संस्कृत :S
डोक्यावरुन गेलं !
तेव्हा शाळेत पण.... व आजकाल महाजालावर पण :''(
विद्याप्रेमी राजे
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
दुसर्या सुभाषिताबद्दल कल्पना नाही. पाचवे साधारण असे असावे -
शनै पन्था: शनै कन्था: शनै पर्वतोल्लंघनम्|
शनैर्विद्या शनैर्बुद्धि पञ्चैतानि शनै: शनै:||
सहावे सुभाषित क्रमिक पुस्तकात सुभाषितमालेत होतं, हे आठवतं. त्यापुढची ओळ 'हे सहाही रस रोजच्या जेवणात असावेत' अशा अर्थाची होती.
नंद्या मेल्या गप रव! तुका रे खय कळता त्या संस्कृतातलो? :)
आधी त्या वेलच्यान तुका मुद्रित संशोधक नेमल्यान आणि आता भाग्यश्रीनं मेल्या तुझो फुकटचा नंद्याचा नंदनजी करून तुझो भाव मात्र वाढवून ठेवल्यान! :)
तात्या.
आता मालकांनीच संस्कृत शिकणा सुरु केल्यावर आमका पण थोडे धडे गिरवूक होयेच मा? ;). बाकी
वेलच्याक उचके लागत असतले थंय. कितकी रे आठवण काढशीत? :D
[आपांपसातील संवादासाठी कृपया खरडवहीचा वापर करावा, अशी नोटीस येतली आता :).]
नक्की ओळ आठवत नाही मात्र ते रस - कषाय (तुरट?), तिक्त (तिखट), मधुर (गोड), कटु (कडू), लवण (खारट), आम्ल (आंबट) असल्याचे आठवते. खाली मितालींनी दिलेच आहे.
(विसराळू)बेसनलाडू
तिक्त (तिखट), कटु (कडू),
या मूळ संस्कृत शब्दांचे एकदम वेगळेच आहेत.
तिक्त ( कडवट/ कडू)
कटू ( भेदक /टोचणारे) ( उदा: कर्णकटू किंकाळी)
मराठीत येताना थोडे अर्थ बदलले आहेत
धन्यवाद नंदनजी. तुमचे म्हणणे बरोबर आहे.सहाव्या सुभाषिताचा अर्थ असाच आहे.
द्वामिमा वुदधो क्षेप्यो कंठे बध्वां द्रुढांम शीलाम
श्रीमान् न योहर्ते दत्ते दारिद्र्ये योलस्य सदा.
असा असावा असे आत्ता आठवतेय.
आठवणींच्या शिदोरीतुन.. (दहावीच वर्ष कोण विसरेल ...)
१०० मा़र्क संस्कृत १० वी च १९९६ च पुस्तक मिळालं तर त्यात अचुक मिळतील हि सुभाषीतं. रोजच्या रोज घोकुन पाठ करवुन घेऊन आमचे संस्कृत आणि त्यायोगे एकुण % वाढवणार्या सरांना स्मरण करुन आठवणींच्या शिदोरीतुन ही सुभाषीतं..
एकः स्वादिष्टमश्नाति वस्ते वासश्च् शोभनम् |
यो असंविभज्य भ्रुत्येभ्य: को नृशंसतरस्तथ: |
(एकटाच स्वादिष्ट भोजन घतो, सुन्दर वस्त्र परिधान करतो, आपल्या नोकराना वाटा देत नाही त्याच्या सारखा निर्दय कोण बरे असेल?)
द्वामिमावुदधो क्षेप्यौ कंठे बध्वां दृढांम शीलाम |
श्रीमान् न योहर्ते दत्ते दारिद्र्यो योलस: सदा |
( या दोघानाही गळ्यात मोठा दगड बांधुन समुद्रात टाका. श्रीमंत व्यक्ती जो योग्य माणसाला दान देत नाही, आणि दरिद्री माणुस जो सदा आळशी पणा करतो.)
उत्तमा मध्यमा नीचा तिस्त्रो वे प्राणीनां विधा |
परार्थ स्वार्थ विध्वंसा लक्षणानी यथा क्रमम |
( उत्तम , मध्यम व निच असे प्राण्यांचे तीन प्रकार होत. परार्थ , स्वार्थ, विध्वंस अशी त्याची अनुक्रमे लक्षणे आहेत.)
प्राच्यर्वाची प्रतिचीच तुर्योदिची तथैवच |
दिशश्च्तश्च प्रमुखा वन्दंते धार्मिका जना |
(प्राची (पूर्व), अर्वाची (पश्चिम), प्रतिची (उत्तर) , तुर्योदि (दक्षिण) या चार प्रमु़ख दिशांना धार्मिक लोक पुजनिय मानतात.)
शनै: कन्थः शनै: पन्थः शनै: पर्वतमुर्धनि |
शनै: विद्या शनै: वित्तम पन्चैतानि शनै: शनै: |
( घोंगडी विणने , धर्म पालन , पर्वत चढणे, विद्यार्जन , पैसा कमवणे ही पाच कामे सावकाश करावी.)
आम्लतिक्त कषायच मधुरो लवणः कटु |
षड रसा: पुरुषेणेहः भोक्तव्याम बलंइच्छिता |
(बल मिळवण्यासाठी आंबट, तुरट, तिखट, कडु, गोड, खारट या पाच रसांचे सेवन करावे.)
एन्द्रम धनु सप्तवर्णान बिभ्रत प्रावृषी शोभते |
रत्नहारो मेघकंठे नानारत्नेर्नु गुंफीता |
(पावसाळ्यात सात रंगाचे इन्द्रधनुष्य शोभुन दिसते. ढ्गांच्या गळ्यातील रत्नहारच जणु.)
पादौ हस्तौ जानुनी द्वै उरच्छातललाटकं |
अष्टांगेन स्प्रुषेत भुमी साष्टांग प्रणतिश्चसा |
(दोन पाय , दोन हात, दोन्ही गुढगे , छाती , कपाळ या आठ अंगानी भुमीला स्पर्श करावा. याला सुर्यनमस्कार म्हणतात.)
शृंगार वीर करुणादभुत हास्य भयानक: |
विभत्स रौद्रौ शांतस्य काव्ये नवरसा मता |
(शृंगार , वीर ,करुण ,अदभुत ,हास्य, भयानक, विभत्स, रुद्र, शांत असे काव्याचे नऊ रस मानले जातात.)
मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत |
मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चंचल: |
लक्ष्मी (मा), मन, भुंगा (मधुप), मद्यपि(दारुडा), मेघ, माकड, वारा ( मरुत), माशी (मक्षिका), ढेकुण (मत्कुण), मासा हे दहा "म"कार चंचल आहेत.)
फार आभारी आहे गं.खुप दिवसांपासुन पाचवे अन् सहावे सुभाषित अडले होते.माझी टंकनक्षमता फारच कमी आहे त्यामुळे अर्थ लिहीला नव्हता तो तु पुर्ण केल्याबद्दल धन्यु गं.
प्रतिक्रिया देण्यार्या सर्वांचे आभार.
तात्या माझ्या इंदोरी वास्तव्याचा परिणाम हो हा. :D सगळ्यांना जी जी म्हणायची सवय लागलीये. :)
लाज वाटते सांगायला की मला पण १०० मार्कांच संस्कृत होतं आणि १० वीला ९१ मार्क मिळाले होते.
लाज अश्या साठी की आज काहीही आठवत नाही. शेजवळकत बाईंचा आत्मा तळमळत असेल. :(
(नालायक )गणपा
खिर खाउन विवेकने खुप पानी पिल्ले आनि हसला म्हनुन बकाबका वोक्ला.
=)) =)) =))
पहीली लाइन आठवत नाही.
मी आठवायचा प्रयत्न करतो..
हंसः शुभ्रः बकः शुभ्रः
को भेदो हंसबकयो:
नीरक्षीरविवेके तु
हंसः हंसः बकः बकः
आणि याच सुभाषिताचा एक पाठभेद -
काकः कृष्णः पिकः कृष्णः
को भेदो काकपिकयो:
वसंतसमयेप्राप्ते
काकः काकः पिकः पिकः
(पिक म्हणजे कोकिळ)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
जम्बुफलानि पक्वानि |
पतन्ति च विमले जले ||
तानि मत्स्या: न खादन्ति |
जालगोलक शंकया ||
कोळ्याच्या जाळ्याचे गोल गोटे आहेत असे समजून मासे ती पिकलेली जांभळे खात नाहीत.
कालिदासाची समस्या पूर्ती आहे असं कुठेतरी वाचलं होतं...
अशीच एक समस्या पूर्ती राणीच्या हातून चंदन पात्र पडल्याच्या आवाजाची होती. ती आठवत नाही आता.
ठा ठं ठ ठं अशी काहीतरी होती....
भोजनान्ते चकिं पेयं जयंतः कस्य वै सुतः |
कथं विष्णुपदं प्रोक्तं, तक्रं शक्रस्य दुर्लभम् ||
पहिले ३ प्रश्न आहेत, शेवटच्या भागात तिन्हींची उत्तरे एकेका शब्दात आहेत.
अजुन एक मजेशीर सुभाषित अर्धवट आठवतयं...
सुसरला गौरी सुवंशोद्भवा
तंवी स्पर्शसुखावह मधुमती
नित्यंमनोहारिणी(जी सरळ,शुभ्र, चांगल्या कुळातील ,बारिक ,जी चा स्पर्श सुखकर आहे )
सा केनापि ह्रुता न्रुसशहो गंतुं न शक्तोस्यहम (ती च्या शिवाय मी जाउच शकत नाही.)
