नशिबवान आहात भोचक साहेब.
राम शेवाळकरांच्या भाषणांनी वेड लावलं होतं. त्यांचा "रावण" ऐकला.. बिभिषण ऐकला.. रावणाकडे एक दैत्य म्हणून न बघता, एक प्रजेचे कल्याण चिंतणारा राजा म्हणून पहायची दृष्टी शेवाळकरांच्या वाणीने दिली.
आपला आठवणींचा छोटेखानी लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
श्रीमंती यापेक्षा काही वेगळी असते का?
- अगदी. पूर्णपणे सहमत आहे. मनापासून लिहिलेला हा लेख अतिशय आवडला. राम शेवाळकर जेव्हा काही वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या संमेलनात अध्यक्षीय भाषणाआधी लताबाईंनी पसायदान गायले होते. ज्ञानेश्वरांना सुरांनी आणि शब्दांनी सामान्य मराठी जनतेपर्यंत पोचवणारे हे दोन दिग्गज एकत्र येणे हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल.
लेखाच्या शीर्षकावरून ज्ञानेश्वरीत शोधल्यावर हे दोन श्लोक सापडले. प्रा. शेवाळकरांच्या वक्तृत्वाच्या शैलीला यथार्थ ठरावेत असे -
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।
तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये ।
भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥
नंदन आणि मोडक साहेबांशी अगदी सहमत. हीच खरी श्रीमंती, ह्या आठवणी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील.
खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. एखादं जपलेलं जाळीदार पिंपळपान पुन्हा एकदा पुस्तकातून काढून अलवारपणे पहावं, आणि पिंपळाची सळसळ काना- मनात पुन्हा एकदा रुजून यावी असा झाला आहे लेख.
प्रा. शेवाळकरांचा माझ्या बाबांशी अगदी जवळचा परिचय होता. सोलापूरला आले की ते नेहमीच घरी येत. त्यावेळी ते वणीला होते. त्या लहान वयात साहित्यातलं फारसं काही कळायचं नाही, पण त्यांचं बोलणं लहानांनाही गुंतवून ठेवणारं होतं. रामायण महाभारतातील गोष्टी, संतकथा सांगून ते आम्हाला खिळवून ठेवत. त्यांच्या अक्षर साहित्याप्रमाणेच त्यांचं अक्षर अत्यंत रेखीव, सुन्दर, वळणदार होतं. देवदयेनं आम्हालाही या महान व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाचा लाभ घडला.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
शेवाळकरांची जवळून झालेली ओळख येथे मिपाकरांना पण दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाचा अनुभव सीडी/कॅसेटवर घेतला आहे, तसेच एकदा सभेत पण ऐकलेले होते. मात्र भेटण्याचा योग नव्हता....
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी