पाकिस्तान, बांगलादेश किंवा पॅलेस्टाईन पेक्षा.. इस्त्रायल उत्तम...
बौद्ध मूर्तींचे तोडफोड केल्या पासून, अफगाणिस्तान देखील बेभरवशी आहे..
बाकी इतर आखाती देश, आपल्या सीमेपासून दूर असल्याने, जितक्यास तितके संबंध उत्तम....
काही अपडेट?? इस्रायल सैन्य गाझाच्या वेशीवर ऊभं होतं ते आत घुसलंय की नाही?? मानवतावादी, दवाखाना संघटना (WHO) इस्रायल ला हाग्यादम भरताहेत अश्या बातम्या आल्या होत्या. हमास ने हल्ला केला तेव्हा झोपल्या होत्या का ह्या संघटना??
गेल्या २४ तासांत गाझा पट्टीतील सुमारे ४०० हमासच्या तळांवर इस्त्रायलने केलेल्या बॉम्बवर्षावात एकूण ७०४ जण (हमासचे दहशतवादी + पॅलेस्टिनी लोकं) मृत्युमुखी पडले आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धात इस्त्रायलच्या प्रतिहल्ल्यात २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्यांचा हा आकडा आत्तापर्यंतचा सर्वात जास्त असल्याचे म्हंटले जात आहे.
सुमारे २२० ओलीसांची सुटका हमास करत नाही तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहणार असून गाझा पट्टी 'हमास मुक्त' करण्याचे आमचे हे अभियान दीर्घकाळ चालेल असे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने म्हंटले आहे!
हे पण नाही...
पण, इस्त्रायलची सीमा, आपल्याला लागून नसल्याने, जमीन बळकावणे हा त्रास नाही...
शिवाय, येन केन प्रकारेण, आपला धर्म वाढवावा ही ज्यु लोकांची भूमिका आत्ता तरी नाही...
ही नेहमीचीच पद्धत आहे.
आधी खोडी काढायची आणि मग अशा संघटनांना ढाल म्हणुन पुढे करायचे.
ते नाहीच जमले तर, आपलेच उदारमतवादी ढाल म्हणुन पुढे येतातच...
हमासने हल्ला केला म्हणून फक्त निषेध व्यक्त करतील आणि हमास म्हणजे पॅलेस्टाईन नाही, अशी सारवासारव करतील.
हे म्हणजे, लष्कर ते तोयबा, म्हणजे पाकिस्तानी नाहीत, असेच म्हणण्या सारखे आहे..
जाता जाता एक उदाहरण देतो...
कसाबने हल्ला केला तेंव्हा मी कुवैतला होतो. कितीतरी पाकिस्तानी कसाबने हल्ला केल्याने खुष होते.
बरे झाले की, मी आखाती देशांत काम केले. माझे उदारमतवादी धोरण गळून गेले.
भारताची पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलबाबतची भूमिका पूर्वीपासूनच अत्यंत दळभद्री राहिली आहे.
१०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या आणि 'आधुनिक दहशतवादाचा जनक' म्हणवल्या जाणाऱ्या 'यासर अराफत' सारख्या पॅलेस्टिनी नेत्याला भारताने पहिल्यांदा 'नेहरू गुड-विल पुरस्कार' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. भारताच्या ह्या कृतीमुळे त्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची 'गरिमा' इतकी वाढली होती कि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ह्या पुरस्कार सोहळ्याला मीडिया कव्हरेज देणे बंद केले होते.
हि एकच नाही, तर अशा अनंत चुका आपल्या पूर्वसुरींनी इतिहासात करून ठेवल्या आहेत पण राजकीय चर्चांना मिपावर बंदी असल्याने त्यावर भाष्य करणे टाळतो. तसेही आपल्या देशात व्यक्तिपूजक खूप लोकं जास्त असल्याने त्या निंदनीय कृतींचेही समर्थन करण्यास ते लोक मागेपुढे पाहात / पहाणार नाहीत.
फक्त भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्ती होउ नये एवढीच अपेक्षा!
भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्ती होउ नये एवढीच अपेक्षा!
-----
अपेक्षा ठेवून, काहीही फायदा नाही...
हिंदू इतिहासातून काहीही शिकत नाहीत. हिन्दू कधीच एकजूट झालेले नाहीत, आज ही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत....
>>>हिंदू इतिहासातून काहीही शिकत नाहीत. हिन्दू कधीच एकजूट झालेले नाहीत, आज ही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत....
तरीही मुसलमानांना पाच पन्नास वर्षात युरोप, आफ्रिकेतील पूर्ण देश मुसलमान करायला जमले ते हजार वर्षे घालवून ५० टक्के पण जमले नाही.
लचीत बडफुकन, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणा संगा हे जन्माला येत होते...
आता, कुणीही येणार नाही...
का येणार नाही? ह्याची कारणे, प्रत्येकाने आपापल्या परीने शोधावित...
एक साधे उदाहरण देतो... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजात देखील एकवाक्यता किंवा एकाच पक्षात येण्याची समान विचारधारा नाही...
>>आता, कुणीही येणार नाही...
लचीत बडफुकन, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणा संगा जन्माला येण्याआधी सगळे असेच म्हणत होते
>> छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजात देखील एकवाक्यता किंवा एकाच पक्षात येण्याची समान विचारधारा नाही...
प्रत्येक वेळेस एकाच वंशाकडून अपेक्षा नको. मग राहुलबाबा मी पीएम होतो म्हटले तर काय चूक?
माझा मुद्दा सरळ आहे - उद्याचा भविष्यकाल कोणी पाह्यला आहे?
आजपासून ५, ५०, ५००, ५००० वर्षांनी काय स्थिती असेल ते आज सांगता येत नाही. पण म्हणून स्थिती अजून बिघडणारच आहे असे मानणे चूक राहील.
बांगलादेश आणि पाकिस्तान, हे भारताचेच भाग होते..
आणि आत्ता हे दोन्ही वेगळे देश आहेत...
हिंदू एक झाले नाहीत तर, जे पर्शिया आणि अफगानिस्तान बाबतीत झाले, ते भारतात व्हायला वेळ लागणार नाही...
जाऊ दे...
पॅलेस्टिनी भूमितील जमीन बळकावण्याच्या इस्त्रायलच्या धोरणास विरोध करणा-या ठरावाच्या बाजूने भारताने संयुक्तराष्ट्राच्या आमसभेत मतदान केले. या धोरणाचा भारताला कसा फायदा होईल ? जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत. ( लोकसत्ता : तोतरेपणास तिलांजली)
-दिलीप बिरुटे
बाकी काही म्हणा, लोकसत्ताचे अग्रलेख मात्र विनोदी असतात, चांगली करमणूक होते 😀
तूर्तास इतकेच लिहून थांबतो, उगाच देशी राजकारणावरील चर्चेला तोंड फुटून मिपावरचे सध्याचे उत्सवी वातावरण दूषित व्हायला नको!
लोकसत्ताचा लेख आपणास विनोदी वाटला असेल वाटु द्या. मतं व्यक्तीसापेक्ष विचारसापेक्ष असतात. भारत सरकारने घेतलेल्या मतावर आपली अभ्यासपूर्ण मतं वाचायला आवडतील. अर्थात, याच धाग्यात आपली दोन वेगवेगळी मतं इथेच वाचायला मिळाली आहेत. ''साधारणपणे दिडेक दशकापुर्वी पर्यंत पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमास सारख्या दह्शतवादी संघटनेचा सहानुभुतीदार होतो'' ''पण पुढे आंतरजालाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या संघर्षाची दुसरी बाजु समजु लागली'' पहिली आणि दुसरी बाजूबरोबर आणखी एक मत वाचायला आपल्याच प्रतिसादात मिळते ''विद्यमान सरकारच्या आधीच्या भूमिकेविषयी समाधानी असलो तरी (कालांतराने वाजवलेल्या) डबल ढोलकीवर पण भाष्य केले असते'' ?
