हि बातमी पेपर मधे वाचून फार छान वाटले..
परंतु, प्रतिक्रियांमधे काही जणांनी गोडसे बरोबर गप्पा मारायला आवडेल असे वाचून अंमळ दु:ख झाले...
असो... प्रत्येकाची आवड-निवड...
-
अफाट जगातील एक अडाणि.
परंतु, प्रतिक्रियांमधे काही जणांनी गोडसे बरोबर गप्पा मारायला आवडेल असे वाचून अंमळ दु:ख झाले...
मला वाटते की गोडसे, हिटलर, स्टॅलीन अशा प्रकारची नावे ही काही वैयक्तिक हिरो म्हणून कोणी डोक्यात ठेवून लिहीली नसावीत. अशा प्रकारच्या मनोवृत्ती (विकृती?) कशा विचार करतात हा डोक्यात आलेला विचार असावा... उ.दा. तेंडूलकरांनी फाशी जाणार्या गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुधीर गाडगिळांकडून जक्कलच्या मुलाखतीसाठी ते आणि मोहन गोखले ("माफीचा साक्षिदार" काढण्याआधी) गेले होते त्यावेळेला गजाआडचा जक्कल कसा रानटीपणे वागला हे सांगितले होते. त्याच पठडीतील हा विचार आहे.
विकास भौ तुमचि प्रतिक्रियेतील भावना समजली, पण तोच भाव तुमच्या प्रश्नात 'वरिजनली' नव्हता.... तुमच्या प्रश्नातील आणि ओबामांना विचारलेल्या प्रश्नातील भाव (मला समजलेला) नक्कीच वैयक्तिक हिरो म्हणून होता.
तुम्ही दिलेले प्रस्तुत उदाहरण नक्कीच चुकीचे आहे आणि इथे गैरलागू आहे. सुधीर गाडगीळ (त्यांच्या बद्दल संपूर्ण आदर राखून) यांचा संपूर्ण जन्म लोकांच्या मुलाखती घेण्यात गेला (आणि ति गोष्ट ते फार सुंदर करतात) ... त्यात त्यांनी जक्कल ची मुलाखत घेतली तर काही वेगळे नाही केले. जर त्यांना विचारले असते कि आयुष्यात एका व्यक्तीला भेटायचे, ती कोणती आणि त्यावर त्यांनी जक्कलचे नाव सांगीतले असते तर ते ईथे लागू झाले असते....
बराचश्या प्रतिक्रियांवरून मला तरी समजले कि सर्वांनी आपले व्यक्तिगत आदर्श डोळ्यासमोर ठेवून नावे दिलेली आहेत, त्यात गोडसे हे नाव प्रकर्शाने खटकते.
@गटणे -
कोणतीही विचारसरणी समजुन घेणे नक्क्कीच वाईट नसते. भले ती वाईट असो वा चांगली.
मुद्दा बरोबर आहे पण तो विचारसरणीला लागू आहे, जिथे काही विचारसरणीच नाही तिथे गैरलागू आहे. विचारसरणी वैगेरे अवघड शब्द वापरून उगाचच गोडसेचे उदात्तीकरण करू नका.
-
अफाट जगातील एक अडाणि.
१. हिटलर - मागं वळून पाहताना काय वाटतं? खेद, स्वतःची घृणा की जे केलं ते बरोबरच होतं?
२. स्टालीन - एक माणूस-नेता म्हणून, कम्युनिझ्म तुमच्यामुळं अपयशी ठरला की, तुम्ही कम्युनिझ्ममुळं?
३. लादेन - का, का हे सारं?
यातून काय तुम्हाला ही त्रयी त्यांची होरो वाटते?
बाकी अडाणींचा मुद्दा बरोबर आहे. पण प्रत्येक प्रतिसाद हा माझ्या मूळ प्रश्नाला (आणि त्यात घातलेल्या मर्यादांना) संदर्भ ठेवून दिला आहे असे वाटत नाही. नाहीतर हयात नसलेल्या व्यक्तीत विसोबा, मिभो, विकास आणि माधुरी दिक्षित दिसले नसते. :-)
मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन.
असतील? अंदाज? हे काय स्पष्ट शब्द आहेत का? यात एकच गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे तुम्ही वेगळ्या चष्म्याने प्रत्येकास बघत आहात आणि फुकाचे आरोप करत गैरसमज पसरवत आहात.
बाकी तुमच्यासारखा, मला जर विकृतीलाच हिरो समजणार्यांच्या समुदाययाचा अनुभव आला तर मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन.
* येथे "राम" या शब्दाचा अर्थ आपला (जो काही) आदर्श (असला तर), त्याचा जिथे अभाव आहे तेथे न राहणे पसंद करणे असा आहे.
आता माझा अंदाज मांडला तर त्यात काय इतकं चिडण्यासारखं बुवा? फुकाचे आरोप करत गैर समज पसरावयचे असते तर ह्या लोकांना असेच म्हणायचे आहे असे खात्रीने ठोकून दिले असते ना! (टिळकांचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असे तू मागे म्हणाला होतास तसे.)
असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे. आणि आपल्याला एखाद्याचे विचार विकृत वाटले म्हणून सगळ्यांना तसे वाटलेच पाहिजेत असेही नाही. प्रत्येकाची मते असतात आणि त्याचा सर्वांनी आदर करावा.
पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांनी त्यांना नथुराम विकृत विचारसरणीचा आहे असा प्रतिसाद दिल्यास मी माझे शब्द मागे घेऊन सर्वांची माफी मागेन.
पण तसा प्रतिसाद न आल्यास तू मात्र चपला घालून राम म्हणू नयेस एवढीच विनंती :)
आता माझा अंदाज मांडला तर त्यात काय इतकं चिडण्यासारखं बुवा?
चिडतोय कोण? मी फक्त इतरांकडून स्पष्ट शब्द मागणारा स्वतः मात्र अंदाज म्हणजेच वास्तव असे म्हणतो तेंव्हा त्यातील विरोधाभास दाखवून दिला.
असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे.
परत तेच अंदाज! कशाची खात्री म्हणून दिसत नाही :)
पण तसा प्रतिसाद न आल्यास तू मात्र चपला घालून राम म्हणू नयेस एवढीच विनंती
मी त्यांच्याकडून कुठल्याच प्रतिसादाची वाट पहात नाही आहे. विकृत वगैरे तुम्हाला वाटले आहे, मला नाही.
मला देखील नथुराम गोडसेना भेटायला आवडेल. त्यांनी जे काही केलं ते केवळ असमर्थनीयच होतं. कुठल्याही मानवाचा खुन किंवा हत्येचे समर्थन मी कधीही करणार नाही. गांधींच्या तर नाहीच नाही. कारण कुणी कितीही म्हणो आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीत त्यांचा मोलाचा वाटा होता आणि आहे. पण म्हणुन मी नथुरामला विकृत मनोवृत्तीचा नाही म्हणणार. कारण एवढी एक घटना सोडली तर नथुरामच्या आयुष्यात कोणी बोट दाखवावे असे काही घडलेले नाही. तो विकृत असता तर त्यापुर्वीसुद्धा त्यांने कर्तव्याच्या नावाखाली आणखी काहीजणांना मारले असते किंवा प्रयत्नतरी केला असता. पण तसे कुठेच आढळत नाही. मग म. गांधींसारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्वासच जिवे मारण्याचा निर्णय त्याने का घेतला असेल? गोपाळ गोडसेंनी त्यांच्या पुस्तकात भले नथुरामचे समर्थन केले असेल. पण या निर्णयाप्रत येण्याचे नक्की कारण काय होते? ते नथुरामकडुनच जाणुन घ्यायला मला आवडेल.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मलाही असे वाटते की हे निमित्तमात्र साहेबाना जे जे त्याना पटते ते ते खरे बाकी सगळे विकृत.
आमचे गुरु दत्तात्रेय आहेत. त्यानी स्वतः २४ गुरु केले. त्यानीच हे शिकवले आहे की ज्याच्याकडे जे जे चांगले आहे ते ते उचला.
विकृती प्रत्येकामधे असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करुन जमले तर त्याचे गुण बघावे. त्यामुळे रामायणाचा व्हिलन रावण वैदिक संस्कृतीत अजूनही मानला जातो (पूजला नव्हे) ते त्याच्या बुद्धीमत्तेमुळे. वेदांच्या पठण पद्धतीमधील घनपठणाच्या आधीचे क्रम आणि जटा हे प्रकार रावणाने निर्माण केल असे आजही मानले जाते. (आता या गोष्टीत तुम्हाला रस नसेल तर तो माझा दोष नाही).
शेवटी प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात आणि प्रकृती-विकृतीही कालसापेक्ष असतात. त्यामुळे तुम्ही जरी
असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे. आणि आपल्याला एखाद्याचे विचार विकृत वाटले म्हणून सगळ्यांना तसे वाटलेच पाहिजेत असेही नाही. प्रत्येकाची मते असतात आणि त्याचा सर्वांनी आदर करावा हे लिहीले असले तरी पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांनी त्यांना नथुराम विकृत विचारसरणीचा आहे असा प्रतिसाद दिल्यास मी माझे शब्द मागे घेऊन सर्वांची माफी मागेन. ह्यातून तुमचे म्हणणे असे वाटते की माझ्या पेक्षा वेगळी आणि विरुद्ध मते असतील तरी सर्वांनी माझीच मते मानली पाहीजेत.
बाकी हिटलर आणि नथुराम विषयी त्या धाग्यांवर लिहीनच.
पुण्याचे पेशवे
Since 1984
मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन.
मोडक अपवाद आहेत तर मीही अपवाद आहे. मलाही गोडसे आणि हिटलर हीरो वाटत नाहीत. आणि श्रावण काकांना प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला श्रावण काकांशी या विषयावर बोलायला आवडेल.
धमु आणि/किंवा पुण्याचे पेशवे यांना काय आवडेल हे त्यांनी लिहावं ना, तुम्ही का त्यांच्याबद्दल बोलताय? शिवाय हे दोघं म्हणजे सगळे मिपाकर नव्हेत.
(खरंच नवे लोकं मिपा नीट वाचत नाहीत आणि वर सरसकट, सर्वसमावेशक विधानं करतात.)
अदिती
प्रत्येकाला काय विचारतो आहे ते लिहिलं हे एक बरं झालं. एरवी कुठून या धाग्यावर प्रतिसाद दिला अशी स्थिती झाली असती. माझ्या मूळ प्रतिसादातील जी. कांबळे यांच्यासाठी केलेल्या प्रश्नाचाही खुलासा आत्ताच करतो - 'त्या' छत्रपती शिवरायांची प्रेरणा आज दिसतीये कुठं? असा हा प्रश्न आहे. प्रश्नाचा सूर उघडच ती प्रेरणा आज दिसत नाही असा आहे. तो तसाच आहे. आज ती प्रेरणा दिसत नाही. त्याचा अर्थ शिवरायांची प्रेरणा संपली असा आता काढू नका. ती धारण केली जात नाही असा त्या प्रश्नाचा सूर आहे.
मला असे वाटते की "Hmmmm" याचे मराठीकरण "हम्म्म्म्म" असे न करता "हंssssss" असे करावे! जसे मी "WOW"चे मराठीकरण "वाsssssव" असे केले तसे.
जस्ट एक सूचना! हम्म्म्म्म म्हटले की लहानपणच्या "हम्मा"चीच (गाय) आठवण येते!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
बर्याच मोठ्या लोकांनी निदान गेल्या शंभर-दोनशे वर्षात केलेले कार्यत्यांच्या व त्यांच्यावरच्या साहीत्य, शोधनिबंध, काहींचा दृक्श्राव्यफिती माध्यमातुन उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना भेटण्यात तसा फारसा इंटरेस्ट नाही.
तर अश्या त्यांना भेटण्यापेक्षा इंटरेस्ट आहे तो ह्या मोठ्या लोकांची उमेदीची वर्षे कशी होती, त्यांना आपल्यातल्या उर्जेची, श्रेष्ठत्वाची जाणीव, आकलन कसे झाले ते उमजुन घेण्यात.
त्यामुळे (प्रसिद्ध व्यक्तिंपेक्षा) आता भेटायचे म्हणले तर बरेचदा आपल्याला आपल्याच पणजोबांपेक्षा मागल्या पिढीतले कोणीच माहीती नसते तर त्या लोकांना, पारतंत्र्याच्या काळात त्यांची रहाणी, विचारसरणी, त्यांच्यावरचे पगडे, ज्या गोष्टी-विचार आपण अगदी गृहीत धरुन चालतो तीच गृहीतके त्याकाळात कशी होती. आपले डिएनए जिथुन आले त्या आपल्याच खानदानातील लोकांबद्दल जास्त माहीती /समाजातील/समुहातील, प्रगती/अधोगती समजुन घ्यायला जास्त आवडेल.
तरी अगदीच विकासरावांच्या धाग्याला धरुन नाव सांगायचे म्हणल्यास महाराष्ट्रातील कुठलाही एक मोठा संत महात्मा व लिओनार्डो दा विंची (बराच जुना काळ)
सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर मी या निर्णयास पोचलो आहे कीं मिपावर फक्त तीन लोक प्रामाणिक आहेत!
१. विसोबा खेचर
२. अमित अभ्यंकर
३. प्रा. बिरुटे
कुणाहणापुरुषाने मेरीलिन मन्रो, जॅकी केनेडी, मीनाकुमारी, नूतन, महाराणी गायत्री देवी यांच्यासारख्या सुंदर स्त्रियांची नावे का दिली नाहीत? बरे दिसत नाही म्हणून?
बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली?
खरे बोलायला का लोक घाबरतात बॉ?
ते. रा.
बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली?
सगळेच लोकं वन-ट्रॅक विचार करत नाहीत म्हणून! त्यातून तुम्हाला राज कपूर, राज कुमार, मा. विनायक, ग्रेगरी पेक फारच आकर्षक वाटत असतील तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे ... लवकरात लवकर मास्तरांना भेटा.
अदिती
(अधिक माहितीसाठी ३०% लोकांना विचारा.)
- बालगंगाधर टिळक,
- ज्ञानेश्वरराव विट्ठलपंत कुलकर्णी-आपेगांवकर,
- बाळशास्त्री हरदास,
- पामुलपर्ति वेङ्कट नरसिंह रावु
- मुहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)
- सुब्रमणियभारति,
- नामक्कल रामलिङ्गम पिळ्ळै,
- टी. एम. सौन्दर राजन,
- एम. एस. सुब्बुलट्चुमि
- आनंद राजगोपाल कुलशेखर भागवत,
- हैयो हैयैयो!