श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.
श्रावण महिना सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे या महिन्यात आकाशातील पांढरे-काळे ढग, सरसर येणाऱ्या पावसाच्या सरी, मध्येच दिसणारे निरभ्र आकाश, पुन्हा पडणारा रिपरिप पाऊस हे निसर्गचित्र नेहमीचंच असतं.
मिपावरचे लेखन-प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद असेच असतात, नाही का?
श्रावण मास हा हिंदूंचा पवित्र काळ असतो. नागपंचमी, राखीपौर्णिमा, पोळा यांची धामधूम सुरु असते. बेसिकली, उत्सवी वातावरणाची, व्रतवैकल्याची, उपवास-निराहारांची सुरुवात या इथून सुरु होते.
मिपाकरांना श्रावण मासाच्या आगाऊ शुभेच्छा.
संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात - परिसीमन विधेयक, आयकरसुधारणा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवणारं विधेयक, FCRA विधेयक, MSME साठी विलंबित पेमेंट्सवरचं संरक्षण देणारं विधेयक अशी प्रमुख विधेयकं सरकारच्या अजेंड्यावर आहेत. यातली FCRA दुरुस्ती विधेयक आणि उच्चशिक्षण नियामकांना एकत्र आणणारं VBSA विधेयक हे दोन विरोधकांच्या रडारवर आहेत, काँग्रेसने या दोन्हींना विरोध करण्याचं आधीच जाहीर केलंय. शिवाय NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरही चर्चा होत आहे. यांतील काही विधेयकं मंजूर झाली आहेत काही होतील.
परिसीमन विधेयकावरून सरकार व विरोधी पक्षांत नुकतीच वैठक पार पडली. या मुद्द्यावर संसद चांगलीच तापणार आहे. जंतरमंतरवरचं आंदोलनात अजून काही काळ धुगधुगी राहील असे दिसते आहे.
नुकत्याच झालेल्या विविध विधानसभांच्या पोटनिवडणुकांत भाजपचा एक विजय आणि दोन पराभव असा निकाल लागला आहे.
आर्थिक आघाडीवर सरकारने भारतीय स्मार्टफोन ब्रँड्स जगात पुढे यावेत यासाठी साडेबासष्ट हजार कोटींची योजना जाहीर केलीय, चिनी-कोरियन ब्रँड्सच्या तुलनेत भारतीय कंपन्या किती पुढे सरकतात ते बघावे लागेल.
शेतीसाठी ऑगस्ट महिना नेहमीच कसोटीचा असतो. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची चातक प्रतीक्षा, हे नेहमीचं विषम चित्र यंदाही आहे.
माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार मागच्या दहा वर्षांत भारतातील पावसाळा हा जून ते सप्टेंबर असा पारंपारिक न राहता जुलै मध्य ते नोव्हेंबर असा पुढे सरकला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी वेळापत्रकात त्यानुसार बदल करावा असे सरकार चारपाच वर्षांपासून सांगते आहे पण सगळेच शेतकरी त्याला प्रतिसाद देतात असे नाही. (आम्ही मात्र आमची मराठवाड्यातील शेती पावसावर अवलंबून ठेवलीच नाहीय!)
या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय; कुस्ती-बॅडमिंटन-हॉकीसारखे हुकमी मेडल मिळवणारे खेळ नसतानाही बॉक्सिंग-ज्युदो-ट्रॅक अँड फील्डच्या जोरावर पदकतालिकेत भारत बऱ्यापैकी वर सरकलाय, हे विशेष कौतुकास्पद.
भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६, शनिवारी साजरा होईल.
बाकी महिनाभरात काय काय घडतं, कोणत्या बातम्या गाजतात ते इथे नोंदवत जाऊया. चर्चा करत राहु या.
- कांदा लिंबू
प्रतिक्रिया
(No subject)
(No subject)
(No subject)
आज हे मटेरियल मिळाले आहे वाटते 🤣, असो
मोदीजींच्या तर्फे ईद - उल - मिलाद - उन - नबी (पैगंबर मुहम्मद जन्मदिवसाच्या) समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा
काल २५ ऑगस्ट २०२६ ला भारतात…
काल २५ ऑगस्ट २०२६ ला भारतात UPI सेवा सुरु होऊन दहा वर्षे पूर्ण झाली. त्याच काळात पेमेंट करण्यासाठी BHIM ऍप् सुरु झाले. नंदन निलकेनी यांच्या नेतृत्वात NPCL ने UPI निर्माण केले.
पेटीएम ही बहुधा पहिली खाजगी यूपीआइ सेवा सुरु झाली; त्यानंतर फोनपे आली. जीपे (गूगलपे) त्यामानाने बरीच उशिरा आली. जीपेचे नाव सुरुवातीला दुसरे काहीतरी होते.
हिंदू मतांसाठी मंदिरात जाऊन,…
हिंदू मतांसाठी मंदिरात जाऊन, सदऱ्यावरून जानवे परिधान करून, स्वतःचे हिंदू गोत्र सांगून आपण सश्रद्ध हिंदू आहोत याचा देखावा करण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही हिंदू मते मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर कॉंग्रेस आता हिंदू मतांचा नाद सोडून आपली पाळेमुळे व आपल्या मूळ मुस्लिम लांगूलचालन या विचारसरणीकडे उघडपणे निघाला आहे.
संपूर्ण वंदेमातरम न म्हणण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुस्लिम धर्मांधतेविरोधात मौन पाळून अस्तित्वात नसलेल्या मनुवादाविरोधात कॉंग्रेसने बोलण्यास प्रारंभ केला आहे. देशभर कॉंग्रेसला मिळणाऱ्या अंदाजे १९-२० टक्के मतातील १३-१४ टक्के मते मुस्लिमांकडून येतात. त्यावर डल्ला मारायला आआप, डावे, सप, शिशिउबाठा, बसप, राशप असे अनेक लहानमोठे पक्ष टपले आहेत. ती मते जाऊन द्यायची नसतील तर मुस्लिम लांगूलचालनाला पर्याय नाही.
खरंय
मौन पाळून अस्तित्वात नसलेल्या मनुवादाविरोधात कॉंग्रेसने बोलण्यास प्रारंभ केला आहे.
अस्तित्वात नाही ते इतकी तडफड करतोय भाजप ! थोडे अस्तित्व दिसले तर कायच हालत होईल म्हणायची ?