अर्थशास्त्र हा शासन-व्यवस्थापनाबद्दल अव्वल दर्जाचे विचार सांगणारा ग्रंथ आहे. तसेच हे त्या काळातल्या समाजाबद्दल ऐतिहासिक ज्ञान मिळवण्याचे उत्तम साधन आहे.
शोधाच्या शताब्दीच्या निमित्ताने ही कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद.
(परंतु हा ग्रंथ मिळण्यापूर्वी जर लोकांना वाटत असेल की याविषयीचे जुने ग्रंथ भारतात उपलब्ध नव्हते, तर ते ठीक नाही. मनुस्मृतीतही शासन-व्यवस्थापनाबद्दल विस्तृत प्रकरण आहे - म्हणजे करभाराचे दर काय ठरवावेत, वगैरे, इतपत तपशीलवार!)
विकासराव,
छान लेख आणि भाषांतरही. काळाच्या ओघात काय काय रत्नं हरवली आहेत आपल्या हातून त्याची आपल्याला जाणिवही नाहीये. असं काही काही योगायोगाने हाती लागतं.
इतिहास जतन न करणे, जो काही ज्ञात आहे तोही योग्यरितीने समजून न घेणे आणि त्यातूनही जे काही समजले ते विसरणे ही आपल्या भारतीय संस्कृतीची फार मोठी उणी बाजू आहे.
बिपिन कार्यकर्ते
सूहास (verified= न पडताळणी केलेला)Wed, 06/24/2009 - 13:07नवीन
मुळ लेख व माहीती व ग्र॑थ http://acorn.nationalinterest.in/2009/06/10/the-librarian-of-mysore/ येथे ऊपलब्ध आहे...
सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे..
सौजन्य: प्राजुताई..
माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे (आणि मी ते वाचलंयही ;) ) पण हा इतिहास माहिती नव्हता.
-----------
त्या पुस्तकातलं बाकी काय लक्षात राहिलं माहिती नाही पण एक वाक्य (चिरंतन सत्य !) मात्र कायम लक्षात राहील ते म्हणजे --
"ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!!
>>>माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे<<<
दुर्गा भागवतांचे का? ते मस्त आहे. माझ्याकडे पण होते. मात्र नंतर ते कोणीतरी वाचायला म्हणून घेतले.... :-(
>>"ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!!
हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर.....
(आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे)
खराटा
(रंग माझा वेगळा)
हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर.....
भ्रष्टाचार ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे.
(आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे)
मानवी मनाने देव निर्मिती करतांना आपल्या गुणदोषांसारखेच देवाचे वर्तन असणार या सहजसुलभ भावनेतुन देवाला काहीतरी द्यावे ही प्रेरणा तयार झाली.
श्री.खराटा यांना नम्र आणि जाहीर विनंती की आस्तिक भक्तांच्या भावनांची खिल्ली संधी मिळेल तिथे उडवणे जरा कमी करावे.
--अवलिया
प्रतिक्रिया