O Delight of the Raghus the evilintentioned Ahalya, inclined towards the king of the
celestials and knowing him to be the thousandeyed Indra in the guise of the ascetic, consented for the union.
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
हे रघुनंदन ! महर्षी गौतमका वेष धारण करके आये हुए इन्द्रको पहचानकर भी उस दुर्बुद्धी नारीने ‘अहो!
देवराज इन्द्र मुझे चाहते है’ इस कौतूहलवश उनके साथ समागमका निश्चय करके वह प्रस्ताव स्वीकार कर लिया॥
नवर्यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
Having thus cursed Indra, he also cursed Ahalya: 'You will be staying here for thousands of years without food and subsisting on air, lying down in ashes, doing penance, without being seen by any living beings in this ashrama' 'When the son of Dasaratha, the unassailable Rama enters this dreadful forest, you will be cleansed (of this sin)'. 'O Wickednatured one by offering hospitality to Rama, without covetousness and passion, you will happily live with me by regaining your present form'..
हिंदी-
इन्द्र को इस प्रकार शाप देकर गौतमने अपनी पत्नी को भी शाप दिया—‘दुराचारिणी! तू भी यहाँ कई हजार
वर्षोतक केवल हवा पीकर या उपवास करके कष्ट उठाती हुई राखमे पड़ी रहेगी। समस्त प्राणियोंसे अदृश्य रहकर इस
आश्रममे निवास करेगी। जब दुर्शर्ष दशरथ-कुमार राम इस घोर वनमें पदार्पण करेंगे, उस समय तू पवित्र होगी।
उनका अतिथ्य-सत्कार करनेसे तेरे लोभ-मोह आदी दोष दूर हो जायँगे और तू प्रसन्नतापूर्वक मेरे पास पहूँचकर
अपना पूर्व शरीर धारण कर लेगी’॥
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.)
जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८
तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अॅटीट्युड होता तेही लक्षात येईल :
अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना ।
कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥
आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् ।
इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥
सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् ।
रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥
ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे.
______________________________________________
बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या.
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
इत्यलम.
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून.
ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात.
१. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल.
२. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे.
२. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.
अवांतर :
पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो,
जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :(
स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे.
आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत.
आपण काहीतरी करायला हवे.
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=))))
ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =))))
ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल.
अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल
=))))
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते.
खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ).
-नाठाळ नठ्या
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत
राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक
इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून
हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे.
केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.
शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ?
शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः ।
देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥
न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया ।
शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥
जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला.
श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.)
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥
राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे.
हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही.
इत्यलम
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.
हे असं होतं बघा.
@विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद.
तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे.
तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे.
पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.
संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह!
https://satsangdhara.net/vara/prastavik.htm
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते.
अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे।
प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।।
- समर्थ रामदास स्वामी
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ?
इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला.
बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.
कशाला वेळ वाया घालवायचा ?
रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात.
मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा.
बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे.
बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.
लोकहो,
पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे.
प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही.
तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल.
-नाठाळ नठ्या
-नाठाळ नठ्या
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका.
हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो.
"अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी.
https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE
प्रतिक्रिया
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय
बलात्कार
अपराधी व्यक्तीला दिला जाणार
आपल्या सर्वच धर्मग्रंथात
साफ चूक.
अयोध्या कांड एवजी बालकांड
पटाईतकाका विनोदी लिहून सनातन
अवांतर :
तुका म्हणे उगी रहावे, जे जे
तुका म्हणे..
?
येथे मूळचा ग्राम्य शब्द
काहीतरी करायला हवे.
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी
आवरा .
@प्रसाद गोडबोले यांच्याशी सहमत.
धर्म, विज्ञान आणि चिंतन
पटाईत आणी निनाद ह्याचे लेख
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले
काय भेसळ आणि काय नाही हे
>>>>राजा भोजच्या काळात
तद्दन बिनडोक लेखन
हान
शंबूकाला शिक्षण घेतोय म्हणून
शंबुक कसले शिक्षण घेत होता ?
अनेक राक्षस इत्यादी तप करून
हे असं होतं बघा.
.
संपूर्ण वाल्मिकी रामायण
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये.
कशाला वेळ वाया घालवायचा ?
हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारी
लिंक बद्दल धन्यवाद
अस्सल व प्रक्षेप
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी