मराठी चित्रपटातील संवादच दळीद्री?
💬 प्रतिसाद
(70)
म
मैत्र
Fri, 03/13/2009 - 09:53
नवीन
संवादाचा भारदस्त पणा आणि परिणामकारकता हिंदी मध्ये जरा काकणभर जास्त आहे असं वाटतं..
त्यामुळे ते शब्द, डिक्शन ( मराठी ?) लक्षात राहतं...
- Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर
Fri, 03/13/2009 - 10:35
नवीन
मी एकदा मराठी वर्तमान्पत्रान्तील पत्रकारान्चा मोर्चा पाहिला होता. आता ते तर सगळे मराठी . त्यान्ची मीठ भाकर मराठीवर अवलम्बून. पण त्यान्च्या घोषणा मात्र ," लेके रहेंगे, नही चलेगी, झिन्दाबाद, मुर्दाबाद" अशा. मी एकाला त्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला की मराठी घोषणान्मध्ये काही punch (हा त्याचाच शब्द) नाही.
- Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर
Fri, 03/13/2009 - 06:28
नवीन
भरपूर आहेत मराठी चित्रपट संवाद लक्षात राहण्यासारखे. वर अनेकांनी नमूद केल्यानुसार मराठी संवादांचा बाज वेगळा आहे-- शाब्दिक कोट्या, प्रासंगिक, तिरकस विनोद ई.ई. त्यांची हिंदीशी तुलना करणे काय आणि उझबेक्/जपानी चित्रपट संवादांशि तुलना करणे काय सारखेच होईल!
(मला व्यक्तीशः हिंदीपेक्षा मराठी सिनेमे आवडतात कारण त्यातले अफाट संवाद!)
काही उदाहरणे:
"सामना": निळू फुले म्हणतात" अरे मास्तरांना दूध भातात साखर घालून दे"
"कायद्याचं बोला": "तुला माणूस म्हणावं तर अक्क्ल नाही आणि गाढव म्हणावं तर शेपूट नाही".
"दे दणादण": महेशः "लक्ष्या, ही आवडी--गुराप्पांची मुलगी." लक्ष्या: "गुराप्पांच्या गोठ्यात्ली आहे होय?!"
पछाड्लेला: जखमी भरत जाधवः सौंदर्याचा आटमबोंब फुट्ला डोळ्यावर (सौंदर्याच्या वडिलांनी मारल्यानंतर)
- Log in or register to post comments
स
सालोमालो
Fri, 03/13/2009 - 06:43
नवीन
धुमधडाका मधली लक्ष्याच्या तोंडची वाक्ये:
१. भूत आया भागो भागो , हेच ते भूत!
२. पापा, टा़ळी वाजवा ना!
३. अहो पपा, मी हीच्यावर बलात्कार करत होतो. तुम्ही मधेच येउन तो कट केलात.
४. कॅमेरामन डोळस, डोळस, ए डोळस!
अजून खूप वाक्य आहेत. जय महाराष्ट्र!
सालो
- Log in or register to post comments
उ
उपटसुंभ
Fri, 03/13/2009 - 08:13
नवीन
"वजीर" मधील एक जबरदस्त वाक्य -
कुलदीप पवार विक्रम गोखलेना म्हणतात - आता तुम्ही चौकटीत बंदीस्त असलेले राजे नाही, तर पटाच्या चारही कोपर्यात धुमाकूळ घालणारे वजीर आहात वजीर..
"सरकारनामा"मध्ये
यशवंत दत्त प्रभावळकरांना म्हणतात - अण्णा, मेजवानीला बोलवायला आलोय. बोकड कापायचाय बोकड..
याच प्रसंगात पुढे यशवंत दत्त म्हणतात - अण्णा, तुमच्या कालच्या खेळीनं आमचा केसबी वाकडा झालेला नाही. आणि तुमच्या त्या *****ला धाडून दिलाय नरकाच्या वाटंला.
त्यावर प्रभावळकर - असू दे. पहिला डाव भूताचा म्हणून सोडून देऊ आम्ही. बाकी कोकणात गेल्यावर तो फुरसं चावून मरणारच होता. माझं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतलंत याबद्दल तुमचा आभारी आहे सी.एम.
यशवंत दत्त -- अण्णा, तुला हिथं गाडीन.
प्रभावळकर -- गाडा. तुमचा पाहुणा म्हणून आलोय. तुमच्या पाहूणचाराची ही पद्धत असेल तर खुशाल गाडा. बाहेर पत्रकार वाट बघतायत.
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Sat, 03/14/2009 - 10:23
नवीन
दोन दिवस मिपा वर वाचनमात्रच येत होतो, आता प्रतिक्रिया लिहिण्यास वेळ मिळाला.
तात्या, मी तो धागा सूरू केला तेव्हाच विचार होता की कोणत्याही चित्रपटांतील वाक्ये लिहावीत. म्हणून मी ही लेखाच्या नावात हिंदी टाकले नव्हते. पण लिहिता लिहिता लक्षात आले की मी ही मराठी पेक्षा हिंदी सिनेमाच जास्त (आणि जास्त वेळा) पाहिले आहेत. त्यामुळे माझ्या लेखातही हिंदी सिनेमांचीच वाक्ये जास्त आहेत. आणि त्यातल्या त्यात त्याच ओघात त्या लेखाच्या दुसर्या भागाच्या शेवटी 'आपण हिंदी सिनेमा पाहतोच ' असेच वाक्य आहे ;)
आता हेच सर्वसाधारणपणे दिसत असेल कारण हिंदी सिनेमांची छाप जास्त पडली आहे. तरी त्यामुळे मराठी सिनेमांतील संवाद दळिद्री आहेत असे नाही म्हणता येणार. वर अभिजीत आणि चंद्रशेखर गोखले ह्यांनी लिहिलंय त्याच्याशी मी सहमत आहे. त्यांनी लिहिल्याप्रमाणे हिंदी आणि मराठी सिनेमांच्या सादरीकरणात खूप फरक होताच. हिंदी सिनेमातील कथा/संवाद हे आधीच थोडेसे उदात्तीकरण केलेले असते. मराठी सिनेमांचे तसे नव्हते. तसा आता त्यांत फरक पडत चालला आहेच.
फक्त 'संवादांचा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही' ह्या मताशी मी असहमत आहे. जर संवादाला महत्व नसते तर 'आलम आरा' बनलाच नसता :) आणि मध्ये आलेला कमल हासनचा 'पुष्पक' हाच बाजी मारून गेला असता. ह्म्म, तेवढ्या एका कारणाने मग आपण कोणत्याही देशात बनलेला सिनेमा पाहू शकत होतो. :)
असो, बाकी मराठी सिनेमांतील म्हणायचे तर,
सरकारनामा मधील
१. ह्याचा सत्कार करा.
२. तुमचे सावरता सावरता आमचे निसटायची वेळ आली आहे. (शब्द वेगळे असू शकतात)
३. अण्णा, तुला हिथं गाडीन
४. बोकड कापायचंय, बोकड.
ही यशवंत दत्त ह्यांची वाक्ये त्यांच्या संवाद शैलीमुळे नेहमी लक्षात राहतील.
तसेच झपाटलेला मधील 'तात्या विंचू म्हणत्यात मला' हेही एक वाक्य आहे.
- Log in or register to post comments
द
दिपोटी
Sun, 03/15/2009 - 08:29
नवीन
चित्रपट : सिंहासन
प्रसंग : एका गझलनवाजाची मैफिल ... नुकतीच सुरु झाली आहे व चांगलीच रंगात सुध्दा आली आहे ...
राज्याचे मुख्यमंत्री (अरुण सरनाईक) या नुकत्याच सुरु झालेल्या मैफिलीत त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या पहिल्या रांगेतील खुर्चीत येऊन बसतात. दोन-चार मिनिटे एखाद्या दर्दी श्रोत्याप्रमाणे अगदी मान डोलावून व तल्लीन होऊन 'क्या बात है' अशी दाद दिल्यावर मग थोड्या वेळाने ...
मुख्यमंत्री (शेजारील सरकारी अधिकार्यास) : हे कोण ... गुलाम अली वाटतं ?
अधिकारी : नाही नाही, हे मेहदी हसन.
मुख्यमंत्री (अंमळ बेफिकीरपणे) : हां हां, म्हणजे तेच ते.
मुरलेल्या व मुरब्बी अशा राजकारण्यांचा हा भंपकपणा / संभावितपणा फक्त दोन-तीन वाक्यांत नेमका व अचूक दर्शवणे हे फक्त तेंडुलकरच करु जाणोत.
- दिपोटी
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 03/17/2009 - 09:05
नवीन
माझ्या मते तो प्रसंग अरुण सरनाईक यांचा नसुन , श्रीराम लागु हसन नावाच्या पक्ष सोबत्याच्या घरी विरोधकांची मिटिंग घेतात तेंव्हा जेवण चालु असतानाच आहे ! गंमत म्हणजे ह्या मुस्लिम सहकार्याची बायको प्रत्यक्षात दाखवली नाहिये, ह्याच्या घरातुन निघताना डॉ. लागु तीचा निरोप घ्यायला जातात तेंव्हा ती फक्त दाराच्या आतुन बोलताना दाखवली आहे, आणी तो आवाज रीमा लागु ह्यांचा आहे हे लगेच लक्षात येते.
प्रसाद मुजावर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
द
दिपोटी
Tue, 03/17/2009 - 23:56
नवीन
परा,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मात्र मी वर्णिलेला प्रसंग हा माझ्या मते कोणाच्या घरी घडलेला दाखवला नसून प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या एका प्रेक्षागृहात घडलेला दर्शवला आहे. अरुण सरनाईकांच्या तोंडचा हा संवाद इतक्या वर्षांनंतर आजही माझ्या चांगल्याच आठवणीत आहे.
- दिपोटी
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sun, 03/15/2009 - 08:07
नवीन
आपल्या एका मिपाकराची पंचलाईन हा श्यामची आई या चित्रपटातला संवादच आहे.
"पायाला घाण लागू नये म्हणून ......."
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Mon, 03/16/2009 - 05:16
नवीन
१) बाबा लगीन !!!!~~~~~~~!!!!!
धींगच्याक ढीच्यांग ढींगच्याक ढीच्यांग !!!!!
नवरा आला वेशी पाशी !!!!! =))
२) दुर्गे सूड !!!!! ~~~~~~~!!!!! ;-)
३) मालक बरोबर ना मालक @@@!!!
३)डोळे बघ डोळे बघ !!!! ;-)
इती- पछाडलेला !!!!
४) कित्ती बोलतात रे ह्या बायका !!! ;-) इती - अग बाई अरेच्या !!
५)ये झेमण्या !! ;-) इती - गोलमाल (मराठी)
६)बोला कधीपासुन येताये पापड लाटायला ,सकाळी एक चहा ,दोन टाइम वडापाव आणी दिवसाला २० रुपये !! ;-) इती -जत्रा !!!
७) ओ ~~ ओ !! =)) इती -जत्रा!!
८) आरे ये मास्तुरड्या !! :-) इती - पिंजरा !!!
अजुनही बरेच संवाद आहेत ,पण टंकायचा जाम कंटाळा आलाये ......;-)
(केदार शिंदेचा पंखा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
उ
उपटसुंभ
Mon, 03/16/2009 - 05:39
नवीन
"ऑफिसर, थोडा वेळ खिडकीत बसलो तर चालेल ? अख्खं आयुष्य गेलं या चौथ्या सीटवर..!"
"ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत त्या प्रश्नांवरच फुली मारायची..!"
- Log in or register to post comments
अ
अ-मोल
Mon, 03/16/2009 - 11:52
नवीन
गोळीबंद संवादासाठी एकदा तरी वाचायलाच हवे!
- Log in or register to post comments
क
केदार_जपान
Tue, 03/17/2009 - 03:27
नवीन
माझ्या मते, मराठी सिनेमा मधे खूपशे लक्षात राहण्यासारखे संवाद नाहीत पण त्याची कसर मराठी नाटकानी पुरेपुर भरुन काढली आहे असे वाटते....आणि मराठी रंगभुमी ही अजुनही आपल्या देशात एक नंबर आहे असे मला तरी वाटते... :)
मला काही लक्षात राहिलेले मराठी नाटकांतले संवाद,
१. अरे हाय काय आणि नाय काय ---- प्रशांत दामले..गेला माधव कुणिकडे
२. मीच तो...मीच तो ----- यदा कदाचित मधली पात्रांची यंट्री..
३. अरे दारु म्हण्जे काय रे भाउ?? ------ वार्यावरची वरात... (पुल खरच महान :).. हा प्रसंग मी जेव्हाही पहतो तेव्हा गडाबडा लोळल्याशिवाय रहात नाही )
अजुनही ऍड करावे किन्वा वेगळा धागा सुरु करा ;)
------------------------
केदार जोशी
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Tue, 03/17/2009 - 06:40
नवीन
यदा कदाचित मधला एक प्रसंग :
कोणीतरी म्हणते : देवा मला पाव
भिम : हे घे बारा पाव
- Log in or register to post comments
म
मी असाकसा वेगळ…
Tue, 03/17/2009 - 07:40
नवीन
द्रौपदिचा भाऊ : येथे जमलेल्या माझ्या मेव्हण्यांनो....
कोणीतरि : अरे तुम्ही द्रौपदिचा सामुदायिक विवाह मांडला काय?
- Log in or register to post comments
क
केदार_जपान
Tue, 03/17/2009 - 08:34
नवीन
यदा-कदाचित मधला अजुन एक..
भीम : मी दुर्योध्नाच्या तंगड्या तोडु... (अश्याच अर्थाचे एक वाक्य)
धर्मराज - नाय्-नो-नेव्हर
ते एवढे लोकाना पाठ होते, कि शेवटी धर्म्राज नुसते हात्-वारे करतो...आणि पिटातले लोकच म्हणतात हे वाक्य....भन्नाट्च एकदम :)
- Log in or register to post comments
भ
भिडू
Tue, 03/17/2009 - 08:39
नवीन
वारयावरची वरात मधला....
श्रीकांत मोघे:-हा आहे रिदम...
पु.ल.-अहो तुम्हि मगाशी याचे नाव कदम म्हणालात....
श्रीकांत मोघे:- जो वाजवतो तो कदम.... जे वाजवतो तो रिदम.....
अजुन एक
"दारु म्हणजे काय रे भाउ"
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 03/17/2009 - 14:49
नवीन
मला वरिल सर्वेच्या सर्व आवडतात्..पण "वजीर" मधल
"लख्तर करीन लख्तर "
हे खास आवडत
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 03/25/2009 - 09:44
नवीन
सरकारनामा : सत्कार करा रे यांचा
वजीर : लक्तरं करीन लक्तरं
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2