शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे.
दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.
२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११
सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =))
सं - दी - प
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही.
असो.
पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते.
काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल
अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏
वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी.
श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर,
वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान.
-दिलीप बिरुटे
९८ पूर्ण
---
आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला.
---
शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ?
तो मनुष्य सांगू लागला .
सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो .
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे .
ते का ?
मी उपजत चौकसपणातून विचारले .
कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे .
काय ?महंतांचा खून ?
होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा .
पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो .
आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते .
आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते !
मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते .
ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली .
माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस .
परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले .
पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला?
प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते .
कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ?
कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही .
गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे .
जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम !
वेळेचा अपव्य करू नये .
नर्मदे हर !
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते.
गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता.
कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना.
इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही.
या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले.
लेखकाला साष्टांग दंडवत.
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर !
mazinarmadaparikrama.blogspot.com
आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले.
खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता.
तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला.
बर्याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला.
मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे.
बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी.
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ?
२. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ?
३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात)
४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ?
५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ?
४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे.
माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल.
अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल.
टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ?
हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते .
२. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ?
वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो .
३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात)
नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे .
४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ?
२०० % होय
५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ?
होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.
२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे.
पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे.
असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल.
https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे.
का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य :
>>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही .
कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे !
मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . .
नर्मदे हर !
प्रतिक्रिया
पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे.
पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे.
फोटो मस्तच.
फोटो मस्तच.
फोटो मस्तच.
छानच. खंड न पाडता पुढील भाग
छानच. खंड न पाडता पुढील भाग
नर्मदे हर
थोडक्यात तीन चार लेखांत
पुस्तके वाचन वेगळे आणि हे लेखन वेगळे.. कारण..
या लेखमालेचे एकूण ७५ भाग आहेत असे (ब्लॉगवरून) समजले
काल आणी आज...
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता
बापरे.
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा
खरंय.
+११११११११११
आपणास साष्टांग दंडवत !
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर
छान.
अगदी सहज सुन्दर लेखन. वाचतोय.
सुंदर लेखन ७५ भाग वाचून झाले.
७९
९० पूर्ण
अरे वा, माहितीबद्दल धन्यवाद.
९८ पूर्ण
फेक किस्सा की वास्तव कल्पनेपेक्षा अधिक दारुण?
ढाराढूर नव्हे सावध झोपला होता .
:)
असं प्रांजळ आणि वाचावेसे
एक लक्ष मानस परिक्रमा
मानस परिक्रमा पूर्ण
नर्मदे हर !
अवांतर :
चांगले प्रश्न विचारले आहेत.
मला वाटते खरडवहीवर किंवा
का? समजु द्या की सगळ्यांना ....
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे
आशेवर भारतीय माणूस जगतो...
प्रश्न व उत्तरे क्रमशः
धन्यवाद !
नर्मदे हर !
अप्रतिम लिखाण
नर्मदे हर!!
+१
१०० % जमणार !
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील
लेख आवडला !
वाचतो आहे.
धन्यवाद!
Pagination