Skip to main content

चिऊचं घर शेणाचं...

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 28/10/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता काऊ एक होती चिऊ काऊचं घर होतं मेणाचं चिऊचं घर होतं शेणाचं एकदा काय झालं, जोराचा वारा आला चिऊचं घर उडून गेलं चिऊ आली काऊकडे तिला वाटलं, तो आपलं ऐकून घेईल त्याचं घर एवढं मोठं, त्यात जागा देईल काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, माझं घर लहान आहे'' काऊदादा काऊदादा दार उघड" "नको, माझं घर खराब होईल'' काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, माझे कपडे खराब होतील'' काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, मला जायला उशीर होईल'' ""असं काय रे करतोस? माझं घर वाहून गेलंय. सगळे छळतील. टोचतील, त्रास देतील. तू मला घरी घे; दाणे दे, पाणी दे. जरा वेळाने बरी होईन.
काव्यरस

मोती साबण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 28/10/2010 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी म्हटली कि अभ्यंग स्नान आले..कारखान्यात ला कामगार वर्ग याला पहिली अंघोळ.. दुसरी अंघोळ असे म्हणायचा तर गावाकडे पुरुषाचे नहाणे???..व बायकांचे नहाणे असे म्हणायचे.. दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबण साधारण पणे वापरला जातो....दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का? हे पण एक कोडे आहे.... एक खरे....... हि परंपरा वर्षानु वर्षे चालत आली आहे व त्यात खंड नाहि ... आपल्याला मोती साबण आवडतो का?

अरे विठ्या विठ्या ...

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 28/10/2010 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
संत जनाबाई. महाराष्ट्राच्या भूमीत समाजसुधारणा, भक्तीमार्गदर्शन या हेतुन प्रेरीत होऊन जे अनेक संत होऊन गेले त्यातले एक अग्रणी नाव. नामयाची दासी, दासी जनी, जनी नामयाची यासारख्या अनेक नावांनी स्वतःला संबोधुन विठ्ठल भक्तीत अखंड रममाण झालेली एक स्त्री संत. कधी आवडीने विठ्ठलाचे नाम घेत तल्लीन होऊन भजणारी तर कधी त्याच्यावर संतापणारी जनी. एक ना अनेक अशी तिची रुपे आपल्याला तिच्या अभंगातुन पहायला मिळतात.

हे शक्य आहे का...?

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 28/10/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील दलित नेते शिक्षणात आरक्षण असावे म्हणून आंदोलने करतात. त्याचा फायदा केवळ मूठभर दलित विद्यार्थ्य़ांना होऊ शकतॊ. यातील बरेचसे विद्यार्थी सामान्य दर्जाच्या माध्यमिक शाळांतून शिकलेले असल्याने बरेचदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळूनही पूर्णत: फायदा घेऊ शकत नाही. मार्टीन ल्युथर किंग यांनी हार्वर्ड येथे प्रवेश मिळविण्यासाठी जाळ्पोळ केली नाही, तर संपूर्ण माध्यमिक शिक्षणपद्धती समतेच्या तत्त्वावर व उच्च दर्जाची असावी यासाठी आग्रह धरला. भारतातील सामाजिक चळवळीने असाच आग्रह धरला तरच ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचू शकेल.

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 28/10/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीस का त्या मंद, मृदुगंधाला पाहताच हरवलेल्या आपल्या शब्दांना बिलगलीस नकळत हरवून स्वतःला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीच असशील त्या गावाला भिजलेल्या त्या चिंब पावसाला ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? डोळ्यातून मी व्यक्त होताना, तुला आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला माझा हात तुझ्या केसांत विसावलेला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? माझी आठवण नको तुझ्या मनाला आपल्या हळूवार जपलेल्या त्या क्षणांला म्हणून विसरलीस ना आपल्या नात्याला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? हसताना हलकेच ओघळणार्‍या अश्रुला निक्षुन बजावताना, झालेल्या यातनेला

आंधळी कोशिंबीर

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 28/10/2010 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

आंधळी कोशिंबीर

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 28/10/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

टिळक कि दाते

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 28/10/2010 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
टिळक कि दाते फार पुर्वि महाराष्ट्रात दिवाळी दोन वेळा साजरी व्हायची..एक टिळक पंचांगा प्रमाणे..व एक दाते सोलापुरकर पंचांगा प्रमाणे. अर्थात बहुसंख्य लोक दाते सोलापुरकर पंचांगा प्रमाणे दिवाळी साजरी करतात.. आपल्या समुहात टिळक पंचांगा प्रमाणे दिवाळी साजरी करणारे सभासद वा आपल्या माहितीचे कुणी आहेत का?