Welcome to misalpav.com
लेखक: आजी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अगदी. मनातलं. सर्वांशी हसून राहावं पण अलिप्त राहावं. वयाचं अंतर असतं. ते बोलले तरी ते वरून असतं,आतून मात्र टाळत असतात हे पक्कं लक्षात ठेवावं. आपल्या आपणात रमलं की सर्व जग आपलंच.

आतून मात्र टाळत असतात हे पक्कं लक्षात ठेवावं याच्याशी थोडीशी असहमती. अर्थात नियम अपवादानेच सिद्ध होतात.

गेली 5-6 वर्षे, वृद्धांच्या साठीच सेवा करत असल्याने, मी माझ्या पुरते काही नियम आखून घेतले आहेत ... ---- माणसांचा प्रवास ...WWW ते MMM... तरूण पणी W ....Wealth W .... Wisely Investment W ... Wine ( ताकद आणि उर्जा असे पर्यंत, जे जे आवडत आहे, त्याचा आनंद घ्या ...) निवृत्ती नंतर, आपण कधी निवृत्त व्हायचे? हे प्रत्येकाने ठरवावे .. M = Medical facilities M = (Young) Manpower M = (Sufficient) Money ------- वरील नियम हे माझ्या पुरते आहेत आणि मानवी जीवन हे एका साच्यात बसत नाही ... कुणाला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही, हा माझा वैयक्तिक अधिकार आहे ...

छान लेख!! पण ईतकी स्पष्टता असणारे लोक कितीसे असतात? मग एकाच छताखाली राहुन २ किवा ३ पिढ्यांचा संघर्ष आणि त्यातुन कटुता येते. तरीही नाती तशीच ओढत माणसे एका छताखाली जगतात. मग कोणत्याही एका पिढीला सुख मिळत नाही. विषय खोल आहे, त्यामुळे थांबतो.

मावळत्या सूर्य म्हणजे तापहीन मार्तंड. मावळतीवरचे बदलते रंग बघत बुडून जाणे एव्हढेच हातात उरते. स्पष्टता असो नसो, मावळत्या दिनकराची फक्त फक्त उरते ती फरपट आणी मग वाटते....... देखा है ज़िंदगी को कुछ इतने क़रीब से चेहरे तमाम लगने लगे हैं अजीब से

खुप छान! अजून तीस -चाळीस वर्षांनी मी अशीच आजी होवो ;):)

आत्ता कमीहेत. कारण आता सासू ह्या कमजोर आघाडीवर लढताहेत. ऊद्या सून नावाचा तगडा खेळाडू मैदानात ऊतरला की भक्तीताईंचा कस लागनार. मग चीडचीड होणार, भांडणे मग रूसवे फूगवे. : ) मग भक्तीआजीही असे धागे काढनार…. :)

मुख्य म्हणजे राहत्या घरावर आपलाही कायदेशीर हक्क हवा. "खायचं ताट द्यावं पण बसायचा पाट कधी देऊ नये"म्हणतात ते घेण्यासारखं आहे. अगदी संपूर्ण सहमत आहे!

लेख खूपच छान आहे. पण भावे प्रयोग आहे. स्वतःला मोल्ड करता आले पाहिजे आणि नेमके तेच या वयात अवघड असते. जोडीदाराबरोबर सहजीवन सुद्धा या वयात अवघड जाते.

खूप छान लिहीले आहे आजी. आपल्याला आयुष्याच्या अगदी शेवटल्या दिवसापर्यंतची साथ म्हणजे अपले शरीर आणि आपले छंद यांची. या दोन्हींची जपणूक हर प्रयत्नांनी करत राहिले पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे तर नुकतीच बहात्तर वर्षे पूर्ण झाली. वर्षातला बराचसा काळ मुला-नातवंडासोबतच रहातो. नातवंडांबरोबर घालवत असलेला काळ सर्वोत्तम. बाकी शक्य तितकी मदत मुलांच्या घरांसंबंधीच्या बाबतीत करतो. उदा. सुतारकाम, दुरुस्तीबद्दल नकाशे वगैरे बनवणे, बागकाम इत्यादि. नुक्तीच मोठी दगडी पाळ मुलासोबत काम करून बनवली. खूप मजा आली. बाकी बाबतीत अलिप्तता. चित्रकला, संगीत आणि मिपात रमणे. आहार-विहार वगैरेसंबंधी जागरूकता बाळगणे. नातवंडांना एरव्ही कुणी शिकवणार नाही असे काही शिकवणे, उदा. चित्रकला, ५०-६० च्या दशकातले सिनेसंगीत, नाट्यसंगीत, वॉल्ट्झ, मोझार्ट वगैरे ऐकवणे, आणि वाजून दाखवणे वगैरे. मी दुपारी झोपतो तेंव्हा दोन वर्षांची नात उठवून म्हणते, "आबा ऊथ, पिंतिंग कल" तेंव्हा जे काही वाटते, ते शब्दात मांडता येणार नाही.

बरोबर. शेवटी १) आपल्यासाठी कुणी थांबलंय, २)आपल्याला वाचून कुणाचं अडलंय. आणि चिमुटभर विनोद.

सर्व मुद्दे पटणेबल. आता काही वर्षांत येऊ घातलेल्या साठीत प्रवेश करताना हे उपयोगी होईल. :)

माझ्या या लेखाला भरपूर वाचने लाभली आणि तुम्हां सर्वांचे भरभरून प्रतिसादही मिळाले.फार बरं वाटलं आणि आनंद झाला.वाचकांचं उदंड प्रेम मिळालं तर लेखकाला दुसरे काय हवे! सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

मागेही एकदा प्रतिसादात लिहिलं होतं.. आजही तसंच वाटतंय. हा लेख वाचून आदरार्थी अनेकवचन मोडून पडलं बघ! :-) आजी, तुझं लेखन हे नेहमीच वेगळं, सहज आलेलं आणि थेट भिडणारं असतं! इतकं सहज सोपं राहणं ही पातळीच अगदी निराळी आहे, आश्वस्त करणारी आहे आणि पुढील मार्ग दाखवणारी देखील आहे! खूप आवडले! :-) (रंगास्टाईल) खुद के साथ बातां :- तुला ही सहजता अंगी लाख बाणवायची आहे रे राघवा, पण ती अशी प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाही त्याचं काय? त्यासाठी स्वभाव बदलायला हवाय.. कसं?

एकत्र कुुंबपद्धती असेल तर, आपले दैनंदिन कार्यक्रम, मुलांचे आणि नातवंडांचे कार्यक्रम उरकले की मग करायचे आणि चार माकडे बनायचे १. मुलांचे वादविवाद ऐकायचे नाहीत २. विचारल्या शिवाय सल्ला द्यायचा नाही ३. ते करत असलेला अनावश्यक खर्च बघायचा नाही ४. पुस्तक किंवा मासिके वाचत झोपायचे पाचवा पर्याय सर्वोत्तम आहे सरळ उत्तम वृद्धाश्रम गाठायचा आपलाच टीव्ही आणि आपलाच ग्लास, नो झंझट