Skip to main content

कसाब तुमच्या तावडीत आला तर............................

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 11/05/2009 16:46 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2084
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

=)) मी तर तुमच्या तावडीत देईन.... तुमचे मराठी वाचून त्याला फेफरं येतील व तो पळत सुटेल मग पोलिस वाले त्याला पकडतील व पुन्हा तुझ्या तावडीत देतील =)) ;) * हलकेच घे. थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

+१ सहमत. त्याआधी त्याला माननीय श्री. सतिश भाउ यांच्या 'मोकलाया दाहि दिश्या' आणी 'प्राणिपात कोटि कोट' यांची पारायण करायला लावु. त्यानंतर 'फ' अक्षरावरुन मुला मुलीचे नाव सुचवायला लावु आणी त्या नावाला समर्पक अशी चित्रे गुगलवरुन शोधायला लावु. मग ती ख फ वर चिकटवायची. त्यानंतर २ तास सलग पर्नल मराठे यांच्याशी खरड खरड खेळणे. यातुन तो जगलाच तर मग पुढचे बघु. पराब ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

त्यला चुचुक्ले दएवु तांग्ला तोकय्लअ (त्याला चुचुकडे देवु चांगला ठोकायला) अवांतर - चुचुसारखे लिहिणे फार अवघड असते बुवा !! :) --अवलिया

समर्थ रामदासस्वामींनीही म्हटले आहे सुष्टांशी सुष्टपणे वागावे व दुष्टांशी दुष्टपणे वागावे तेव्हा असल्या माथेफिरुं अतिरेक्यांसाठी "जागीच गोळ्या घालणे" याव्यतिरिक्त कोणताही पर्याय लागू होत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे माफ करा पण हा विषय एवढा सोपा नाहिये... कारण अफजल गुरु कित्येक वर्षे तुरुंगात आहे... आता त्यात कसाबची भर आपल्या हातापर्यंत तो न येण्याची पुरेपुर काळजी काँग्रेस सरकार नक्की घेईन.... (देशभक्त) सागर

In reply to by सागर

छे गोळ्या घालून हिंसा करणार काय?त्यापेक्षा कसाबला अहिंसेचे डोस पाजून एक शेळी,शेळीच्या पायाला जखम झाली तर उपचार करायला पालापाचोळा, एक चरखा आणि रघुपती राघव राजारामची सीडी बरोबर देऊन त्याची पाकिस्तानात सन्मानपूर्वक परतपाठवणी करावी. कसाबपेक्षाही मोठा सन्मान त्याच्या वकिलाचा झाला पाहिजे. १८ वर्षाखालील मुले अतिरेकी म्हणून भारतात पाठवावी एवढी सुंदर कल्पना त्यानेच पाकड्यांना दिली आहे ना.मग त्याचा सन्मान नको व्हायला?मला वाटते त्याची शिफारस भारतरत्नासाठी व्हावी.अशा महात्म्यांना भारतरत्न देऊन आपण आपली आणि पुरस्काराची शान वाढवू. ************************************************************** (उद्विग्न) विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

In reply to by क्लिंटन

क्लिंटनसाहेब, खरे आहे तुमचे. गांधीबाबा असते तर कसाबसारख्या कोवळ्या वयाच्या मुलाला फाशीची शिक्षा न देता माफी मिळावी म्हणून त्यांनी उपोषण केले असते. स्वतः त्यांनी कसाबला पाकीस्तानात फरिदकोटला सुखरुपपणे त्याच्या घरी पोहोचवायची व्यवस्था केली असती आणि माणुसकी दाखवली या भुक्कड कल्पनाविलासापायी समाधान मानून घेतले असते... वासुदेव फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी, यांसारखे जहाल नेते स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला मिळाले नसते तर गांधीबाबांच्या मार्गाने स्वातंत्र्य कदापिही न मिळते.. - सागर

In reply to by सागर

या टाइमपास कौलामध्ये गांधींना ओढायची काही गरज नव्हती. गांधींच्या तत्त्वाप्रमाणे त्यांनी कसाबला तू गुन्हा केला आहेस तर तो कबूल करून त्याची जी शिक्षा होईल ती कुठलीही खळखळ न करता भोग असे कशावरून सांगितले नसते? सगळेच जर तर. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

गांधींच्या तत्त्वाप्रमाणे त्यांनी कसाबला तू गुन्हा केला आहेस तर तो कबूल करून त्याची जी शिक्षा होईल ती कुठलीही खळखळ न करता भोग असे कशावरून सांगितले नसते? कुठली तत्वं? चौरीचौरामध्ये इंग्रज सरकारने केलेल्या गोळीबारानंतर चवताळलेल्या आंदोलकांनी जेव्हा चौकीवर हल्ला केला त्यावेळी गांधींनी इंग्रजांना दोष न देता आंदोलकांनाच दोष दिला होता. तेच गांधी आज असते तर त्यांनी कसाबला ही इंग्रजांसारखीच वागणूक दिली असती आणि ज्या पोलिसांनी स्वतःचे जिव धोक्यात घालून त्याला पकडला त्यांच्यावरच टिका केली असती.

In reply to by विजय आवारे

इंग्रज सरकार आंदोलकांवर गोळीबार्/लाठीमार करणार हे गृहीतच होते. त्यावर प्रतिसाद म्हणून हिंसा करू नये असे गांधींचे म्हणणे होते. त्यामुळेच चौकी जाळणार्‍यांना गांधीनी दोष दिला होता आंदोलकांना दोष दिला नव्हता (म्हणजे आंदोलन केल्याबद्दल दोष दिला नव्हता तर चौकी जाळल्याबद्दल दोष दिला होता) व आंदोलन मागे घेतले होते. या दोन गोष्टीत फरक आहे एवढे तरी मान्य व्हावे. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

अगदी बरोबर बोललात खरटा भौ. अज्ञानातुन आणि तर्कविलासातून कै च्या कै बोलायचे आणि गांधीजी व नेहरूंना शिव्या द्यायच्या.... - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by नितिन थत्ते

खराटाजी, या टाइमपास कौलामध्ये गांधींना ओढायची काही गरज नव्हती. कसाबचा विषय तुम्ही टाईमपास म्हणता यावरुनच तुमची विचारशक्ती दिसून येते. (माफ करा असे म्हटल्याबद्दल) कधी कधी तुम्ही सिक्सर मारता विचारशक्तीत. पण या देशाच्या गुन्हेगाराला तुम्ही टाईमपासचा विषय समजता??? पटले नाही म्हणून बोलतो आहे. तुमचा इतिहासाचा किती अभ्यास आहे हे माहित नाही. पण खरेच तुम्ही इतिहासाची पाळंमुळं खणून काढा मग खरेच कळेन की गांधीबाबांना दोष देणे योग्य आहे की नाही. गांधीबाबांच्या देशभक्ती बद्दल माझ्या मनात किंतु अजिबात नाही. पण त्यांचा सत्याग्रहाचा मार्ग योग्य आणि क्रांतिकारकांचा मार्ग चुकीचा हे त्यांनी भारतीय समाजमनावर प्रकर्षाने बिंबवण्याचा प्रयत्न केला. स्वतःचे म्हणणे कोणी ऐकत नसेन तर उपोषणाचा केलेला वापर या सर्व घटना एक निरिक्षक म्हणून पहा तुमचे तुम्हालाच पटेन गांधीबाबांचा या विषयाशी काही संबंध नाही म्हणता. एक विसरता आहात तुम्ही की हा कसाब ज्या देशातून आला आहे त्या देशाच्या निर्मितीस हातभार लावण्याचे महान कार्य गांधीजींनीच केले आहे. मी जिवंत असे पर्यंत देशाचे तुकडे होऊ देणार नाही असे म्हणणार्‍या गांधीजींच्या हयातीतच पाकीस्तानची निर्मिती झाली हे विसरुन कसे चालेल? भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत आपण पाकीस्तानच्या रुपाने अश्वत्त्थाम्याची कायमच भळभळत राहणारी जखम घेऊन मोजली आहे. फाळणीच्या काळात आपण आपले स्वतःचे काही गमावले नाहीये, त्यामुळे लाखो लोकांची झालेली कत्तल, लाखो पोरी-बायकांच्या अब्रू चे निघालेले धिंडवडे , त्यांच्या वेदना याबद्दल आपण फक्त चर्चा करतो. पण एक सच्चा देशभक्त म्हणून सर्वांचे अशा घटनांसाठी जेव्हा रक्त सळसळेल तो दिवस सोन्याचा.... देशावरचा प्रत्येक हल्ला हा त्यापेक्षा दुप्पट ताकदीने परतवून लावला तर पुन्हा असले धाडस करायची दुश्मनाची हिंमत होणार नाही या मताचा मी समर्थक आहे. राष्ट्रहित सर्वात महत्त्वाचे आहे. धन्यवाद, सागर अवांतरः तुमच्या देशभक्तीबाबतही माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. फक्त स्फुल्लिंग पेटणे आवश्यक आहे. तेव्हा माझी टिप्पणी वैयक्तीक घेऊ नये ही विनंती....

In reply to by माया

मी तर म्हणते की चांगलचं झालं! घाण गेली! मायाजी ... दुर्दैवाने सगळी घाण नाही गेली :( गांधीबाबांनी इथेही ठामपणे भूमिका घेतली होती की ज्यांना जायचे त्यांनी जावे , ज्यांना इथे रहायचे त्यांनी इथेच रहावे.... जय हिंद... जय महाराष्ट्र सागर

In reply to by सागर

कसाब हा विषय टाइमपास नसून हा धागा टाइमपास आहे असे मी म्हटले होते. कारण या कौलात जे पर्याय दिले आहेत तेच टाईमपास दर्शवतात. गांधींविषयी माझी मते या धाग्यात दिसतील. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

खराटाजी काय लिहू? प्रतिक्रिया वाचल्यावर कळाली तुमची विचारसरणी पण गांधीजींच्या सगळ्या मतांशी सहमत नाही आहात हे वाचून बरे वाटले

त्याचा उपयोग आपल्या प्रेमळ, शांतताप्रेमी :( शेजार्‍याचे सगळ्या जगासमोर पितळ उघडे करण्यासाठी करायचा.

अहो तो तर तुकाराम ओंबळ्यांच्या तावडीत सापडला. आमच्या तावडीत सापडला असता (एके ४७ सोबत) तर आमच्या पँटला 'त्यावेळी येणार्‍या वासाने' त्याला भोवळ आली असती. मग आम्हि त्याला पोलिसांच्या तावडीत दिले असते. खराटा (रंग माझा वेगळा)

असले कौल म्हणजे १. रम्य कल्पनाविलास - "मी अमुक तमुक झालो/ले तर..." स्टाईल चे + २. दिवसभर काही ना काही कारणाने कुठे ना कुठे साठलेली वाफ दवडण्याचे/हात धुवून घेण्याचे हक्काचे ठिकाण (लंडन मधला हाईड पार्कचा स्पीकर्स कॉर्नर ;) ) हे होय... बाकी चालू द्या (दिवास्वप्ने पाहणारा बडबडा) विंजिनेर ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

कसाब तुमच्या तावडीत आला तर.... १)तो ज्या भारतिय लोकांच्या मदतीने भारतात आला त्यांची नावे काढुन घेणे.! २)त्याला आणि त्या भारतियाना देशाशी एकनिश्ठ असलेल्या पोलिसांच्या ताब्यात देणे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

कसाब तुमच्या तावडीत आला तर............................ पोलिसाना सोपवाल ??? तो आधीच पोलीसाच्या ताब्यात आहे. मग तो आता आमच्या तावडीत कसा येईल??? म्हणजे तो पोलीसाच्या तावडीतन पळाला तर असे म्हणायचे आहे का???? ---नि३.

वरच्या कौलात दुसरे काही असा पर्याय आहे त्याला अनुसरून संगजा देशकालोत्था, अपिसांक्रमिका गदा: | शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामी तं || हा मंत्र म्हणेन. याने 'परदेशातून आलेले रोग' बरे होतात असे कळते. आत्ता येडा खवीस चा प्रतिसाद वाचून आठवण झाली. खराटा (रंग माझा वेगळा)

अनवधानाने का होईना पण मंत्राचा उपमर्द होतोय तुमच्याकडुन्....उगीच मंत्र द्यायच्या भानगडीत पडलो असं वाटतय -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

शेवटच्या पर्यायाला मत दिले आहे. माझा उपाय - कसाब माझ्या तावडीत आला तर मी त्याला आयुष्यभर कैदेत तर ठेवीनच परंतु रोज त्याच्या कुल्यामध्ये तापलेली सळईही घालीन! :) जय हिंद..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्यांशी सहमत. असा एकादा पर्याय हवा होता कौलामध्ये. कानाखाली देणे, पोलीसांच्या तावडीत देणे, गोळी घालणे हे असले सौम्य पर्याय कसाबसारख्या नराधमासाठी कशाला? काल सुद्धा कोर्टात पत्रकारांकडे बघून हसत होता म्हणे तो पाकड्या! तात्या, गरम सळी कसाबच्या कुल्यात कोंबल्यानंतर माझ्यातर्फे चमच्याभर आऍसिड टाकायला विसरू नका. आयुष्यभराचा सल्फ्युरिक अ़ऍसिडचा स्टॉक माझ्याकडून फुकट! :) अवांतर : acid शब्द कसा टायपायचा? खूप प्रयत्न केला काही जमलं नाही. आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

गंगाजल हा शब्द वापरा.... जास्त चांगला पर्यायी शब्द आहे ऍसीड ला.... अजय देवगणचा हा चित्रपट पाहून गंगाजल हे नाव ऍसिडला जास्त योग्य वाटू लागले आहे

पोलिसाना सोपवाल ----- कशाला??? का म्हणून??? स्वतः त्याला कुदवाल ---- या वयात आता अशक्य! :( कानाखाली द्याल ------- या वयात हे देखिल अवघड! माझाच हात मुरगळला म्हणजे? कि गोळी घालाल ------- पान्ढरपेशे लोक आम्ही! दिवाळीतल्या केपान्च्या पिस्तुलीवेगळी पिस्तुल कधी बघितली नाय, बन्दुक नि गोळी कुठून आणू??? दुसरे काहि असेल तर सुचवा -- कोण सुचवायचय? कौल घेणार्‍याने की मतदान करणार्‍याने??? त्यातुनही आमच्या तावडीत तो आलाच, तर पहिले झूत मी माझी शेतीची बैलाकडून करुन घ्यावयाची सगळी कामे त्याच्याकडून करुन घेईन, उगा माणुस मारुन टाकण्याच्या मी विरोधात आहे! जो जसा आहे, त्याचा वापर करुन घ्यावा या मताचा मी आहे! सबब आयुष्यभराची सक्तमजुरी करवुन घेईन! :) जोडीला, भाड्याने आणून मारलेले हण्टरचे फटके असतीलच, इतके की नानी याद आली पाहिजे! कुठून झक मारली अन मुम्बैला जाऊन एकेफोर्टीसेव्हन चालवली असे पदोपदी जाणवले पाहिजेल इतके गुरासारखे कष्ट करवुन घेईन! :) कौलवाल्यान्ना अजुन काय पर्याय सुचतात तर बघा बोवा, सान्गा आम्हाला! अन द्या धाडुन त्या कसाबला नीट बन्दोबस्तात आमच्याकडे! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

सध्या कसाब हा पोलिसांच्या तावडीत आहे. तो जर माझ्या तावडीत आला, तर मी त्याच्या बाबतीत ती नीती वापरेन जी बांग्लादेश निर्मीतीनंतर भारताच्या तावडीत सापडलेल्या पाकिस्तानी सैनिकांशी वापरण्यात आली होती. त्यानंतर मिपाकरांनी सुचवलेल्या कल्पना अंमलात आणायला काही हरकत नाही. डुकराला मारण्यापूर्वी जसा धष्टपुष्ट करतात, तसा कसाबाला चैनीत ठेवून त्याच्यातील जोश, प्रेरणा, ह्या बाबी नाहीशा करायच्या नि तो सुस्तावल्यावर त्याचे हाल करायला सुरुवात करावी, नि त्याच्याकडून हवी असलेली माहिती व कबूलीजबाब काढून घ्यावा. मग बघा, पाकड्या राघू कसा पटापटा बोलायला लागतो ते. आपला नम्र, वडापाव भारतीय लोकशाहीतील असामान्य नागरिक

सध्या कसाब हा पोलिसांच्या तावडीत आहे. तो जर माझ्या तावडीत आला, तर मी त्याच्या बाबतीत ती नीती वापरेन जी बांग्लादेश निर्मीतीनंतर भारताच्या तावडीत सापडलेल्या पाकिस्तानी सैनिकांशी वापरण्यात आली होती. त्यानंतर मिपाकरांनी सुचवलेल्या कल्पना अंमलात आणायला काही हरकत नाही. डुकराला मारण्यापूर्वी जसा धष्टपुष्ट करतात, तसा कसाबाला चैनीत ठेवून त्याच्यातील जोश, प्रेरणा, ह्या बाबी नाहीशा करायच्या नि तो सुस्तावल्यावर त्याचे हाल करायला सुरुवात करावी, नि त्याच्याकडून हवी असलेली माहिती व कबूलीजबाब काढून घ्यावा. मग बघा, पाकड्या राघू कसा पटापटा बोलायला लागतो ते. आपला नम्र, वडापाव भारतीय लोकशाहीतील असामान्य नागरिक

सध्या कसाब हा पोलिसांच्या तावडीत आहे. तो जर माझ्या तावडीत आला, तर मी त्याच्या बाबतीत ती नीती वापरेन जी बांग्लादेश निर्मीतीनंतर भारताच्या तावडीत सापडलेल्या पाकिस्तानी सैनिकांशी वापरण्यात आली होती. त्यानंतर मिपाकरांनी सुचवलेल्या कल्पना अंमलात आणायला काही हरकत नाही. डुकराला मारण्यापूर्वी जसा धष्टपुष्ट करतात, तसा कसाबाला चैनीत ठेवून त्याच्यातील जोश, प्रेरणा, ह्या बाबी नाहीशा करायच्या नि तो सुस्तावल्यावर त्याचे हाल करायला सुरुवात करावी, नि त्याच्याकडून हवी असलेली माहिती व कबूलीजबाब काढून घ्यावा. मग बघा, पाकड्या राघू कसा पटापटा बोलायला लागतो ते. आपला नम्र, वडापाव भारतीय लोकशाहीतील असामान्य नागरिक

मी चूकून तीनदा प्रतिक्रिया प्रकाशित केल्यात. कशा ते कळलंच नाही. आपला नम्र, वडापाव भारतीय लोकशाहीतील असामान्य नागरिक