इस्रायल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, मदत करतो आपण इस्त्रायलला मदत केली आहे. आता इस्त्रायलविरोधी भुमिका घेवून भारत काय साधत आहे, आता जगमानस गाझाला मदत केली पाहिजे असे म्हणत आहे. पूर्वी औषधोपचार आणि विषयावर आपण तटस्थ राहिलो आहोत आणि आता मदतीला तयार आहोत. स्थानिकांच्या जीवनमानाचा प्रश्न लोकसत्ता विचारते ते चुक आहे किंवा विनोदी आहे ? आपण या विषयावर फार सविस्तर लिहिले आहे. लोकसत्ताचा विनोद कुठे आहे, तेही समजून घ्यायचंय आणि सध्या भारताच्या धोरणाबद्दल आपलं मतही वाचायला आवडेल.
उत्तर लिहिलेच पाहिजे असा आग्रह नाही. एक वाचक म्हणून सर्व नीट समजून घ्यायचंय इतकंच.
-दिलीप बिरुटे
चार दिवसांचा युध्दविराम घोषित झाला वाटत. दोन्ही बाजू एकमेकांचे काही ओलीस \ कैदी यांची सुटका करणार आहेत असे पण वाचले. लहान मुले, म्हातारी माणसे वैगैरेंची सुटका झाली तर चांगलेच आहे.
पण दक्षिण गाझाचे संपूर्ण निर्लष्करीकरण करायची इस्राईलची मागणी \ इच्छा पूर्ण होणे कठीण दिसत आहे. तरी पण ईस्राईल गाझाचा छोटा का होईना पण लचका तोडेल असे मला वाटते.
नाही तोडला तर इस्राईल ला मुर्ख म्हणायल हवे. एक बरंय पण इतर देशांना भिक न घालता इस्रायल न हल्ले सुरूच ठेवले. मानवतेच्या नावाखाली इस्रायलने मुर्खपणा केला असता तर त्याचाही भारत झाला असता.
निरपराध माणूस युद्धात माणूस मरतो. इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले. माणसाचे मरणे दुःखदायक असतं. कोण चुक कोण बरोबर त्यापेक्षा मानवतेचा विचार मोठा वाटतो.
-दिलीप बिरुटे
गाझातील लोकांना आपण निरपराध परस्पर कसे ठरवलेत?? ४८ किमीच्या चिंचोळ्या पट्टीत हमासचे लोक कुठे लपून बसलेत हे त्या बिचार्या “निरपराध” लोकांना खरंच माहीत नाही?? की त्यांनीच लपवून ठेवलेत?? इस्रायलचे लोक मेले तेव्हा ह्या निरपराध लोकांनी म्हणे आनंदत्सव साजरा केला होता. त्यावेळी मरण दुखदायक नसतं का? तेव्हा कुठे होता मानवतेचा विचार?? की फक्त गाझातील अतिरेकी लपवनारे गाझावासी मेले की मानवतेची आठवण येते?? इस्रायलचे ज्यू मेले तेव्हा मानवता कुठे जाते?? की इस्राईलच्या लोकांना माणूस मानलं जात नाही??
गाझात एकूण एक अतिरेकी आहे, त्यांनीच हमासला निवडूण दिलंय नी तेच लोक हमासचे कमांडर वगैरे लपवून ठेवतात, इस्राइलचे लोक मेले की आनंदोत्सव साजरा करतात नी इस्राईलने चांगलं झोडपून काढलं की मग जगासमोर गळे काढायला मोकळे.
एक छोटीशी शंका आहे. हमास इस्राएलच्या स्थापनेची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आली कि काही उडाणटप्पू, चेंडू ऐवजी हॅन्डग्रेनेड शी खेळणाऱ्या लोकांमुळे जन्माला आली?
बाकी हिंदू, त्यातही भारत आणि महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जन्म घेतला त्या सर्वांविषयी मला खूपच आदर आहे. हे असं ठरवून कसा जन्म घेता येतो ये कळले तर बरे.
अतिरेकी गाझात असू दे की इस्रायलमधे अतिरेकी संपवायचे म्हणून निरपराध लोक मरू नयेत..मग ते इस्रायलचे ज्यु असोत की गाझातले नागरिक. दोन्हीकडील सामान्य लोक मरणे हे दुःखदायक.
-दिलीप बिरुटे
गाझा पट्टीतील सामान्य माणसे अतिरेक्यांना आधार आणि सहाय्य्य करत असतील तर ते संपूर्णपणे निर्दोषी आणि निरपराध मानता येईल का?
इस्रायली स्त्रियांवर बलात्कार होताना किंवा अर्भकांवर अत्याचार होताना हि माणसे अमानुषपणे नाचणार असतील तर त्यांच्य्याबद्दल जगाला सहानुभूती वाटेल का?
According to the Organization for Economic Cooperation and Development, aid to Palestinians totaled over $40 billion between 1994 and 2020.
तीन लाख वीस हजार कोटी रुपये ईतकी मानवतावादासाठी दिलेली मदत जर केवळ भुयारे/ तळघरे खणण्यात आणि क्षेपणास्त्रे अन अग्नीबाण बनवण्यात जाणार असेल तर जगातील लोकांनी नक्की विचार करायला हवा कि आपले दान सत्पात्री आहे का?
'हमास' या कडव्या संघटनेचं गाझापट्टीत शासन असलं तरी, हमास निरपराध लोकांना कवच म्हणून वापरते असा आरोप इस्त्रायल कायम करते. याचा अर्थ सरसकट नागरिक ’हमासच’ समर्थन करतात असा घ्यायचा ? सरसकट नागरिक अतिरेकी आहेत असे मानायचे ? गाझापट्टीतून स्थलांतर करणा-यांची संख्याही लाखांपेक्षा अधिक आहे. जर ते सगळेच अतिरेकीच असते तर, जीवावर उदार होऊन इस्त्रायलशी लढले असते आणि स्वर्गातील बहात्तर सुंदर-या मिळवल्या असत्या.
एखाद्या देशातील, लोकनियुक्त सरकारमधील एखाद्या पंतप्रधानाने किंवा अध्यक्षाने असे फ़र्मान काढले की, उद्या आठवाजेपासून रस्त्यावर यायचं नै. घरात बसून टीव्हीवरील कार्यक्रम बघायचे. किंवा अमुक धमुक तारखेला टाळ-ढोल वाजवायचे असे फ़र्मान काढले तर करावेच लागेल की नै ? गाझातील सरकार तर, ’कडव्या संघटनेचं’ आहे. हमासची नागरिकांवर काही दहशत असेल की नाही ? नागरिक कोणाचं ऐकणार अशावेळी ? एक तर सरकारचं ऐकावे लागेल किंवा इथून परागंदा झालेलं बरं असा विचार ते करीत असतील की नाही ? अशा निरपराधांबद्दल बोलतो आहे. हमासचे हल्ले त्यांचा माज आणि इस्त्रायलचे हल्ले आणि युद्धाची खुमखुमी हे दोघेही मला निरपराधांसमोर समान आहेत. इतकंच. रेश्ट माय केस.
-दिलीप बिरुटे
सरकरा विरूध्द जनतेने बंडं केल्याचे ऊदाहरणं आहेत जगात. पण त्या निरपराध लोकांना इस्राईलविरूध्द लढायचंच असेल नी हमासला पाठिंबाच द्यायचा असेल तर कोण रोखनार बिचार्या निरपराध अतिरेक्यांना?
इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले.
इस्राएलच्या अनेक नागरिकांवर हत्या, अपहरण, बलात्कार अन्वनित छळ असे प्रकार झाले ते म्हणजे फक्त टेंगुळ, आणि इस्राईलने प्रतिकार केला तर ते म्हणजे निरपराधांचे अमानुष बळी अशी तुलना योग्य आहे का?
इस्राएलच्या प्रतिकारी हल्ल्यात हमासचे अनेक दहशतवादी ठार झालेले आहेत, त्यांना निरपराध म्हणण्याचा प्रयत्न योग्य आहे का?
याच प्रकारचे लोक अफझलच्या न्याय्य शिक्षेला judicial killing ठरवतात, ते योग्य आहे का?
अत्यंत चलाखपणे अशी शब्द रचना करून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा असा प्रयत्न योग्य आहे का?
हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम करायचं काय काम?? त्यांना हमासप्रेमी, अतिरेकीप्रेमी म्हणा. तुम्ही तरी शब्दरचना करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाहीतर काय करताय?? आधी मा देखील पुरोगामींना असलं काहीतरी वाचून वाईट समजायचो पण पुरोगामींचं आभाळाएवढं कार्य पाहून कळाले की ते किती महान आहेत ते. त्सामुळे पुरोगामींना कुठेही गोवून बदनामी करायचं थांबवा.
आजकाल स्वतःला पुरोगामी म्हणवणारे सगळे एकजात भंपक, दुटप्पी आणि हलकटच दिसतात. यामुळे पुरोगामी हा शब्द्च बदनाम झालेला आहे
यामुळे अस्सल पुरोगामी स्वतःला पुरोगामी म्हणवत नाहीत.
मनूवादी सनातनींना आपला चातुर्वर्णव्यवस्थावादी प्रातशाखीय संघी अजेंडा पुरोगामींमूळे रेटता येत नाही म्हणून ते गल्लीतील हाणामारी ते इस्रायल पॅलेस्टाईन प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून चळवळ बदनाम करू इच्छितात.
मागेही एक दोन-वेळा मी "पुरोगामी म्हणजे नेमके काय?", "पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?"
अश्या स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. पण फारशी काही उत्तरे मिळाली नाहीत.
पुरोगामी शब्द बदनाम करायचा विडा ऊचललाय का?
की ऊगाच कुठूनही पुरोगामी शब्द धरून आणून पुरोगामी नेत्यांना बदनाम करायचे कारस्थान आहे?
हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम करायचं काय काम?
या विधानांवरून तुम्ही पुरोगामी आहात / तुम्हाला पुरोगामींबद्धल आपुलकी / सहानुभूती आहे असे मला वाटते. (माझे असे वाटणे चुकही असू शकते.)
@अमरेंद्र बाहुबली, तुम्ही सांगा -
पुरोगामीची व्याख्या काय?
पुरोगामी म्हणजे नेमके काय?
पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
मुलींच्या शिक्षणाला विरोध करनारे, फुलेंना दगडं मारनारे, शाहुंवर गरळ ओकनारे, आंबेडकरांवर टिका करनारे चातुर्वर्ण व्यवस्थावादी, सनातनी, मनुवादी प्रवृत्ती ज्या आजही प्रातशाखेत जातात ते प्रतिगामी.
मग गांधीजी नेहरू ना मानणारे प्रतिगामी काय?
याचं उत्तर दिलेले नाही!
त्याच बरोबर स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, श्री शिवाजी महाराजांना मानणारे प्रतिगामी आहेत का?
मनूवादी सनातनींना आपला चातुर्वर्णव्यवस्थावादी प्रातशाखीय संघी अजेंडा पुरोगामींमूळे रेटता येत नाही म्हणून ते गल्लीतील हाणामारी ते इस्रायल पॅलेस्टाईन प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून चळवळ बदनाम करू इच्छितात.
अगदी अपेक्षित!
हमास == मनुवादी
की
इज्राएली== मनुवादी
?
सध्याच्या सरकारचा पहिल्या राज्याभिषेक होण्याआधी जी वातावरण निर्मिती केली गेली त्या मंथनातले एक रत्न म्हणजे पुरोगामी हि वृत्ती. अजून काही रत्न म्हणजे गुलामगिरी, सत्तर वर्षातली निष्क्रियता (ज्यात भाजपा आणि मोदींची देखील वर्ष आहेत पण मोदी तेव्हा नवथर नवरीसारखे होते म्हणून काँग्रेसच त्या निष्क्रियतेचे कर्ते धर्ते), पराभूत मानसिकतेचा इतिहास वगैरे.
खरं तर ज्ञान, तर्क, आणि अनुमान याच्या आधारावर आजच्या समाजाची ज्यांनी उभारणी केली ते पुरोगामी कुणाच्या निर्भत्सनेचा विषय कसे काय होऊ शकतात? परंतु पुरोगामी जे काही करतात त्यातून नकळतपणे सनतन्यांच्या सोग्याला हात घातला जातो. त्यातून पारंपारिकपणे पुरोगामी सनातन्यांचे शत्रू होत असत. हल्ली त्यात भर पडली ती म्हणजे पुरोगाम्यांनी निस्पृह असण्याची. म्हणजे फक्त हिंदूंवर टीका नाही करायची. असा प्रश्नच खरं तर उद्भवू नये. आपल्या नद्या, हवा, माती, आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्याचं जे प्रदूषण आपण बघतो आहोत त्यात सर्वात मोठा वाटा ज्यांचा आहे त्यांना दोष नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? दाभोलकरांना हा प्रश्न जेव्हा विचारला जायचा तेव्हा त्यांचं उत्तर असायचं कि जर आपण हिंदूंच्या अनिष्ट प्रथा नियंत्रित केल्या तर इतर समाजावर तशा प्रकारच्या सुधारणांचं दडपण येऊ शकतं. असो. उन्मादी वातावरणात पहिला बळी हा तर्काचाच असतो.
थोडक्यात पुरोगामी म्हणजे ज्ञान, तर्क, आणि अनुमान यांच्या कसोट्यांवर चालणारी माणसं. ती तुमच्या कौतुकासाठी आसुसले नसतात किंवा हेटाळण्यामुळे नाउमेद होणारी नसतात.
तळटीप: विनाकारण सणकेल प्रतिसादांना कुठलाही उपप्रतिसाद मिळणार नाही. तेव्हा मीच जिंकलो म्हणून छाती पिटण्यास सदर आयडी मोकळे असतील.
प्रतिक्रिया
मैत्री करण्यासाठी...
काही अपडेट?? इस्रायल सैन्य
गेल्या २४ तासांत गाझा पट्टीतील सुमारे ४०० हमासच्या तळांवर
इस्रायलशी वाकडं त्याचे नदीवर
इस्रायलशी नीट त्याला सोन्याची वीट.
हमास ने हल्ला केला तेव्हा झोपल्या होत्या का ह्या संघटना??
काल इस्रायलच्या राजदुताने
१०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या
भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्त
>>>हिंदू इतिहासातून काहीही
कारण....
>>आता, कुणीही येणार नाही...
भूतकाळातील घटना बघीतल्या की भविष्य नक्कीच समजेल...
डिवायडेड बाय कांग्रेस भाजप
+२७१०२०२३
चुक
आता पुढे कसं ?
बाकी काही म्हणा,
अधिक वाचायला आवडेल.
लोकसत्ताचे अग्रलेख मात्र विनोदी असतात
पुढं काय झालं??
चार दिवसांचा युध्दविराम घोषित
नाही तोडला तर इस्राईल ला
मानवता वगैरे ?
गाझातील लोकांना आपण निरपराध
अप्रतिम! निःशब्द करणारा प्रतिसाद!
मानवता सर्वत्र सेम.
गाझा पट्टीतील सामान्य माणसे
हेच तर मी सांगतोय, हजारो
अतिरेकी लपवनारे निरपराध कसे?
सरसकटीकरण
सरकरा विरूध्द जनतेने बंडं
+२७११२३
इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ
पुरोगामी शब्द बदनाम करायचा
निरपराधांचे अमानुष बळी == judicial killing
हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम
आजकाल स्वतःला पुरोगामी
मनूवादी सनातनींना आपला
पुरोगामी म्हणजे नेमके कोण?
- पुरोगामीची व्याख्या काय?
- पुरोगामी म्हणजे नेमके काय?
- पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
- या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
- त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
- पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती
मग पुढे बोलू.फुले शाहु आंबेडकर ह्यांचे
कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे
- पुरोगामीची व्याख्या काय?
- पुरोगामी म्हणजे नेमके काय?
- पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
- या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
- त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
- पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती
मग पुढे बोलू.फुले शाहु आंबेडकर ह्यांचे
मुलींच्या शिक्षणाला विरोध
मग गांधीजी नेहरू ना मानणारे
मनूवादी सनातनींना आपला
ह्या दोघांच्या भाडंणात
तात्पुरता युद्ध विराम.
पुरोगामी म्हणजे कोण?
अत्यंत ऊत्कृष्ट प्रतिसाद टोबी
Pagination