Welcome to misalpav.com
लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

विविध व्यक्तींचे फोटो देताना ते अयूबखानाच्या फोटोसारखे लहानसे दिलेलेच बरे. खूप भव्य निसर्ग किंवा अन्य जास्त तपशील असलेले फोटो देताना (उदाहरणार्थ डॉन दैनिकाचा फोटो) ६००-७०० रुंदी ठेवणे योग्य. केनेडी आणि फातिमा जिन्ना यांचे येवढे मोठे फोटो अप्रस्तुत वाटले. अयूबखानचा तो बोट दाखवणारा, 'गुरगुरणारे भाव' वाला फोटो हुडकून टाका राव. लहानपणी अयूबखानची व्यंगचित्रे पेप्रात बघितलेली आठवतात. . राणी एलिझाबेथ - नेहरू, अयुबखान वगैरे.

प्रयोगादाखल मी खालील फोटो नेटवरून copy image address घेऊन इथे चढवल्यावर त्याच्या मूळच्या 1600 x 1000 (518 kb) आकारात इथे दिसत आहे. . आता width 200 ठेऊन तो इथे चढवल्यावर खालीलप्रमाणे लहान आकारात दिसत आहे. तेंव्हा मिपावर फोटो चढवताना नुस्ता चेहरा किंवा अगदी कमी तपशील असलेले फोटो २००-३०० रुंदी ठेऊन देणे बरे. जास्त तपशील असणारे, भव्य दृष्य वगैरे, किंवा ज्यात काही 'वाचायचे' असते असे फोटो ६००-७०० रुंदीत द्यावेत. .

'ये धोती पहननेवाले क्या कर सकते है', असं हाच अयूबखान लालबहाद्दूर शास्त्रीजींना उद्देशून म्हणाला होता. अयूबखान सहा फुटाहून अधिक उंची असलेला धिप्पाड सेनानायक होता. याउलट शास्त्रीजी अगदीच चिमुकले पाचफुटी होते व चेहऱ्यावरून निरागस वाटायचे. १९६५ च्या युद्धाच्या आधी शास्त्रीजींनी भारतीय सेना पश्चिम पंजाबात घुसेल असं सांगितलं आणि सेना त्याप्रमाणे घुसली. भारतीय सेना रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर दाखल झाली व तिने डागलेले काही तोफगोळे नदी ओलांडून लाहोरात जाऊन पडले. अयूबखानची पळता भुई थोडी झाली. शास्त्रीजी असेच दटून राहिले तर पाकिस्तान नामशेष होईल हे अमेरिका व रशिया दोघांनाही कळलं. शास्त्रीजींना तहाच्या निमित्ताने ताश्कंदात आणलं. शास्त्रीजींनी आपला मुस्लीम खानसामा त्यावर नको तेव्हढा विश्वास टाकून सोबत नेला होता. त्याने तिथे शास्त्रीजींना विष देऊन ठार मारलं. नंतर तो परस्पर पाकिस्तानांत पळून गेला. या घटनेवर अयूबखानची देखरेख होती अशी वदंता आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूचं भांडवल करून अयूबखानाने अनेक पाश्च्यात्यांना रहस्यांकित ( ब्लॅकमेल ) केलं म्हणतात. -नाठाळ नठ्या

पाकिस्तानच्या लोकशाहीत इतकी बजबजपुरी आहे कि राष्ट्रपती अगदी फडतुस कारणासाठी सुद्धा पंतप्रधानांना बरखास्त करून सत्ता हातात घेतात आणि असं झालं कि अस्थिरतेचे कारण देऊन लष्कर सत्ता काबीज करते. पाकिस्तानचे राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी मार्शल लॉ लावून लष्कराला पाचारण केले ते सापाला घरात घेण्यासारखे होते. यानंतर जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा लष्कराने सत्ता हातात घेतली. मुळात पाकिस्तानात लोकशाहीची बीजे रुजलीच नाहीत. ज्या इस्लामवर पाकिस्तानची निर्मिती झाली त्या धर्माला मुळातच लोकशाही हा विचार माहिती नाही. कोणत्याही इस्लामी राष्ट्रात सुलतान( राजा) याने तुर्कस्तानच्या खलिफाचा मांडलिक म्हणून राहून इस्लामच्या तत्वाप्रमाणेच (शरिया) राज्य चालवायचे हाच नियम यामुळेच कोणत्याही इस्लामी राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही हि वस्तुस्थिती. भारताच्या पश्चिमेस फक्त इस्रायल मध्ये लोकशाही आहे. मधल्या कोणत्याही राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही

अगदी खरं आहे. मुहम्मद पैगंबरांनंतर खलिफापद सुरू झाले, त्याचा ईतिहास भयानक रक्तरंजित आहे. खलिफापद आधी मक्का, मग दमास्कस, बगदाद करत ईजिप्त ला स्थिरावले, तिथून खलिफाला तुर्कस्तानमध्ये ऊचलून नेण्यात आले. खलिफाला पैगंबरांचे वस्त्र वगैरे वस्तू मिळतात. पण तूर्कींकडे खलिफापद अरबांना मान्य नाही/नव्हते. शेवटचा खलिफा १९२८ साली झाला नंतर खलिफापद केमालपाशा ने रद्द केले. आपल्या इथल्या शाह्यांनाही खलिफाचा मान्यता मिळवावी लागायची. टिप्या बराच झटला होता मान्यता मिळवायला.

टिप्या बराच झटला होता मान्यता मिळवायला.
टिप्या खूप जुना झाला, तेवढ्या मागे जायचीही गरज नाही! तुर्कांवर झालेल्या अन्यायाचा निषेध तसेच पहिल्या महायुद्धानंतर इस्लामचा खलीफा म्हणून ऑट्टोमन साम्राज्याच्या सुलतानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणण्याच्या नावाखाली १९१९ ते १९२४ ह्या कालावधीत भारतीय मुस्लिमांनी 'खिलाफत चळवळ' सुरु केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मो.क. गांधी, वल्लभभाई पटेल आणि बाळ गंगाधर टिळक अशा तत्कालीन राजकारण्यांनीसुद्धा ह्या चळवळीला पाठिंबा दिला होता 😀 असो, लेखमाला छान चालू आहे! पुढील भागाच्या प्रतीक्षेत असलेला... टर्मीनेटर (मोदी का परीवार)

टर्मीनेटर, मुस्लीम कार्यासाठी तोंडदेखला पाठिंबा द्यायला टिळकांची हरकत नव्हती. बदल्यात असहकार चळवळीस मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार होता. लखनौ कराराच्या पार्श्वभूमीवर हिंदूमुस्लीम सहयोगाची चांगली संधी होती. -नाठाळ नठ्या

मुस्लीम कार्यासाठी तोंडदेखला पाठिंबा द्यायला टिळकांची हरकत नव्हती.
म्हणजे ज्याला आज मुस्लिम तुष्टीकरण वगैरे म्हणतात त्याची ही सुरुवात होती का? माझे कैक राष्ट्रवादी मुस्लिम मित्र आहेत ज्यांच्या लेखी ही फक्त आणि फक्त राजकीय खेळी होती! बादवे तुम्ही गांधी आणि पटेल ह्यांच्या तत्कालीन भूमिकेविषयी काही लिहिले नाहीये...

अयूबखान राजवटीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती भारतापेक्षा बरी होती असं वाचायला मिळतं. पण नेहरू-शास्त्री काळात भारतात जास्तीत जास्त उद्योग परकीय मदतीने का होईना भारतीय प्रयत्नांतून उभे करण्यावर भर असल्यामुळे भारत हा खऱ्या अर्थाने विकसनशील होता. पाकिस्तानसारखा परकीय उत्पादनांचा सुळसुळाट, त्यामुळे दिखाऊ सुबत्तेच्या खुणा कमी दिसत असाव्यात, अपवाद मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्राससारखी शहरं.