Welcome to misalpav.com
लेखक: केदार भिडे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आता जागे झाले. दिल्लीत केजरीवाल यांनी खाजगी शाळांना फी वाढवण्यावर बंदी घातली. नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यास सांगितले. प्रत्येक पालकास वाटे की आपले मूल चांगले शिकून पुढे स्पर्धा परीक्षा पास व्हावे. हे साध्य झाले. एरवी महागड्या शाळांत ते मुलांना पाठवू शकत नव्हते. तर हा मुद्दा पुढच्या निवडणुकांत इथे येऊ नये या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरा मुद्दा असा की कोचिंग परवडणारे विद्यार्थी तिकडे झाकपाक कपडे घालून जातात, रेडिमेड उत्तरे मिळवतात आणि शाळांत केवळ उपस्थितीसाठी येतात. ते बंद होईल. तिसरा मुद्दा म्हणजे पैसे देईल तो शिकेल याचा धंधा झाला. त्या संस्था चालवणाऱ्यांच्या तडक विरोधात जाणे आता शक्य नसले तरी तेच करणार. निवडणुका जवळ आल्या आहेत.

वरील अभिप्राय हा इंडिया टुडे साप्ताहिकातील लेखावर आधारित आहे. केजरीवाल यांनी शिक्षणाचे चक्र कसे फिरवले याबाबत लेख होता. ते स्वतः उच्च परीक्षा पास झालेले सनदी अधिकारी होते. त्यामुळे त्यांना आतील गोष्टींची कल्पना आहे.

मुळात कोचिंग उद्योग हा १० वी ,१२ वी ( मेडी/इंजी) आय आय टी एन्ट्रन्स , आय आय एम साठी चालवला जातो.ही परिक्षा पद्धतच बदलायला हवी. दहावी बारावी परिक्षेमुळे मुळे कला शाखा / शास्त्र शाखा या कडे चांगल्या मुलांचा ओढा कमी होतो. बी एस सी नंतर मेडीकल किंवा इंजी ( पोस्ट ग्रॅज्यूएशन ) केले गेले तर याचा बराच फरक पडेल. तो पर्यंत मुलानाही नक्की काय करायचे आहे ते समजलेले असेल. पालकांची आणि मुलांचीही निराशा कमी होईल. कोचिंग उद्योग मुलांच्या मनात जी भ्रामक भीती निर्मान करतात तीही कमी होईल

म्हणजे १५ वर्षे फुकट घालवल्यानंतर पुढे मेडिकल किवा ईंजीनीयरिंग? म्हणजे २० वर्षे वयाचा मुलगा/गी अजुन ५-७ वर्षे शिकणार, मग नोकरी धंदा वगैरे. मग लग्न मुले/बाळे वगैरे कधी? अशाने कठीण परीस्थिती होईल राव!! आणि बी कॉम्/बी एस सी साठी कोचिंग क्लासेस चालत नाहीत असे थोडीच आहे? ते ही जोरात चालुच आहेत की. थोडक्यात शिक्षण आणि वैद्यकीय सेवा हा पैसेवाल्यांचा खेळ झालाय आपल्या देशात. प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी किमान ५० लाख रुपये तयार ठेवणे आवश्यक आहे आत्ताच.

असे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेची ऐशी तशी तर शहरी भागात पालकांच्या खिशाला भगदाड. ज्या तरुणांची कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांना आकाशाची मर्यादा आहे. एक आकरावी पास झालेला मुलगा सैन्यात जाण्यास मार्गदर्शन मागण्यास आला. जुजबी चौकशीत कळाले की गावात कुठेतरी इस्त्री म्हणजे धोब्याचे काम करतो आहे. बोलता बोलता सहज सुचवले आमच्या सोसायटीत लाॅन्ड्री व्यवसायाला खुप स्कोप आहे. लोक बाहेरून आपली जरूरत पुर्ण करता आहेत. कुठेतरी त्याच्या डोक्यात पटले. आज पाच कर्मचारी व ऑन लाईन बिलिंग सारख्या सोयी बरोबरच ड्रायक्लिनींग सेवा सोसायटीत पुरवत आहे. लोकांचा विश्वास अर्जीत केला व स्वताच मॅनेजिंग डायरेक्टर बनला आहे. कोचिंग वगैरे पैसेवालायांचे मार्ग, होतकरू कष्टाळू तरुण असे काही मार्ग शोधून आपली प्रगती करत आहेत. तुझा तूच शिल्पकार....