विचार करायला लावणारी मांडणी.
प्रतिसाद उत्सूकतेने वाचतो आहे.
"मित्र"देशाकडून आपली काय अपेक्षा असते, असे निकष शक्यतेच्या विश्वात कोण्याही देशाला असू शकतात का? याबद्दल प्रतिसादक काही लिहितील अशी अंधुक आशा आहे, पण बहुधा फळणार नाही.
माझी एक चांदणी लागु...
कशाबद्दल ते मी कशाला सांगु...
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
मित्र कशाला हवेत.
आत्मैव ह्यात्मनो बन्धु ह्यात्मैव रीपुरात्मना.
या उक्तीने चालले तर कोणी काही बिघडवु शकत नाही.
तो ब्रम्हदेश / उत्तर कोरीया /इराण यांचे कोणी काही बिघडवु शकलेले नाही.
आजच्या काळात तुमचे मित्र कोण हे तुमच्याकडून त्यांचा फायदा काय आहे किंवा तुमचे उपद्रव मूल्य काय आहे यावर अवलम्बून आहे.
अन्यथा अमेरीका कशाला त्या फालतू पाकिस्तानला जवळ करेल?
अमेरीकेच्या बर्याच कंपन्या इतर देशात आहेत त्यांच्या फायद्यासाठी अमेरीकन सरकार बरेच काही करत असते. विशेषतः तेल कंपन्या.
भारताने बाजार पेठ थोडी ताणून धरली तर अमेरीका नाक मुठीत धरून शरण येते किंवाथेट हल्ला करते.
इराकवर नक्की कशासाठी हल्ला केला हे बुश४३ काकाना विचारा म्हणजे याचे उत्तर मिळेल.
सद्दामने कुवेत पादाक्रान्त करताच विमाने आणि अस्त्रे सोडणारे तिबेटबाबत इतकी वर्षे मूग गिळून बसले आहेत.
तिबेट्मध्ये तेल मिळत असते तर त्याना लगेच लोकशाही आणि तीची परवड आठवली असती आणि जगाचे तारणहार बनून आकाशात झेपावले असते.
भारताला मित्र हवे असतील तर भारताने आपली उपद्रवक्षमता सिद्ध करायला हवी
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
भारताला मित्र हवे असतील तर भारताने आपली उपद्रवक्षमता सिद्ध करायला हवी
आपल्या देशाला आणि (किमान सध्याच्या) सरकारला गांधीवाद जवळचा आहे असे ते या ना त्या रुपाने सांगत असतात. आणि असे वागणे हे गांधीवादाच्या विरोधात आहे. शिवाय आपण आपली उपद्रवक्षमता ही अंतर्गत वापरण्यात तरबेज आहोत. बाहेरचा संबंध आला की, "मेहमा जो हमारा होता है, वो जानसे प्यारा होता है" असेच म्हणणे पसंद करतो.
वाssssssssव! जीते रहो, विकास! अगदी मर्मावर बोट ठेवलं तुम्ही!! अगदी "पतेकी बात" सांगितलीत.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
तुम्ही अजुन सूर्याच्याच ग्रहमालेत अडकले म्हाराज ! अशा शेकडो आकाशगंगा आणि करोडो ग्रहमाला आहेत. चंद्र मंगळ जूने झाले.
थिंक बिग मॅन !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
हॅ हॅ हॅ
आम्हाला बाकी काही माहिती नाही पण एक माहिती आहे पिडाचा अवलिया आणि अवलियाचा पिडा मित्र आहे... तेव्हा बाकी दुनिया फाट्यावर.. कसे ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
ह्म्म...आपल्या देशाने आपल्या आजुबाजुच्या देशांशी चांगले संबंध ठेवुन असायलाच हवे...पण तसे काही दिसत नाही,कारण जर तसे असते तर त्यांच्या देशातुन आपल्या देशात घुसखोरी,आपल्या विरुद्ध कारवाया आणि बनावट चलन बनवण्याचे धंदे फोफावले नसते...नेपाळ-चीन मैत्री ही आपल्या देशाला नंतर तापदायक ठरणार आहे...तेव्हा आत्ताच काहीतरी उपाय केले पाहिजे...श्रीलंकेशी उत्तम संबंध ठेवणे ही देखील काळाची गरजच आहे.
स्वतःची शक्ती वाढवली की दुसर्यावर अवलंबुन राहण्याची गरज राहणार नसली तरी उत्तम मित्र देखील हवाच हवा.
(आपले इस्त्रायलशी संबंध कसे असावेत बरे ? :?)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
ISRO to launch 7 satellites in 20 minutes
http://www.timesnow.tv/videoshow/4327992.cms
Navy gets UAVs to counter sea threat
http://www.timesnow.tv/videoshow/4327991.cms
आपले इस्त्रायलशी संबंध कसे असावेत बरे ?
दोघांनाही एकेमेकांपासून घेता येण्यासारखं बरंच आहे....
पण मोठ्यानं बोलू नका बरंका! आपले लाडके अरब देश रागावतील!!!!
:)
खरं तर अरब राष्ट्रांनी सर्व बाजूंनी वेढलेला असतानासुद्धा अद्याप तग धरून असलेला देश म्हणून इस्रायलशी मैत्री करायला हरकत नसावी. नवे प्रयोग करून वाळवंटातही शेती पिकविणारा, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा निर्माता व पिटुकला असला तरी धिटुकला असा हा देश आपल्याला खूप काही शिकवून जातो.
पण या "नळ्या"बरोबर एक "गाडा"ही येतो. त्यामुळे इस्रायलशी मैत्री म्हणजे अमेरिकेशीही मैत्री आलीच. पण अमेरिका इतकी आपल्या चीन-पाकिस्तानसारख्या "सख्ख्या" वैर्यांबरोबरच्या नात्यात गुरफटली आहे कीं तिचे डोके कुठे आहे व पाय कुठे आहेत हेच कधी-कधी कळत नाहीं. त्यामुळे हा सर्व प्रकार जरा कठीणच वाटतो.
खरं तर दोन निखळ लोकशाही राष्ट्रे म्हणून आपली नैसर्गिक गट्टी असायला हवी, पण अमेरिकेला स्वतःच्या देशात लोकशाही लागते व परदेशात त्यांच्या सोयीच्या कुठल्याही "शाही"ला ते पाठिंबा देतात. अगदी अयुब खानापासून ते मुशर्रफपर्यंत, मार्कोसपासून सुहार्तोपर्यंत व सौदी राजघराण्यापासून ते मध्य-पूर्वेतले सगळ्या अमीरां-शेखांपर्यंत. म्हणूनच जरा वांदा आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
पिडा तुम्ही म्हणताय ते खरंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांचे काही स्थान आहे,अशी मंडळी आपल्या बाजूने दिसत नाहीयेत हे खरंय. काही फुटकळ (आकार, ताकद या दृष्टिने) पण स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचे काही देश मित्र म्हणावेत असे आहेत. त्यात अफगाणिस्तान, ताजिकीस्तान हे आहेत. नुकताच आपण मंगोलियाशी अणू करार केलाय. युरोपीय देश अमेरिकेच्या कच्छपी लागलेले असले तरी त्यात फ्रान्स आपल्या बाजूचा वाटतोय. ब्राझीलशीही आपले चांगले संबंध आहेत. पण मोठी म्हणता येतील अशी राष्ट्रे आपल्या बाजूने नाहीत, हे पटतंय. पंडित नेहरूंच्या तटस्थ देशांची चळवळ सुरू करण्याचा उद्देश अशा फुटकळ, अविकसित राष्ट्रांचीच एक ताकद तयार करण्याचा असावा. पण तो पूर्णत्वास गेला नाही हे दिसतेच आहे. शिवाय त्यातल्या चीननेच आपल्यावर आक्रमण केले. आता नव्याने ब्रिक म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना असा प्रयत्न होतोय, पण यातल्या चीनशी आपले संबंध पहाता, त्याला कितपत अर्थ आहे हा प्रश्न आहेच. थोडक्यात एवढी मांडणी करूनही बाकी शून्यच येतेय.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
लय भारी रे पिडां !
पितृभू, पुण्यभूश्चैव वाले लोक उद्या सकाळी उगवतील, त्यांच्या वैचारिक दारिद्र्यपूर्ण प्रतिसादाची वाट पाहतो. तोपर्यंत, तू वैचारिक लिहितोस, त्यामुळे अत्यंत ब्राम्हणद्वेष्टा आहेस, त्यामुळे उपक्रमाच्या संपादकमंडळावर जाण्याच्या लायकीचा आहेस, हे सांगून ठेवतो.
अष्टविनायका तुझा महिमा कसा !
-- मिसळभोक्ता
तोपर्यंत, तू वैचारिक लिहितोस, त्यामुळे अत्यंत ब्राम्हणद्वेष्टा आहेस,
आँ? हे काय बॉ नवीन?
काकांमध्ये गफलत झाली काय?:)
ब्राम्हणद्वेश्टा?:)
आजवर आमच्या एकंदर अवताराकडे बघून आम्ही कोकणस्थ ब्राम्हण (खरे तर तो दोन अक्षरी ज्वालाग्राही शब्द!!) आहोत का असं अनेक जणांनी विचारलंय. (मग आम्ही त्यांना बांगड्याच्या हुमणाची रेसेपी वर्णन करतो ते सोडा!!!:))
पण आयच्यान सांगतो, आम्हाला आजवर कोणीच ब्राम्हणद्वेष्टा म्हणालेलं नाही हो!!! आज तुम्ही पहिल्यांदाच!!!!:(
कशामुळे तुम्हाला असं वाटलं? आमच्या आडनावामुळे का? ते आमचं आडनांव नेहमी मार खातंय बघा....
आम्ही तर आता ते नांव बदलून "नेने" नांव घ्यायचं ठरवतोय बघा...
फिरंग्यांना उच्चारायलाही सोपं...
आणि तेव्हढीच (आपल्या) माधुरीशी जवळीक!!!
आमचा त्या मुलीवर भारी जीव हो!!!!
:)
पिडांना लई भारी गुगली पडलाय! अहो पिडा ह्या वाक्याला वेगळाच आंतर्जालीय संदर्भ आहे!
मिसळपाव बरोबरच तुमचा दुसर्या कुठल्या मराठी संस्थळावर जाण्याचा 'उपक्रम' असेल तर येईल कदाचित लक्षात! ;)
(मिसळक्रमी)चतुरंग
मित्र ? ते फक्त बलदंडानाच असतात शेळपटाना नाही. आपल्या देशाने परकीय राष्ट्राशी संबंधित अशा कोणत्या बाबतीत स्वतःचे अस्तित्व,
ताकद दाखवून दिली आहे ? चीन, अमेरिका यांची पाकिस्तान ला मदत, ऑस्ट्रेलियातील हल्ले, पाकिस्तानातून येणारे दहशतावादी, घुसखोर, मल्टीनॅशनल कंपन्यांची दादागिरी, चीनचे रोजचे नवे नवे दावे, इ. इ.
या पृथ्वी वर असलेल्या कुठल्याही बलदंड (आर्थिक/सामरीक दृष्टीने) देशाला भारता सोबत मैत्री करण्याची गरज नाही. त्यांच काहीही अडत नाही/बिघडत नाही. आणी ह्याच मुळे असला कुठलाही देश भारताचा मित्र नाही/होणार नाही. फक्त असलेच देश काय, इतर लहान/दुर्बल देशही भारताला मित्र मानत नाही. उदा. नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांगलादेश. जेव्हा केव्हा संधि मिळते तेव्हा हे देश सुदधा भारताला धमकी द्यायला कमी करत नाही. बांगलांची घुसखोरी, नेपाळ माओवादींची पशुपतीनाथ मंदिरातील भारतीय मुळाच्या पुजार्यांना मारहाण, श्रीलंका सरकार कडुन हजारो तामिळांची अटक, परवड आणी या बाबत असलेल्या युनो/भारत च्या आक्षेपांना काहीच भिक न घालणे हे तर आपण बघतच आहोत. इतर सर्व देशांना माहीत आहे की भारत देश फक्त निषेध नोंदवण्या पलीकडे काहिच करू शकत नाही. भारताचे कोणीच मित्र नाही. मैत्री केल्या जाते ती बरोबरच्या किंवा स्वता: पेक्षा मोठया(आर्थिक/सामरीक दृष्टीने) असलेल्या व्यक्ती (देश) सोबत.
कुठला देश मुर्ख आहे? :|
माझ्या मते तिबेट आणि नेपाळ हे भारतवर्षाचे जुने मित्र आहेत. संस्कृती मिळती-जुळती आहे, आणि भारताची अनेक आध्यात्मिक, सांस्कृतिक मुळं तिथे रुजली आहेत. पण आता वेगळीच समस्या भेडसावत आहे. आपले मित्र देश कोणते आहेत हा मुद्दा फारसा गंभीर नाही. आपली मित्र 'राज्य' कोणती आहेत हे तपासणे आता गरजेचे वाटू लागले आहे. देशाभोवती एकच कुंपण आहे म्हणून अखंड देश म्हणायचे. अन्यथा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतातील काही राज्ये, ह्यां मध्ये आपापसात किती स्नेह आहे हे आपण जाणतोच. जोवर आपण आपल्याच डोळ्यातील मुसळ पाहात नाही, तो पर्यंत दुस-यांच्या डोळ्यातील कुसळ शोधणे व्यर्थ आहे असे वाटते.
राजकारणात (मग ते राष्ट्रीय असो वा आंतर्राष्ट्रीय) कोणीही कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रुही नसतो. (अपवाद चीन आणि पाकसारखे देश) इथे प्रत्येक जण परिस्थितीनुसार, आपापल्या स्वार्थानुसार आपला स्टान्स बदलत राहतो. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
अहो गरजच काय म्हणतो मी? सिंह कधी कळपाने शिकार करतो का? आम्हांला कोणाच्याही मैत्रीच्या भिकेची गरज नाही. आम्ही सिरियस, अल्फा सेंच्युरी आणि अँड्रोमेडालाही फाट्यावर मारतो.
हा प्रतिसाद, त्याचं शीर्षक नक्की कोणत्या भाषेत आहे? कदाचित वाचण्यासारखा असला तरी इंग्रजीच्या प्रभावाखाली असलेल्या मराठीमुळे झोप आली ... सबब प्रतिसाद वाचला नाही, त्यामुळे अवांतराचं बीज टाकून जात आहे!
(सिरीयस - व्यास, अल्फा सेंच्युरी - मित्रतारा, अँड्रॉमीडा - देवयानी असे मराठी शब्द हे अनिवासी लोकं का वापरत नाहीत कोण जाणे!)
मोड्कांनी प्रतिसाद का दिला आहे कळले नाही पण त्यांचे कधी चुकत नाही. म्हणुन सहमत
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
अतिशय चांगले अवांतर प्रतिसाद
नंदन ह्यांनी त्यांचा नेहमीच्या पद्धतीने प्रत्येक शब्दाचा विकी (wiki) चा दुवा दिला असता तर अहुन ज्ञानात भर पडली असती.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
वा वा. नंदन आणि अदिती तुमचे प्रतिसाद वाचणे ही एक मेजवानीच असते. तुमच्या अवांतरातूनही बरीच माहीती मिळते. छान छान असेच अवांतर लिहीत रहा.
असेच बोल्तो. काय लिहावे हे सुचत नव्हते म्हणून आधी फक्त +१ लिहिले होते.
कुठल्याही फोरमवर पहा! कुणी ना कुणी निवासी भारतीय अनिवासी भारतियांवर घसरत असतो! कधी मातृभूमीची सेवा करण्याऐवजी आम्ही परकीयांची सेवा करत आहोत म्हणून बोल लावतात, तर कुणी आम्हाला डॉलर-हंटर म्हणून हिणवतात, तर कधी आम्ही कांही इंग्रजी शब्द वापरले तर कधी चुकीचे मराठी लिहिले म्हणून (श्री. नंदन अनिवासी भारतीय आहेत कां?), किंवा कधी आणखी काही कारणाने. जणू काही निवासी भारतियांच्या घरी देवी सरस्वती (मराठी शारदा) कायम वावरत असते.
आम्ही अनिवासी भारतीय आम्हाला मराठी नीट न येण्याचं समर्थन तरी करू शकतो (करत नाही, पण करू शकतो) कारण आम्हाला निवासी भारतियांइतकं चांगलं, अर्वाचीन व दर्जेदार मराठी वाचायला मिळत नाहीं. पण निवासी भारतियांच्या वाईट मराठीला काय समर्थन आहे?
तरी असं उगाच घसरू नये.
ज्यांचं मराठी चांगलं आहे ते कुठेही गेले तरी चांगलंच लिहितात (उदा. सुबक ठेंगणी), पण आमच्यासारखे काही लोक जरासे "१९-२०" प्रतीचं मराठीच लिहितात व लिहीत रहाणार. आम्ही भारतात राहिलो असतो तरीही आमचं मराठी असं "१९-२०"च राहिलं असतं कारण मूलतः मराठी साहित्याऐवजी इंग्रजी साहित्य वाचायचा आमचा शौक. पण ही तर आपली-आपली पसंतीची गोष्ट आहे.
मुख्य मुद्दा हा कीं आमचं मराठी चांगलं नसण्याचा व आम्ही अनिवासी भारतीय असण्याचा काहीही संबंध नाहीं.
आमचं मराठी पुरेसं चांगलं नसेल व मराठी भाषेवरील प्रभुत्वाच्या न्यूनतम पात्रतेचा (minimum qualification) काही दंडक (norm) असेल आणि आम्ही त्या दंडकरेषेच्या खाली असू तर तात्यासाहेबानी आमचे सभासदत्व जरूर रद्द करावे. आमची काही तक्रार नाही. (तात्यासाहेब. कृपया यावर कृती करा)
तरी जरा सबूरीनं घ्यावं.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
माझ्या मते अल्फा सेंच्युरी नव्हे तर अल्फा सेंटॉरी - मित्रतारा आणि सिरियस - व्याध असं हवं, नाही का?
घ्या, एक दुवा पण दिला. अर्थात नंदनरावांइतका आमचा व्यासंग नसल्याने आम्हाला एकच दुवा सापडला. बाकी दुव्यांसाठी विनोद दुआंना भेटा.
मित्र भट, अंमळ चूकच झाली टंकताना! चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार.
आमचं आणि विनोदाचं वावडंच, पण तरीही दुव्यांना विरोध नाही. हा घ्या देवयानी दीर्घिकेचा आणि हा घ्या मित्रतार्याचा दुवा.
(भटोश्रीची मैत्रिण) अदिती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी