मास्तर, आवडला लेख.
एक मनात आलेला विचार, इतकी वर्षे भारताबाहेर राहिलोय, पण भारतात गेल्यावर (स्वतःचे घर असूनही) हाटेलात राहणारा माणूस कधीच दिसला नाही. कसे काय लोक असे करू शकतात कळले नाही अजूनही. असो.
बिपिन कार्यकर्ते
मलाही अजूनपर्यंत कळलेले नाही. काही कारणे जी मी ऐकली त्यांच्याकडून
एवढ्याशा घरात खूप गर्दी होते (घे की मग मोठे घर, आता छापतोयस ना इतके $$$)
सारखे लोक येतात भेटायला, मग स्वतःसाठी वेळच नाही मिळत आणि घरच्यांना पण किती त्रास (च्यायला मग आलास कशाला इथे, तिथे होता ना हवा तेवढा वेळ)
मुंबईजवळ असले की 'travelling' ला 'easy' पडते ना, केवढी ती गर्दी. भितीच वाटते. (हो बरे आहे तुझ्यासारखी लोके बाहेर जातायत, तेवढाच हातभार गर्दी कमी करण्याला)
सध्या तरी इतकीच आठवतायत. पण मला तरी कळत नाही की लहानपणापासून इतकी वर्षे तिथे त्याच वातावरणात राहताना न झालेला त्रास बाहेर गेल्यापासून २-४ वर्षातच अचानक कसा होऊ लागतो. आणि आई बाबांबरोबर राहताना थोडा सो कॉल्ड त्रास सहन केला तर कुठे बिघडले?
बर्याच दिवसांनी माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या मर्त्य मानवाला कळेल असे काहीतरी साधे सोपे मास्तरांनी लिहिले आहे. आवडले/कळाले :).
बाकी परदेशातून येऊन होटेलात राहणारी लोक अजुन सुदैवाने माझ्यातरी प्रत्यक्ष पाहण्यात आली नाहीयेत. पाहिलेय ते "तू तिथे मी" सारख्या चित्रपटांतच.
असो. पैसा/ऐषा-आराम माणसात कली शिरवतात हे खरे.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
मी पाहिलेत होटेलचा मा़ज करणारी माणसे. एकाने विचारलं सुद्धा १BHK मधे कोंडल्यासारख नाही का वाटत म्हणून. तरी बरं इथे त्याच सुरुवातीला studio(1 room kitchen त्यात folding bed) च होतं.
मी अजुनपण माहेरी आले की आईच्या कुशीत झोपते. बाबांना नमस्कार करताना डोक्यावरुन फिरलेला हात आज खूप आठवला. मीतर मुलांना सवयच लावली आहे झोपायच्या आधी आई-बाबांच्या कुशीत शिरून पापी द्यायची.. पोर कितीही मोठी झाली तरी हि सवय मोडू देणार नाही मी.
- एवढ्याशा घरात खूप गर्दी होते (घे की मग मोठे घर, आता छापतोयस ना इतके $$$)
- सारखे लोक येतात भेटायला, मग स्वतःसाठी वेळच नाही मिळत आणि घरच्यांना पण किती त्रास (च्यायला मग आलास कशाला इथे, तिथे होता ना हवा तेवढा वेळ)
- मुंबईजवळ असले की 'travelling' ला 'easy' पडते ना, केवढी ती गर्दी. भितीच वाटते. (हो बरे आहे तुझ्यासारखी लोके बाहेर जातायत, तेवढाच हातभार गर्दी कमी करण्याला)
सध्या तरी इतकीच आठवतायत. पण मला तरी कळत नाही की लहानपणापासून इतकी वर्षे तिथे त्याच वातावरणात राहताना न झालेला त्रास बाहेर गेल्यापासून २-४ वर्षातच अचानक कसा होऊ लागतो. आणि आई बाबांबरोबर राहताना थोडा सो कॉल्ड त्रास सहन केला तर कुठे बिघडले?