Welcome to misalpav.com
लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आयला, अयूबखानांना युद्ध लढणे हे काम चांगले जमायचे हे वाचून कपाळावर हात मारून घेतला. साहेबांनी भारताची खोड मोडण्यासाठी खेमकरण विभागात ९०+ रणगाडे आणले होते. जेणेकरून काश्मीरातला रसदपुरवठा बंद पडेल. मात्र भारतीय सेनेने कालवे फोडून जमीन पाणथळ करून सोडली. ती टाळण्यासाठी मग साहेबांना रणगाडे उसाच्या शेतांतून चालवावे लागले. त्यामुळे आवाज व्हायचा आणि भारतीय सैनिक रणगाड्यांना अचूक टिपायचे. शिवाय पाणथळ जमिनीमुळे बरेचसे रणगाडे रुतून बसले ते वेगळेच. पाकी सेना पळून गेली वा शरण आली. अयूबसाहेबांच्या ब्लिट्झक्रीगची जंगली तूफान टायर पंक्चर अशी अवस्था झाली. अस्सल उत्तर गावानजीक सुमारे शंभरेक पाकिस्तानी रणगाडे ( पॅटन, शेरमन, इत्यादि ) पडीक आहेत. त्या ठिकाणास पॅटनची दफनभूमी म्हणतात. -नाठाळ नठ्या

मूळ पुस्तकातील तो भाषांतरित उल्लेख आहे. प्रवीण झा यांनी लिहिलेले ते वेगळे पुस्तक आहे. केनेडी - बदलती दुनिया का चश्मदीद

जरा मोठे भाग टाकता आले तर बघा. एव्ह्ढ्याशा दुर्लक्षित देशाकडे लिहिण्याकरता ईतका ईतिहास असेल असे कधी वाटले नव्हते. बरीच नवीन माहीती समजत आहे. बादवे--भारत पाकीस्तान एकत्रच स्वतंत्र झाले. दोघांची सुरुवातीची अनेक वर्ष देशांतर्गत प्रश्न सोडवण्यात गेली. आर्थिक बाजु कमकुवत होत्या. तरी पाकीस्तान कडे ईतके रणगाडे आणि युद्ध करण्याची खुमखुमी वगैरे कुठुन आले?

पाकीस्तान कडे ईतके रणगाडे आणि युद्ध करण्याची खुमखुमी वगैरे कुठुन आले? पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली असली तरी धर्म हा भाषिक किंवा वांशिक अस्मितेच्या पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण ठरत नाही हे जगभरात सिद्ध झालेले आहे. पाकिस्तानच्या पाच प्रांतांमध्ये कधीही बंधुभाव नव्हता. त्यापैकी १९७१ मध्ये बांगला देशाच्या निर्मितीने हा मुद्दा पूर्णपणे अधोरेखित केला आहे. सध्या पाकिस्तानच्या पंजाब सिंध बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या चार प्रांतांमध्ये कोणतेही सौहार्द्राचे वातावरण नाही. इतर तीन प्रांतांमध्ये पंजाब आपल्याला सापत्नभावाने वागवतो हा विचार मूळ धरून आहे. बाकी चार भागांना एकत्र ठेवण्यात भारत विरोध आणि काश्मीर हे दोनच मुद्दे कारणीभूत आहेत. त्यातुन पाकिस्तानात लोकशाही कधी रुजलीच नाही. आजतागायत एकही लोकशाही वर्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानाला आपली पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही. यामुळे पाकिस्तानची सामाजिक आर्थिक व राजकीय स्थिती कोणत्याही कारणाने कठीण झाली तर काश्मीरचा मुद्दा घेऊन भारताची कुरापत काढून युद्धज्वर भडकावला कि स्थानिक मुद्दे बाजूला टाकण्यात तेथील लष्करशहा आणि राज्यकर्ते सफल होतात. अफगाणिस्तानातून अमेरिका आणि रशिया दोघांनी माघार घेतल्यामुळे एक मुसलमान १० काफिरांना भारी पडतो सारखे भंपक मुद्दे तिथल्या बिनडोक जनतेत भरवण्यात तेथले मौलवी हातभार लावत असतात. (मग त्यात अफगाणिस्तान बेचिराख झाला असला तरी चालेल) शिवाय धार्मिक उन्माद शिगेला पोचवून आपल्या तुंबड्या भरण्यात तेथेले मौलवी पुढे आहेत. यामुळे जेन्व्हा जेंव्हा शक्य असते तेंव्हा भारताविरुद्ध युद्ध किंवा युद्ध सदृश्य स्थिती निर्माण केली जाते.

मुघल काळात राजपुत्रांच्या सत्तास्पर्धेत अधिक आक्रमक आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे डोळे काढून मक्केला पाठवत असत या इतिहासाची आठवण झाली. आताचे सत्ताधीश देश लुटून झाला की सैन्याच्या उठावानंतर सौदी, आखाती किंवा पाश्चिमात्य देशांत आश्रय घेतात आणि तेवढ्यापुरती थोडीफार भारताच्या बाजूची वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे वारंवार दिसून येते. एकूणच सरंजामशाही रक्तात मुरलेली असल्यामुळे लोकशाही मूळ धरत नसावी. मात्र भारताविरुद्ध जेवढं काही जिथं जिथं करता येईल तेवढं करण्यात सत्तेवर आल्यावर कोणीच मागं हटत नाही.

'पाकिस्तानात साठ वर्षे' या बी. एम. कुट्टी यांच्या पुस्तकातून पाकिस्तानच्या इतिहासाचं आणि राजकारणाचं दुर्दैवी चित्र समोर उभं राहतं.

वाचतोय... बादवे काल प्रवासात असताना इंस्टाग्रामवर परवाचा, म्हणजे १२ मार्च २०२४ रोजीचा पाकिस्तान विषयीचा एक गंमतीशीर व्हिडीओ पाहण्यात आला. त्यातले तथ्य जाणून घेण्यासाठी थोडी शोधाशोध केली असता पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थिती विषयी काही रोचक माहिती हाती लागली. आज-उद्याकडे वेळ मिळाल्यास त्यावर एक लेख पाडावा म्हणतो! (असे दाबलेले-चेपलेले फोटो बघायला आवडत नसल्याने त्यावरचे भाष्य टाळतो 😀) पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

धन्यवाद. चित्रगुप्त काकांनी सजेस्ट केल्याप्रमाणे फोटोत कमा जास्त बदल केले. पण चेपल्या गेले. लवकर लेख लिहा.

फोटो टाकताना फक्त रुंदीचा आकडाच भरावा. सामान्य फोटोंसाठी २०० रुंदी पुरे. खूप भव्य दृष्ये, त्यात बघण्याजोगे खूप तपशील वगैरे असले तर ६०० पर्यंत.

चित्रगुप्त काका, वाचक कुठल्या आकाराच्या स्क्रीनवर मिपावरचे लेख वाचतोय हे लेखकाला कसे समजणार? मला वाटतं तुम्ही देखील माझ्या प्रमाणेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या मॉनीटरवर मिपा वाचत असावेत! पण आज बहुसंख्य वाचक मोबाइल फोनवर मिपा वाचतात त्यामुळे अशा वाचकांना विशिष्ट रुंदी किंवा उंची दिलेले फोटोज स्क्रीनवर विचित्र दिसतात. तेच फोटो मोठ्या स्क्रीनवर आणखिन विचित्र दिसु शकतात. त्यामुळे लेखात कुठलिही रुंदी किंवा लांबी देणे टाळावे, मिपाची थीम रिस्पॉन्सीव्ह आहे त्यामुळे कुठलीही मापे नं देताही वाचकाच्या स्क्रीनच्या आकारानुसार ती फोटोंचा आकार ठरवते. आपण थोड्या मोठ्या स्क्रीनवर वाचतो त्यामुळे काही फोटोज खुप मोठे दिसतात हे मान्य, पण समजा एखादा वाचक ६५ इंची स्मार्ट टीव्ही वर मिपावरचे लेख वाचत असेल तर त्याला २०० रुंदी दिलेला फोटो त्याच्या स्क्रीनवर किती लहान आकाराचा दिसेल ह्याची कल्पना करा. त्यामुळे लेखात फोटो देताना कुठलीही लांबी रुंदी देणे लेखकाने टाळावे अशी मी तरी शिफारस करतो, बाकी त्याउपर लेखकांची मर्जी...

लांबी किंवा रूंदी दिली नाही तर मूळ फोटोच्या आकारात फोटो येतो असे दिसते. म्हणूनच टाईम, जिना वगैरेंचे फोटो खूप मोठे आले. मी करून बघितले होते. हो. मिपा फक्त लॅपटॉपवरच बघतो मी.

लांबी किंवा रूंदी दिली नाही तर मूळ फोटोच्या आकारात फोटो येतो असे दिसते.
बरोबर! कुठ्लीही लांबी किंवा रूंदी नं देता मोठ्या स्क्रीनवरही फोटो जास्तीत जास्त त्याच्या मुळ आकारा एवढाच दिसेल, पण ठरावीक रुंदी किंवा उंची दिल्यास तोच फोटो छोट्या स्क्रीनवर दाबलेला किंवा चेपलेला दिसेल.