Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बालकवी

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/13/2009 - 09:41
💬 30 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
16399 वाचन

💬 प्रतिसाद (30)
अ
अवलिया Wed, 05/13/2009 - 10:19 नवीन
वा ! दिलीपशेट !! सुरेख लेख! येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !! वा !! (दिलीपशेटचा पंखा) अवलिया
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 10:30 नवीन
असेच म्हणतो. कवितेच्या बाबतीत आम्ही दगडच पण तुमचा ओघवत्या भाषेतील लेख वाचायला मस्त वाटले. लेख आवडला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
निखिल देशपांडे Wed, 05/13/2009 - 10:32 नवीन
येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !! असेच म्हणतो हो प्रा.डॉ ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
क
क्लिंटन Wed, 05/13/2009 - 11:38 नवीन
प्राध्यापक साहेब, कविता, ललित साहित्य यासारख्या विषयांपासून खरे सांगायचे तर मी अंतर राखून असतो .पण तरीही आपला लेख खूप आवडला तो आपल्या ओघावत्या भाषाशैलीमुळे आणि त्यातील ’कन्टेन्ट’ मुळे.अगदी आपल्या वर्गात बसल्यासारखे वाटले. असे इतर कवींविषयीही लेख येऊ द्यात. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
न
नंदन Wed, 05/13/2009 - 11:06 नवीन
सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विसोबा खेचर Wed, 05/13/2009 - 10:44 नवीन
सुरेख लेखन... सर, आपल्या व्यासंगाला प्रणाम... तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 05/13/2009 - 16:15 नवीन
हेच बोल्तो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विजुभाऊ Wed, 05/13/2009 - 10:49 नवीन
सुंदर लिखाण. इतकी छान समिक्षा बरेच दिवसानी वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments
व
वडापाव Wed, 05/13/2009 - 10:56 नवीन
आचार्य अत्रे यांच्या या आत्मचरित्रात बालकवींविषयी काही माहिती आली आहे. विशेषकरून त्यांच्या मृत्युच्या वादाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आपण वाचली असेल, तर उत्तमच ! पण माहितीवरून अत्रे हे बालकवींचे देखील भक्त होते असेच वाटते. बाकी आपला लेख छान आहे. माझे सध्या कर्हेचे पाणी याचेच वाचन सुरू आहे. यात गोविंदाग्रजाबद्दल अत्र्यांनी केलेल्या मतप्रदर्शनामुळे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यास मी उत्सुक आहे. आपणाला माहिती असल्यास पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करावी, अशी विनंती. आपला नम्र, वडापाव
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/13/2009 - 11:04 नवीन
भादली स्टेशनावर (भुसावळ आणि जळगावच्या मधे ) रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या पटरीत ट्रॅक बदलतात तिथे पाय अडकून पडल्यामुळे मालगाडी अंगावरुन गेली इतकीच माहिती आहे. त्याव्यतिरिक्त कोणती माहिती आपल्याकडे आहे ? मला उत्सुकता आहे ! अवांतर : पुढे कोणतेही लेखन करणार नाही हो, हेच लेखन अपूर्ण वाटते म्हणून तसे लिहिले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
च
चिरोटा Wed, 05/13/2009 - 11:46 नवीन
अशीच जरा वेगळी माहिती शाळेत शिक्षकानी सांगितली होती.मालगाडीला सिग्नल होता म्हणून थांबली होती.ट्रॅक च्या दुसर्‍या बाजुला त्याना जायचे होते.म्हणून ते डब्याखालून जावू लागले आणि गाडी चालु झाली. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वडापाव Wed, 05/13/2009 - 12:49 नवीन
ही गोष्ट अत्रेंनी लिहीली आहे. यात मी फक्त वाचकाची भूमिका बजावली आहे : ५ मे १९१८ चा तो दिवस होता. खानदेशात भादली स्टेशनजवळ एका सकाळी तो अपघात झाला. स्टेशनपासून काही अंतरावर आगगाडीचे दोन फाटे फुटतात. यांपैकी एका फाट्यावर बालकवी उभे होते. कारण त्या फाट्यावरून जाणारी गाडी आधीच येऊन गेली पाहिजे अशी बालकवींची समजूत होती. पण, त्या दिवशी त्या गाडीला उशीर झाला होता. ती गाडी समोरून येताना बालकवीनी पाहिली. त्यांना वाटले, की ती गाडी दुसर्या फाट्यावरून जाणारी आहे.म्हणून डाव्या हातावर तंबाखू घेऊन तिला चुना चोळीत ते विमनस्कपणे त्या फाट्यावर तसेच उभे राहिले. एवढ्यात ती गाडी एकदम त्यांच्या अंगावर आली आणि तिच्याखाली सापडून त्यांचे तीन तुकडे झाले. पुढे त्यांनी असेही लिहीले आहे की बालकवींना मृत्यु का आला ह्यासंबंधीची एक विलक्षण हकिकत 'बालकवी' चे चरित्रकार श्री. कृ. बा. मराठे यांनी आपल्या पुस्तकात दिलेली त्यांना आढळली. ती येथे सांगितल्यास बालकवींचे चरित्र वाचताना त्याबद्दलची उत्सुकता राहणार नाही, म्हणून येथे मी देत नाही. आपला विनम्र, (अत्रेभक्त) वडापाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/13/2009 - 13:12 नवीन
मृत्यू त्यांचा आपण म्हणता तसेच झाला. त्याबाबतीत इतर हकीकत माहिती नाही, वाचनात ही नाही. पण कोणी ज्योतिषाने त्यांना 'चैत्रातली नवमी घाततिथी असे सांगितले होते 'बालकवी तसे त्या तिथींना डचकूनच असायचे. त्या संबधी एक आठवण वरील पुस्तकात आहेच. ''बालकवींचे पुण्याचे मित्र श्री. भा. नी. सहस्त्रबुद्धे लिहितात, 'बालकवींचा मृत्यू १९१८ साली पाण्यात बुडून किंवा आगगाडीखाली सापडून अपघाताने होईल असे भाकीत केले होते. बालकवींना ते प्रत्यक्ष माहीत नव्हते. मात्र दुर्दैवाने ते भविष्य खरे ठरले. '' ( समग्र बालकवीत पृ.क्र. ३३ वर याचा उल्लेख आहेच) मात्र या नंतरच्या कथा असाव्यात बाकी योगायोगाच्या गोष्टी आहेत असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
स
सहज Wed, 05/13/2009 - 10:57 नवीन
अजुनही कवितेतले तितकेसे(बरेचसे सगळेच) समजत नसले तरी लेख आवडला. बालकवींच्या आयुष्यावर अजुन काहीतरी लिहलेत तर आवडेल.
