>>ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...>>
हे खास!
>>भरून गेली किल्बिल सारी>>> आसमंती किलबिल खुलते असं केलं तर? चूकभूल क्षमस्व. :)
आहे कवितेचा :)
>> ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...
आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे,
राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत...
>>
या ओळी विशेष आवडल्या.
सुवर्णाचे नाजूक तुरे ही कल्पना तर खासच आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
सुंदर अति सुंदर काव्य.आवडलं.
कसं जमतं तुम्हाला असं लिहायला..तुमची कविता वाचली की माझी कविता मला पुचाट वाटते !
इति...
ह्या कुतूहलाचं उत्तर मला असं वाटतं,ते कसं ते,
(सांगत्ये) सांगतो ऐका!
उघडून गोदाम शब्दांचे
ती मांडणी सुरेख करीते
शब्दां मागून शब्द येती बळे
ते तिला कसे ते नकळे
प्रतिभा उरी धरूनी
ती गीत लिहित जाते
हे भाव स्वप्न अपुले
साकार ती करीते
म्हणून म्हणतो,
नकां विचारू....
कारण तिच्या....प्रेरणेचे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी