>>एक मोठा उद्योगपती याव्यतिरिक्त त्यांचा समाजाशी काय संबंध आहे.
कमीतकमी आजपर्यंततरी डीएस्केनी कोणाला दमदाटी करून एखाद्याची जागा हिरावून घेतल्याचे ऐकिवात नाही. कोणास तसे माहीत असेल तर सांगावे माझे मुद्द्याचा मी परत विचार करेन.
मनुष्य चांगला, धडपड्या आणि कष्टाळू आहे. त्यांची अनेक वर्षापूर्वी मुलाखत ऐकली होती. त्यावरून तरी असे वाटले. त्यांच्या उद्योगातील यशामुळे ते नक्की चांगले प्रशासक होऊ शकतील असे वाटते. पूर्वीचे डिएस्के विश्व आता किती जवळ आले आहे ते त्या भागाचा आता झालेला विकास(?) पाहीला की वाटते.
(मी डिसके यांच्या कोणत्याही गृहप्रकल्पार रहात नाही किंवा स्वस्तात घर देतो असे त्यानीही मला सांगितलेले नाही)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
आमच्याकडे मतदान उद्या आहे.
मी व्यक्ती पाहून मत देणार आहे. कारण मला अजून असा कोणताहि पक्ष वाटत नाहि ज्याला स्वतःची "ठाम" विचारधारा आहे. जर सगळे पक्ष वेळप्रसंगी एकमेकांसारखे वागणार असतील तर मत देण्यासाठी उरतात त्या व्यक्ती.
माझे निकष:
व्यक्तीने मतदारसंघातील जनतेसाठी काहि काम केलं आहे का?
त्याच्या योजना काय आहेत?
मुंबईसाठी तो काय करेल/करतो?
माझ्या मतदार संघातील प्रश्न तो जाणतो का? त्यावर त्याच्याकडे काहि उपाय आहेत का?
माझ्या भागाचं प्रतिनिधीत्त्व दिल्लीत तो करू शकेल का?
देशाला त्या व्यक्तीला निवडून देऊन कोणत्याहि प्रकारचा धोका / अपाय होण्याची शक्यता आहे का?
माझ्यापुरतं तरी उमेदवाराचे वय, लिंग, पुस्तकी शिक्षण, जात, धर्म या गोष्टींना विषेश महत्त्व नाहि
ऋषिकेश
आम्ही राजसाहेबांवर विश्वास ठेऊन बाळा नांदगावकरांनाच मत दिले आहे
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
चांगली चर्च्या रंगली आहे...
मता चे दान देण्यासाठी मत आसायेला पाहिजे, आणि आमच्या मतांच्या "चिंदठ्या" या राजकारणी लोकांनी केव्हाच केल्या आहेत !! मत कोणलाही द्या... आमच्या (सामांण्ये लोक) मतांचा कधी विचारच झाला नाही... होइल असे वाटत पण नाही....कोणी ही निवडुन आला तरी माझ्या बापाला काय मिळ्णार??? ऊगा कश्याला ऊन्हात तास दोन तास उभा राहच्ये म्हणतो मी !!
आत्ताच मत देऊन आलो. सगळ्या उमेदवारांची यादी काळजीपूर्वक वाचली. मग फक्त राष्ट्रीय पक्षांवर लक्ष केंद्रित केले. कारण केंद्रात फक्त राष्ट्रीय पक्षच असावेत अशा मताचा मी आहे. शेवटी जो पक्ष बहुमताच्या जवळ येईल असे वाटले व ज्याचा उमेदवार गुन्हेगार नाही अशा पक्षाला मत दिले.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
मत द्यावे न द्यावे असा विचार करत शेवटी मतदान करून आलो.
आमच्या भागातील त्यातल्या त्यात चांगला वाटलेल्या उमेदवाराला.
(गेले काही दिवस मिपाची धावती भेटच व्हायची. त्यामुळे हा धागाही नीट वाचता आला नाही.
ह्याबाबतील माझे विचार अनुदिनीवर टाकल्यानंतर हा पुन्हा वाचनात आला. म्हणून पुन्हा इथे न लिहिता त्याचा दुवा देतो. )
मी ह्यावेळी पक्ष पाहुन मतदान केले.. पक्ष नविन आहे, काहीतरी वेगळे करेल अशी आशा आहे, पण त्याने माझ्या भागात उभ्या केलेल्या उमेदवाराचे नावही मी आधी ऐकले नव्हते.. (आणि ज्यांची ऐकलेली त्यांची नावे काही वर्षांपुर्वी पेपरात खुन वगैरे प्रकरणी वाचलेलीही)
पक्ष मी आधीच ठरवलेला, त्यामुळे त्याच्या उमेदवारापुढे बटन दाबुन मोकळे झाले.. :)
साधना
या वेळी मतदान आमच्या विभागातील उमेदवारांचा विचार न करता, पंतप्रधान पदाचा उमेदवार डोळ्यापुढे ठेऊन केले.......!!!!
--------------------------------------------------------------------------------------------
अवधुत
अन धन्यवाद देवाचे...
या वेळी मतदान आमच्या विभागातील उमेदवारांचा विचार न करता, पंतप्रधान पदाचा उमेदवार डोळ्यापुढे ठेऊन केले.......!!!!
--------------------------------------------------------------------------------------------
अवधुत
अन धन्यवाद देवाचे...
- व्यक्तीने मतदारसंघातील जनतेसाठी काहि काम केलं आहे का?
- त्याच्या योजना काय आहेत?
- मुंबईसाठी तो काय करेल/करतो?
- माझ्या मतदार संघातील प्रश्न तो जाणतो का? त्यावर त्याच्याकडे काहि उपाय आहेत का?
- माझ्या भागाचं प्रतिनिधीत्त्व दिल्लीत तो करू शकेल का?
- देशाला त्या व्यक्तीला निवडून देऊन कोणत्याहि प्रकारचा धोका / अपाय होण्याची शक्यता आहे का?
माझ्यापुरतं तरी उमेदवाराचे वय, लिंग, पुस्तकी शिक्षण, जात, धर्म या गोष्टींना विषेश महत्त्व नाहि ऋषिकेश