रे भिक्शो तव कामिनी (तुझी ती प्रिय पत्नी का?)
नही नही प्राणप्रिया यष्टीका (माझी प्राणप्रीय काठी.)
जम्बुफलानि पक्वानि |
पतन्ति च विमले जले ||
तानि मत्स्या: न खादन्ति |
जालगोलक शंकया ||
या सुभाषिताची कथा अशी आहे.
चार तरुण भोज राजाच्या दरबारात काव्य करुन काही धन मिळवण्याच्या इच्छेने आले होते.
भोजराजाने आज्ञा दिल्यावर पहिल्या तरुणाने पहिली चटकन रचुन पहिली ओळ म्हटली ,"जम्बुफलानि पक्वानि ".
लगेच दुसरा म्हणाला, "पतन्ति विमले जलम"
तिसरा म्हणाला, "तानि मत्स्या: न खादन्ति "
चौथ्याला चटकन काही सुचेना.
तेव्हा तो म्हणाला "जलमध्ये डुबुक डुबुक"
त्याबरोबर भोजराजाला एकदम राग आला.
तो रागाने त्यांना काही शिक्षा देणार एव्हढ्यात कालिदास पुढे आला आणि त्याने चौथी ओळ दुरुस्त केली. "जालगोलक शंकया ||"
ही कथा नववी किंवा दहवीच्या पुस्तकात आहे
एक प्रकारची समस्यापूर्ती आठवते ..
बहुतेक 10 वी च्या पुस्तकातील आहे ..
राजा एकदा कोडे विचारतो - मृगात् सिंह: पलायते | (हरणापासून सिंह पळतो.) हे कसे काय ?
त्यावर दरबारातील काहीजण आपापल्या परीने त्याचे उत्तर देतात.
एकजण अर्जुन व कर्ण युद्धाचे उदाहरण देतो व अर्जुनाच्या तोंडी वाक्य देतो - मृगात् सिंह: पलायते ? { हरणापासून सिंह पळतो ( काय ) ? }
शेवटी एकजण त्याचे उत्तर देतो -
त्यासाठी तो सुभाषित रचतो ..
कस्तुरी जायते कस्मात्
को हन्ति करिणां शतम् |
भीत: कुर्वीत किं युद्धे
मृगात् सिंह: पलायते ||
स्पष्टीकरण - प्रथम, द्वितीय व तृतीय चरणातील प्रश्नांचे उत्तर चौथ्या चरणातील अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या शब्दात मिळते.
पहा,
कस्तुरी जायते कस्मात् ? = मृगात् { कस्तुरी कोणापासून मिळते ? = हरणापासून }
को हन्ति करिणां शतम् ? = सिंह: { शंभर हत्तींना कोण ठार करतो ? = सिंह }
भीत: कुर्वीत किं युद्धे ? = पलायते { भित्रा माणूस युद्धात काय करतो ? = पळतो }
===> मृगात् सिंह: पलायते | { हरणापासून सिंह पळतो. }
- या प्रकारच्या आणखी समस्यापूर्ती कोणाला माहीत असतील तर कृपया सांगावीत.
कुंती सुतो रावणकुंभकर्ण: | (कुंतीची दोन मुले - रावण आणि कुंभकर्ण)
असे शेवटचे पद असलेले एक सुभाषित असेच समस्यापूर्तीचे होते.
त्यात आधीच्या तीन पदांमध्ये असलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे मिळून हे पद बनते. पण मला आत्ता ते सुभाषित पूर्ण आठवत नाहीये.
धागा मस्त आहे.
माझ्या सर्वात आवडती समस्यापूर्ती.
एकदा राजदरबारात सुभाषिताची शेवटची ओळ दिली जाते :
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:।
आणि कवी रचतो :
रामाभिषेके जलमाहारन्त्या
हस्ताच्युतो हेमघटो युवत्या:
सोपानमार्गेण करोति शब्दम्
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:।
अर्थ :
रामाच्या अभिषेकासाठी जल आणण्याऱ्या युवतीच्या हातातून सोन्याचा घडा पडला. तो पायऱ्यांवरून ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ असा आवाज करत गेला.
<<<<<<
का पान्डुपत्नी गृहभूषणम् किम्
को रामशत्रु: किम् अगस्त्य जन्मः |
कः सूर्यपुत्रः विपरीत पृच्छत
कुंती सुतो रावण कुंभकर्णः ||
>>>>>>>
रूपीताई, वरील श्लोक उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद !
<< मला आठवतं त्याप्रमाणे कुंती, सुत, रावण, कुंभ, कर्ण अशी पाच उत्तरे असलेले पाच प्रश्न होते >>
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
धन्यवाद !
- हर्षा { हर्षद }
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी