Welcome to misalpav.com
लेखक: सरिता बांदेकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

येणारी प्रत्येक नवीन पिढी अधिक अधिक स्मार्ट होत चालली आहे. बाब्याने आईला विचारले, "आई, मुल कशी होतात?" "अरे आम्ही देवाला प्रार्थना करतो मग देव आपल्याला मुल देतो." बाब्याने वडिलाना विचारले,आजीला विचारले, आजोबांना विचारले सगळ्यांनी त्याला थातूर मातुर सांगून समजूत काढली. बाब्या शाळेत मित्राला काय सांगतो, "आपल्या आधीच्या दोन पिढ्या वाया गेल्या. एव्हढी वये वाढली पण ह्यांना अजून मुले कशी होतात हे माहित नाही." लेख मात्र छान जमला आहे.

एक नंबर लेख लिहिलाय! काहीतरी लिहिलं असेल असं म्हणून वाचायला घेतलं आणि शेवट होईपर्यंत थांबू शकलो नाही. वर्जन टू पॉईंट झिरो पण येऊ द्या!

की दुसऱ्या दिवशी कॅालेजमध्ये सगळ्यांच्या समोर तिने भैय्याला चांगल्या चारपाच लगावल्या.
कोणाच्या तरी दुसऱ्याच्या चुकी मुळे कोणीतरी पोरगी कॉलेज मध्ये सर्वांच्या समोर एखाद्या मुलाला चार पाच चपराक लावत असेल तर त्या मुलाच्या आत्मविश्वास चे काय होईल ? तेही त्याची स्वतची काही चूक असेल तर कदाचित समजून घेता येईल, पण काहीच चूक नसताना असे झाले तर त्याचे भविष्यात भयंकर परिणाम होतील हे मी पैज लाऊन सांगतो. त्यातही तो मुलगा साधभोला आहे , मग तर तो हा प्रकार प्रचंड मनाला लाऊन घेईल ह्यात शंका नाही, एकतर सुसाईड करेल नाहीतर अँसिड फेकेल. दोन्ही केस मध्ये त्याला दोषी धरता येणार नाही , काहीही चूक नसताना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि हे सगळे ऐकून आई हसू कशी शकते हे अनाकलनीय आहे. आपल्या भोळ्या पोराला कोणीतरी पोरगी चपराक लावते हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात जायला हवी. हेच का स्त्री मुक्ती चळवळ चे फलित ? एका मुलीने दुसऱ्या मुलीच्या कारस्थानामुळे एका निष्पाप भोळ्या मुलाला सर्वांसमोर कानाखाली लाऊन अपमानित करावे अन् हे आईला कळल्यावर तिने हसावे ? वाह. # मुलगी शिकली प्रगती झाली. कथा आवडली नाही. कथेचा पुढील भाग लिहिलात तर त्यात तो भोळा मुलगा सुसाइड करतो की जबरदस्त सूड उगवतो ह्यावर जरूर लेखन करा. पू.ले.शू

सहमत आहे. कथा बिनडोक आहे. सत्यकथेचा काही अंश असेल तर हे जगणे करंटेपणाचे द्योतक आहे. असलेच लिहिणार असाल तर पुलेशु नाही.

धन्यवाद भागो,वामन देशमुख,प्रसाद गोडबोले,अहिरावण तुमच्या प्रतिसादाबद्दल. आणि प्रसादजी ज्या मुलाची बहीण इतकी सतर्क आहे तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही. पुढे काही अजून तरी सुचलं नाहीय. पुढे बघूया सुचली तर लिहेन. आणि अहिरावणजी तुमच्या सुचनेची नोंद घेतली आहे. पुढे नाही लिहीणार.कळकळीच्या सुचनेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

आणि प्रसादजी ज्या मुलाची बहीण इतकी सतर्क आहे तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही.
वाह, म्हणजे ह्यातही बहिणीच्या सतर्कतेचे कौतुक . मुलाचा स्वाभिमान गेला तेल लावत. हा आपला दृष्टिकोन आवडला. बहिण प्रँक करत आहे, जी मुलगी आवडते ती चारचौघात कानाखाली लावत आहे आणि आईला कळल्यावर तीही हसत आहे. धन्य आहे ही फॅमिली. त्या मुलाला लहानपणीच "बडवून" घेतलेले आहे का ?

धन्यवाद गोडबोलेजी, माझा असा समज होता कि कुंभार मडकं भाजून घेतलं कि ते पक्कं झालंय का बघायला ‘बडवून ‘ बघतो. पण मुलांबरोबर हिंसाचार मी बघितला नाही कुठे. तुमच्या भावना पोचल्या आहेत. तुम्हाला कथा नाही आवडली हरकत नाही. मला पण खूप वेळा नाही आवडत. पण ते आत्महत्येचं तुमच्या डोक्यात का यावं हे मला कळत नाहीय. मी यापुढे माझ्या लिखाणामुळे असं काही होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणि परत सांगते तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही कथेच्या पुढच्या भागात.

मुलांबरोबर हिंसाचार तुमच्या कथेतच आहे. का तो 'मुलग्याबरोबर' आहे म्हणून हिंसाचार वाटत नाहिये तुम्हाला? ही कथा का आवडली नाही हे तुम्हाला समजतय का?

पुरुशाने स्त्रीला मारले की तो हिन्साचार, स्त्री ने पुरुशाला मारले की तो विनोद? लेखिका ताई, एखाद्या कथेत मुलानी मुलिला मारले असे लिहिले असेल तर तुमची अशीच प्रतिक्रिया असेल का? पुरुशाना किती सहज बावळट, बिन्डोक, मार खाणारे दाखवले जाते. मुलाचा यात काय अपमान झाला याची स्त्री लेखिकेला काही कल्पनाच नाहिये!