लोकसभा निवडणुक २००९: दक्षिण भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज
💬 प्रतिसाद
(3)
भ
भास्कर केन्डे
Wed, 03/04/2009 - 21:22
नवीन
पहिल्या दोन लेखांत न वापरलेले प्रस्तावना तंत्र या लेखात वापरले गेल्याने क्लिंटन यांचे मताधिक्य वाढले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे क्लिष्ट वाटणारे दक्षिणेतले राजकारण (किमान लोकसभा जागांपूरते तरी) थोडेसे समजाण्याजोगे झाले आहे.
आंध्रात भाजपाची स्थिती खराब असणार आहे हे नक्की मात्र ते अगदी शुन्यावरच बाद होतील??!!
जयललितांच्या प्रचंड कोलांट-उड्या, तमिळ वाघांविरोधातली विचारसारणी (जर असेल तर) यामुळे त्यांना आपण म्हणता तेवढ्या जागा मिळतील असे वाटत नाही. कदाचित माझी तमिळ मानसिकता नसल्याने मी ती नाडी ओळखत नाही व माझा अंदाज चुकीचा असू शकतो.
केरळात, आंध्रात, राजस्थानात काँग्रेसच्या जागा वाढल्यामुळे पुन्हा युपीए चे सरकार येणार असे सध्या तरी दिसत आहे. तेव्हा आता तुमचा समारोपाचा लेख काय असेल व एकूनच अंदाज काय असेल याची उत्सुकता लागली आहे.
आपल्या पायाला संभाळून/काळजी घेऊन जमेल तेवढ्या लवकर येऊ द्यात. आम्ही वाट पाहतो आहोत.
आपला,
(वाचक) भास्कर
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 03/06/2009 - 13:43
नवीन
>>पहिल्या दोन लेखांत न वापरलेले प्रस्तावना तंत्र या लेखात वापरले गेल्याने क्लिंटन यांचे मताधिक्य वाढले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे क्लिष्ट वाटणारे दक्षिणेतले >>राजकारण (किमान लोकसभा जागांपूरते तरी) थोडेसे समजाण्याजोगे झाले आहे.
धन्यवाद.
>>आंध्रात भाजपाची स्थिती खराब असणार आहे हे नक्की मात्र ते अगदी शुन्यावरच बाद होतील??!!
राज्याच्या राजकारणात भाजपला फारसे स्थान नाही. १९८४ मध्ये भाजपचे लोकसभेत अवघे दोन खासदार निवडून आले.खुद्द अटलजींचाही पराभव झाला.त्या दोन पैकी एक होते गुजरातेतील पालनपूरचे ए.के.पटेल आणि दुसरे आंध्र मधील हणमकोंड्याचे सी.जंगा रेड्डी. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुढे १९९१ ते १९९६ या काळात पंतप्रधान असलेल्या पी.व्ही.नरसिंह रावांचा पराभव केला. राव महाराष्ट्रातील रामटेकमधून निवडून आले होते आणि ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात परराष्ट्रमंत्री होते. जून-जुलै १९८४ मध्ये इंदिरा गांधींनी राज्यपाल रामलाल यांना हाताशी धरून एन्.टी.रामारावांना मुख्यमंत्रीपदावरून काढायचा जो खेळ खेळला त्याविरूध्द राज्यातील जनमत तापले होते. इंदिरा हत्येनंतरची सहानुभूतीची लाट पूर्ण देशात पसरली पण या कारणामुळे आंध्रमध्ये मात्र काँग्रेसचा मोठा पराभव झाला. १९८४ ची निवडणुक भाजपने तेलुगु देसमबरोबर युती करून लढवली. त्याचा फायदा पक्षाला झाला.
१९८९ मध्ये पक्षाची पाटी लोकसभा निवडणुकीत राज्यात कोरीच राहिली. पक्षाचे काही आमदार (हाताच्या बोटावर मोजता येतील इतके) स्वत:च्या लोकप्रियतेवर निवडून गेले पण राज्यात पक्ष बळकट नव्हता.
१९९१ च्या लोक्सबहा निवडणुकीत पसरलेल्या ’रामलाटेचा’ फायदा भाजपला मुख्यत्वे उत्तर प्रदेशात आणि गुजरातेत झाला. पण नर्मदेच्या खाली दक्षिणेत कर्नाटकात ४ जागा आणि आंध्र प्रदेशात एक जागा असा रामलाटेचा चमत्कार होता. भाजपने राज्यात स्वबळावर जिंकलेली एकमेव जागा म्हणजे सिकंदराबाद. ही जागा पक्षाचे नेते बंडारू दत्तात्रय यांनी जिंकली.१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपची पाटी परत कोरीच राहिली.
१९९८ मध्ये भाजपने लोकसभा निवडणुका तेलुगु देसमच्या लक्ष्मीपार्वती गटाबरोबर युती करून लढवल्या. लक्ष्मीपार्वती गटाचा एकही खासदार निवडून आला नाही पण भाजपने मात्र चार जागा जिंकल्या. केंद्रात वाजपेयींचे सरकार स्थापन होताच विश्वासदर्शक ठरावासाठी भाजपला चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगु देसमची गरज पडली आणि भाजपने लक्ष्मीपार्वती गटाबरोबरची युती तोडून नायडू गटाबरोबर युती केली. त्यानंतर लक्ष्मीपार्वती राज्याच्या राजकारणातून हद्दपार झाल्या त्या आजवर.
१९९९ मध्ये भाजपने तेलुगु देसम बरोबर युती करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या.या युतीने दोन्ही निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केले. राज्यात पूर्वीपासून भाजपची स्वत:ची १०-१२% मते होतीच.पण त्या मतांच्या जोरावर स्वबळावर विजय मिळवणे पक्षाला शक्य झालेले नव्हते. ते तेलुगु देसमची साथ मिळाल्यामुळे शक्य झाले. भाजपचे ७ खासदार आणि २६ आमदार राज्यातून निवडून आले. पक्षाचे बद्दम बाल रेड्डी यांनी एम्.आय.एम च्या ओवैसींना जोरदार टक्कर दिली.
२००४ च्या निवडणुकीत नायडूंना प्रस्थापितविरोधी मताचा सामना करावा लागला.त्यात दोन्ही पक्षांचा जोरदार पराभव झाला. लोकसभेत पक्षाचा एकही खासदार राज्यातून निवडून आला नाही.
तेव्हा भाजपने राज्यातून स्वबळावर लोकसभेची जागा जिंकली आहे ती एकदाच १९९१ मध्ये आणि ती म्हणजे बंडारू दत्तात्रयांची सिकंदराबाद. यावेळी चंद्रबाबू कम्युनिस्टांबरोबर निवडणुक लढवणार आहेत. तेव्हा भाजपला कोणीही साथिदार नाही. या परिस्थितीत भाजपला स्वबळावर यश यायची शक्यता जरा कमीच आहे. करीमनगरमधून माजी केंद्रिय मंत्री के.विद्यासागर राव चांगली मते घेऊ शकतील पण ते इतर कोणाच्याही मदतीशिवाय निवडून येतील ही शक्यता जरा कमी वाटते.
>>आपल्या पायाला संभाळून/काळजी घेऊन जमेल तेवढ्या लवकर येऊ द्यात. आम्ही वाट पाहतो आहोत.
पुढचा लेख आज रात्रीपर्यंत नक्की. आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 03/06/2009 - 13:38
नवीन
घाईत हैद्राबाद शहरातील एम.आय.एम. या पक्षाचा विचार करायला विसरलो. हैद्राबाद- सिकंदराबाद या जुळ्या शहरात हैद्राबादमध्ये मुस्लिम बहुसंख्या आहे तर सिकंदराबादमच्ये हिंदू.हैद्राबादच्या मुस्लिमांचा एम.आय.एम. हा पक्ष आहे. या पक्षाचे विधानसभेत ४-५ आमदार प्रत्येकवेळी निवडून येतात तसेच लोकसभेची हैद्राबादची जागा हा पक्ष गेल्या अनेक निवडणुकांत जिंकत आला आहे.पक्षाचे सुलतान सलाहुद्दीन ओवैसी हे अनेक वर्षे तेथून निवडून येत असत.पण २००४ मध्ये त्यांचा मुलगा निवडून आला आणि यावेळीही तोच निवडून येईल असे वाटते. तेव्हा राज्याच्या निकालाच्या अंदाजात पुढील बदल करत आहे.
एकूण जागा: ४२
तेलुगु देसम: १८
तेलंगणा राष्ट्र समिती: ५
भारतीय कम्युनिस्ट पक्ष: २
काँग्रेस: १४
प्रजाराज्यम: २
एम.आय.एम: १
---विल्यम जेफरसन क्लिंटन
- Log in or register to post comments