Skip to main content

बलिदान त्याविना हे ... (गझल)

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 30/12/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
असते मनात काही उमजून येत नाही वाटे किती फुलावे उगवून येत नाही घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी बलिदान त्याविना हे उजळून येत नाही तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला शब्दास अर्थ आता लगडून येत नाही -- अमेय

बाप माणुस

लेखक jaypal यांनी सोमवार, 30/12/2013 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाप माझा बाप बाप मानुस होता. फाटकी चड्डी मळकट बनियान मनाने मात्र तो साफ माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. टकलावर तुरा अन डोळ्यावर जाड काचा. आरे मोठठ व्हायच तर भरपुर वाचा. अस नेहमी ओरडणारा तो ताप माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. वयात आली जवानी घेऊन नवि उर्मी. स्वभावात रगेल पणा बोलण्यात उद्धट गुर्मी. दोस्तांच्या गप्पात मग एकेरी उल्लेख होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. आज जेंव्हा मी हळवा बाप होतो. लेकाला माझ्या घट्ट जवळ घेतो. फुटतो सारा बांध कारण समोर चेहरा त्याचा होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. तक्रार नाही केली की कधी नाही चिडला. आयुष्य भर झिजला संसाराचा गाडा ओढला. माझा बा

सुरतवर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लान होता ????????

लेखक मारकुटे यांनी सोमवार, 30/12/2013 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
यासिन व रियाझमधील फोन संभाषण यासिन: भाईजान... एखाद्या छोट्या अणुबॉम्बची व्यवस्था करता येईल का? रियाझ: नक्कीच करता येईल.

भटकंती २

लेखक इन्ना यांनी सोमवार, 30/12/2013 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे. कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर. अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 30/12/2013 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.

महाभारतातील “चलाख” महापुरुष - भाग १

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 29/12/2013 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
mahabharat महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे.

भान

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 29/12/2013 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
'हे बघा तुमची मुलगी खुपच वेगळी वागते,'सासु म्हणाली, 'तुम्हाला म्हणायचे नेमके काय?एवढे दिवस काही नव्हते बरं ती काय नविन आहे का?,'मुलीचा बाप बापु म्हणाला, 'आता पर्यत खुप सहन केली, आता या पुढे जमणार नाही,'महेश मध्येच म्हणाला, 'बापु ह्याचं काही एकु नका हे तुमच्या समोर एक बोलतात आणि माघारी माझ्या समोर एक वेग़ळच बोलतात,'मुलग़ी ग़ीता म्हणाली, 'हो हो हो तुझावरच विश्वास ठेवतील बघ,शेवटी तुझा बाप,'सासु म्हणाली, 'आहो तसे नव्हे,दोघांचंही ऐकुण घेतोच की ,हे बघा महेशराव आतापर्यत देवाच्या आशिर्वादान ग़ोडी ग़ुलाबीन चालु होत, हो की नाय,'बापु हात करत, 'मग़ ह्या दोघाचं आता का पटंना?कारण दोघांनी ही एकमेकांना समजावुन घेत

भटकंती १

लेखक इन्ना यांनी रविवार, 29/12/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती -१ लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास! आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!! हळूहळू त्या प्रवासाची म्हणा, अथवा अनुभवाची, चटकच लागली. शाळेतून येताना, पुणे ३० ते गुलटेकडी, रोज नवीन रस्ता असो, वा गडकिल्ले असो, आजीच्या गावाला म्हशींच्या मागे जाणे असो वा शाळेतून गुंजवणी खोर्‍यात विविध उपक्रमांसाठी जाणे असो.