Skip to main content

'सायलेन्स प्लीज'

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 10/09/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
'सायलेन्स प्लीज' हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली... टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप १५-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक ३०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप ४०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक टक टक टक टक टक ६०-० परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली...

मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 10/09/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज न्यूयॉर्कमधे बुद्धीबळाचा एक डाव सुरु होतोय. अजून बरोब्बर साडेतीन तासांनी अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता. वयाच्या तेराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आणि आता बिल्बाओ इंटरनॅशनल मधे विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरवण्याच्या स्पर्धेतला खेळाडू नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग! मॅग्नुस फक्त १९ वर्षांचा आहे आणि आज जगातला अव्वल दर्जाचा खेळाडू समजला जातो. फिडेच्या यादीत तो आत्ता पहिल्या क्रमांकावर आहे! न्यूयॉर्कमधल्या कूपर स्क्वेअर हॉटेलमधल्या पेंटहाऊस मधे हा सामना रंगेल.

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियम

लेखक लीना सचिन चौधरी यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती... राष्ट्रध्वज उतरवणे देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते.

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

लेखक लीना सचिन चौधरी यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध

लेखक लीना सचिन चौधरी यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन व २6 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करीत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले आहे. आजही जेंव्हा आपण सुखाने झोपलेलो असतो, आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करत असतो, तिकडे सीमेवर आपल्या रक्षणासाठी कोणीतरी रात्रंदिवस पहारा करत असतं. मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह 'तिरंगा' झेंड्याची अवहेलना होत असल्याचे दिसत आहे. दरवर्षी आपल्या देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनी व स्वतंत्रता दिनी अगणित प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांची विक्री होत असते. लोक अतिशय उत्साहाने ही खरेदी करतात मात्र दुसर्याच दिवशी हे राष्ट्रध्वज केविलवण्या परिस्थितीत रस्त्यात इतस्तत: पडलेले असतात. सार्वजनिक सफाई कामगाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणी वळुन पाहणण्याचेही कष्ट घेत नाही. आपल्याच राष्ट्रध्वजाची अशी उपेक्षा या स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून आपल्याला शोभते का? राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असून भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असतात. मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चूक होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशी प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत. तरच त्याचे उत्पादनाला आपोआप खिळबसेल. या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक बानविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण प्रजासत्ताक व स्वतंत्र राष्ट्र आहोत याचा जल्लोष मांडून झाल्यावर त्याच राष्ट्रध्वजाला, पायदळी तुडवतना, कचरयाच्या पेटीत टाकताना आपल्याला काहीच वाटत नाही? रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नलाच्या कडेला हे ध्वज विकणारी मुले, ते गरज म्हणून विकतात पण आपण ते काय म्हणून विकत घेतो? क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाचा अवहेलना केली जाते. त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगवून घेतांना काहीच कसे वाटत नाही. याचे आश्चर्य वाटते. आपण सांगा हे कितपत योग्य आहे. ध्वजाला कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे. आणि ते आपल्या कर्तृत्त्वातून जाणवत.असते. फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज वापरु नये, याची सर्वांनाच कल्पना आहे, असायलाच हवी. मात्र फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज पुर्णत: नष्ट कसा करावा याची किती लोकांना माहिती आहे? स्वतंत्र भारतात आपल्याला श्वास घेता यावा म्हणून कित्येकांनी आपल्या आयुष्याची होळी केली आहे. आपल्या घराची समृद्धी या देशासाठी त्याग केला आहे. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची परतफेड आपण अशा प्रकारे करणार आहोत का? अशा प्रकारे ध्वज विकत घेऊन त्याची उपेक्षा करण्यपेक्षा, तो न विकत घेता, खरंतर तो विकण्यावरच आक्षेप घेऊन स्वत:ला या देशाची नागरिक म्हणवणं मी जास्त पसंत करीन. यापुढे प्लास्टिक आणि कागदाच्या राष्ट्रध्वजविक्रिसाठी मी आक्षेप घेणार आहे. जिथे जिथे मला अशा प्रकारची विक्री होताना आढळेल, तिथे तिथे मी स्वत: जाउन लोकांना असे ध्वज खरेदी न करण्याविषयी आवाहन करणार आहे. स्वत:च्या देशाचा मानसन्मान कायम राखाण्याकरिता तुम्ही काय करणार आहात? सौ. लीना सचिन चौधरी (अध्यापक) ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (गुरुकुल विभाग)

पत्र

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अबक, तुला नवल वाटेल मी तुला अचानक हे पत्र लिहीत आहे म्हणून परंतु मला माझ्या भावना कागदावर उतरवणं आवश्यक बाब वाटली. कोणतही नातं हे तुमच्या जीवनात विशिष्ट हेतू, ध्येय घेऊन येतं आणि तो हेतू साध्य झाल्यावरच ते अनंतात विलीन होतं यावर माझा विश्वास आहे. तुझं नेहेमीचं मिष्कील हसू हसलास ना? नाही रे हे घोकंपट्टी केलेलं पुस्तकी वाक्य नाही. हा तर माझा स्वानुभव आहे. मला जाणवलेलं सत्य आहे हे. आपलं नातं या सत्याला अपवाद कसं असेल? आपल्यामधे तुला परस्यू मी केलं. मी तुला भेटत राहीले वारंवार, इमेल पाठवल्या, या निमित्ताने तर कधी त्या निमित्ताने मैत्री वाढविण्याचा प्रयत्न केला.

श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 10/09/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या आपल्या लाडक्या गजाननाचे आगमन होत आहे. आता १० दिवस एक उत्साहाचे वातावरण सगळीकडे असेल. मनातील मरगळ काढून टाकुन या विघ्नहर्त्याचे स्वागत करायला सज्ज होऊ या. यानिमित्याने आपण व आपल्या कुटुंबियांवर श्री गजाननाची अखंड कृपा दृष्टी राहो या शुभेच्छा !!!

दोघे

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 10/09/2010 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
दोघे एक देशातला एक परदेशातला दोघांचीही लग्ने होउन साधारण १० वर्षे झालेली. ............................................................................................................................ देश "हलो" बोल्,आता काय झाले? "अहो काय म्हणायचे तुमच्या ह्या विसराळुपणाला.? की मुद्दाम असते हे"? आयला आता नेमके काय ते बोल की. "ती पिशवी माळ्यावर टाकायला सांगितले होते ना?" घरी आल्यावर टाकतो. "तुमचे हे नेहेमीचेच" असु दे. "असु दे काय?

खारकेची बी

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 10/09/2010 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
पावशेर खारकेच्या बिया भरुन ठेवल्यात एका डब्यात सकाळी एक तोंडात टाकतो अन बसतो चघळत निरर्थक रात्री झोपतांना तीच बी नीट ठेवतो कधी साखरेच्या तर कधी तिखट मिठाच्या पाण्यात रात्रभर स्वप्न पहात सकाळी पुन्हा उठुन तीच बी चघळण्यासाठी जीव आसुसला होतो पोट भरत नाही की तोंडही सुकत नाही गोडी मिळत नाही की कडु पण पडत नाही बी असली तरी खारकेची चवच मुळी न्यारी सर्व मिपाकरांना समर्पित (पुनःप्रकाशित)