Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

या बाबतीत मुस्लिम समाजाचे कौतुक करावेसे वाटते. फारशा सरकारी नोकऱ्या नाहीत. शिक्षण असतेच असेही नाही. पण रडत न बसता अंगमेहनत-छोटामोठा हंगामी का असेना स्वयंरोजगार करत या समाजातले तरुण आनंदात राहतात. एकमेकांना धरून राहणे आणि परिस्थितीशी शक्य तेवढे जमवून घेणे यामुळे बहुतेकदा ते तगून जातात. शिवाय वृद्ध व्यक्तींना घरातच कसे का होईना सांभाळले जाते, वृद्धाश्रमाची वाट दाखवली जात नाही. आणि आत्महत्या किंवा मानसिक रुग्ण यांचे प्रमाणही फारसे दिसत नाही. यातून इतरांनाही काही घेण्यासारखे नक्कीच आहे.

सहमत आहे. कौटुंबिक एकोपा खूप असतो. वृद्धांना हाडहूड करण्याचे, डस्टबीन समजण्याचे, लाथ मारुन हाकलून देण्याचे प्रमाण हिंदू (विशेषतः ब्राह्मण) समाजापेक्षा खुप कमी आहे.

मी गेली, २०-२२ वर्षे, ह्या ना त्या नात्याने, वृद्धाश्रम आधारीत काम करत आहे... त्यामुळे, तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. आणि वृद्ध माणसांना जातपात किंवा धर्म नसतो... ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात...

असहमतीबद्दल सहमती. गेल्या चाळीस वर्षांमधे आजुबाजूच्या पन्नास एक (त्यातील तीस एक ब्राह्मण) कुटुंबातील वृद्धांची वाताहात, विशेषतः आयटीमधे कामाला असलेल्या मुलामुलींनी केलेली आहे ती अगदी जवळून पाहिली आहे. अनेक जण वृद्धाश्रमात निधन पावल्यावर त्यांच्या त्याच गावात रहाणा-या मुलामुलींनी स्मशानात आम्ही नेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आमचा संबंध नाही अशी भुमिका घेतल्यावर समविचारी मित्रांच्या सहाय्याने त्यांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. >>>तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. तशीच काही अडचण केवळ २०-३० टक्के वृध्दांच्या बाबत असते. बाकी अडगड झालेले आहेत. >>ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात... हे मात्र अगदी खरे...

चाळीसेक वर्षांपूर्वीपर्यंतच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण समाजात जेवढी तडजोडीची-जमवून घेण्याची वृत्ती होती, ती आता कमी झालेली दिसते. याला आर्थिक परिस्थितीत झालेली सुधारणा हे कारण वाटते. मात्र बऱ्यापैकी उच्चशिक्षित आणि सुस्थितीत असलेल्या बहुजनसमाजात ब्राह्मणांचा हा दुर्गुण सुदैवाने अजूनतरी तितकासा दिसून येत नाही. त्यांचाही शेतीचा आधार फारसा राहिला नाही. बहुतेकजण नोकरीपेशातच स्थिरावले आहेत. पण माणसं धरून ठेवण्याकडेच त्यांचा एकंदरीत कल दिसतो.

सरकारी नोकरी हा एक मोठा छलावा आहे. त्यातूनही युपीएस्सी ची परिक्षा ही उगाचच घरातल्याना आशा लावण्यासाठी ठेवली असावी असेच वाटते. सी ए पार्ट २ ही परीक्षा देखील अशीच. पार्ट १ बरेचजण क्लीअर करतात. आणि मग वर्षानुवर्षे पार्ट २ करत बसतात. निदान ते काही क्लेरीकल काम तरी करत असतात. कामाची लाज वाटणे या बरोबरच घरातल्यानी सहन करणे हे सर्वात मोठे कारण असते असल्या कर्मदरिद्री वागण्याचे. ( शब्द वाईट आहे .............पण वस्तुस्थिती आहे ही)

या लेखाच्या शिर्षकात आरक्षण आहे, पण मजकूराशी त्याचा संबंध समजला नाही.

सदर धागालेखकांच्या लेखांमध्ये मोदींची स्तुती अथवा मागील सरकारांवरील टिका अथवा दोन्ही गोष्टी कोणत्याही संदर्भाशिवाय येऊ शकतात.