परा... साक्षात भगवद्गीतेचे हे विडंबन... ते सुद्धा इतके जुने... म्हणजे सगळ्या विडंबकांसाठी २ चांगल्या गोष्टी...
०१. विडंबनातून भगवद्गीता / व्यास (कोण रे तो फोकलिचा म्हणतोय त्यांना ;) ) सुद्ध सुटले नाहीत. तर बाकिच्यांनी उगाच ओरडू नये...
०२. विडंबनाला फार जुनी प्रंपरा (शब्द बरोबर लिहिला आहे ना. काय आहे आज हात कापत आहेत जरा) आहे.
काय बोल्तो?
बिपिन कार्यकर्ते
क्रांतीताई, हा खजिना शोधून आम्हा विडंबनपंथीयांसमोर ठेवल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितुके थोडके!! :) :)
विडंबनकलेचा उगम बराच जुना आहे हे ह्यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
साक्षात गीतेचे इतके सुंदर विडंबन करणारे हे उपाध्येबुवा आम्हाला जणू म्हणताहेत "जस्ट डू इट!" ;)
चतुरंग
फार मस्तं.. एकदम मजेदार :)
हे विडंबन साधारण किती साली केले गेले असावे? ज के उपाध्ये कोण..त्यांचे इतर लेखन काय आहे याबद्दल जाणून घ्यावेसे वाटत आहे.
-- लिखाळ.
संगीतबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'विसरशील खास मला' हे गीत लिहिणारे ज.के.उपाध्ये.
http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/J%20K%20Upadhye.htm
पण त्यांचे अजूनही साहित्य नक्कीच असावे. अधिक माहिती आवडेलच.
(त्यांनी विडंबने मूळ नावानीच केली की टोपणनावाने?)
चतुरंग
जयकृष्ण केशव उपाध्ये {१८८२-१९३७}
माझ्याकडे त्यांची उपलब्ध असलेली माहिती अशी आहे - एकीकडे ते परमेश्वरभक्तीची गीते आणि लोकमान्यांसारख्या विभुतींची चरित्रे गाण्यात तल्लिन होतात, तर दुसरीकडे कमालीच्य मिस्किलतेने विनोदी काव्यलेखनातही प्रसन्नपणे रंगून जातात. तल्लख बुद्धिमत्ता आणि सूक्ष्म निरिक्षणशक्ती यामुळे त्यांच्या विनोद्-विडंबनात्मक कवितांना विशेष रंगत चढते. अशा वैशिष्ट्यांमुळेच त्यांचे लेखन मोजके असूनही ते रसिकांच्या लक्षात राहिले आहे.
उपाध्ये यांच्या इतर कविता तसेच साहित्य याच्या शोधात मी आहेच. इतरही कुणाला काही मिळाल्यास अवश्य सांगावे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
विडंबनाच्या प्रंपरेबद्दल (बिकांकडून साभार) सगळ्यांनी लिहिलेच आहे वर.
त्यात आणखी एक खास बात जाणवते ती म्हणजे गीतेचा मूळ आशय कायम ठेवत विडंबन केलेलंय!! ;;)
खूप खूप आभार!
राघव
:H सगळ्या मित्रांना धन्यवाद. खर तर "फोडिले भांडार | धन्याचा हा माल | मी एक हमाल | भारवाही |" अजून काही नवी माहिती किंवा या काव्याच्या पुढील भागाबद्दल माहिती मिळाली तर अवश्य देईन.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
या विडंबनाचे पुढचे अध्याय कवि. ज. के. उपाध्ये यांना लिहायचे होते, पण ते होऊ शकले नाही. मात्र याच रचनेत आणखी दोन चरण आहेत, ते अलिकडेच वाचनात आले.
अर्जुनाच्या
लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
यापुढच्या दोन ओव्या अशा आहेत :
मग बायका बोंबलती घरी | डोई बोडून करिती खापरी [केशवपन प्रथेचा संदर्भ असावा इथे]
चाल चाल कृष्णा माघारी | सोड पिच्छा युद्धाचा
अरे, आपण मेल्यावर | घरच्या करतील परद्वार
माजेल सारा वर्णसंकर | आहेस कोठे बाबा
अगं जे असेल ते ... तुझा ब्लॉग शोधला .. मिळाला नाहि. .
तु लिहिलेलं बरच वाचायचं असतं .. मग धाग्याची वाट बघत बसावं लागतं :(
थोडसच पण उत्क्रुष्ट लिहितेस .. मला आवडतं .. मनापासुन दाद द्याविशी वाटते ..
समोर चित्रं उभी रहातात तुझ्या ओळीतुन .. आवडतं मला .
ही एक मस्त उपरोधिक रचना मिळाली ज. के. उपाध्ये यांची.
कविते! करिन तुला मी ठार ||धृ ||
पूर्व कवींनी तुज रस पाजुनि मस्त बनविले फार
रस बिस आता मम साम्राज्यी काहि न तुज मिळणार
.......पदलालित्ये जना भुलविले केले नाना चार
भावाची बहु हाव तुला परि अभाव तुज करणार
नादातचि रंगुनी गुंगविसि रसिका करिसी गार
नाद तुझा तो नष्ट कराया समर्थ मी साचार
समृद्ध अर्थे असा मिरविला आजवरी बडिवार
अर्थाचा परि लेश यापुढे तुजला नच मिळणार!
कृष्ण म्हणे अर्जुना | काढ तंबाखु लाव चुना ||
त्याविण माझी सुस्ती जाईना ||
मला वाटायचं कि या ओळी उपाध्यांच्या विडंबनातल्या आहेत. पण तसं नाहि आहे तर.
अर्धवटराव
हा इतका जुना धागा नजरेतून कसा सुटला कोणास ठाऊक! पण ही कविता आहे असे समजल्यावर अनेक वर्षे शोधत होतो पण मिळाली नव्हती. आता गावाला वळसा घालून झाल्यावर मिळाली! :-)
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
हाहाहाहा...
१९८५ च्या सुमारास या कवितेच्या काही ओळी ऐकल्याचे स्मरत आहे.
बहुधा वृत्तपत्रात एक टिकात्मक लेख आला होता, असेही पुसटसे आठवते.
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?
अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;
या ओळी अजूनही आठवणीत आहेत. :)
कालच्या पिकनिक मध्ये मित्राने हे विनोद सांगितले
१] उपाध्ये त्यांच्या मित्राकडे गेले असताना मित्राने मोलकरणी मार्फत कळवले की तो बाहेर गेला आहे
हा मित्र काही दिवसांनी त्यांचे घरी आला तेव्हा उपाध्येनी घरातून ते बाहेर गेल्याचे सांगितले
मित्र म्हणाला कमाल करतोस . तू स्वताच बाहेर गेलास असे खोटे का सांगतोस ?
उपाध्ये म्हणाले '' मी मित्राच्या मोलकरणीवरही विश्वास ठेवतो आणि तू खुद्द मित्रावर अविश्वास दर्शवतोस ?"
२] उपाध्ये यांची गंमत करण्यासाठी त्यांचा मित्र म्हणाला
'' काल मुलगी म्हणत होती कुणीतरी पाध्ये मला भेटण्यास आले होते ''
'' म्हणजे ऊ तिच्या डोक्यातच राहिलेली दिसते '' उपाधेंचे उत्तर .
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी