[शतशब्दकथा स्पर्धा] कोण...?
ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता.
हा बाहेर दोन गोजिर्या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता.
'...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...'
याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले.
आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..."
तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको.
तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली.
क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... "
“शांत राहा, बोलू नकोस”.
शब्द बुडबुड्यासारखे फुटलेच, "... आपल्या दोन मुलांपैकी.... एक....
मिसळपाव
रात्रीचे दहा वाजत आले होते.अनघा अरविंद्च्या खांद्यावर डोके ठेऊन रडत होती.अरविंद तिला समजावुन सांगत होता "रडु नकोस पोरी.तुझ्या सासरी तु सुखी राहा.सासरच्या लोकांचं मन सांभाळ."आज अरविंद्च्या लाडक्या छ्कुलीचं लग्न होतं.ती सासरी जात होती आणि अरविंद तिला सगळं समजावुन सांगत होता.पण अनघाच्या डोळ्यांतलं पाणी काही थांबत नव्हतं.अखेर ती अलिशान ऑडी कार मध्ये ब