होय निगेटीव्हच
💬 प्रतिसाद
(17)
व
विसोबा खेचर
Fri, 05/15/2009 - 08:58
नवीन
(प्रतिसाद रुपाने का होइना एवढ्या मोठ्या अखील महाराष्ट्रात जाणार्या साप्ताहिकाने माझी दखल घ्यावी हे ही नसे थोडके,असे मला वाटते.
शाब्बास रे विनायका..
तुझं अभिनंदन.. :)
आता काय बॉ, तू मोठा पत्रलेखक/लेखक झालस. पण माझ्यासारख्या मोडक्यातोडक्या लेखकाला विसरू नकोस हो! :)
बाकी, राजकारण हा माझ्या आवाक्याबाहेरचा, बुद्धीपलिकडचा विषय आहे त्यामुळे त्यावर अधिक काही भाष्य करू शकत नाही..
तात्या.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 05/15/2009 - 09:02
नवीन
हेच म्हणतो :)
तुझं अभिनंदन.. =D>
--अवलिया
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 05/15/2009 - 09:28
नवीन
विनायका,
हार्दिक अभिनंदन.मी तुझा मूळ प्रतिसाद वाचून प्रतिसाद देतोच पण तुझे आधी अभिनंदन करावे यासाठी लागलीच हे लिहित आहे.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 05/15/2009 - 09:49
नवीन
अभिनंदन!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 05/15/2009 - 09:08
नवीन
अभिनंदन!
- Log in or register to post comments
द
दिपक
Fri, 05/15/2009 - 09:20
नवीन
अभिनंदन रे विनायका.. पुढील अशाच उत्तम लि़खाणासाठी शुभेच्छा. :)
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 05/15/2009 - 09:51
नवीन
परत एकदा अभिनंदन.....तुझ्या लिखाणाची दखल लोकसत्ताने घेतली आहे म्हणजे इथुन पुढे तुला जबाबदारीने लिहायला हवे.देव तुला सुयश देवो.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
- Log in or register to post comments
य
योगी९००
Fri, 05/15/2009 - 12:58
नवीन
एकदम छान...!!!
तुझा प्रतिसाद सुरेखच...!!! मला खुप आवडला..
तुझ्या लिखाणाची दखल लोकसत्ताने घेतली आहे म्हणजे इथुन पुढे तुला जबाबदारीने लिहायला हवे..
या गोष्टीची आता मला खात्री आहे. तू आता जबाबदारीनेच लिहितोस..
देव तुला उत्तम यश देवो.
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Fri, 05/15/2009 - 13:17
नवीन
शाब्बास रे कोदा, तुझा प्रतिसादरुपी लेख आवडला.
कुणी कितीही चेष्टा केली तरी तु लिहीते रहावे हीच विनंती.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Fri, 05/15/2009 - 13:21
नवीन
विनायका, तुझे कौतुक करावेसे वाटते.
लेख आवडला, विचरही पटले ...
तु बिनधास्त लिहीत रहा, आम्हे आहोत ४ कौतुकाचे शब्द लिहायला.
जबाबदारी वाढली आहे आता, वेळप्रसगी आम्ही आसुड उगारायला कमी करणार नाही, असेच छान छान लिहीत रहा ...
विडंबनाची काळजी नको करुस, ते काय फातर महत्वाचे आणि गंभीर आहे असे माझे मत नाही ...
पुलेशु ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 05/15/2009 - 13:29
नवीन
असेच म्हणतो.
सोबतच केलेली टीका फक्त सकारात्मकतेने घेणे इतक्यावरच न थांबता त्यातून आपल्याला काय नविन सुधारणा करता येतील ह्याकडेही जरुर लक्ष दे.
शुभेच्छा!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
गुरुवार, 05/21/2009 - 11:30
नवीन
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Sat, 05/16/2009 - 01:03
नवीन
हार्दिक अभिनंदन!
विनायक म्हणतात :
आणि अशा रद्द निवडणुकीनंतर सरकार कोणी चालवावे - पूर्वीच्या सत्ताधार्यांनी? पण तेसुद्धा तर निवडणूक हरलेच आहेत. त्यांना राहू दिले तर नकारात्मक मताची काय किंमत राहिली?
की राष्ट्रपती शासन लागू - राष्ट्रपतीला कोणी निवडून दिले आहे? नकार दिलेल्या सरकारनेच ना? राष्ट्रपतीला पंतप्रधानांशिवाय राज्य करू द्यायची पद्धत तरी घटनेत आहे का? (अगदी आणीबाणीतही पंतप्रधानच राष्ट्रपतीच्या नावे सत्ता चालवत असतो.)
की हा पर्याय : जितक्या लोकसभा जागा भरल्या त्यांतल्या त्यांत पंतप्रधान निवडावा. मग महाराष्ट्रातल्या बर्याचशा जागा नकारात्मक निवडीने रिकाम्या राहिल्या तर उरलेल्या राज्यांच्या प्रतिनिधींकडून पंतप्रधान निवडलेला तो चालेल.
की नवीन निवडणूक होईपर्यंत सरकार बरखास्त करावे, आणि सरकारच असू नये? म्हणजे नको असलेल्या उमेदवारांपेक्षा अराजक बरे? ही विचारातली घोडचूक आहे.
स्वतःच्या अनुकूल उमेदवार उभा करून जिंकायची धमक नाही, आणि दुसर्यांनी उभे केलेले उमेदवार चालतही नाहीत... अशा कर्मशून्य आणि विघ्नसंतोषी लोकांना बरे वाटण्यासाठी हा नकारात्मक मताचा उदोउदो चालतो.
अर्थात विनायक हे तडफदार नव्या दमाचे लेखक आहेत. ते कर्मशून्य नाहीत कारण त्यांच्या कार्याची कित्येक दशके त्यांच्या पुढ्यात आहेत. तारुण्यात घातक विचारांशी खेळणे, आक्रसताळेपणा करणे, हे वयास अनुरूपच आहे. अशा ऊहापोहातूनच त्यांचे विचार प्रगल्भ होत आहेत. तरी असल्या लोकशाहीघातक विचारांच्या व्यूहात थोडाच वेळ गुरफटावे. लवकरच विनायक यांनी ते दुष्ट व्यूह फोडून बाहेर यावे. त्यांनी स्वतः आदर्श लोकप्रतिनिधी कसा जिंकू शकतो, त्याचा पायंडा घालावा. त्यांचा आदर्शवाद सकारात्मक वळणाला लागो, ही हार्दिक शुभेच्छा.
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
Sat, 05/16/2009 - 11:25
नवीन
आपल्या प्रतिसादातेल सर्व मुद्दे मला पटले.
स्पष्टच सांगायचे झाले तर तुम्ही मांडलेल्या मुद्याचा मी विचारच केला नव्हता.
त्यामुळे आता त्याला लवकर उत्तर देणे शक्य नाही.
पण आता जरी नेते निवडले जात असले तरी ते तरी सार्वमताने कोठे निवडले जातात
३५-४० % लोकानी निवडलेले नेते सर्वमान्य कसे?
प्रश्न उरतो तो राज्य कोणी चालवायचे याचा.
खरेतर भारतात नोकरशाही ही जी पद्धत आहे ,ती ही सगळी कामे करण्यास समर्थ आहे.
नाहीतरी बरेचशे निर्णय तेच घेत असतात ना,
मग निदान आता त्याना पुर्ण स्वातंत्र्य तरी मिळेल .
आणि ही चुक जनतेची आहे,पहिल्यांदा मतदानाला बाहेर पडायचे नाही ,दिले तर पैसे घेवुन
या सगळ्यापेक्षा नकारात्मक मत बरे.
आणि मग महाराष्ट्रातले कोण आले नाही त्याला चुक त्यांचीच.
मग जे काही निवडुन येतील त्याना पुर्ण हक्क दिला जावा,त्यामुळे सचीन पायलट सारख्या लोकांचे चांगले होइल.
असो.
(हा प्रतिसाद तात्काळ दिला आहे.धनंजय यानी मांडलेला मुद्दा गंभीर असुन त्यावर अधीक विचार करणे गरजेचे आहे,त्यामुळे या विषयावर योग्य प्रतिसाद नंतर देइल्,आताचा प्रतिसाद हा प्रतिक्षीप्त समजावा.
निकालाबाबत- यावेळचे निकाल मला व्यक्तीशः आवडलेले नाहीत. पण मुंबैत ज्या प्रकारे मतविभाजन झाले ते बर्यापैकी एकविचारी असलेल्या गटांसाठी योग्य नाही असे राहुन राहुन वाटते.
कोल्हापुरात व्यक्तीकेंद्रीत निवडणुकीमुळे आत्ताच्या घडीला मंडलीक आणि रजु शेट्टी यांचा विजय निश्चीत वाटतो.)
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
विनायक पाचलग
- Log in or register to post comments
स
सँडी
Sat, 05/16/2009 - 03:21
नवीन
अभिनंदन! शुभेच्छा!
-संदीप.
काय'द्याच बोला.
- Log in or register to post comments
म
मिहिर
गुरुवार, 05/21/2009 - 11:23
नवीन
अभिनंदन.
काही मुद्दे खटकले.
१. लोकप्रतिनिधी कामे करत नाहीत. केली, तरी त्यांचा केंद्रबिंदू तळागाळातला समाज हाच असतो. मध्यमवर्गीयांचा ते विचारच करत नाहीत
लोकप्रतिनिधी उलट धनदांडग्यांसाठी काम करतात. तळागाळातील लोकांसाठी खरोखर काम केले आहे अशा राजकारण्यांची नावे सांग पाहू.
२. खरेतर भारतात नोकरशाही ही जी पद्धत आहे ,ती ही सगळी कामे करण्यास समर्थ आहे.
नाहीतरी बरेचशे निर्णय तेच घेत असतात ना,
नोकरशाही पूर्णपणे समर्थ असती तर भारत कुठल्या कुठे पोहोचला असता. निर्णय राजकारण्यांकडून घेतले जातात, नोकरशाहीने त्याची अंमलबजावणी करायची असते.
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
Sat, 05/30/2009 - 10:36
नवीन
बर्याच दिवसाने मिपावर आल्याने आज प्रतिसाद पाहिले.
या सर्व मुद्यांवर जरुर विचार करीन.आभार
अवांतर्-मध्यंतरी मी मनाच्या कुपितले हे सदर लिहिले होते.या सदराचा बॅकअप येथे उपलब्ध आहे ,एकदा जरुर नजर टाकावी
(सध्या मिपा बंड पडत आहे,हा प्रश्न तात्यानी सोडवलेला आहे,पण चुकुन काही झालेच(अशी शक्यता कमीच्)तर लिखाण शाबुत रहावे म्हणुन हा उपद्व्याप, बाकी काही नाही
विनायक पाचलग
मेकओव्हर
- Log in or register to post comments