शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)
💬 प्रतिसाद
(102)
म
मैत्र
Mon, 06/01/2009 - 20:32
नवीन
भावनेला आवर घालून उपहास न करता विचारलेल्या काही प्रश्नांची नीट उत्तरे मिळतील का? नीट म्हणजे किमान एखादे उदाहरण देऊन किंवा मत सिद्ध करून.
नुसते "सर्वश्रुत आहे" याला गोबेल्स नीती म्हणतात.
http://www.misalpav.com/node/8009#comment-122770
http://www.misalpav.com/node/8009#comment-122769
http://www.misalpav.com/node/8009#comment-122776
http://www.misalpav.com/node/8009#comment-122783
http://www.misalpav.com/node/8009#comment-122794
आपण एकाही प्रश्नाला उत्तर दिलेले नाही पण इतरांच्या उपहासाला प्रतिक्रिया देत आहात म्हणून थेट विचारतो.
पुरंदरे, राजवाडे अगदी कोकाटे यांच्या इतका अभ्यास नाहीये माझा. ग्रँट डफ याबद्दल आपलं काय मत आहे?
नवा मुद्दा: शिवरायान्नी नागनाथ महाराला गावची पाटिलकी दिली त्याच महार समाजाला शिवरायंचे नाव घेवुन आपण भांडणे लावलीत...... किती हे आपले थोर उपकार,................... तुमच्या मुद्द्याचा संदर्भ माहीत नसल्याने मी त्यावर काही विचारू शकत नाही. जर एका व्यक्तीला एका गावाची पाटिलकी दिली तर त्यांची विचारधारणा आपण किंवा राऊत यांनी पाळली पाहिजे म्हणता हे मला योग्य वाटते. हाच निष्कर्ष लावून वर म्हटल्याप्रमाणे शिवरायांकडे आयुष्यभर काम केलेल्या, प्राण दिलेल्या ब्राम्हणांची जी मी यादी दिली आहे त्याचा विचार करता तुमचे कर्तव्य काय होते? का या सर्वांना सामावून घेण्यात खुद्द महाराज चुकले आणि आपला सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वीच्या परिस्थितीचा अंदाज त्यांच्या निर्णयापेक्षा जास्त योग्य आहे?
तुम्ही काही उत्तरे दिलीत तर या चर्चेला पुढे अर्थ आहे... आणि आपण पुरावे दिलेत ब्रिगेड किंवा कोकाटे यांच्या संग्रहातून आणि ते खरे व योग्य असतील तर चांगले आहे. दुसरी बाजू समजेल तरी (काही आहे तरी अशी आशा करतो) !
इतिहास हा वेगवेगळ्या घटनांनी बनलेला असतो. महाराष्ट्राचा, प्राचीन भारताचा, युरोप अमेरिका, ग्रीस ई. देशांचा आणि अगदी गेल्या दोनशे वर्षांचा जगाचा इतिहास हा अशाच अनाकलनीय आणि धक्कादायक घटनांचाच आहे. यात एक समान सूत्र आहे राजकारण, सत्ता, आक्रमण, स्वातंत्र्याच्या रक्षणाचे यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्न. यात सहसा एकच समुदाय अखंडपणे अधिकारात (डॉमिनन्ट) राहिल्याचे उदाहरण नाही.
एक अतिशय महत्त्वाची गोष्ट - अनेकदा खूप मोठ्या घटनेमागे असलेल्या व्यक्ती - ज्या खूप चुकीच्या किंवा खूप बरोबर वागलेल्या असतात - ( नंतर घडलेल्या इतिहासाचा आता हाईंड साइट मध्ये विचार करता) या व्यक्ती त्यांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करतातच असे नाही. त्यामुळे कोणत्याही घटनांचे जनरलायझेशन हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचे आहे.
आणि ज्या जनरलायझेशनला काही शतकांमध्ये समान आधार नाही तेच खरे असे सांगणे हे समाजाशी द्रोह करण्यासारखे आहे!
- Log in or register to post comments
म
मैत्र
Tue, 06/02/2009 - 11:20
नवीन
उत्तरच द्यायला तयार नाही !
कोणी तिरकं बोललं तर त्याला उत्तर द्यायला वेळ आहे. पुरंदरे समितीत नाहीत याच्या लिंक शोधून द्यायला वेळ आहे.
पण एकाही प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ नाही.
राजकारणात नाव काढणार तुम्ही. सोयीस्करपणे प्रश्नांना आणि कोंडीत आणणार्या गोष्टींना बगल देणे हे राजकारणातल्या यशस्वितेचे सगळ्यात मोठे साधन असते.
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Mon, 06/01/2009 - 15:35
नवीन
सामनाच्या या लेखाला उत्तर :
ब. मो. पुरन्दरे हे ब्राह्मण आहेत या कारणासाठी हा विरोध आहे असे आपले मत चुकिचे आहे असे मी मानतो. ज्यान्नी आपले सम्पूर्न आयुष्य शिवरायान्च्या कर्तुत्वाचा पाढा जनते समोर आनण्या साठी वेचले असे सान्गण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्यान्नी वर्णिलेल्या विविध प्रसन्गान्तुन ****असे जे सादरीकरण केले आहे ते चुक आहे की नाही याची शहानिशा न करता आपण हा लेख लिहिला आहे.... आपणाला शिवराय किति प्रमाणात समजले आहेत हे आम्ही बघतोच आहोत.
ज्या शिवरायान्नी रायगडावर मस्जिद बान्धायला लावली त्यान्चे च नाव घेवुन आपण हिन्द-मुस्लिम दन्गे घडवुन आणलेत.... किती वेदना झाल्या असतील शिव्रयान्च्या ह्र्दयाला!!!!!!!!!!. ज्या शिवरायान्नी नागनाथ महाराला गावची पाटिलकी दिली त्याच महार समाजाला शिवरायंचे नाव घेवुन आपण भांडणे लावलीत...... किती हे आपले थोर उपकार,...................
या संजय राऊत साहेबांनी सर्व प्रथम इतिहास वाचला आहे काय याचीच शंका त्यांच्या लिखानातुन येते आहे. कुणी पढविलेले आणि चढविलेले लगेच उघडे पडतात... तसे त्यांचे झाले आहे. त्यांनी अंध राजकारणाचा चश्मा उतर्वुन मग मैदानात यावे, सर्व ऐतीहासिक गोष्टींवर चर्चा करायची आमची तयारी आहे.
जय जिजाऊ.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
संपादक - आक्षेपार्ह विधाने टाकून महापुरुषांची निंदानालस्ती करु नये. अन्यथा संपूर्ण प्रतिसाद उडवले जातील.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Mon, 06/01/2009 - 19:27
नवीन
आक्षेपार्ह भाग संपादीत केल्यामुळे प्रतिसाद काढुन टाकला आहे.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 06/01/2009 - 16:03
नवीन
हेच्च तर म्हणतोय मी दादा :)
पण आपलेपणाने एक सांगू, कम्युनिष्टांसारखे जे जे आपल्या विरोधी ते ते केवळ असत्य असा पवित्रा घेऊन काय भले होणार?
असे हवेत बाण मारण्यापरास, जरा दाखले देऊन सप्रमाण सिध्द करा ना.
आता, कदाचित कुणी पुर्वग्रहदुषित कोत्या वैचारिक गर्तेत अडकून म्हणेल की सगळा इतिहास ब्राम्हणांनीच लिहिला त्यामुळे तुम्हाला दाखले काय द्यायचे..ते ब्राम्हणांविरोधीच असणार. मग असं असेल तर आपल्या म्हणण्याप्रमाणेच असलेल्या विचारधारेचे पाईक साडेतीनशे वर्षं वयाचे आहेत काय?
त्यांनी स्वत: पाहुन हा "दुरुस्ती केलेला इतिहास" सांगायला सुरुवात केलेली आहे? त्यांनी कोणत्या पुराव्यावर हे मुद्दे मांडले आहेत?
जर ते इतिहासाच्या दस्ताऐवजात सापडत नसतील तर केवळ भावनीक अवाहने करकरुन कुठवर हा लढा देणार?
आपण समर्थन करत असलेल्या विचारसरणीच्या जन्मदात्यांकडे काही मूळ पुरावे उपलब्ध आहेत काय?
असल्यास त्यांची सत्यासत्यता पडताळली आहे काय?
अशी सत्यासत्यता पडताळाण्याची एक प्रणाली असते ह्याची त्यांना कल्पना आहे काय? शिवकालीन लेखन/संदर्भ शोधताना आणि त्यांचे दाखले देताना त्या काळातली भाषा (मोडी/फारसीप्रचुर प्राकृत मराठी), भाषांवरचे परकीय वर्चस्व(अरबी/फारसी) ह्यांचा/ ह्या भाषेतील कागदपत्रांचा अभ्यास केलेला आहे काय?
आणि केवळ एकाच बाजुने इतिहासाची शोधयात्रा न करता, महाराज ज्यांच्याशी लढले त्यांच्याकडच्या तर्जुमे, कागदपत्रं, खलिते, शिलालेख ह्या सर्व साधनांच्या अभ्यासात कोणी भरीव कार्य करुन योग्य तो शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काय?
ह्या आणि आपण खुद्द तटस्थवृत्तीने विचार केल्यास ह्यांच्या अनुशंगाने उद्भवणार्या इतर प्रश्नांची उत्तरे शोधाल काय?
ह्यांची उत्तरे मिळाली की एक सकस चर्चा नक्कीच होईल.
कारण, पुरावे आणि भावना ह्यांची गल्लत करण्यात काही अर्थ नाही. ते काम शुध्द मुर्खांचे. आपण व्यासंगी दिसता, आपल्या उत्तरांच्या प्रतिक्षेत :)
- धमालराव देशमुख-पाटील.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 06/01/2009 - 15:37
नवीन
ह्या मानसीक रुग्णांच्या सत्याच्या काहि प्रती आम्हाला आंतरजालावर सापडल्या त्या इथे देत आहोत.
भाग १
भाग २
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Mon, 06/01/2009 - 15:50
नवीन
अश्याप्रकारची वाक्ये इथे लिहिली जावीत का?
त्यांनी आयुष्यभर उदोउदो केला आम्ही एक्दाच लिहिले तर आपला आक्षेप!!!!! किती विसंगती.........
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Mon, 06/01/2009 - 15:52
नवीन
महापुरुषांच्या बाबतीत इतकी घाणेरडी भाषा वापरणार्या या भिकारचोट लोकांना जोड्याने मारले पाहिजेत.
ब्राह्मणांना शिव्या घालणार्या यांच्या खेडेकराची बायको भाजपाची आमदार आहे. तिथे बरे यांना ब्राह्मण चालतात. साले हरामखोर. जातीच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरायचे उद्योग आहेत सगळे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 06/01/2009 - 15:53
नवीन
थोडे इनो घ्याच बॉ आता.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Mon, 06/01/2009 - 15:55
नवीन
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Mon, 06/01/2009 - 18:36
नवीन
आक्षेपार्ह भाग संपादीत केल्यामुळे प्रतिसाद काढुन टाकला आहे.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 06/01/2009 - 16:40
नवीन
मेटे व कंपनिवर चिडुन व बौधिक वाद घालुन उपयोग आहे? यांचा बोलावता धनि कोण आहे? हे बघण महत्वाच आहे..बौधिक वाद संपला आहे व धुळवड चालु आहे...फार ताकद वान आहेत यांचे बोलवते धनि..सार राजकारण त्यांच्या हातात आहे..८० वर्षाच्या बाबा साहेबांचे हात तोडायचि भाषा होत आहे पण सारे साहित्यिक,व बुध्धिवादि मुग गिळुन गप्प आहेत..नाहि म्हणायला आय बी एन च्या वागळेनि झोडला .पण बाकि गप्प आहेत..आचार्य अत्र्यांचि आठवण येते..
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/01/2009 - 19:07
नवीन
अगदी अगदी मनातले बोललात कुलकर्णी साहेब.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Tue, 06/02/2009 - 07:55
नवीन
प्रती मा. संपादक साहेब,
तुमचे हे मात्र असे आहे, आपला तो बाब्या अन दुसर्याचे ते कार्टे. आम्ही लिहिले तर आम्हाला दामदट्टी करण्याचा प्रयत्न अन तुम्ही लिहिले तर त्याची वाहवा........ असो हे संकेत स्थळ आपल्या मालकीचे असल्याने आपण आपणाला हवे ते संपादित करु शकता. विरोधी विचारांवर कारवाई करु शकता.
जय जिजाऊ
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Tue, 06/02/2009 - 08:26
नवीन
http://119.82.71.95/parahar/epaperimages/262009/262009-md-hr-4/15632781.JPG
http://epaper.pudhari.com/epaperimages/3152009/3152009-md-kol-5/1915593.JPG
http://epaper.pudhari.com/epaperimages/3152009/3152009-md-pun-5/15734391.JPG
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/02/2009 - 13:44
नवीन
सदर प्रतिसादातली दुसरी लिंक म्हणते:
"बाबासाहेब पुरंदरे हेच खरे जेम्स लेन."
वर्तमानात, जिवंत असणार्या, दोन माणसांंमधे जे लोक गफलत करत आहेत त्यांना ऐतिहासिक दस्तऐवजांचा अर्थ नीट उलगडता येईल का? आणि त्या अर्थावर कोणीही विश्वास का ठेवावा?
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Tue, 06/02/2009 - 09:50
नवीन
झालात का शान्त एकदाचे. बाबासाहेबान्ना ह्टवले या समिती वरुन्...आणि घेतले कोणाला मग??
लाज आहे आपल सरकार्...आता आपल सरकार म्हणायची लाज वाट्ते.....
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Tue, 06/02/2009 - 09:50
नवीन
http://3.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RvpkeTZlpTI/AAAAAAAAAGw/c7fqZLs7hWQ/s1600- h/Reality of Janata Raja Natak 1.JPG
http://4.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RvpkejZlpUI/AAAAAAAAAG4/ohwTplLJV2U/s1600- h/Reality of Janata Raja Natak 2.JPG
http://1.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RuTtUaO1mAI/AAAAAAAAAGY/lfIcam_2PS8/s1600- h/Loknayak 30aug.JPG
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Tue, 06/02/2009 - 10:07
नवीन
लिन्क ओपन होत नाहिये
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Tue, 06/02/2009 - 10:13
नवीन
यान्च्या करवित्याला विधानसभेची चिन्ता आहे. म्हणुन मत फोडायची बाकी काही नाही......
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Tue, 06/02/2009 - 11:43
नवीन
http://3.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RvpkeTZlpTI/AAAAAAAAAGw/c7fqZLs7hWQ/s1600-h/Reality+of+Janata+Raja+Natak+1.JPG
http://4.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RvpkejZlpUI/AAAAAAAAAG4/ohwTplLJV2U/s1600-h/Reality+of+Janata+Raja+Natak+2.JPG
http://1.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RuTtUaO1mAI/AAAAAAAAAGY/lfIcam_2PS8/s1600-h/Loknayak+30aug.JPG
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/02/2009 - 13:49
नवीन
अनेक वाक्यांचा धडधडीत चुकीचा अर्थ लावला आहे हे उपरोल्लेखित लिंक्सवरून दिसत आहेच.
उदा: दुसरी लिंकः
'शिष्यादिच्छेत पराजयम' याचा अर्थ लावताना गुरूपेक्षा शिष्य वरचढ निघाल्याचा गुरूला आनंद होतो असं आहे. यात शिष्याला कमी लेखण्याचा लवलेशही नाही. अनेक वेळा हेच वाक्य शिष्य गुरूपेक्षा वरचढ निघाला की वापरतात!
"पंतांच्या चेल्याने पंताच्या कित्यावर ताण चालवली होती" या वाक्यातून सरळच समजत आहे की पंतांचा चेला त्यांच्या वरचढ आहे. सूर्या दाखवायला लागत नाही, तो दिसतोच. पण म्हणून दिव्याचं महत्त्व कमी होत नाही.
उपरोल्लेखित लिखाण अतिशय पूर्वग्रहदूषित नजरेनेच लिहिलं आहे यात तीळमात्र शंका नाही.
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Tue, 06/02/2009 - 12:59
नवीन
तुमचे हे इतिहासकार (अ)ज्ञानी कोण आहेत?
खाली फक्त सभाजी ब्रिगेड अस लिहिल आहे.
त्याना जाउन इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक वाचायला सान्गा.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 06/02/2009 - 14:15
नवीन
अशा विषयांना निवडणुकीच्याच तोंडावर उत येत असतो. राजकारण्यांना लोकांच्याच सहभागातून त्यांना फॅसिझम निर्माण करायचा असतो. गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. अशा पद्धतीने जनतेची कोंडी करुन त्याला मार्ग दाखवल्याचा आभास निर्माण केला जातो.
इथे ऐतहासिक विश्लेषणाच्या नावाखाली जातीय अस्मितेच्या विषवल्ली पसरवायचा उद्योग पुर्वीपासुन चालु आहे.
इतिहासाची मढी उकरुन किती काळ तथाकथित अस्मितेच्या नशेत जगणार? अहो आपल्या खापरपणजोबांचे नाव तरी आपल्याला माहित आहे का? इतिहासात काय घडले असेल याचे उपलब्ध / अनुपलब्ध गोष्टीवरुन याचे तर्क कुतर्क करत बसणार? देशासमोरील आजचे प्रश्न काय आहेत याला प्राधान्य द्या. हेच गुर्हाळ किती काळ चालवत रहाणार?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Wed, 06/03/2009 - 05:32
नवीन
अगदी बरोबर बोललात घाटपांडे साहेब.
अतिशय क्षुल्लक गोष्टींवरून वाद उकरून काढायचे आणि त्यांवर भांडत बसायचे ही खोडच आहे 'संभाजे ब्रिगेड' आणि 'मराठा सेवा संघ' या संस्थांना. आता वितंडवाद घालून इतिहास बदलणार आहे का? किंवा कुणाचीही सरशी झाली तरी त्याने आपल्या आताच्या समस्यांवर उत्तरे मिळणार आहेत का? वर्तमानातल्या समस्या आणि भविष्यातली स्वप्ने लाथाडून भूतकाळाची भूते जिवंत करून काहीही उपयोग होणार नाही हे देखील कळत नाही या बिनडोक नेत्यांना आणि खोट्या अस्मितेची नशा चढवणार्या त्यांच्या निर्बुद्ध अनुयायांना. या संघटनांमधल्या ९९% लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास ओ की ठो माहित नाही आणि चालले दंडेलशाही करायला. आमच्या गावातही एका ब्राह्मण प्राचार्यावर असाच हल्ला केला होता 'संभाजी ब्रिगेड' च्या मद्यधुंद कार्यकर्त्यांनी. कारण अतिशय क्षुल्लक होते किंबहुना कारण नव्हतेच पण उगाच तमाशा करून दहशत निर्माण करायची या हेतूने तो हल्ला करण्यात आला होता. त्या मद्यधुंद रेड्यांमध्ये कित्येक त्या प्राचार्यांचे माजी विद्यार्थी होते. त्यांना 'शिवाजी' हा शब्द तरी व्यवस्थित लिहिता येईल की नाही इतपत त्यांच्या दिव्य ज्ञानाविषयी शंका होती. स्वतः शिवाजी महाराजांइतके नसू द्या पण काही तरी भव्य करायचे अशी स्वप्न नाही पडत या कार्यकर्त्यांना. कुठल्याही थोर व्यक्तींवर केवळ ती ब्राह्मण आहेत म्हणून अतिशय अश्लाघ्य पद्धतीने टीका करायची, मारहाण करायची आणि स्वतः शोध लावलेल्या सत्याची भलावण करायची एवढेच ते काय यांचे कतृत्व! खर तर खेडेकर, प्रवीण गायकवाड, अनंत चोंदे आणि विनायक मेटे यांच्यावर कायद्याने जमावबंदी आणि भाषणबंदी आणली पाहिजे. लोकांच्या मनात निष्कारण एकमेकांविषयी द्वेष पसरविण्याखेरीज हे नग दुसरं काहीच करत नाहीयेत. अतिशय घातक आणि विध्वंसक अशा प्रकारचे कार्य चालवले आहे या लोकांनी. असो. कधीतरी त्यांना आपण वाट चुकलेलो आहोत हे नक्की कळेल आणि त्यांच्या राजकारणातल्या आकांक्षा तर खचितच पूर्ण होणार नाहीत. शरद पवारांसारख्या पैशाने गबर (आणि सगळा मराठा समाज आपल्याच पाठीशी आहे असा फाजील आत्मविश्वास बाळगणार्या) राजकारण्याच्या इच्छा फलद्रूप नाही झाल्यात तिथे या बुजगावण्यांची काय कथा!! शरद पवार स्वतःला आणि त्यांचे समर्थक त्यांना खूप धूर्त आणि हुषार राजकारणी समजायचे. सोनिया गांधी शरदरावांपेक्षा १००० पटीने जास्त हुषार, मुत्सद्दी आणि धोरणी राजकारणी सिद्ध झाल्या. आता या जन्मात तरी त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे सत्य आहे. त्याला कारण त्यांची राजकारणाची कुचकामी आणि गुळमुळीत शैली हेच होते. शिवाय जमीन, पैसा, गुंतवणूक इत्यादी बाबींवरून त्यांचे तसे नाव ही खराब झालेले आहेच. मागे एका प्रतिसादात मी वर्तवलेले सगळे अंदाज खरे ठरले आणि त्यातले एक शरदरावांविषयी होते. सोनिया गांधींनी कृतीचे राजकारण करून सत्ता पटकावली तर शरदरावांनी केवळ गुळमुळीत, दुटप्पी आणि बिनबूडाचे राजकारण केले म्हणून त्यांना आपटी खावी लागली. पुन्हा कृषीमंत्री पद देऊन खरं तर सोनियाने शरदरावांना भीक घालून गप्प केले आहे पण काही लोकांना त्यातही समाधान वाटते. त्यांना मत्स्योत्पादन मंत्रीच करतील की काय अशी मला शंका येत होती पण बाई हुषार आहेत हे खरे. आता शरदरावांचा आणि राष्ट्रवादीचा आवाज अधिकाधिक क्षीण होत जाणार हे नक्की. असो. त्यांना धडा मिळाला आणि तसाच या सगळ्यांना मिळेल आणि तो मिळावाच. तेच सर्व समाजाच्या दृष्टीने चांगले आहे.
--समीर
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Tue, 06/02/2009 - 15:37
नवीन
"पंतांच्या चेल्याने पंताच्या कित्यावर ताण चालवली होती" या वाक्यातून सरळच समजत आहे की पंतांचा चेला त्यांच्या वरचढ आहे. सूर्या दाखवायला लागत नाही, तो दिसतोच. पण म्हणून दिव्याचं महत्त्व कमी होत नाही.
जेंव्हा हे पंत गुरु नाहीतच तर त्यांचा उदोउदो करण्या मागचा हेतु पुर्वग्रह दुषीत आहे असे मानायला जागा आहे.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/02/2009 - 17:46
नवीन
पंत गुरू नाहीतच याचे काही पुरावे देणार आहात का, पुन्हा कोणी, दोन-चार वर्षांत जे काही लिहिलं आहे तेच 'ऐतिहासिक दस्तऐवज' आहेत असं सांगणार आहात? संशोधकांनी (बाबासाहेब, निनाद बेडेकर इ.) यांनी पुरावे तपासून विधानं केली आहेत. आपल्याला कुठल्या कागदपत्रांमधे सापडलं हे सगळं? आणि आपण म्हणता हे खरं आहे तर एवढी वर्ष कुठे लपले होते हे पुरावे?
एखाद्या माणसाने त्याचा गुणी शिष्य मोठा व्हावा यासाठी झटून प्रयत्न केले, त्या प्रयत्नांची कोणी प्रशंसा केली तर ती चूक? उद्या सचिन मोठा फलंदाज आहे हे म्हणताना काय रमाकांत आचरेकरांना वाईट ठरवणार आहात का, का आचरेकरांनी काही शिकवलंच नाही सचिनला? डून स्कूलमधे काल जल्लोष झाला कारण तिथले चार माजी विद्यार्थी मंत्री झाले. त्या चौघांनी आपल्या कार्यकालात अनेक चांगली कामं केली तर काय डून स्कूल खराब आहे असा आरडाओरडा करायचा का, का या लोकांच्या चांगल्या कामात डून स्कूलचा काय वाटा असा प्रश्न विचारणार आहात?
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं!
शिवाय 'असे मानायला जागा आहे' असं आपण म्हणता; खात्रीपूर्वक असं विधान आपण करू शकत नाहीत.
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Wed, 06/03/2009 - 04:36
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/03/2009 - 05:40
नवीन
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं!
व्वा ! क्या बात कही !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Wed, 06/03/2009 - 06:00
नवीन
अप्रतिम !
अवांतर :- पण या लोकांना कळेल तर ना ?
:B :B :B बाकरवडी :B :B :B
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Wed, 06/03/2009 - 08:26
नवीन
प्रति, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब,
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं!
जर दादोजी खरोखरच गुरु असते तर आमची काहीही हरकत नव्हती. मात्र ते गुरु नसतांना त्यांना गुरुपदी बसविण्याचा जो अट्टाहास केला गेला त्याला हरकत आहे आमची. कुणाला जर पुरावे हा प्रकार कळतच नसेल तर व्यर्थ आहे हा वाद. असतील पुरावे दादोजी गुरु असल्याचे तुमच्याकडे तर निश्चित पणे महाराष्ट्र सरकारला द्या. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते ?' हे चर्चासत्र् मराठा विकास मंचाने आयोजित केले होते त्याला उपस्थित राहावे आणि पुराव्यानिशी सिद्ध्द करावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र तुमचे तथाकथित शिवशाहिर त्याला उपस्थित राहिले नाहित. काही उत्तर देवु शकले नाहीत. 'पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण?'.
जय जिजाऊ
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Wed, 06/03/2009 - 14:20
नवीन
१. दादोजी शिवाजी महराजांचे गुरु नव्हते याचा पुरावा काय? कुणीतरी एक-दोन पुस्तके (कुणीतरी साळुंखे म्हणून असले भाकड लिखाण करण्यात पटाईत आहेत असे ऐकले आहे) लिहून त्यात म्हटले की दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते म्हणजे ते खरेच आहे असे आहे काय?
२. इतकी वर्षे दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु होते हा इतिहास महाराष्ट्राला (आणि मराठ्यांना) चालत होता; आता अचानक काही वर्षात तो खोटा कसा काय वाटायला लागला. ज्यांनी हे संशोधन केले त्यांच्या संशोधनाच्या सत्यतेची आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांची सत्यता काय? ती कुणी पडताळून पाहिली?
३. आणि दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असे क्षणभर मानले तरी त्याने आपल्या आत्ताच्या जगण्यात काय फरक पडतो? त्याने शिवाजी महाराजांची राजा म्हणून योग्यता १०० पटींनी वाढते काय?
४. आणि दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे म्हटले (जे खरे आहे) तर त्यामुळे शिवाजी महाराजांची एक धडाडीचा राजा म्हणून योग्यता लगेच कमी होते का?
५. इतिहास हा इतिहास असतो; त्याला बदलता येत नसते. त्यातून उपयुक्त धडे घेऊन पुढे जायचे असते. असं असतांना 'मराठा विकास मंचा'ला "दादोजी कोण होते" असे चर्चासत्र आयोजित करण्याचा रिकामटेकडा उद्योग कुणी सांगीतला होता? त्या चर्चासत्रातून काय साध्य होणार होते? असल्या चर्चासत्रांकडे तसल्याच संघटनांच्या लोकांखेरीज कुणी ढुंकूनही बघत नसतांना फक्त जातीय द्वेष पसरविणे या उद्देशाखेरीज दुसरा कोणता उद्देश या चर्चासत्रांमुळे साध्य होतो?
६. असल्या निरुद्योगी आणि निरुपयोगी चर्चासत्रात भाग घेऊन वाद आणखी वाढवणे योग्य वाटले नसावे म्हणूनही कदाचित बाबासाहेबांनी तिकडे दुर्लक्ष केले असावे आणि ते योग्यच आहे. शिवाय पुन्हा कुणी हल्ला-बिल्ला केला तर काय करावे अशी भीती देखील त्यांना वाटले असावी जे की रास्तच आहे. शेवटी असल्या फालतू चर्चासत्रांपेक्षा कुणालाही जीव प्यारा असतो. ते तर काही मद्यधुंद कार्यकर्त्यांना हाणामारी आणि गुंडगिरी करण्यासाठी घेऊन येऊ शकले नसते आणि ते त्यांच्या शिवसंस्कृतीमध्ये कधीच बसले ही नसते.
७. ब्राह्मणांना जर ब्राह्मणेतर थोर पुरुषांविषयी अभिमान आणि आदर वाटू शकतो तर या संघटनांच्या लोकांना थोडी सभ्यता दाखवणे एवढे जड का जावे? इतकी संकुचित मनोवृत्ती का आहे यांची? आयुष्यभर शिवरायांच्या चरणी आपल्या बुद्धीची आणि श्रमांची सेवा अर्पण करणारे बाबासाहेबच आहेत; खेडेकर, मेटे, गायकवाड किंवा चोंदे नाहीयेत. बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास आणि विचार जेवढा जागता ठेवला आणि त्याचा जेवढा प्रचार आणि प्रसार केला त्याच्या अर्धा टक्का तरी या सगळ्या मुजोर लोकांनी केला आहे काय? भांडणांखेरीज आणि गुंडगिरीखेरीज या लोकांनी काय दिवे लावले आहेत?
--समीर
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/03/2009 - 14:51
नवीन
असतील पुरावे दादोजी गुरु असल्याचे तुमच्याकडे तर निश्चित पणे महाराष्ट्र सरकारला द्या. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते ?' हे चर्चासत्र् मराठा विकास मंचाने आयोजित केले होते त्याला उपस्थित राहावे आणि पुराव्यानिशी सिद्ध्द करावे असे आवाहन करण्यात आले होते
हा मराठा विकासमंच म्हणजे काय सरकार आहे काय? आलेत मोठे मराठा विकास मंचवाले.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/03/2009 - 15:18
नवीन
मिपावर मागे दादाजी कोंडदेव गुरु आहेत का यावर चर्चा झाली होती तो धागा मला प्रयत्न करुनही सापडेना. 'शिवाजी राजांचे गुरु कोण' या उपक्रमवरील चर्चेत मागेच आमचे मत मांडले आहे. असो, इतिहासातील अपूर्या दस्तऐवजांचा स्वतःच्या फायद्यासाठी अर्थ काढण्याचा सध्याचा काळ आहे. केवळ जातीचे चूकीचे संदर्भ अर्थ लावून आपण ऐतिहासिक व्यक्तींना आपल्या खूज्या विचारांनी खूजे करतोय. असे मला तरी वाटते.
बाकी चालू द्या !
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Fri, 06/05/2009 - 11:49
नवीन
हा घ्या तो धागा
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
- Log in or register to post comments
द
दवबिन्दु
Wed, 06/03/2009 - 14:48
नवीन
शिवाजी महाराज कुणाचे?
माझेत. :)
___________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Wed, 06/03/2009 - 15:18
नवीन
१. दादोजी शिवाजी महराजांचे गुरु नव्हते याचा पुरावा काय? कुणीतरी एक-दोन पुस्तके (कुणीतरी साळुंखे म्हणून असले भाकड लिखाण करण्यात पटाईत आहेत असे ऐकले आहे) लिहून त्यात म्हटले की दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते म्हणजे ते खरेच आहे असे आहे काय?
अहो महाशय,
भाकडकथा लिहिण्यात तुमच्या समाजाचा आज वर कुणिही हात धरु शकलेले नाही. साळुंके किस झाड की पत्ती.... कुठल्या तरी सत्य कि असत्य नारायणाची पुजा केल्याने बुडालेले जहाज वर येते असे ऐकले आहे..... खरे किती छान कथा आहे...... टायटानिक वर आणायला किती घालावे लागतील सत्य नारायण?
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Wed, 06/03/2009 - 16:36
नवीन
महाशय,
तुमच्या या प्रतिसादातल्या भाषेवरूनच तुमच्या मनात ब्राह्मणांविषयी किती अनाठायी द्वेष आहे हे दिसून येते.
भाकडकथा लिहिण्यात तुमच्या समाजाचा आज वर कुणिही हात धरु शकलेले नाही.
इथे कुणीच जातीवरून बोलत नाहीये. माझा स्वतःचा आक्षेप आहे तो खेडेकर वगैरेंसारख्या निरुद्योगी लोकांवर आणि त्यांनी पोसलेल्या ब्राह्मणद्वेषावर. माझ्या लिखाणात मी कुठेही मराठा जातीला काहीही बोललेलो नाही कारण मला माहिती आहे हा सगळा प्रकार दोन-चार निरुद्योगी लोकांमुळे घडून येत आहे. मराठा जातीचा यात काहीही संबंध नाही. किंबहुना माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे मी स्वतःला देखील मराठा समजतो हे तुम्हाला ठाऊक असेलच. शिवाय माझ्या लेखात मी ब्राह्मणांचे दोष देखील दाखवलेले आहेत. माझे स्वतःचे कित्येक मित्र अस्सल ९६ कुळी मराठा आहेत आणि त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आचार-विचारांविषयी मला खूप आदर आहे. हे जर सगळे असे आहे तर हे तुमच्या लक्षात येऊन तुम्ही असली बिनबुडाची सरळ-सरळ जातीवरची विधाने टाळली पाहिजेत. बरं, तुम्ही जे लिहिता त्यासाठी तुमच्याकडे पुरावे नसतातच. मी मांडलेल्या एकाही मुद्यावर तुमचा एक ही तर्कशुद्ध प्रतिसाद आलेला नाही. किंबहुना कुणाच्याच बिनतोड मुद्यांवर तुम्ही भाष्य करत नाहीत. केवळ काहीतरी लिहून खर्या मुद्यांकडे दुर्लक्ष करता. याला चर्चा नाही म्हणत; रडीचा डाव म्हणतात. ब्राह्मणांनी असे कुठले लिखाण केले आहे सांगा बरे? उलटपक्षी साळुंकेंसारख्या अतिविद्वान लेखकांनीच असले फालतू लिखाण करून वादाला तोंड फोडले आहे. काय संशोधन आहे त्यांचे? बाबासाहेबांच्या अर्धा टक्का तरी व्यासंग आहे का त्यांचा? बाबासाहेबांप्रमाणे त्यांनी आयुष्य शिवचरणी वाहिलेले आहे काय? ब्राह्मणांनी कधीच असे फूट पाडणारे आणि समाजाची वीण सैल करणारे, समाजात जाती-जातींविषयी विष पेरणारे लेखन केलेले नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. नुसते सरसकट विधान केले म्हणून ते खरे ठरत नाही.
एवढी चर्चासत्रे घडवून आणता; निदान एका मुद्यावर तरी तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक मत द्या. तसे होणार नसेल तर मग या चर्चेला काहीही अर्थ नाही आणि यातून एकच निष्कर्ष काढता येईल की या संघटनांचा आणि त्यांच्या विघ्नसंतोषी नेत्यांचा ब्राह्मणांना त्रास देणे याखेरीज दुसरा कुठलाही हेतू नाही. विनाकारण गुंडगिरी करून समाजाची शांतता भंग करणे; सरळमार्गी ब्राह्मणांना धमकावून, मारून-धोपटून खाली दाबणे आणि स्वतःची शून्य कर्तबगारी असतांना, अर्धवट ज्ञान असतांना आरडा-ओरडा करून लक्ष वेधून घेणे हेच यांचे उद्दिष्ट आहे असे सिद्ध होते. काहीतरी विधायक काम करून सगळ्या महाराष्ट्राला सोबत घेऊन पुढे जाणे जमत नसेल तर असल्या बाष्कळ विषयांवरून निदान आपल्या राज्यातली शांतता तरी भंग करू नका.
--समीर
- Log in or register to post comments
श
शुभान्कर
Wed, 06/03/2009 - 15:53
नवीन
छत्रपती शाहु महाराजांनी विश्वासाने राज्यकारभार एका ब्राम्हणाच्या हातात दिला.
आणि तो पेशव्यांनी (ब्राम्हणांनी) जवळ्पास १०० वर्ष चालवला हा इतिहास मेट्यांना माहीत नाही काय? मराठयांपेक्षा ब्राम्हणांनी महाराष्ट्राचा जास्त वर्ष कारभार सांभाळला
(छत्रपतींना योग्य तो मान देऊन) हे मेटे सोयिस्कर विसरतात.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 06/03/2009 - 16:17
नवीन
आता ब्राम्हण श्रेष्ठ की मराठा श्रेष्ठ ह्यावर आली आहे. संपादक जागे असतील तर ती इथेच थांबवावी.
जातपाती मुळे महाराष्ट्राचे अगोदरच खुप नुकसान झाले आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 06/03/2009 - 16:49
नवीन
चर्चा इथेच थांबवावी.
अन्यथा धागा अप्रकशित केला जाईल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विकि
Wed, 06/03/2009 - 20:21
नवीन
आपल्याला खुप आवडली. इतका गहनपणे चर्चा केल्याबद्दल सर्वांचे आभार.संपादक मंडळाला कळकळीची विनंती आहे की हा धागा अप्रकशित करू नये उलट वाढवावा यातून चांगले ज्ञान मिळेल आणि आमच्यासारख्या अभ्यासू वाचकांना चिकित्सा करण्यात अधिक मदत होईल
तेव्हा अजुन चालू धावे.
- Log in or register to post comments
स
स्वामि
Wed, 06/03/2009 - 20:30
नवीन
व्हॉल्टेअरचं एक वाक्य............History is fables agreed upon.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Fri, 06/05/2009 - 11:11
नवीन
मी लिहिलेला शेवटचा प्रतिसाद नाहीसा झाला म्हणून हा प्रतिसाद पुन्हा देत आहे. माझ्यापुरता हा विषय मी इथे संपवला आहे. या लेखाचा उद्देश जातींवर घसरून जातीवाचक द्वेष ओकण्याचा नव्हता. मी स्वतः कुठेच (लेखात आणि माझ्या प्रतिसादांमध्ये) मराठा जातीवर कुठलीच टीका केलेली नाही. 'संभाजी ब्रिगेड' आणि 'मराठा सेवा संघ' किंवा तत्सम संघटनांनी गुंडगिरीद्वारे जी दडपशाही चालवलेली आहे त्याला आणि तसल्या वृत्तीला माझा विरोध आहे. त्यांच्या नेत्यांना (खेडेकर, मेटे वगैरे) थोडी तरी समज यावी हाच या लेखाचा हेतू. सगळ्याच जातींमध्ये काही गुण असतात आणि काही दोष असतात. ब्राह्मण जात देखील याला अपवाद नाही. असे असेल तर सगळ्यांनी सामोपचाराने एकत्र येऊन आणि एकदिलाने आपला महाराष्ट्रधर्म वाढवणे आणि एका उत्तुंग पातळीवर नेण्यासाठी धडपड करणे हे सगळ्या मराठीजनांचे आद्य कर्तव्य आहे. जातींसारख्या क्षुल्लक गोष्टींवरून आपल्या आजच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि सगळ्यांचे जीवन अधिकाधिक सुसह्य करण्याच्या विधायक प्रयत्नांमध्ये कुठलीही बाधा येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच! इतिहासातील्या आणि कालौघातील विखुरलेल्या सुवर्णक्षणांना हातात पकडून त्यांची झळाळी कमी करण्याच्या प्रयत्न करणे म्हणजे कालांतराने हात भाजून घेण्यासारखे आहे. क्षुल्लक गोष्टींवरून वितंडवाद घालणे, गुंडगिरी करणे, स्वतःला शून्य ज्ञान असतांना काही सन्माननीय लोकांना केवळ जातीच्या आधारावर नालायक ठरवून अकारण त्रास देणे, कसली तरी बिनबूडाची चर्चासत्रे घडवून त्यातून द्वेषाची भावना अधिक भडकावणे इत्यादी गोष्टींनी समाजाची शांतता भंग पावते आणि अकारण जातीजातींमध्ये फूट पडते जे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अजिबात चांगले नाही. काल-परवाच्या दैनिक सकाळ (पुणे आवृत्ती) मध्ये पहिल्या पानावर महाराष्ट्रातील घटलेल्या मराठी टक्क्याची बातमी आलेली आहे. महाराष्ट्रातला मराठी टक्का ७५% वरून ६८.८% वर आलेला आहे आणि हिंदीभाषिक परप्रांतीयांचा टक्का ५% वरून ११% वर गेलेला आहे. ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आज कित्येक भाग असे आहेत जिथे हिंदी बोलल्याशिवाय काम होत नाही. औंध, बाणेर, पिंपळे सौदागर, विश्रांतवाडी, वानवडी, फातिमानगर, कोंढवा, औंधगाव, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, चांदणी चौक, वाकड, हिंजवडी आदी नुकतीच हिंदीप्रभावित झालेली ठिकाणे एके काळी अस्सल मराठी गांवे होती. ही परिस्थिती नक्कीच भीतीदायक आहे आणि याचा आत्ताच काहीतरी नायनाट करायला हवा. उद्या सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ इथेही हिंदी बोलावे लागेल आणि पुण्याचे अलगद मुंबई होईल. कुठल्याच स्वतःला मराठी म्हणविणार्या माणसाला हे रुचणार नाही. काही वर्षांनंतर पुण्यातली मराठी कुटुंबे फक्त घरातच मुंबई धरतीचे ओबडधोबड मराठी बोलतील आणि बाहेर मुंबई धरतीचेच अशुद्ध आणि लाचारीमिश्रित हिंदी बोलतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांनी एकत्र राहून मराठीची शान वाढवली पाहिजे हीच आशा आणि अपेक्षा! जय शिवाजी, जय महाराष्ट्र!!
--समीर
- Log in or register to post comments
प
पक्या
Fri, 06/05/2009 - 21:08
नवीन
आम्हा घरी धन कडे कुठलेच कनव्हिंसिंग मुद्दे नाहियेत. त्यामुळे तोंडाला येईल ते तो बरळ्तोय. मला वाटतय त्याच्या प्रतिसादाला आता कोणीच उत्तर देऊ नये म्हणजे तो गप्प बसेल.
समीर सूर चा लेख छान वाटला. धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अक्स
Mon, 06/08/2009 - 10:12
नवीन
रामदास आणि दादो़जी ह्याना जोपर्यन्त शिवरायान्च्या गुरुपदी बसविण्याचा उद्योग काही वर्णवर्चस्ववादी (म्हणजे ब्राह्मण नव्हे..)
करत राहतिल....तोपर्यन्त ही लढाई वाढतच जाईल....
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Mon, 06/08/2009 - 11:58
नवीन
मक्या राव ,
तुमच्या कोल्हे कुईत सामिल झालो म्हणजेच कनव्हिंसिंग मुद्दे मांडले आहेत असे होत असेल तर ठिक आहे चालु द्यात तुमची कोल्हे कुई....
खाली दिलेली लिन्क जरा बघा आणि मग प्रतिक्रिया द्या.
http://epaper.dnaindia.com/epaperimages/04062009/d31434594-3Pune%20Main%20Edition-pg1-0.jpg
तुम्ही स्वतः वर्ण वर्चस्व जातियवादी पणा दाखवायचा अन आम्हाला जातियवादी म्हणायचे हे मात्र ठिक नाही.
खरे बोललं की बरं वाटत नाही अन बरं बोललं की खरं वाटत नाही.
मी खरं बोललो ते तुम्हाला काही बरं वाटलेलं दिसलं नाही.
या पुढे या विषयावर कुणीही प्रतिक्रिया व्यक्त करु नये असं संपादकांनी बजावलेलं असतांना प्रतिक्रिया दिल्या जात आहेत हे विशेष.
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Mon, 06/08/2009 - 11:59
नवीन
मक्या राव ,
तुमच्या कोल्हे कुईत सामिल झालो म्हणजेच कनव्हिंसिंग मुद्दे मांडले आहेत असे होत असेल तर ठिक आहे चालु द्यात तुमची कोल्हे कुई....
खाली दिलेली लिन्क जरा बघा आणि मग प्रतिक्रिया द्या.
http://epaper.dnaindia.com/epaperimages/04062009/d31434594-3Pune%20Main%20Edition-pg1-0.jpg
तुम्ही स्वतः वर्ण वर्चस्व जातियवादी पणा दाखवायचा अन आम्हाला जातियवादी म्हणायचे हे मात्र ठिक नाही.
खरे बोललं की बरं वाटत नाही अन बरं बोललं की खरं वाटत नाही.
मी खरं बोललो ते तुम्हाला काही बरं वाटलेलं दिसलं नाही.
या पुढे या विषयावर कुणीही प्रतिक्रिया व्यक्त करु नये असं संपादकांनी बजावलेलं असतांना प्रतिक्रिया दिल्या जात आहेत हे विशेष.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Mon, 06/08/2009 - 13:44
नवीन
च्यामारी एकच प्रतिसाद तीन वेळा पोस्टवला म्हणजे खरे वाटेल लोकांना असे वाटते की काय तुम्हाला?
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Mon, 06/08/2009 - 15:01
नवीन
आता.... सर्व्हर ची चुक असेल तर त्याला मी काय करणार....
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »