बलिदान त्याविना हे ... (गझल)
असते मनात काही उमजून येत नाही
वाटे किती फुलावे उगवून येत नाही
घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची
नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही
कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी
बलिदान त्याविना हे उजळून येत नाही
तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही
मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही
पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला
शब्दास अर्थ आता लगडून येत नाही
-- अमेय
मिसळपाव
महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे.