एक वेगळाच विषय वाचायला /चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन.
एका लेखात वाचल्याप्रमाणे उसतोड मजुरांमध्ये बाल विवाहाचे प्रमाण खुप आहे, त्यालाही हेच कारण. मुलीला एकटी घरात ठेवुन आईबाप शेतावर जाउ शकत नाहीत. मग आली वयात की द्या लग्न लावुन आणि संपवा जबाबदारी. चाईल्ड ट्रॅफिकींग, बालमजुरी वगैरे फार सौम्य असे म्हणण्यासारखी परीस्थिती
पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले.
या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty).
या मुली कुटुंबात असूनही खरेतर निराधार आणि दुर्लक्षितच असतात आणि त्याचं कारण गरीबी. आजुबाजुच्या समाजही उद्योग आणि ध्येयहीनही असतो.
लोकसंख्या वाढ हे गरीबीची कारण सांगतात,पण साडेचार हजार वर्षांपूर्वीचे इजिप्तमधील ऐतिहासिक पुरावे सांगतात की गरीबी होतीच. म्हणजे काय तर आर्थिक विषमता हे कारण. धनवान, सत्तावान बांधीव दगडी घरांत आणि जनता, गुलामीत मातीच्या खोपटांत. कुमारी मातेने मोझेसला पेटीत घालून सोडून दिलं. इकडे पौराणिक कथेतला कर्ण.
समाजातल्या तरुणांना काही ध्येय निर्माण करून ठेवणे कठीण काम.
विचित्र प्रकार आहे पाचव्या वर्षी मूल होणे म्हणजे. आणि त्यामागील व्यक्ती कायम अज्ञात राहिली हे वाईट.
वरील तुम्ही दिलेली केस वाचताना बरोबर उलट बाजूची केस विकिपीडियाने दाखवली. सर्वात जास्त वयात अपत्य प्राप्ती. वयाच्या ७२ आणि ७३ व्या वर्षी मूल झालेल्या दोन्ही स्त्रिया भारतीय आहेत.
विचित्र आहे खरे !
म्हातारपणीच्या मातृत्वाचा विक्रम बघायला गेल्यास त्यात दोन प्रकार पडतील :
१. नैसर्गिक मार्गाने गरोदर झालेली स्त्री : याचा 2017 च्या ‘गिनेस’ नोंदणीनुसार विक्रम, वय 59 असा दिसतो आहे.
२. कृत्रिम गर्भधारणेने गरोदर झालेली स्त्री : हे वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे वय 73.
धन्यवाद. बाकी कृत्रिम का असेना, पण ते गर्भाशयात रोपण करून मग डिलिव्हरी झाली असे वाटते आहे.
साठ, सत्तर या वयातही गर्भाशय आदि अवयव काम करत असतात असे माहीत नव्हते.
अल्पवयीन मातृत्वाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलींचे बालविवाह. राजस्थानमध्ये ही समस्या मोठी आहे. असे विवाह रोखण्यासाठी तिथे अनेक संस्थांनी एकत्र येऊन जागतिक स्तरावरील 'girls not brides' या नेटवर्कची स्थापना राजस्थानात केली आहे. सध्या या नेटवर्कमध्ये 28 संस्था आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून तिथले बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे.
. . .
बालविवाह : हेरंब कुलकर्णी यांचे नवे पुस्तक
त्या लेखातून :
". . . बालविवाह हे माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. बालविवाह ही महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर समस्या आहे. दुर्दैवाने अजूनही अनेकांना बालविवाह मागच्या शतकातला विषय होता असे वाटते व आता कुठे आहेत बालविवाह? असा उलटा प्रश्न विचारतात. त्यामुळे या विषयावर उपाययोजना तर सोडाच, पण फारशी चर्चाही होत नाही. राजस्थानात हे प्रमाण जास्त असल्याने, राजस्थानची किमान चर्चा तरी होते. महाराष्ट्र हे ‘पुरोगामी’ राज्य असल्याने जणू इथे बालविवाह नसतीलच, असाच सार्वत्रिक समज आहे. या समजामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण किती? बालविवाहाच्या प्रश्नाची दाहकता किती? याची चर्चा कोणीच करत नाही. यामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचा प्रश्न जणू संपला आहे, असे सर्वसाधारण समजले जाते. पण भारतात आजही २३ टक्के, तर महाराष्ट्रात हे प्रमाण २२ टक्के इतके आहे, हे लक्षात घेतल्यावर धक्काच बसतो. . ."
प्रतिक्रिया
भयंकर!!
धन्यवाद !
बालमजुरी वगैरे फार सौम्य असे
पाच वर्षे सात महिने वयाची
या मुली कुटुंबात असूनही खरेतर
सर्वांना धन्यवाद !
विचित्र प्रकार आहे पाचव्या
होय,
धन्यवाद. बाकी कृत्रिम का
बालविवाह