तुम्हीच सांगा राजे.
देशातील गरीब ,भुखेकंगाल,दलीत,पिळवला गेलेला कामगार,न्यायासाठी झगडणारी जी जनता आहे त्यांच्यासाठी काही करायचे की दहशत वाद्यांबरोबर,जातीयवाधांबरोबर,मस्तवाल श्रीमंत,राजकारणी,भुमाफीया,लाचखाऊ प्रशासन यांच्याबरोबर लढायचे.
आपला
कॉ.विकि
अंर्तमुख करायला लावणारा प्रश्न आहे राव!
मी एक साधी सोप्पी गोश्ट करतो..
मी माझे काम प्रामाणिकपणे करतो.. कोणताही गैरप्रकार स्वत: करत नाही आणि दुसर्यालाही करून देत नाही..
आणि एक महत्वाची गोश्ट.. जेव्हा केव्हा देशाकडून बोलावणे येईल, तेव्हा संगणकावर ही बोटे ज्या सराईतपणे चालतात, त्याच
सराईतपणे शस्त्रावर पण चालतील.. कोई शक??
-
कोकणी फणस
वर उल्लेखलेल्या गोष्टी तुम्ही स्वत:साठी करता. त्यातुन देशाला होणारा फायदा (काही होत असेल तर) हा त्याचा बाय प्रोडक्ट आहे. तुमच्या कामाचा थेट उद्देश नाही. त्यामुळे तुम्ही देशासाठी काही करता का? ह्याचे उत्तर नाही असे आहे.
हे म्हणजे मी रोज श्वास घेतो आणि एका भारतीयाला जगायला मदत करतो हीच माझी देशाला मदत असे म्हणण्या सारखे आहे.
थोडक्यात आपण देशासाठी काहीही करत नाही ही मनातील टोचणी घालवण्यासाठी शोधलेली ही पळवाट आहे.
शलाकाशी सहमत.
>>हे म्हणजे मी रोज श्वास घेतो आणि एका भारतीयाला जगायला मदत करतो हीच माझी देशाला मदत असे म्हणण्या सारखे आहे.
>>थोडक्यात आपण देशासाठी काहीही करत नाही ही मनातील टोचणी घालवण्यासाठी शोधलेली ही पळवाट आहे.
बरोबर. हे म्हणजे भारतात व्याजाचा दर जास्त असल्यामुळे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी पैसे पाठवायचे आणि आम्ही गंगाजळी उभी केली म्हणून तात्याने म्हंटले तसा 'गंगाजळी! गंगाजळी!! गंगाजळी!!!' असा ऊर बडवायचा. असा प्रकार वाटतो.
तो माणूस मानसीक रुग्ण असणार असं वाटलं.
त्याच पानावर माननीय शरदचंद्ररावजींचा हिलरी क्लिंटनबरोबर असलेला फोटो पाहिला. कित्ती मैत्री आहे दोन देशांमध्ये असं वाटून गेलं.
;)
रेवती
निले शेठ आपण कधी अनिवासी भारतियाना काहीबाही बोलत नाही,अहो सगळे आपलेच आहेत. उद्या काही कामानिमित्त परदेशात गेलो तर आपले लोकच आपल्याला मदत करणार.आणि मित्र व नातेवाईकच आहेत .
वेताळ
परदेशातुन भारतीय अंतरजालावरील गुगल जाहिरातीवर टिचक्या मारतो, आणि भारतीयांना आर्थिक मदत करतो....
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
मी एक गोष्ट नक्की करत नाही - इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स आणि त्यांचे प्रोग्रॅमिंग ;)
बाकी काय करतो?: शक्य तिथे सेवाभावी कार्याला मदत करतो. भारतातून इथे जेंव्हा सामाजिक संस्था (social entrepreneurs) येतात तेंव्हा त्यांचे काम इथल्या लोकांना समजून देण्यासाठी त्यांचे कार्यक्रम ठेवतो. त्या व्यतिरीक्त अजून पण अशाच अनेक गोष्टी...
स्लमडॉग पेक्षा वेगळा(पण) असलेला भारत हा भारताबाहेरील अभारतीयांना एक भारताचा भारताबाहेरील सामान्य प्रतिनिधी म्हणून ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो - माहीती देऊन आणि स्वत:च्या वागण्यातून.
कशाला काही करायला पाहिजे स्वतःच्या देशासाठी कुणीही?
पोटापाण्याची खळगी भरा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या , जमलेच तर घटकाभर गफा मारा, एखादे शिरू भाउ नाहीतर पुलंचे पुस्तक संपवा , किशोरीताईंच्या "सहेला रे" वर जीव ओवाळून टाका... यातून वेळ उरलाच तर कायद्याचे पालन-बिलन करा.. बस्स उसीमे जिंदगी निकल जाती है!
आणि या इथे घटोऽयं पटोऽयं करण्यापेक्षा बरे नाही का?
काहिही न करून (नंतर झालेला गोंधळ निस्तरायची गरज न पडणारा) देशाचे भले करणारा.
(निष्क्रिय) विंजिनेर
बाय द वे, वेलकम ब्याक फ्रॉम ऑब्लिव्हियॉन राजे..
मुळात हा विचारच चुकीचा वाटतो.
टॅक्स भरणे, नियम पाळणे, मतदान करणे इत्यादी गोष्टी देशासाठी करायच्या नव्हेत तर देशाचा नागरीक म्हणून ती आपली कर्तव्ये आहेत.
देशासाठी काही करतो हे म्हणणे देशावर उपकार करणे या भावनेपोटी आल्यासारखे आहे. या ठिकाणी आपण स्वत:ला देशापेक्षा मोठे मानत असतो.
या देशात आपण जन्मलो, वाढलो, जगतोय. तो देश वा समाज अजून चांगला करण्यासाठी प्रयत्न करणे हा संपूर्णपणे स्वार्थी (चांगल्या अर्थाने) विचारच झाला. कारण देश, समाज चांगला झाला तर आपल्या जगण्याचा दर्जा वाढतो. पर्यायाने आपलाच फायदा किंवा कदाचित आपल्या पुढच्या पिढीचा.
असा 'स्वार्थी' विचार करणे ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने केले पाहीजेच.
जे काही आपण करत असतो ती आपली समाजामधली contribution असते. समाजाचा भाग असण्याची जाणीव असते.
पण जेव्हा मी हे करतो असं आपण म्हणायला लागतो तेव्हा समाजापासून स्वतःला वेगळे काढून घेत असतो, इतरांपेक्षा वरती समजत असतो. त्याला काही अर्थ नाही असे माझे प्रामाणिक मत.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
शेवटी देश देश म्हणजे तरी काय हो! तिथे रहाणारी माणसेच ना!
प्रत्येकजण धोरणी राजकारणी, कलाकार, समाजसेवक, सैनिक इ.इ. नसला तरीही तो देशाचाच घटक असतो.
अगदी सामान्य माणूस असूनही प्रत्येकानेच जर आपले काम जास्तीतजास्त चोख करण्याचा प्रयत्न केला तर आपले सगळ्यांचेच आणि पर्यायाने देशाचे भले होईल ह्यात काय शंका!
माझी प्रतिक्रिया ही पळवाट नसून ती माझी कार्यपद्धती आहे.
त्याचा निश्कर्श तुम्ही आपापल्या द्रुश्टिकोनातून कसाही काडू शकता.
माझ्या मते प्रत्येकाचा आपापल्या कामातील प्रामाणि़कपणा आणि 'भ्रश्टाचारा'ला वेसण ही आज आपल्या देशाची गरज आहे.
ह्याव्यतिरिक्त, तुम्ही काही सुचवत असाल तर आम्ही आनंदाने एकू.
-
कोकणी फणस
शलाकाशी सहमत.
मी सध्या तरी देशासाठी काहीच करत नाही. तेवढा मोठा अजून झालेलो नाही.
सध्या मी माझ्यासाठी काही करू बघतो आहे.
पण तशी वेळ आली, आणि सामर्थ्य आले की नक्कीच काहीतरी करेन.
(कार्यरत)
ज्ञानेश.
"Great Power Comes With Great Responsibilities"
पुण्यात 'कार चेसिंग'चा थरार!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4796866.cms
आता याचा एन आर आय असण्याशी काय सम्बन्ध? सलमान खान कुठे एन आर आय आहे? :)
राजेसाहेब,
मी देशासाठी काहीही करत नाही याचे फार वाईट वाटते.
सध्या जे कोणी फ्रस्ट्रेटेड आहेत त्या माझ्या देशदादा व देशतायांना बरे वाटावे म्हणून जरा कोल्हापूरी पायताणं घालून बाहेर फिरून येते झालं!
राहूनराहून वाईट वाटतं ते एकाच गोष्टीचं. तिथे असेपर्यंत पान खाउन पिचकार्या मारायला नाही शिकले. तेंव्हा नाही शिकले तर आता साठी सत्तरीमध्ये काय शिकणार?
रेवती
अजुन तेवढा अनुभव नसल्याने अथवा तेवढे योग्य वय नसल्याने देशासाठी नक्की काय आणि कसे करावे ह्याची खरोखर कल्पना नाही, मात्र तरीही जमेल तेवढे करत असतोच.
देशासाठी काहितरी करणे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या देशात राहणार्या सामान्य जनतेसाठी काहितरी करणे असे आम्हाला वाटते, मग आम्ही तेच करतो ...
देशातील नागरिकांच्या करातुन उभारलेल्या शिक्षणसंस्थांमधुन उच्च शिक्षण घेतले असल्याने एक जबाबदारी म्हणुन देशाला उपयोगी पडेल अशा उद्योगात काम करतो, अर्थात त्यात वैयक्तिक स्वार्थ आहेच पण तरीही आमच्या कामामधला अगदी नगण्य का होईना पण काही तरी भाग देशासाठी उपयोगी पडतो असा आमचा विश्वास आहे.
देशाच्या न्याय आणि इतर सरकारी व्यवस्थेबद्दल नेहमीच आदर ठेऊन वागतो, शक्य तितके त्यांना सहकार्य करायचे प्रयत्न करतो.
ग्रास रुट लेव्हलवर काम करणार्या स्वयंसेवी संस्थांना शक्य तितकी मदत नेहमीच करत असतो.
पुढची येणारी शिकलेली पिढीच देशाचे आधारस्तंभ असल्याचा आमचा विश्वास असल्याने त्यांना शक्य तितके मार्गदर्शन व मदत करत असतो.
नोकरशाही अथवा राजकारण हे एक "गटार" न मानता जरी आज जमले नाही तरी भविष्यात त्यात सामील होईन देशासाठी मेनस्ट्रीममध्ये काहितरी भरिव काम करु अशी इच्छा बाळगतो.
देशपातळीवर घडणार्या व दुरगामी परिणाम करणार्या विवीध घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यातुन दुसर्यांना काय समजवता येईल हे नेहमीच पहात असतो. इतर सामान्य व जास्त माहिती नसलेल्या लोकांना हे सोप्या भाषेत समजावुन देण्याचा प्रयत्न करतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे "माझा देश नक्की पुढे जाईल व त्याला आमच्यासारखे तरुनच नक्की हातभार लावतील " ह्या तत्वावर नितांत श्रद्धा ठेवतो ...
मला वाटते सध्या तरी एवढेच करतो ...
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
कर भरणे वगैरे करणे ही देश सेवा नव्हे (असे मला वाटते). तो तर नियम आहे. उद्या जर कोणी सांगितले की जर इच्छा असेल तर आणि जितकी इच्छा असेल तितका कर भरा.. तर ह्या देशप्रेमी करदात्यांपैकी किती जण कर भरतील?
मग मी देशासाठी असे खास काहि करतो का? तर नाहि. फार तर मी भारतात असेन तर प्रत्येक स्तराच्या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत मत देतो.
शिवाय घटनेमध्ये जी नागरीकांची कर्तव्ये दिली आहेत त्याचे यथायोग्य पालन करतो. (अर्थात ही कर्तव्ये आहेत ती पाळून फार काहि देशासाठी करतो असे नाहि)
भारतीय नागरीकाची कर्तव्ये
१. घटनेचे पालन करणे; तसेच राष्ट्रध्वज, राष्ट्रीय संस्था, राष्ट्रापुढील आदर्श व्यक्ती व राष्ट्रगिताचा सन्मान करणे
२. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतून उदयाला आलेल्या विविध उपयुक्त संकल्पना आचरणात आणणे, त्यांना बळकटी देणे
३. भारताची स्वायत्तता, एकात्मता आणि अखंडता पाळणे व त्याचे रक्षण करणे
४. भारताचे रक्षण करणे व राष्ट्रीय सेवेमध्ये गरज असताच रुजू होणे
५. विविध धर्म, भाषा, विभाग आणि सामाजिक भिन्नतेच्या या समाजात सलोखा व बंधुभाव राखणे; तसेच स्त्रियांच्या अधिकारांचा आब राखणे
६. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतींचे व इमारतींचे महत्त्व जाणून त्याचे रक्षण करणे
७. भारतातील जंगले, तलाव, नद्या, प्राणी इत्यादी नैसर्गिक संपदेचे रक्षण करणे व त्याला वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करणे
८. आचरणाद्वारे माणुसकी, शास्त्रीय दृष्टिकोन, चौकसबुद्दी व चांगल्या परिवर्तनाची आस बाळगणे
९. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसेचा (अहिंसेने) विरोध करणे
१०. स्वतःचे तसेच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीने प्रयत्न करणे, ज्यामुळे राष्ट्र सतत प्रगतिपथावर राहील
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
- देशातील नागरिकांच्या करातुन उभारलेल्या शिक्षणसंस्थांमधुन उच्च शिक्षण घेतले असल्याने एक जबाबदारी म्हणुन देशाला उपयोगी पडेल अशा उद्योगात काम करतो, अर्थात त्यात वैयक्तिक स्वार्थ आहेच पण तरीही आमच्या कामामधला अगदी नगण्य का होईना पण काही तरी भाग देशासाठी उपयोगी पडतो असा आमचा विश्वास आहे.
- देशाच्या न्याय आणि इतर सरकारी व्यवस्थेबद्दल नेहमीच आदर ठेऊन वागतो, शक्य तितके त्यांना सहकार्य करायचे प्रयत्न करतो.
- ग्रास रुट लेव्हलवर काम करणार्या स्वयंसेवी संस्थांना शक्य तितकी मदत नेहमीच करत असतो.
- पुढची येणारी शिकलेली पिढीच देशाचे आधारस्तंभ असल्याचा आमचा विश्वास असल्याने त्यांना शक्य तितके मार्गदर्शन व मदत करत असतो.
- नोकरशाही अथवा राजकारण हे एक "गटार" न मानता जरी आज जमले नाही तरी भविष्यात त्यात सामील होईन देशासाठी मेनस्ट्रीममध्ये काहितरी भरिव काम करु अशी इच्छा बाळगतो.
- देशपातळीवर घडणार्या व दुरगामी परिणाम करणार्या विवीध घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यातुन दुसर्यांना काय समजवता येईल हे नेहमीच पहात असतो. इतर सामान्य व जास्त माहिती नसलेल्या लोकांना हे सोप्या भाषेत समजावुन देण्याचा प्रयत्न करतो.
- सर्वात महत्वाचे म्हणजे "माझा देश नक्की पुढे जाईल व त्याला आमच्यासारखे तरुनच नक्की हातभार लावतील " ह्या तत्वावर नितांत श्रद्धा ठेवतो ...
मला वाटते सध्या तरी एवढेच करतो ... ------ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)