आवडल्या, सर. दुसरी आणि तिसरी विशेष आवडली. पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना? तसा स्पष्ट उल्लेख हवा, हे माझं वैयक्तिक मत. उगाच कुणाला बोट ठेवण्याची संधी देता कामा नये.
>>पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना?
हो, आता 'तुर्तास' शोधल्यावर लक्षात आले, वरील पहिल्या कडव्यांचे 'मिपाकरण' झाले असे समजावी इतकी ती सारखी उतरली आहे. मात्र दासुंची संपूर्ण कविता वेगळ्या आशयाची आहे आणि दुर्दैवाने तशाच कल्पनेच्या नादात (मिपावरील निवासी /अनिवासींच्या चक्रात)तसेच शब्द उतरल्यामुळे सदरील कवितेवरुन आली आहे, उचलली आहे, असे वाटण्यापेक्षा...सदरील कविता वगळत आहे. नंदन आभारी !!!
-दिलीप बिरुटे
सारेच रस्ते गूलाम निलाम झालेले,
श्वानपुच्छ .
एक-दोन-तीन-चार म्हणताच जयजयकार करणारे,
एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.
ही कविता मास्टरपीस आहे.
कवि बिरुटे चांगलाच दमदार आहे.
काळं बेट, लाल बत्ती - ह्या नाटकाच्या शेवटाची.
गुप्त खजिन्याच्या हव्यासापोटी इतर माणसांची हत्या करणार्या माणसाला शेवटी खजिना सापडतो आणि तो म्हणजे -
"बुध्दाच्या शांततेच्या संदेशाचे भूर्जपत्र "
एखादाच रस्ता असतो
गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला,
बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.
सॉलिट्ट्ट्ट्ट
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
वा .. कविता छान आहेत. बुद्धाची विशेष !
पहिल्या कवितेत कल्पना छान आहे. पण अनिवासी घरटी वगैरेने वेगळे वळण लागले असे वाटले. ते तसे पटले सुद्धा नाही. (किंवा मला समजले नाही)
अजून कविता वाचायला आवडतील.
-- लिखाळ.
आवडली.
दुसरीही त्याच्यापाठी.
(पहिली सशक्त असून आवडली नाही. वर काही जणांनी सांगितल्यामुळे "ते परप्रकाशामुळे असावे" असे वाटते - पण मूळ कविता मी वाचलेली नाही.)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी