Skip to main content

...म्हणून सासू ही 'आई' होऊ शकत नाही!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 31/01/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
सासू ही 'आई' का होवू शकत नाही? या विषयावरील उद् बोधक, विचारप्रवर्तक, खमंग आणि राष्ट्रीय हिताची चर्चा वाचली. छान वेळ गेला. त्या विषयाची चेष्टा किंवा विडंबन म्हणून नव्हे, पण एक गंमत म्हणून काही विचार आणि उत्तरे सापडली. बघा, पटताहेत का! सासू ही आई होऊ शकत नाही, कारण... १. तिच्या घरात सून आलेली असते. त्यामुळे सासू-सासर्‍यांना म्हणावा तेवढा एकांत मिळत नाही. २. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते. ३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते. ४. या वयात हॉस्पिटलच्या वार्‍या नि खर्च परवडणारा नसतो. ५.

माझी अगतीकता

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/01/2010 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अगतीकता अगदी सकाळी मी उठलो, उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो. तर काय सांगत होतो मी...

नटरंग आणि आमचं शंके़खोर मन

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 31/01/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे शंकेखोर मन घेऊन आम्ही सहसा मराठी बोलपट पाहाण्यास जात नाही, कारण मनास फार (कु)शंका पडतात, आणि त्यामुळे आम्हांस फार तसदी होते, असा आमचा नित्य अनुभव आहे. तरीही मराठी भाषा-संस्कृतीवरील प्रेमापोटी आणि सर्वांच्या स्तुतिसुमनांमुळे आम्हांस मोह झाला आणि आम्ही ते धाडस अखेर केले. आता आम्हांस पडलेल्या या काही शंका... टिप्पणी १: आम्ही करमणूकप्रधान बोलपट (उदा: गोविंदा वगैरे) पाहावयास जाताना मेंदू नावाचा आमचा अवयव नेमाने घरी ठेवून जातो, पण उपरनिर्देशित बोलपटाने पारितोषिके वगैरे मिळवून गोविंदाच्या बोलपटांहून उच्च दर्जा प्राप्त केलेला असावा, असा आमचा कयास होता, त्यामुळे आमच्या मेंदूस आम्ही बरोबर नेले.

स्टार माझावर पाहा ’ब्लॉग माझा’चा पारितोषिक वितरण समारंभ !

लेखक देवदत्त यांनी रविवार, 31/01/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
हरभर्‍याच्या झाडावर चढून एक घोषणा: आत्ताच आलेल्या दूरध्वनी आणि विपत्रावरून असे समजले की आज (३१ जाने. २०१०) रात्री ९:३० वाजता स्टार माझावर ह्या पारितोषिक वितरणाचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे. पहायला विसरू नका. :)

सुहास शिरवळकर ह्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 30/01/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
' सुहास शिरवळकर असे आणि तसे ' संपादक :अनिल किणीकर प्रकाशक : शाशिदीप प्रकाशन प्रकाशन हस्ते : श्री. द.मा. मिरासदार , श्री. ह्. मो. मराठे दिनांकः ७ फेब्रुवारी २०१०, सायं ६ वा. स्थळः पुणे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवन , गांजवे चौकाजवळ , नवी पेठ, पुणे. सुहास शिरवळकर यांचा निधनानंतर असा जाहीर कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. ग्रंथात, चित्रपट, कला , साहित्य, मराठी प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर आणि सु.शि. फॅन, कुटुंबीय यांनी शिरवळकर यांचावर , व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून लेख लिहले आहेत. प्रकाशनाच्या दिवशी सु.शि.

हे आय आय टी वाले जातात तरी कुठे?

लेखक अमृतांजन यांनी शनिवार, 30/01/2010 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आजपर्यंत दरवर्षी ५००० आयायटी उच्चशिक्षित तयार होतात. गेल्या वर्षीपर्यंत ह्यांची संख्या किती असेल हे मला निश्चित माहित नाही पण ते २ ते २.५ लाख असावेत असा माझा अंदाज आहे. हे देशातील अत्यंत उच्च प्रतिचे शिक्षण घेतलेले नागरीक आज कुठे आहेत? तुम्ही-आम्ही सामान्य नागरीक पुण्यात कशी मेट्रो पाहिजे आणि रस्ते कसे पाहिजे, शिक्षण कसे पाहिजे आणी पत्रकारीता कशी पाहिजे ह्याच्या चर्चेत गुंग आहोत. पर्यात सुचवतो आहोत; काहीतरी बदल हवेत म्हणतोय आपापल्या कुवतीप्रमाणे विचार व्यक्त करतोय. ह्या आयायटी वाल्यांचे किती ब्लॉग आहेत? ते त्यावर काय लिहिताहेत?

श्रिखंड

लेखक गणपा यांनी शनिवार, 30/01/2010 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
श्रिखंड न आवडणारा मराठी माणुस विरळाच. आमच्या परम मित्र श्री. सहजरावांनी आम्हाला ही खालील श्रिखंडाची कृती दिली. या पुर्वी मी श्रिखंड कधी घरी बनवल नव्हत. नाही म्हणायल खुप लहन (यत्ता ४थी) असताना आईने बनवल होत. त्यामुळे सहजरावांनी दिलेली कृती कधी एकदा करुन पहातो अस झाल होत. त्यामुळे या पाककृतीचे खरे श्रेय आपल्या सहजरावांना. आम्ही फक्त निमित्तमात्र इथे टाकायला. चांगले ताजे घट्ट दही घावे.

बटाटेवडे

लेखक प्रभो यांनी शनिवार, 30/01/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी संपत आला. पहिल्यांदा गड्डा मिस झाला. अरे....समजलं नसेल ना मी काय म्हणतोय ते? मी बोलतोय सोलापुरच्या जत्रेबद्दल, ज्याला सोलापुरातले सगळे गड्डा म्हणतात. साधारण जानेवारीचा पूर्ण महिना जत्रेची तयारी आणी जत्रेला भेट देण्यातच जातात. ५-६ तारखेपासून गड्ड्याची तयारी सुरू होते. आणी गड्डा सुरू होतो १० तारखेपासून.भोगी,संक्रांतीला जास्त महत्व असायचं जत्रेत. काठ्यांची मिरवणूक, अनवाणी चालून ६८ शिवलिंगांना अभिषेक, सिद्धरामेश्वरांचे काठीसोबत लग्न आणी शेवटी दारूकामाची आतिषबाजी.... बाकी जत्रा म्हणजे अशी काही वेगळी असणारे गावचे रितीरिवाज सोडून.