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Wed, 05/13/2009 - 12:18 नवीन
अप्रतिम काव्यपरिचय. बालकवी माझेही काव्यदैवत. खूप लहानपणी त्यांच्या आनंदी आनंद गडेने जे वेड लावले ते गारुड पुढे घोंघावतच गेले. त्या कवितेतील, स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडुनी स्वार्था तो जातो द्वेष संपला मत्सर गेला आतां उरला इकडे तिकडे चोहिंकडे आनंदी आनंद गडे! या ओळीतर अविस्मरणीयच
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/13/2009 - 12:24 नवीन
लेख आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/13/2009 - 13:15 नवीन
वा, मस्त लेख!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 05/13/2009 - 14:36 नवीन
वा ! सर, लेख आवडला. बालकवींच्या काही कविता एक्-कविता या अनुदिनीवर वाचता येतील. त्यांची 'आनंदी पक्षी' ही कविता मला फार आवडते. ...... हासवितो लतिकाकुंजांना प्रेमे काढी सुंदर तना आनंदाच्या गाऊनी गाना आनंदे रमतो ... ... बा आनंदी पक्ष्या देई प्रसाद आपुला मजला काही जेणे मन हे गुंगुनी जाई प्रेमाच्या डोही ... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 05/13/2009 - 15:51 नवीन
सुरेख !! बालकवींच्या कविता फार आवडतात !!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/13/2009 - 15:58 नवीन
खूप चांगला लेख आणि विषय. आपण अपूर्ण असे लिहीले असले तरी अजून यात तसेच अशा इतर वाडम्यीन विषयांवर लिहीले जावे ही मनापासून विनंती! बालकवींच्या कवितेतील निसर्गाने माझ्या सारख्या शहरात राहून त्या निसर्गास न पाहणार्‍याला पण वेड लावले होते. त्यांचे शब्द आणि त्या शब्दांची ठेवण या मुळे प्रत्येक कविता ही आकर्षक झाली होती. ती आनंदी असोत अथवा दु:खी/उदास. आपण वर दिलेल्या "रात्र संपली दिवसही गेले..." या नैराश्य ह्या कवितेत मला त्यांच्यातील लपलेले नैराश्य दिसले होते. त्याच्या उर्वरीत ओळी काहीशा अशा आहेत (आठवणीतून):
चंद्रबिंब धरी अभिनव कांती, मेघ तयांनी धवलीत होती परी हृदयी नैराश्य काळीमा मम खंडीत नाही भोवर्‍यात जणू अडलो कोठे, स्वप्न भयंकर दिसते वाटे जिवन केवळ करूणा संकुल नैराश्ये होई.
मात्र नंतर त्यांनी त्याच्या खाली अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्‍यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्‍या चंद्राप्रमाणे करायची असावी... ती कविता जरी त्यांनी पूर्ण केली नाही तरी, वर अरूणरावांनी म्हणल्याप्रमाणे, त्यांनी "आनंदी आनंद गडे" लिहीले आणि स्वतःची गीते ही लक्षात राहताना आनंदच होवूदेत असे वाटून की काय त्यांनी शेवटी (?) लिहीले असावे असे वाटते:
"निरध्वनी हे , मूक गान हे" यास म्हणो कोणी , नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी. सर्व धर्म हे , भेद-पंथही सर्व एक झाले , माझे , माझे विश्व , तार ही प्रेमाची बोले शांतहि मत्सर , प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला , चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला. ही मोक्षाची , स्वातंत्र्याची , उन्नतिची माला , सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला. हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली ! मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/13/2009 - 16:57 नवीन
अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्‍यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्‍या चंद्राप्रमाणे करायची असावी... काय सांगावे तसेही असेल ! ज्या बर्‍याच अपूर्ण कविता आहेत त्यात असा विचार नक्की करता येऊ शकेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
क्रान्ति Wed, 05/13/2009 - 16:15 नवीन
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. बालकवींबद्दल खूपच चांगली माहिती लेख आणि प्रतिसाद दोन्हीतून मिळाली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/13/2009 - 16:40 नवीन
ह्या बालकवींच्या निसर्गकवितेची मोहिनी अजूनही मनावर आहे. अत्यंत चित्रदर्शी आणि गेय कविता असे बालकवींच्या कवितांचे वर्णन करावे लागेल. निसर्गाशी तादात्म्य पावलेला कवीच असे काव्य करु शकेल. प्राडॉ. तुमचे लिखाण अतिशय भावले. 'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का? पण हे पुस्तक जरुर मिळवायला हवे असे वाटते. उत्तम, अभ्यासपूर्ण लेखाबद्दल तुमचे अनेक आभार आणि अभिनंदन! त्यांच्या इतरही कविता वाचनात आल्या त्यातली 'प्रीती हवी तर' ही कविता बघा - प्रीती हवी तर जीव आधी कर अपुला कुर्बान, प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान ! तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत, याद ठेव अंगार जगाला लावील निमिषांत ! प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी? प्रीतीदेवी जगदेकवीर जो जाय तयापाठी ! नव्हे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा, परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा. गुल गुल बोले प्रीती काय ती? काय महालांत? प्रीती बोलते काळ घालिता कलिजाला हात ! स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला हीन जिवाने घेऊ नये त्या जहरी प्याल्याला ! सह्य जिवाला होय जाहला जरी विद्युत्पात, परी प्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पांत ! जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात; साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत ! बालकवींचा प्रेमभंग झाला होता का? त्याने त्यांना नैराश्य आले असावे का? 'पारवा' सारखी एकाकीपणाने/नैराश्याने भरलेली गीते लिहून ते त्यांच्या मनाची तगमग शांतवीत असतील का? अतिसंवेदनाशील आणि प्रतिभाशाली मनाचे व्यवहारिक जगात धिंडवडे निघत असतील का? आणि ह्यातून येणार्‍या खिन्नमनस्कतेचा परिणाम तो दुर्दैवी रेल्वे अपघात होण्यात झाला असेल का? असे असंख्य प्रश्न मनात पिंगा धरुन रहातात! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/13/2009 - 16:51 नवीन
>>बालकवींचा प्रेमभंग झाला होता का? नाही ! (तसे आढळत नाही ) >>त्याने त्यांना नैराश्य आले असावे का? नैराश्याची वेगवेगळी कारणे असली तरी 'विमनस्क' मोड मधे जाण्याची त्यांना जरा सवयच होती. ( बालस्वभाव असल्यामुळे ते तर साहजिकच होते. ) अशा अवस्थेचे आणखी एक कारण घरगुती अशांत वातावरण, पोटापाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, अस्थीर जीवन, काही पैसे जमा झाले की लहान भाऊ भांडन करुन ते पैसे घेऊन जायचा. त्यांची आर्थिक स्थिती कधीच सुधारली नाही. हे नैराश्येचे मूळ कारण असावे असे वाटते. >>'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का? समग्र बालकवी एकदा वाचाच. माणूस वेडा होतो. एकतर त्यांच्या कवीतेवर झालेले संस्कार वाचायला मिळतात. त्यांच्याविषयी वाचायला मिळते....त्यातले 'समालोचन' कवितांचे वेगवेगळे अंगण वाचकांना खूले करते. खूप असे काहे त्यात आहे ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 05/13/2009 - 16:50 नवीन
डॉ.दिलीप, लेख खूपच आवडला.बालकवींची खूपच माहिती वाचायला मिळाली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/13/2009 - 17:11 नवीन
सुंदर काव्य परिचय.. बालकवींचा जन्म १८९० साली खानदेशात झाला. त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक , निसर्गाशी नाजूक असे जुळलेले भावबंद .. यांमुळे त्यांना निसर्गकवी च म्हंटले जाते.. एका वक्तृत्व स्पर्धेत मी "बालकवी- एक निसर्गकवी" या विषयांवर बोलले होते. तेव्हा त्या भाषणांत आईने खालची कविता लिहिली होती.. तुझ्याच शब्दे डौल मिरवी, हिरवळ ही हिरवी तुझ्याच स्पर्शी फुटते या ढगांना सोनेरी पालवी तूच एकला फुलराणीला गोड गोड लाजवी निसर्ग तुझा.. तू निसर्गाचा, बालकवी तू निसर्गकवी..! बिरूटे सर.. उत्तम लेखन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 05/13/2009 - 17:29 नवीन
पुन्हापुन्हा वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 05/14/2009 - 05:09 नवीन
अतिशय सुंदर आणि विचार देणारा लेख. खूप आवडला.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 05/14/2009 - 05:25 नवीन
तुम्ही नेहेमी का लिहीत नाही हो?सुंदर लेख.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 02/04/2011 - 14:07 नवीन
सर येउद्या अजुन असेच सुंदर लेखन !!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा