Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नथुराम गोडसे आणि हिटलर

न
निमीत्त मात्र
Fri, 09/18/2009 - 03:30
🗣 89 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
56264 वाचन

💬 प्रतिसाद (89)
अ
अवलिया Fri, 09/18/2009 - 09:11 नवीन
हेच बोलतो छान चर्चा.. :) -- हॅरी* हिटलर * समजले नसेल तर तुम्हाला इतिहास माहित नाही. ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/18/2009 - 09:01 नवीन
डानराव, एकदम व्यवस्थित आणि परिपुर्ण प्रतिसाद ! सहमत आहे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/18/2009 - 09:01 नवीन
डानराव, एकदम व्यवस्थित आणि परिपुर्ण प्रतिसाद ! सहमत आहे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 09/18/2009 - 09:16 नवीन
अत्यंत विनोदी धागा आहे.छान करमणुक होते. अजुन विनोदी प्रतिसाद यावेत. वेताळ
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 09/18/2009 - 09:17 नवीन
विकृत विचारांचे नाही पण ... नथुराम गोडसेंच्या देशभक्तीबद्दल अजिबात संदेह नाही , आणि मी गांधीवादी सुद्धा नाही . पण एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नाहीत, किंवा त्याचे वागणे आपल्या अपेक्षे प्रमाणे नाही म्हणुन त्याची हत्या करणे हे चुकीचे वाटते. हिटलर चा ज्यू द्वेष हा त्याचा एकट्याचाच नव्हता तर देशातील सर्व जर्मन जनता ज्यू द्वेष्टी होती ... हे चित्र जर्मनीतच नाही तर ज्या देशांमधे ज्यू होते तिथे दिसते... त्याला आर्थिक, सामजिक व धार्मिक कारणे आहेत.. तरीही त्यांची अशी कत्तल करणे चुकीचेच आहे .. हिटलर ला ज्यू लोकांना बंदी करुन त्यांचा वापर युद्ध परिस्थित जरुर असलेली कामे उदा. रस्ते , किंवा शस्त्र निर्मिती करणार्‍या कारखान्यांमधे इ. करायचा होता पण त्या कैद्याच्या छावण्याचे रुपांतर छळ छावण्यात करण्याचे श्रेय गेस्टापो चिफ हाईनरिच हिमलर याचे आहे असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/18/2009 - 09:21 नवीन
हिटलर चा ज्यू द्वेष हा त्याचा एकट्याचाच नव्हता तर देशातील सर्व जर्मन जनता ज्यू द्वेष्टी होती ... हे चित्र जर्मनीतच नाही तर ज्या देशांमधे ज्यू होते तिथे दिसते... त्याला आर्थिक, सामजिक व धार्मिक कारणे आहेत.. तरीही त्यांची अशी कत्तल करणे चुकीचेच आहे .. याला +१ हीच परिस्थिती रशिया मधे १९ व्या शतकाच्या अखेरीस होती. तेव्हा रशियन ज्यूंनी अमेरीकेत स्थलांतर केले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
प्रदीप Sat, 09/19/2009 - 08:08 नवीन
हिटलर ला ज्यू लोकांना बंदी करुन त्यांचा वापर युद्ध परिस्थित जरुर असलेली कामे उदा. रस्ते , किंवा शस्त्र निर्मिती करणार्‍या कारखान्यांमधे इ. करायचा होता पण त्या कैद्याच्या छावण्याचे रुपांतर छळ छावण्यात करण्याचे श्रेय गेस्टापो चिफ हाईनरिच हिमलर याचे आहे असे म्हणतात.
आणि अशा त्या श्रमछावण्यांचे रूपांतर छळछावण्यांत होत होते तेव्हा हिटलर स्वतःच रस्तेबांधणीची अंगमेहनतीची कामे करण्यात मग्न होता असेही म्हटले जात असावे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
व
वि_जय Fri, 09/18/2009 - 09:27 नवीन
नथुराम गोडसेंच्या देशभक्तीबद्दल अजिबात संदेह नाही , आणि मी गांधीवादी सुद्धा नाही . पण एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नाहीत, किंवा त्याचे वागणे आपल्या अपेक्षे प्रमाणे नाही म्हणुन त्याची हत्या करणे हे चुकीचे वाटते. मनिषादेवी हत्येच समर्थन कोणिच करत नाही.. अगदी नथुरामने सुध्दा केल नसेल. त्याला गांधीवाद्सुध्दा संपवायचा नव्हता.. त्याला संपवायचा होता तो गांधीचा पाकड्यांसमोरचा गुढगे टेकून होणारा नमाज. फाळणीहोण्यापुर्वी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील म्हणणार्‍या महात्म्याने फाळणीस मान्यता दिली वर पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी प्राणांतिक ऊपोषण?हे कधी संपले असते का ?
  • Log in or register to post comments
क
कवटी Fri, 09/18/2009 - 10:32 नवीन
>>फाळणीहोण्यापुर्वी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील म्हणणार्‍या महात्म्याने फाळणीस मान्यता दिली वर पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी प्राणांतिक ऊपोषण? हे कमी होते म्हणून की काय , बलात्कार आणि कापाकापीतून वाचुन जे हिन्दू जीव मुठीत धरून हिंदुस्थानच्या आश्रयाला आले त्याना "तुम्ही तिकडे राहून मरायला हवे होते. इकडे कशाला आलात?" असला मिठ चोळणारा सल्ला कम प्रश्न विचारण्यात आला. बाकी डॉणरावानी अत्यंत सुंदर उत्तर दिलय. हेच उत्तर वर अपेक्षित होते. असो बाकी चालुद्या.... कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वि_जय
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/18/2009 - 11:42 नवीन
<<हे कमी होते म्हणून की काय , बलात्कार आणि कापाकापीतून वाचुन जे हिन्दू जीव मुठीत धरून हिंदुस्थानच्या आश्रयाला आले त्याना "तुम्ही तिकडे राहून मरायला हवे होते. इकडे कशाला आलात?" असला मिठ चोळणारा सल्ला कम प्रश्न विचारण्यात आला.>> अगदी, नथुरामच्या या पराकोटीच्या निर्णयाला हाच मुद्दा कारणीभुत झाला. मुस्लीमांच्या भारतात राहण्याचे समर्थन "राम आणि रहीम" असे देणार्‍या गांधींनी पाकिस्तानमधुन भारतात पळुन आलेल्या हिंदुंना मात्र वरील प्रश्न विचारला होता. त्यांच्या मते पाकिस्तान ही निर्वासितांची जन्मभुमी होती आणि ती सोडुन न येता त्यांनी वेळ पडल्यास तिथेच मरण पत्करायला हवे होते. एकीकडे मुस्लीमांचा अनुनय तर एकीकडे हिंदुंना मात्र ही वागणुक या पक्षपाती वर्तनामुळेच नथुराम गांधीवधासारखे निंदनीय कृत्य करायला तयार झाला. याचे परिणाम काय होतील, आपल्या घरादाराची धुळधाण होइल हेही त्याला माहीत होते. पण तरीही त्याने हा निर्णय घेतला. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
न
निखिल देशपांडे Fri, 09/18/2009 - 11:23 नवीन
नाही, ही लोकं मला अजिबात "विकॄत विचारांची" वाटत नाहीत. त्यंच्या प्रत्येक कॄतीमागे एक व्यवस्थित वैचारीक बैठक होती. अर्थात प्रत्येक विचारसारणीला एकापेक्षा अधिक बाजु असल्याने काही जणांना ही विचारसारणी "विकॄत" वाटु शकते, मात्र त्याने ती "विकॄत" ठरतेच असे अजिबात नाही, तसा आग्रहही नसावा ... डॉनच्या वरच्या प्रतिसादाशी सहमत आहे. मागे मिपा वर क्रांतिकारकांविषयी सुद्धा अशी चर्चा झाली होती. त्यात क्रांतिकारंकाची वैचारिक बैठकीचा किंवा त्यांचा उद्देशाचा विचार जर केला नाही तर ते पण विकृत वाटु शकतात असे निष्कर्श काढणारे सुद्धा अनेक प्रतिसाद होते. त्यामुळे क्रांतिकारक विकृत ठरतात असे नाहीच. असो त्यामुळे आपाल्याला न पटणार्‍या विचारसरणीची सरळ्सरळ विकृत म्हणुन हेटाळणी करणे मला पटत नाही. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
न
नम्रता राणे Fri, 09/18/2009 - 12:53 नवीन
बलात्कार आणि कापाकापीतून वाचुन जे हिन्दू जीव मुठीत धरून हिंदुस्थानच्या आश्रयाला आले त्याना "तुम्ही तिकडे राहून मरायला हवे होते. इकडे कशाला आलात?" असला मिठ चोळणारा सल्ला कम प्रश्न विचारण्यात आला.>>अगदी, नथुरामच्या या पराकोटीच्या निर्णयाला हाच मुद्दा कारणीभुत झाला विशाल कुलकर्णी यांच मत अगदी योग्य आहे. केवळ म्हणूनच गोडसेंच माथ भडकल. ज्या व्यक्तीच्या एका निर्णयामूळे लाखो हिंदूची कत्तल झाली, आयाबहीणींच्या अब्रू लुटल्या गेल्या आणी "तुम्ही तिकडे राहून मरायला हवे होते. इकडे कशाला आलात?" हा अहेर करणार्‍या तथाकथित संताचा गोडसेंनी वध केला. कदाचित गोडसेना वाटल असेल कि हिच खरी काळाची गरज आहे. आणि आजच्या काँग्रेस राज्यकर्त्यांना जर गांधींचा सत्यवादी बाणा मान्य आहे, तर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकावर बंदी आणण्याचा खटाटोप का केला? कि वाटल सत्य बाहेर आल तर गोडसे हिरो होतील म्हणून..
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 09/18/2009 - 13:18 नवीन
फाळणी मुळे लाखो लोकांना जीव गमवावे लागले आणी जे वाचले त्यांचे सर्वस्व लुटले गेले हे अगदी खरे आहे. आणि नथुराम गोडसेंनी गांधी हत्या केल्यानंतर ब्राम्हणांची स्थिती काय होती. त्यानाही प्राण गमवावे लागले, घरे जाळली गेली . म्हणजे फाळणी मुळे जे झाले तेच गांधी वधा मुळे झाले ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नम्रता राणे
क
कानडाऊ योगेशु Fri, 09/18/2009 - 13:59 नवीन
सर्वपित्री आमावस्येलाच नथुराम आणि हिटलरचे भूत मि.पा वर आलेय की काय? >:) >:) कुणी युयुस्तुसाहेंबांना बोलवा जरा!!!!
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 09/18/2009 - 14:12 नवीन
अभ्यंकर, ७८ वर्षाच्या माणसाच्या चुकीमुळे देशाच वाट्टोळ होत असेल तर काय करायच? त्यांना मारण गरजेच होत आणि ते पुण्यकर्म गोडसेंने केल.. त्या साठी त्यांना लाखो सलाम. देशाच्या भवितव्यासठी वय, लिंग ही मर्यादा नसते. चुक ती चुकच... गोडसे हे माथेफिरु अजिबात नव्हते. त्यांच्या सारखा विचारी माणुस नव्हता कोणी.
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Mon, 09/21/2009 - 16:34 नवीन
आदरणिय अजमल कसाब यांना पण मग देशभक्त म्हणावे लागेल......... वा रे पुण्य कर्मे...... त्याने तर किती तरी चुकिच्या(म्हणजे तुमच्या शब्दांत ज्यांचा देशाला फायदा नाही) लोकांना मारणं गरजेचे होते ते कार्य पुर्ण केले. वा रे धन्य ती देश भक्ती अन.. धन्य तो गोडसे..... कुणाही निशस्त्र व्यक्तिच्या हत्येचे समर्थन होऊच शकत नाही. मग ते गांधीजी असोत किंवा मुंबई हल्ल्यात मारले गेलेले निश्पाप नागरिक... अश्या स्वरूपात हल्ला करणारा षंढ असतो.... दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
व
वि_जय Fri, 09/18/2009 - 14:20 नवीन
हत्येनंतर जो हिंसाचार उसळला त्याचेही कुठल्यातरी विचारधारेच्या नावाखाली समर्थन केले तर चालेल का? अमितराव, हत्येपुर्वीच्या आणी फाळणीनंतरच्या हिंसेचे काय? त्याचे तुम्ही समर्थन करीत आहात काय? ७८ वर्षाचा निशस्त्र माणूस? ज्याने भारतमातेचे दोन तु़कडे केले तो माणुस निशस्त्र?
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 09/18/2009 - 14:22 नवीन
विकास यांनी त्यांच्या घाग्यात (श्रावण मोडक यांचे) उदाहरण देऊन काढलेले अनुमान, वरील अनेक प्रतिसाद वाचून फोल ठरले आहे, असेच दिसते! बाकी चालू द्यात!! स्वगतः स्वाक्षरीचे वाक्य बदलून "An eye for an eye makes the whole world blind" असे ठेवावे काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 09/18/2009 - 14:27 नवीन
मलाही नेमके हेच दाखवायचे होते. बाकी सर्वांच्या मताचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ध
धमाल मुलगा Fri, 09/18/2009 - 15:45 नवीन
"जोवर सिंधूनदी माझ्या भारतमातेला परत मिळत नाही तोवर माझ्या अस्थिंचं विसर्जन करु नये. आणि ते भारतात परत आलेल्या सिंधूनदीत करावे." -श्री.नथुराम गोडसे. ------- हल्ली काँग्रेस गवतासारखं विचारवंतांचं पीक जोमानं येऊ घातलंय वाटतं. :D असो. श्री.गोडसे काय होते, त्याची वैचारिक मूस काय होती, कसे होते, राष्ट्र मोठे की व्यक्ती...भले कितीही खस्ता खाल्ल्या असो त्या व्यक्तीने राष्ट्रासाठी! ह्या प्रश्नानं उद्विग्न होणारी गोडसेंची प्रखर राष्ट्रभक्ती ह्या गोष्टी कळण्याइतपत आणि त्या समजवण्याइतपत समाजमनाची प्रगल्भता शिल्लक उरली आहे काय असा एक क्षुद्र प्रश्न कित्येकदा मनात उभा राहतो. आणि त्यावर मौन बाळगणेच पसंत करतो. बाकी चालु द्या! आमची मतं आहेत ही जशी आहेत तशी आहेतच. ह्याउप्पर त्याबद्दल भाष्य करण्यासाठी बांधिलकी नाहीच ;) (च्यायला! मालक इफेक्ट आला की!) -(केवळ निमित्तापुरता न असता सदैव ठाम असलेला) धमाल मुलगा.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 09/18/2009 - 15:52 नवीन
मला वाटते की गोडसे, हिटलर, स्टॅलीन अशा प्रकारची नावे ही काही वैयक्तिक हिरो म्हणून कोणी डोक्यात ठेवून लिहीली नसावीत. अशा प्रकारच्या मनोवृत्ती (विकृती?) कशा विचार करतात हा डोक्यात आलेला विचार असावा... उ.दा. तेंडूलकरांनी फाशी जाणार्‍या गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुधीर गाडगिळांकडून जक्कलच्या मुलाखतीसाठी ते आणि मोहन गोखले ("माफीचा साक्षिदार" काढण्याआधी) गेले होते त्यावेळेला गजाआडचा जक्कल कसा रानटीपणे वागला हे सांगितले होते. त्याच पठडीतील हा विचार आहे.
मला जर विकृतीलाच हिरो समजणार्‍यांच्या समुदाययाचा अनुभव आला तर मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन.
- विकासच्या प्रतिसादांमधून साभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/18/2009 - 15:56 नवीन
वाहवा! म्हणजे दुसर्‍याना तुम्ही चपला दाखवणार पण तुम्हाला कोणी मजेतही चपला दाखवल्या तर तुम्हाला नाकाला मिरच्या झोंबणार. जगातले बहुतेक हुकुमशहा असेच असतात म्हणे. बाकी चालूद्या. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
ध
धमाल मुलगा Fri, 09/18/2009 - 16:03 नवीन
ते त्यांचं वैयक्तिक मत... मी मांडलं ते माझं वैयक्तिक मत!! आपण मांडलंत ते त्यांचं उधारीवर आणलेलं मत!!! हार्डली मॅटर्स टू मी :) अर्थात विकृत ह्या शब्दाबद्दलही एखाद-अर्धी ओळ आधीच्या प्रतिसादात खरडली आहेच की..इतरांनीही त्यावर भाष्य केलेलं आहेच. त्यामुळे विकासराव चपला वगैरे घालणार नाहीत ह्याची मलातरी खात्री वाटते. :) बाकी, विकासरावांच्या प्रतिक्रियेतलं कोटेशन इतक्या पट्टकन येईलच ही माझी शंका बरोबरच होती तर! ;) --- काय मंडळी, आता पटलं ना मी काय बोललो होतो ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
द
दशानन Fri, 09/18/2009 - 16:26 नवीन
एकदम विचारपुर्वक लिहलेला प्रतिसाद, शब्द शब्द पटण्यासारखाच ! +१ ** सगळे गेले (आयडी) वरती... हे धम्या राहिले खालती.... हे राम :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विकास Fri, 09/18/2009 - 20:24 नवीन
मला जर विकृतीलाच हिरो समजणार्‍यांच्या समुदाययाचा अनुभव आला तर मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन. हे वाक्य आणि प्रतिसाद निमित्तमात्र साठी होते. त्यांना मूळ आक्षेप असल्याने जेथे आक्षेपार्ह वाटते तिथे कशाला राहता असा हा प्रश्न होता आणि आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Fri, 09/18/2009 - 20:47 नवीन
मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन.
ह्यात निमीत्तमात्र कुठे आला? मला नक्की काय आक्षेपार्ह वाटत आहे? आणि मी कुठून निघून जावे असे तुला वाटत आहे? माझ्या जाण्याने तुझे मुद्दे खरे ठरणार आहेत का? मी आणि माझ्या विचाराचे लोक इथे फार कमी आहेत असे दिसते आहे. तरी मला का घालवतोस बाबा? मुद्दे संपले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 09/18/2009 - 21:00 नवीन
मी आणि माझ्या विचाराचे लोक इथे फार कमी आहेत असे दिसते आहे. हे वाक्य थोडे बदलून असे लिहावेत (म्हणजे निमित्त मात्र असे म्हणतात असा याचा अर्था आहे!): "मी आणि माझ्यासारखे इथले लोक कमी विचाराचे आहेत असे दिसते." तुम्ही आणि विचार कसला म्हणता? जाता येता विनायक पाचलग च्या लेखा पासून ते स्वातीच्या चेरी केक पर्यंत नुसत्या पिंका टाकत इथून तिथे हिंडता आहात. स्वतः एक चांगले लिहीणार नाहीत, कुठल्याही वादग्रस्त नसलेल्या विषयात देखील कुणाला प्रोत्साहानात्मक चांगले म्हणणे सोडून टिका करणे, कुणाच्या शाब्दीक चुका काढत हिंडणे ही पण एक विकृती आहे. आणि ती तुमच्यात भरपूर दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Fri, 09/18/2009 - 21:19 नवीन
हे फारच वैयक्तिक होत नाही आहे का विकास? मला इथे व्यक्तिगत पातळीवर उतरुन चिखलफेक करायची नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 09/18/2009 - 21:27 नवीन
हे फारच वैयक्तिक होत नाही आहे का विकास? मला इथे व्यक्तिगत पातळीवर उतरुन चिखलफेक करायची नाही.. मग (साभार म्हणत पण) माझ्या लेखातील उतारे जसेच्या तसे देत प्रतिसाद देणे अथवा त्यावरूनच चर्चा टाकणे बंद केलेत तर बरे होईल. सुरवात मी करत नाही. पण म्हणून उगाच काहीतरी लिहीणे चालू केले तर ऐकले जाईल असे समजू नका. जे होईल ती माझ्या दृष्टीने रास्त टिकाच असेल तुम्हाला चिखलफेक वाटली तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
प
प्रदीप Sat, 09/19/2009 - 08:38 नवीन
व्वा!! हे वैयक्तिक आहे का? मग हे काय होते?
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे असो..जोक्स अपार्ट, विकासने आण्णा चिंबोरींच्या प्रतिसादाचाही प्रतिवाद करावा अशी विनंती. तो पर्यंत त्याचा वरील प्रतिसाद नीट वाचून घेतो.
विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे. हाहाहाहा मीही तेच करावे म्हणत आहे. वाचायला वेळ पुरत नाही तिथे इतके टंकायला कसा काय वेळ मिळतो ह्याचाच विचार करत होतो. असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. हे मात्र अगदी लाखमोलाचे बोललात.
मूळ लेख चांगला होता, व नीलकांत इ. अनेकांनी नुसती संघाच्या बाजूने उडती उत्तरे दिलेली होती तसेच इतर काहींनी नुसतीच संघाच्या नावाने धूळ उडवली होती. पण विकास ह्यांचे सविस्तर उत्तर आल्यावर त्याला नुसते टिचकीने (व टिंगलीने), कसलाही प्रतिवाद न करता तुम्ही ऊडवून लावलेत, त्याला फार दिवस झालेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
ह
हुप्प्या Fri, 09/18/2009 - 18:39 नवीन
६० वर्षांनंतर मागे वळून पाहताना मला वाटते की नथुराम गोडशांनी गांधींना मारले ते चूक केले. त्याने गांधी संपले पण गांधीवाद सगळ्यांच्या बोकांडी बसला. एक दांभिक तत्त्वज्ञान नको इतके उदात्त होऊन बसले. तमाम ब्राह्मण जात बदनाम होऊन बसली. राजकारणात अन्य अन्य सामाजिक क्षेत्रात एक नवी अस्पृश्य जात म्हणून ब्राह्मणांना वागवू लागले. हिटलरचे उदाहरण घ्यायचे तर त्याने जसे ज्यू लोकांना घाऊकपणे ठार केले तसे आजकालचे ब्राह्मणद्वेष्टे नेते संधी मिळाली तर तमाम ब्राह्मणांचे शिरकाण करायला मागेपुढे पहाणार नाहीत. प्रत्येक गल्लीबोळात, रस्त्याचौकांवर, नोटांवर नुसते गांधीच. अर्थात त्यांचे स्वच्छता, काटकसर, जातिभेदनिर्मूलन, साधेपण हे विचार कुणीही पाळताना दिसत नाही. निव्वळ फायद्याकरता गांधी वापरून घेणे एवढेच. मुस्लिमांचे लांगूलचालन हे भारतीय राजकारणातील एक आवश्यक घटक बनलेला आहे. उरलेल्या भारताचे नवे लचके तुटत आहेत. पाकिस्तानचा भूभाग पुन्हा मिळवून अखंड भारत बनवणे हे अशक्यप्राय आहे. जे नालायक लोक देशाचे प्रतिनिधी म्हणून मिरवताहेत त्यांच्याकडे बघता देशहितासाठी गांधीची हत्या करून फासावर चढणे हे अत्यंत व्यर्थ गेले असे मला वाटते. गांधी जिवंत राहून अशीच भोंगळ कृत्ये करत राहिले असते तर ते आणि त्यांचे तत्त्वज्ञान वेळच्या वेळी नष्ट झाले असते. त्याला संजीवनी मिळाली नसती. पण हे सगळे आता कळते आहे हेही खरे.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 09/19/2009 - 05:20 नवीन
अगदी खरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
स
सखाराम_गटणे™ Fri, 09/18/2009 - 19:34 नवीन
गांधीजीनी ही चर्चा वाचली असती तर स्वतः आत्महत्या केली असती. :) बाकी कलंत्री काका कुठे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 09/19/2009 - 00:18 नवीन
गांधीजीनी ही चर्चा वाचली असती तर स्वतः आत्महत्या केली असती.
संपूर्ण चर्चेत मला फक्त हाच प्रतिसाद (ह.) घेण्यासारखा वाटला आणि पटला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ए
एकलव्य Sat, 09/19/2009 - 04:58 नवीन
अजून शंभरी कशी भरली नाही? :? (आनंदाने अवांतर) एकलव्य
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार केळकर Mon, 09/21/2009 - 14:46 नवीन
हर्षद आनंदी, आपले मत आवडले. फक्त "ब्राम्हण" शब्द खटकला, आपल्याला "ब्राह्मण" म्हणायचे होते का? असो, मलाही स्वा. सावरकर, हिटलर, भगतसिंग आदि खूप मंडळीना भेटायला आवडेल!
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 10/08/2009 - 10:22 नवीन
सुधारणा केली आहे... B) B)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार केळकर
श
श्रीयुत संतोष जोशी गुरुवार, 10/08/2009 - 09:53 नवीन
गांधी ला यमसदनाला धाडणा-या नथुराम गोडसे यांना विनम्र अभिवादन. मला एका प्रश्नाचं उत्तर कोणी द्याल का ? मोहनदास गांधी हा वकिल असलेला माणूस(?) दक्षिण अफ्रिकेत होता. अजून शिकायला असेल किंवा वकिली साठी असेल ते अलाहिदा . त्यावेळी भारतात जी परिस्थीती होती त्याच्याशी त्या माणसाला त्याचा अपमान होईपर्यंत तरी काहीही देणेघेणे होते असे वाटंत नाही . त्यामुळे जर त्याचा अपमान झाला नसता तर तो स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाला असता का ? महात्मा वगैरे नंतर बोलु. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अडाणि गुरुवार, 10/08/2009 - 19:48 नवीन
आपल्या अकलेचा आणि अज्ञानाचा जाहीर बोभाटा करण्याची काहीही गरज नाहीये... इ. ४थी ते ७वी पर्यंतची ईतीहासाची पुस्तके वाचून काढा, तुम्हाला बरीच काही माहिती मिळेल. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीयुत संतोष जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा