पूर्ण कवितेत हे एकच दिसले रे भोसडीच्या तुला ?
द्याट्स इट !
आता मन्ना डेच्या सर्व गाण्यांचे भाषांतर कर ! सर्व म्हातार्यांचा शाप आहे तुला !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
मस्तच. छान आठवणी कवटाळून ठेवल्यात घराच्या.
मी पण एक सांगू का?
सरकार दरबारी
नोंद असू दे कसलीही,
पण माझे घरही,
मला आज म्हणते एनाराय "?"
हा शेवटचे "?" काढून टाकले तर?
किंवा "मला आज म्हणत असेल का एनाराय?" असे हवे असे मला वाटते.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
मी एनाराय असूनही 'आयटी'त नाही. त्यामुळे नैसर्गिकरीत्या मी हळवा नाही.
पण हा साला धन्याशेट, आयटीत नसलेल्यांनाही हळवा बनवतो.
(हा प्रतिसाद धन्याशेटला अर्पण.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
आज वाचलेल्या एका दुसर्या उत्तम कवितेचा हा व्यत्यास आहे असे वाटले. (इथे व्यत्यास या शब्दाबद्दल विपर्यास नको. ) "किती कठीण आहे घराचे सुटणे" अशा अर्थाचे कायसेसे करंदीकर त्यांच्या परदेशमुक्कामी म्हणून गेले. प्रस्तुत कवितेत वर्षानुवर्षे काढलेले राहाते घर परके झालेले आहे. नवीन घरात आल्यानंतर , जुन्या घराला दिलेल्या भेटीत जाणवलेली अनोळख धनंजय मांडतात.
या कवितेमधे अजून एक विशेष जाणवलेला मुद्दा. इथे भूतकाळातल्या स्मरणरंजनाला अकारण देदीप्यमान केले गेलेले नाही. ममत्व वाटणारी , "कालची" गोधडी कुबट होती आणि "आजचा" बेड स्टराईल - म्हणजे निर्जंतुक - आणि पर्यायाने कसलीही ऊब नसलेला आहे. इथे गतकाळाला ग्लोरिफाय न करता , आपल्या आयुष्याच्या जुन्या तुकड्याशी धागा फक्त जुळवला आहे. इतका निर्मम नॉस्टाल्जिया दुर्मिळ.
छान कविता. धन्याशेठची कविताही छान आणि ही कविताही. :)
मी आयटीत आहे पण ऐटीत नाही . तरीही मी अधूनमधूनच हळवा होतो. सदर कविता वाचून थोडा हळवा झालो होतो पण एनाराय नसल्याने फार जास्त हळवा होऊ शकलो नाही. :(
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
कवितेतही डोक्याला (शीर्षक ह्या अर्थी) महत्त्व असते हे अधोरेखित झाले! ;)
ग्लिसरीनयुक्त अश्रुपात नसलेली पण तरीही एक वेगळाच विचार सांगणारी कविता आवडली!
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या माणसाला सतत अशा सर्जनशील मोड मध्ये ठेवायला काय बरं करावं लागेल? धन्याशेठला वारंवार लिहावं लागेल कदाचित! :) )
चतुरंग
असो मला परत एकदा छोड आये हम वो गलीया आनी चप्पा चप्पा चरखा चले आठवेल.
खर सांगू तर मिभोंचा दर्द समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय. अर्थात धनंजयची कविता जितकी सहज आहे (मुसुनी कशी ते समजवले आहेच) तितका प्रभाव जाणवत नाही आहे. अस्वस्थ वाटते, लिहताना देखील खूपच अस्वस्थ अवस्था होती व फटकन लिहून मोकळे व्हायचे असे वाटते.
पण असे हळवे मिभोपण आम्हाला आवडतात, त्यांना आम्ही कधीच आपले म्हणले आहे, एकदा सगळ्यांनी कोरसमधे म्हणा रे :-)
(त्यावर म्हणतील मला तसे काही व्यक्त करायचेच नव्हते ;-) )
कळकळीची विनंती - प्लीज प्लीज मळलेल्या कुबट वासाच्या गोधड्या सोडा रे, अगदी साध्या तलम इजिप्शियन कॉटन ८०० थ्रेड काउंट डुवे/क्विल्ट काढा की. कशा करता साठवताय पैसा.
आपण पुन्हा एकदा बोलणे आवश्यक आहे.
(तलम ८०० थ्रेड काऊंटच्या चादरींविषयी बोलण्याच्या आधी कमल हसनच्या "पुष्पकविमाना" मधला एक शीन आठव. त्याला हाटेलात झोप येत नसते, म्हणून तो त्याच्या झोपडपट्टीतले आवाज रेकार्ड करून हाटेलात घेऊन जातो. आठव. आणि मग लिहि रे.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
सुंदर कविता. मिभो बर्याच दिवसांनी लिहिते झाले याचाही आनंद झाला. इतके दिवस नुसते विरजणापुरतेच राहिले होते. ;)
अतिशय कमी शब्दात आणि कोणताही भावनिक अभिनिवेश न आणता खूप मोठा आशय आहे कवितेमधे. लिहित जा अधून मधून.
@ चतुरंग : शीर्षक बदलल्यावर खरंच खूप फरक पडला...
बिपिन कार्यकर्ते
वा! सुरेख कवितांची जुगलबंदीच!
आता या दोघा प्रतिभावंतांनी इतके भावूक केल्यावर एक तितकेच दमदार विडंबनही होऊन जाऊ द्या
ऋषिकेश
------------------
नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी