विषय आवडला. सध्या जेवढे सुचतील तेवढे ॲडवतो आणि मग जमेल तशी भर घालतो.
पापभिरू
समाज माध्यमांवर सर्वात मोठी असलेली ही जमात आहे. माणूस कळप करुन रहायला लागल्यानंतर कधीतरी ही पापभिरू साथ आली आणि अजूनही जाण्याचं नाव घेत नाही. चार चौघे जसं वागतात तसं वागलं म्हणजे आपण फारसं दखलपात्र होत नाही ही या वृत्तीची उर्मी.
नात्यामध्ये, शाळा-कॉलेजच्या मित्र समूहामध्ये वा तत्सम व्हॉट्सऍप ग्रुपवर कोणी दुःखद बातमी टाकली की “ॐ शांति”, “हरी ओम” वा RIP आणि हात जोडलेली इमोजी यांचा पूर येतो. संबंधित व्यक्तीशी कधी संपर्क न झालेली मंडळी देखील या पुरात आपले अर्ध्य अर्पण करतात.
वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवसाच्या वेळेस तर विचारुच नका. खिशाला कोणतीही तोशीस पडणार नसल्याने केक, रिबन्स, चॉकलेट्स यांच्या इमोजींचा सढळ मारा होतो.
फूलवाले राहिले. सकाळी सकाळी किलोभर फुले, गुच्छ, ताटवे..
आणखी अचाट माहितीपूर्ण मेगाबायटी लेख फॉरवर्ड करणारे. युनेस्कोने केलेल्या घोषणा, नारायण मूर्ती, विश्वास नांगरे पाटील, अब्दुल कलाम, नाना पाटेकर यांचे केलेले, न केलेले कोट्स..
शुभेच्छा प्रिय जण- आला सण की दे शुभेच्छा,आला सोमवार, मंगळवार... चतुर्थी की दे शुभेच्छा,आला ऐतिहासिक की दे शुभेच्छा!
व्हिडिओ प्रिय जण- १ मिनिटांनचा व्हिडिओ पाहायचं जीवावर येतं तिथे हे पाच दहा मिनिटांचे मूल्यशिक्षणाचे व्हिडिओ कसे पाठवू शकतात ;)
स्व कौतुक प्रिय जण-आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे तो जगाला कळलाच पाहिजे अस़ म्हणत ग्रुपवर असंख्य फोटो टाकून कौतुकाच्या झाडांसाठी आसुसलेले जीव ;)
*कट्टर भाजप द्वेष्टे* :
यांना देशातल्या कोणत्याही राज्यातच नव्हे तर देशातल्या कोणत्याही गावातला कोणत्याही ग्रामसेवक हा सुद्धा भाजपचा नको असतो. त्यामुळे सतत मोदी किंवा भाजप , राममंदिर यांच्या विरुद्ध पोस्टचा तुफानी मारा करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्यासारखे पोस्टत राहतात. समजा एखाद्या समूहात सगळे भाजप द्वेष्टे आहेत हे माहिती असले तरीसुद्धा ; समजा जर आपण हा मारा थांबवला आणि चुकून त्यातला एखादा भाजपच्या थोडासा जवळ गेला ; त्याची विचारसरणी ही भाजपला अनुकूल अशी बनली तर काय करायचं ? तशी वेळच येऊ नये म्हणून हे मुसळधार पाऊस जसा पडतो तसं भाजप , राममंदिर , संघ , नरेंद्र मोदी या चार प्रकारांना विरोध बाण सतत मारत राहतात.
उदा. मोदींनी १५ लाख देण्याचे वचन दिले होते अशी थाप मारतात. पुरावा द्या म्हटले तर पळ काढतात.
वैचारीक फुस फुस
बऱ्याच वेळा समव्यावसायिक लोकांमध्ये एकत्र येऊन वैचारिक देवाण घेवाण करण्याची टूम निघते. वर वर पाहता ती एक चांगली कल्पना वाटते. पण असा ग्रुप तयार झाल्यानंतर जी वैचारिक घुसळण होते त्याचा हा नमुना:
कुणी तरी नवशे अगदी फुसके प्रश्न विचारतात. हाताशी इंटरनेट असतांना ज्याची सहज माहिती मिळू शकते असे प्रश्न विचारले जातात. अगदीच काही हिरमोड नको व्हायला म्हणून आपण काही माहितीचे संदर्भ पाठवतो. पण ते देखील वाचण्याची तसदी न घेता काही सॅम्पल्स आहेत का अशी विचारणा होते.
आतल्या गाठीचे: वैचारिक घुसळण समूहामध्ये काही संपन्न अशी बडी मंडळी असतात. प्रत्यक्ष गाठीभेटींच्या कार्यक्रमात यांना प्रतिष्ठेचं निमंत्रण असतं, ते जे काही बोलतात त्याला keynote address असं काही तरी म्हटलं जातं. घूसळण कार्यक्रमात चुकून माकून, आपल्या व्यग्रतेतून थोडा वेळ काढून, हे प्रकटलेच तर असे विचारमोती सांडतात: “तसं नक्की नाही सांगता येणार. या विषयाला खुप पैलू आहेत आणि त्यातील प्रत्येक पैलूचा अभ्यास करनं गरजेचं आहे”.
विवीध विषयांवर असलेले समुह पकडले आहेत. जमेल तसे एखादे कोंबडीचे पिल्लू सोडून द्यायचे. दिवसभर पकाक पक ऐकू येते दिवस छान जातो.
व्हिडीओ,ढकलपत्रे, त्रिकाळ संध्या म्हणजेच गुडमॉर्निंग, गुडनाईट वगैरे वाचत नाही. नुसतीच नजर फिरवायची.
उरला सुरला वेळ मिपा आहेच.
माहीत नव्हतं सेवानिवृत्त आयुष्य इतक भारी असतं,केव्हांच व्हिआरेस घेतली असती.
लेख छान आहे. ग्रुपमधील बरेच किस्से, गमती-जमती आठवल्या. शुभेच्छुकांचा अनुभव आहे.:)
व्हाॅट्सअपमुळे भारतातील नातेवाईक/मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहणे सोप्पे झाले हे मात्र निश्चित!
कोणताही सण आला की फराळाची ताटे, मिठाईचे बॉक्सेस, जिलेब्या, चकल्या, रांगोळी, देवदेवतांची चित्रे, ह्यांचा भडीमार करणारे हा देखील एक मोठा ग्रुप आहे. खिशात हात न घालता आपण किती धार्मिक किंवा सोशल आहोत, हे दाखविण्याचा ते एक केविलवाणा प्रयत्न करतात.
मी माझ्या व्हाटसप मंडळींना सांगून ठेवलंय की जर तुम्हाला, मला खरंच शुभेच्छा द्यायच्या असतील तर फोनवर बोलून द्या, मग भले तो फोन व्हाटसपवरचा चकटफू फोन असो. उगाचच इकडून आलेला संदेश तिकडे पाठवला की जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाली अशा विचारांच्या लोकांचा भयंकर राग येतो.
हल्ली तर आयुष्यात कधीही न ऐकलेल्या, पाहिलेल्या किंवा साजऱ्या केलेल्या एखाद्या बुवांची जयंती, एखादी सप्तमी, एखादी अमावस्या ह्यावर देखील शुभेच्छा येतात, नुसता वैताग झाला आहे.
अजून एक कॅटेगरी सांगतो.
व्हाट्सअप एडमिन
फुलांच्या गुच्छ पासून म्हशीच्या पुच्छापर्यंत कशावरही हे लोक ग्रुप तयार करू शकतात आणि त्याचे एडमिन पद भूषवू शकतात.
कोणी जास्त नडायला लागला तर त्याला सरळ ग्रुप मधून बाहेर काढतात पण टेन्शन घेत नाही
मी माझ्या व्हाट्सअॅपच्या ग्रुपमधून काढून टाकलेल्या एक कोटी लोकांचा व्हाट्सअॅप ग्रुप
ह्या बाळासाठी प्रसववेदना सुरू झाल्याचे आमच्या पुणे मुंबईच्या शिवेवरील खात्रीलायक सूत्रांकडून समजते
यात एक ऍड करू इच्छितो,
काही विषय शोधायचा आणि व्हाट्सअप्प ग्रुप काढायचा,
1)सकाळी लवकर उठणाऱ्या चा ग्रुप
2)मिळून मिसळून ग्रुप - ज्यात स्वतःचे घोडे दामटायचे
3)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात सद्य परिस्थिती लक्षात न घेता उगाच आमका हिंदीत बोलला म्हणून रोज सकाळी बांग द्यायची,
4) गुंतवणूक ग्रुप - यात गुंतवणूक सोडून सर्व चर्चा करायची,
5) मन स्वास्थ्य ग्रुप - स्वतःचे चित्त थाऱ्यावर नाही आणि दुसऱ्या ला शहाणपणा शिकवत बसायचे,
अजून असे बरेच ग्रुप - यात स्वतःला काही पटले नाही की पोस्ट डिलीट करायची, मस्तरा सारखी छडी घेऊन दिवसभर कंडू शमवत राहायचा,
)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात सद्य परिस्थिती लक्षात न घेता उगाच आमका हिंदीत बोलला म्हणून रोज सकाळी बांग द्यायची, सद्य परिस्थीती काय आहे??? आणी राज्यभाषेची मागणी करणं म्हणजे बांग देणं?? मराठी भैय्ये हे प्रकरन खरंच इंटरेस्टींग आहे हे तुमच्याकडे पाहून कळतं. :)
मराठी भाषा शुद्धीकरण ग्रुप - यात परत हिंदी ची कशी दादागिरी चालते? भारताला कॉमन भाषा कोणती असावी?
त्यात कोणी सल्ले दिले तर ते न मानता उगाच पाळणा हलत ठेवण्यासाठी रोज सकाळी एक पिल्लू सोडून द्यायचे,
यथावकाश ग्रुप वर येऊन नको असलेले प्रतिसाद उडवायचे आणि परत दुसऱ्या ग्रुप वर उकिरडे फुंकायला जायचे
प्रतिक्रिया
हं. विरंगुळा.
आमचे दोन पैसे
पुल उवाच
खरंय
फूलवाले राहिले. सकाळी सकाळी
वपुंचे कोट्स पुलं च्या नावावर
परवा माझाच एक मिपावरचा लेख
घेतोस की नाही
कळले नाही..
हा हा !
१ मिनिटांनचा व्हिडिओ पाहायचं
कायप्पावर भक्तगणांची मांदियाळी.....
हे राहिले -
तुम्हाला कोण / काय हवे आहे
पुरावा द्या म्हटले तर पळ काढतात.
अवांतर
*असं व्हाट्सऍपवर लिहितात.*
*असं व्हाट्सऍपवर लिहितात.*तुम्हाला लेखकाची किर्ती माहित नाही का? :=)अजून काही १
आतल्या गाठीचे
जेष्ठांचा समुह....
हा हा हा ... खुसखुशीत ! मस्त
लेख छान आहे. ग्रुपमधील बरेच
चकटफू शुभेच्छक
आमच्या मित्राने व्हाट्स अॅपवरून हे टाकायला सांगितल्याने
आणि त्यांना आताशा
यात एक ऍड करू इच्छितो,
)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात
)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात सद्य परिस्थिती लक्षात न घेता उगाच आमका हिंदीत बोलला म्हणून रोज सकाळी बांग द्यायची,सद्य परिस्थीती काय आहे??? आणी राज्यभाषेची मागणी करणं म्हणजे बांग देणं?? मराठी भैय्ये हे प्रकरन खरंच इंटरेस्टींग आहे हे तुमच्याकडे पाहून कळतं. :)लेकी बोले सुने लागे,
हॅ हॅ हॅ
हम्म यामुळे
आले आले,
मराठी भाषा शुद्धीकरण ग्रुप -
इतका त्रास होत होता तर सोडून द्यायचा ना ग्रुप? ;)
कोण थांबलय, शीघ्रकोपी :)