जनातलं, मनातलं

संकेतस्थळावरील सदस्यांचा '' एक फसलेला दिवाळी अंक'' !!!

Primary tabs

संकेतस्थळावरील लेखनाचा,  एक फसलेला दिवाळी अंक !!!
vm

गेल्या अनेक दिवसांपासून मोठा गाजावाजा केलेल्या, एका सौम्य आणि सभ्य भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या, आणि संकेतस्थळावर वावरणा-या आणि त्यांनीच वाचावा या हेतूनेच की काय, निघालेला दिवाळी अंक नुकताच वाचण्यात आला. संकेतस्थळावरील दिवाळी अंकाचे वेगळेपण काय असावे, तर सर्वसामान्य वाचकांची कोणतीही अभिरुची भरुन निघेल असा, वेगळेपण असलेले लेखन आणि नवलेखकांना लिहिण्यासाठी प्रेरणा मिळावी. वेगळेपणाचा एक साहित्यिक अनुभव मिळावा,वाचकाची ब्रम्हानंदी टाळी लागावी हा हेतू या दिवाळी अंकात असावा असा एक समज आमच्या मनात होता, तसे मात्र काहीच दिसत नाही. एका संकेतस्थळावरील प्रस्थापीत लेखकांचा दिवाळी अंक वाटला. त्यांचेच लेखन निवडून संपादित केलेल्या लेखनास दिवाळी अंक म्हणायचे का ? जे लेखक सतत लिहित असतात त्यांच्या लेखनात तसे वेगळेपण काही नसताना त्याच पठडीतले लेखन दिवाळी अंक टाकण्याचा उद्दामपणा आम्हाला कळला नाही. वाचतांना दिवाळी अंक नव्हे तर संकेतस्थळावरील लेखन वाचतो आहे असेच वाटत होते. आणि संपादकीय मधून संपादक मंडळानीच ' आम्ही केवळे भारवाही' असे म्हणून की काय त्याचे समर्थनच केले आहे असे वाटते. कोणतेही वेगळे साहित्य प्रकार नाही. सामाजिक, आणि राजकीय या विषयांच्या जवळ जाणारा एकही लेख त्यात आढळत नाहीत. कथा, लेख, अनुभव, कविता, प्रवासवर्णन, मुलाखती,पाककृती, या अशा ठरावीक साच्यातला हा अंक. लेखनाच्या अनुक्रमेत वाचक सोयीचे वाटेल तेथून वाचायला सुरुवात करतो आम्ही कवितेपासून वाचायला सुरुवात केली.

नेहमीप्रमाणेच चित्तांची ''तुझ्या शहरात मी जातो'' ही कविता सुंदर झालेली' आहे. पण, संकेतस्थळावरील वाचकांना चित्तांची ओळख असल्यामुळे त्यांची कविता वाचतांनाही त्यांच्याच संकेतस्थळावरील कविता वाचतोय असे वाटले. प्रसाद शिरगावकरांची 'सारांश'. मुकुंद भालेरावांची ''एक कविता लिहीन म्हणतो, मिलिंद फनसेंची 'कोणासाठी'' या कविता, मात्र जबराच आहे. थोडा समय आहे, कुमार जावडेकरांचीही सुंदर कविता आहे. पटतच नाही, अजब. चुकलो म्हणेन मी तर सोकावतील सारे, चक्रपाणी चिटणीस. कविता कशी हवी अनिरुद्ध १९६९, चकवा, ओकार क-हाडे. तु असता तर, प्राजकता. आणि दिवाळी पहाट या कविता वाचनीय आनंद देतात.म्हणजे त्यांच्यामुळेच हा दिवाळी अंक आहे, असे क्षणभर वाटते. निर्भयतेच्या नभात, प्रदीप कुलकर्णी आणि उत्पल चंदावरच्या निमित्तमात्र आणि श्रावणसरी या शब्दरचनेच्या बाबतीतल्या नोंद घेण्यासारख्या कविता आहेत.
मात्र थेंबाचे निरोप, जयंता ५२, तनामनातुन दाटलेला, संतोष कुलकर्णी. मुकतता, हर्षल भडकमकर. श्रेयस, मुग्धा रिसबुड. प्रीत बावरी ,मुक्तछंदा. या कविता रसास्वादाच्या बाबतीत वाचकांना खिळवून ठेवतील का या बाबत मात्र आमच्या मनात शंका आहे.

त्यानंतर अनुभवात ''आक्का'' ही मिरा फाटकांचे व्यक्तिचित्र म्हणावे की अनुभव तेही सुरेखच झाले. लेखिकेने स्मरणातले प्रसंग सहीच रेखाटलेले आहेत, त्यातला चित्रपट थेटरातला -
''अगं, तू कशाला इतकं वाईट वाटून घेतीयस? रडू नको, गप बघू! गप." मग मात्र मला माझं रडू आवरावंच लागलं! '' अशा प्रसंगातुन आक्का विशेष लक्षार राहते, मात्र अशा लेखनात समारोप फार महत्त्वाचा असतो. शेवट वाचतांना वाचक हेलावला पाहिजे असा असावा लागतो, अशी एक साधारणता अपेक्षा असते, इथे मात्र तसे होत नाही. त्यामुळे वाचनातली मजा निघून जाते.
अक्कलदाढ आली तर, कुशाग्रांचा अनुभव छान झाला आहे. पण असे दात आणि डॉक्टरांचे अनेक प्रसंग वाचक वाचत असतात म्हणून या अनुभवांची खोली तितकीशी वाटत नाही. मात्र विनोदी पद्धतीने लिहित असल्यामुळे वाचकांची करमणूक होते.
दिघुकाका हे व्यकितीचित्र मात्र माधव कुलकर्णी यांनी कसदारपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात ते यशस्वी झाले आहेत असे वाटते.
माध्यमाची ताकद वाढवणार्‍या अनेक साधनांपैकी एक असलेले मी कॉश्चूम डिझायनरच आहे, डिझायनरची नव्या विषयाची ओळख चित्रपटातील विविध अनुभवासहीत अज्जुका यांनी मस्त करुन दिली आहे. वा-या पोलिसचौकीची. मी दादरकर, यांचा अनुभव आणि संकेतस्थळवर लेखन प्रसिद्ध केल्यानंतरच्या विविध भावना रोहिनी यांनी ''स्वगत'' मधून मस्त मांडलेले आहे. स्वाती दिनेश यांचे जर्मनीचे सरकारी अनुभवही छान झाले आहेत.
लेखांमधे, परसृष्टीचा शोध घेणारे वरदा वैद्य, यांचा लेख संदर्भासहीत झाल्याने एकदम क्लासवन झाला आहे. जरा लेखाची लांबी वाढल्यासारखे वाटते. अर्थात आवडणारा लेख असेल तर वाचक लांबीचा विचार थोडाच करतो.
जीवन जिज्ञासा, यांचे कवडसे पकडणारा कलावंत अंतोन चेकॉव्ह यांच्या कथांवर लिहिण्यात आलेला लेख मस्त आहे, चेकॉव्हची ओ़ळख सहीच करुन दिली आहे. रावसाहेबांच्या त्यांच्या ठारविक शैलीतील गीतकार कैफी आझमीची गाण्यांची ओळख झकास झाली आहे. आनंदघन यांची कोणत्याच काळात न संपणा-या दशावताराचा अर्थ भविष्यकाळात सोयीने घेतला तर ते महत्त्वाचे कसे आहे हे पटवून देणारा लेखही बरा उतरला आहे.
जगभर नावलौकिक असलेल्या समाजसेविका क्रिस्टिनाच्या कार्याची आणि तिच्या कामाची ओळख ममा टिना हा प्रदीप यांचा लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्टे वाटावा असा आहे.
घाटपांडे यांचा आवडता विषय फलजोतिष इथेही आहे, पण या प्रवाहात माधव रिसबूडांचे वैचारिक मंथन आणि त्यांच्याशी असलेल्या घरोब्याचे संबध त्यासाठी माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे, मात्र या लेखातून लेखकाची भुमिका स्पष्ट होत नाही असे वाटते.
प्रवास वर्णनात खीद्रापूरच्या शिवमंदिराचे वर्णन छान झाले आहे, प्रियाली यांचे प्रवासवर्णन स्वप्ननगरीच्या जादूनगरीत त्यांच्या इतर लेखनाप्रमाणे झकासच झाले आहे.
मुलाखतीत, मंगला गोडबोले यांची सुवर्णमयी यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे त्यांची साहित्यविषयक दृष्टीकोण समजण्यास वाचकांना नक्कीच आवडेल.त्या तुलनेत सुहास जगागिरदार यांची लांबलेली मुलाखत वाचायला कंटाळवाणी वाटते.
कथेच्या बाबतीत कोहम यांची गर्ता ही कथा दर्जेदार वाटली. जिद्द, प्रभाकर पेठकरांची लांबलेली कथाही मस्तच आहे, जज्जाची कोठी 'द जजेस हाऊस' या लघुकथेचं स्वैर रुपांतर दर्जेदार झाले आहे. विसुनानांची एक दिवाळी अशीही येते दर्जेदार झालेली आहेत. श्रावण मोडक यांचे झाड, अरुण वडूलकर यांचे बटाटा हाईट्स, जोरदार झाले आहे. एकूणच काय या दिवाळी अंकातल्या कथा या प्रकारांनी बाजी मारली आहे तर, त्याला हातभार लावला कविता प्रकारांनी. विनोदाचा अभाव नजरेत भरणारा आहे,बाकी..........संकेतस्थळावरचे वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेखनाचा संग्रह आहे. वाचक म्हणून आपल्याला लिहिणारे ते सुंदरच लिहितात, या भावनेने वाचायला काय हरकत आहे.
संपादक मंडळाची मात्र लेख निवडतांना दमछाक झाली असेल. नाकारलेल्या लेखकांच्या लेखनाच्या संबधी आता वर्षभर शिमगा चालेल. मात्र संपादकांनी लेखनाची केलेली निवड आणि त्यांच्यामुळेच अंकाचा दर्जा, सभ्य आणि सौम्य करण्यास मदत झाली असावी, मात्र नवीन ते काही देऊ शकले नाही हे अपयश लपवण्यासारखे नक्कीच नाही.

विसोबा खेचर

सगळीच संकेतस्थळं हल्ली दिवाळीअंक काढायला लागली आहेत. आपण पण एक होळीअंक काढू आणि होळीला प्रसिद्ध करू! किती बोंबलायचंय ते बोंबला तिच्यायला! :)

आणि हो, ज्यांना सहित्यातलं शष्पही कळत नाही अशीच मंडळी संपादक मंडळात नेमू! होऊ जाऊ दे मिसळपावची जोरदार होळी आणि होळी विशेषांक!

काय म्हणता? :)

तात्या.

>>सगळीच संकेतस्थळं हल्ली दिवाळीअंक काढायला लागली आहेत. आपण पण एक होळीअंक काढू आणि होळीला प्रसिद्ध करू! किती बोंबलायचंय ते बोंबला तिच्यायला! :)

कल्पना छान आहे !!! :)))))

>>ज्यांना सहित्यातलं शब्दही कळत नाही अशीच मंडळी संपादक मंडळात नेमू!
हा घ्या आमचा अर्जे, संपादक मंडळातील मुख्य संपादकपदासाठी !!!
माझ्या इतका क्वालीफाईड संपादक, मानधन देऊनही मिळणार नाही. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर

आमच्या मिसळपावच्या बिरुटेसाहेबांनी इतक्या बारकाईने आणि बर्‍याच लोकांच्या लेखनाला दिलेला प्रतिसाद खरोखरंच कौतुकास्पद आहे! हजारोंच्या संख्येत सदस्य असलेल्या खुद्द मनोगतावरदेखील एकाच व्यक्तिने इतक्या अल्पावधीत त्यांच्याच दिवाळी अंकातल्या एवढ्या समग्र साहित्याची जाहीर नोंद घेतलेली माझ्या पाहण्यात नाही!

अर्थात ही खासियत, ही रसिकता आमच्या अवघ्या दोनचार शेकड्यातल्या मिसळपावचीच! :)

बिरुटेसाहेब, मिसळपावला तुमचा अभिमान वाटतो! :)

तात्या.

अण्णा

हे मनोगत या स्थळावरच्या अंका विषयी असावे असे वाटते आहे.
चांगला वाटला अंक...
इतका काही फसलेला वगैरे वाटत नाही!
बरा आहे.

आजानुकर्ण

खरे आहे. दिवाळी अंक एकदम फसला आहे. माझा लेख नाकारल्यामुळे तर जास्तच! पण तुमच्या लेखातील खालील वाक्यांमधून तसे वाटत नाही. ;)

-(चहाटळ) आजानुकर्ण

ही कविता सुंदर झालेली' आहे
या कविता, मात्र जबराच आहे.
सुंदर कविता आहे.
कविता वाचनीय आनंद देतात
शब्दरचनेच्या बाबतीतल्या नोंद घेण्यासारख्या कविता आहेत.
अनुभव तेही सुरेखच झाले
ते यशस्वी झाले आहेत असे वाटते
मस्त मांडलेले आहे.
अनुभवही छान झाले आहेत.
क्लासवन झाला आहे.
लेख मस्त आहे
ओळख झकास झाली आहे.
प्रदीप यांचा लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्टे वाटावा असा आहे.
फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे,
झकासच झाले आहे.
वाचकांना नक्कीच आवडेल.
कथा दर्जेदार वाटली.
कथाही मस्तच आहे,
स्वैर रुपांतर दर्जेदार झाले आहे.
दर्जेदार झालेली आहेत.
कथा या प्रकारांनी बाजी मारली आहे

कितीही भिक्कार साहित्यकृती असली तरीही त्याच्यातल्या काही गुणांचे कौतुक करणे हे समिक्षकाला जमले पाहिजे , ही आमच्या गुरुंची शिकवण आहे !!! म्हणून कौतुकाच्या वाक्याची पेरणी या नवसमिक्षकाकडून झाली असेल !!! खोटं वाटत असेल तर विचारा, चित्रपटाचे समीक्षण करणा-या आपल्या गुरुंना !!! ;)

कोलबेर

खोटं वाटत असेल तर विचारा, चित्रपटाचे समीक्षण करणा-या आपल्या गुरुंना !!! ;)

बिरुटे सर,
हा टोला बाकी भारीच.. आता शिष्योत्तम काय म्हणतायत बघुया!!

आजानुकर्ण

इथे सगळ्यांना कळेल म्हणून चांदोबात वाचलेली एक बोधकथा सांगतो.

आंब्याच्या झाडाला सगळे जण दगड मारत असतात. म्हणून तो रडत रडत परमेश्वराकडे जातो आणि विचारतो मलाच का सगळे दगड मारतात?
परमेश्वर सांगतो, "अरे ज्यांना रसाळ, गोड फळे लागतात त्यांनाच लोक दगड मारतात. समोरच्या बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारत आहे का?"
आंबा बिचारा खूष होतो.

तात्पर्य सांगणे नलगे.

साहित्यकृती भिकार असली तर त्याला तसेच झोडणे आवश्यक असते असे माझे मत आहे.

उगीच हल्लीच्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये असते तसे हेडलाईन आकर्षक बनवून पुढे रात्रीचे जेवण सकाळी परतून वाढलेले असावे त्याप्रमाणे लेख नको. ;)

विसोबा खेचर

कर्णा,

साहित्यकृती भिकार असली तर त्याला तसेच झोडणे आवश्यक असते असे माझे मत आहे.

हे माझ्या मते बरोबर आहे, परंतु बिरुटेसाहेबांनी जे म्हटलं आहे,

कितीही भिक्कार साहित्यकृती असली तरीही त्याच्यातल्या काही गुणांचे कौतुक करणे हे समिक्षकाला जमले पाहिजे ,

तेही माझ्या मते बरोबर आहे. ओव्हरऑल साहित्यकृती जरी भिकार असली तरी त्यातल्या काही गुणांचे कौतुक करायला काय हरकत आहे? भिक्कार साहित्यकृतीतदेखील काही गूण असू शकतात ना? :)

आपला,
(देवगडातील काणे वकील!) तात्या.

आजानुकर्ण

हेडलाईन "एक फसलेला दिवाळीअंक" अशी असल्यामुळे काहीतरी दणदणीत वाचायला मिळणार अशी समजूत करून घेऊन आंघोळीला चाललो असताना टॉवेल, गरम पाणी वगैरे बाजूला ठेवून हा लेख वाचायला सुरुवात केली पण शेवटचे वाक्य वगळता हा लेख पाहिला तर तो मनोगत दिवाळी अंकाच्या गौरव विशेषांकाचा संपादकीय लेख असावा असे वाटले. शेवटी थंड पाण्याने आंघोळ करावी लागली.

वाचकांची अशी फसवणूक करणे योग्य आहे का?

असा लेख लिहिणे म्हणजे सचिन तेंडुलकर ९९ वर बाद झाल्यानंतर "एक फसलेली फलंदाजी" असा लेख लिहून त्यात सचिनने मस्त स्क्वेअर कट मारला, काय झकास पुल शॉट होता, कव्हर ड्राईव्ह तर अप्रतिम. पण त्याचे शतक पूर्ण न झाल्याने फलंदाजी फसली असे म्हणण्यासारखे आहे.

- आजानुकर्ण वेंगसरकर.

ज्या पद्धतीने या दिवाळी अंकासाठी गाजावाजा करुन साहित्य मागविल्या जात होते आणि मिळालेले साहित्य , असे नको तसे हवे.
पुर्व प्रसिद्ध झालेले साहित्य नको, त्यासंबधी किती किती चर्चा, आणि किती किती मार्गदर्शन झाले............म्हणून आम्हाला वाटले कधीच झाला नाही आणि भविष्यात पुढेही होणार नाही, असा दिवाळी अंक निघतो की काय ? म्हणून, त्या पार्श्वभुमीवरही त्याचे फसलेलेपण आमच्या डोळ्यात अधिक भरले !

गौरव विशेषांकाचा संपादकीय लेख असावा असे वाटले.

खरे तर आपला पॉझीटीव्ह ऍटीट्युड आम्हाला फार आवडला ! आणि आमचा लेख तसाच असता तर
मिसळपाववर आज अस्वस्थपणे फिरणारे, अण्णांचे डोळे आमचा लेख वाचल्यावर असे भरुन आले असते का ? :)

अवांतर ;) आमच्या लेखाबाबत आपण फार मनाला लाऊन घेऊ नये ! आपले परत आलेले लेख तसेच सांभाळून ठेवा. आम्ही पुढील वर्षी असाच गाजावाजा करुन एक दिवाळी अंक काढणार आहोत त्याच्यात नक्की टाकू !!!:) ( ह. घे.)

फिरकीपटू
प्रा.डॉ. शेन वॉ..

विसोबा खेचर

म्हणून आम्हाला वाटले कधीच झाला नाही आणि भविष्यात पुढेही होणार नाही, असा दिवाळी अंक निघतो की काय ?

बिरुटेशेठ, हल्ली तुम्ही औरंगाबादेत असता परंतु मूळचे तुम्ही कोकणातले का हो? कारण वरील वाचून रत्नांग्रितल्या मधल्या आळीची आठवण झाली! :)

आपला,
(देवगडकर) तात्या बर्वा! :)

आजानुकर्ण

या पार्श्वभुमीवरही त्याचे फसलेलेपण आमच्या डोळ्यात अधिक भरले !

हो. पण अंक कुठे फसला आहे ते सांगा तरी. तुम्ही स्तुतीसुमने उधळून अंक फसला आहे असे म्हणता ते काही पटले नाही बॉ. नवीन म्हणजे नक्की काय एक्स्पेक्टेड होते अंकामध्ये जे यात नाही.?

खरे म्हणजे प्रत्येक लेखावर स्वतंत्र समीक्षा हवी. दोनचार ओळीत काम आटोपणे हे अगदीच सखाराम गटणेसारखे पंचनामा केल्यासारखे वाटते बॉ. ;)

- आजानुकर्ण हवालदार

पहिल्या उता-यात लिहीलेच आहे, दिवाळी अंकात काय असावे पण, मित्राने इतका आग्रह धरलाच आहे तर आणखी जरासा खूलासा. एकतर फसलेला आहे, म्हणून सर्वच लेखन टाकाऊ असते असे म्हणने योग्य नसते. काही तरी उत्तम लेखनाचाही विचार जसा असेल तसा स्विकारला पाहिजे. म्हणून आम्ही टाकलेली स्तुतीसुमने, तीही फार मुकतपणे उधळलेली नाही. दिवाळीअंकाचा जो एक ठरावीक साचा असतो त्यात हा उतरलेला आहे का ? छपाई करुन देण्यासाठी वेगळा आणि ऑनलाईन वाचकांसाठी वेगळा अशा स्वरुपात फरक पडत असतो. वेगवेगळ्या ब्लॉगवर विविध कथा, अनुभव असतात. म्हणून ते निवडतांना सार्वजनिक अनुभवापेक्षा वेगळे लेखन आहे का याचा अभाव इथे आम्हाला दिसतो.

१) आंतरजालीय दिवाळी अंक आहे, म्हणून जरा दृकश्राव्य माध्यमं वापरता आली असती.
२) विषयानुरुप सुंदर चित्रांची निवड करुन त्याची पखरण लेखांमधे परिणामकारक ठरु शकली असती.
३) व्यंगचित्रे, चुटकुले टाकता आली असती.
४) कथाप्रकारात वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळता आले असते.
५) विनोदी कथांची संख्या वाढवता आली असती.
६) एकांकिका, हाताळता आल्या असत्या./ विनोदी/गंभीर/सामाजिक ( अर्ध्या तासाच्या अभिनयासाठी लिहिल्या जातात तश्या)
७) दर्जेदार साहित्यिकांच्या( अजून तीनेक) मुलाखती न लांबणा-या टाकता आल्या असत्या.
८) संपादकाला आवडणा-या लेखनापेक्षा वाचकाला काय आवडेल याचा विचार करुन लेख टाकायला पाहिजे होते.
९) राजकीय,सामाजिक, अध्यात्मिक, संगणकीय तंत्र, भ्रमनध्वनी, यावर लेख आणि याच विषयावर विडंबनात्मक लेखन टाकता आले असते.
१०)तांत्रिक बाबतीत नजरेत भरेल असे बॅक्ग्राउंड,पेजेस आणि लक्षवेधी शब्दाचे फाँट्सचा वापर करता असता,
:) वरील सर्व विषयांचा अभाव या दिवाळी अंकात दिसतो आणि आस्वादाच्या पातळीवर काही लेखन मात्र उतरतच नाही, त्याचा समाचार आम्ही योग्य ठिकाणी घेतलाच आहे, या अभावामुळे हा दिवाळी अंक आम्हाला फसलेलाच वाटतो.
या दिवाळी अंकातले अनेक लेखनाचे उतारे समीक्षण करतांना टाकता आले असते, साधक बाधक चर्चा करता आली असती. पण आमचे समीक्षण न राहता मीनी दिवाळी अंक झाला असता म्हणून ते टाळले आहे. पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो ) तेव्हा लेखन अनुमतीच्या प्रतिक्षा करणा-या सदस्यांच्या, संपादित करणा-या संपादकाच्या दिवाळीअंकाचा, अधिक परिपक्व समीक्षकाच्या भुमिकेत त्याचा साधक बाधक समाचार, अनेक उता-या, संदर्भासहीत आम्ही नक्कीच घेऊ!!!

विसोबा खेचर

बिरुटेसाहेबांनी मांडलेले दहाही मुद्दे पटण्याजोगे आहेत.

पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो )

हा हा हा! मला तर तीच शक्यता अधिक वाटते! :) च्यामारी या कर्णाला त्या थोर मनोगताचे आणि त्यांच्या थोर दिवाळीअंकाचे भारीच कवतिक दिसते आहे! :)

चलो, कोई बात नही...:)

तात्या.

पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो )

आम्ही मागील वर्षी केलेला अंदाज अगदी बरोबर ठरला. असो...

आमच्या मित्राने नुकतीच दिवाळी अंकासाठी संपादकपदाची सुत्रे हातात घेतल्याची बातमी आहे, अशात आमच्या भेटी-गाठी नसल्यामुळे इथेच अभिनंदन करतो. !!! :)

वेळ मिळाला तर.... आणखी एका ऑनलाइन अंकाच्या समीक्षेसाठी...समिक्षेची मुलतत्त्वे या बरोबर आणखी काही पुस्तके वाचावे लागतील? यासाठी कोणी मार्गदर्शन करेल का ? संपादक आणि इतर वैचारिक मारामार्‍या हा आमच्या समीक्षेचा विषय नाही, हे चाणाक्ष वाचकांना सांगण्याची गरज नाही.

विसोबा खेचर

आम्ही मागील वर्षी केलेला अंदाज अगदी बरोबर ठरला. असो...

हम्म! शक्यता आहे! :)

असो, आम्ही आमची रौशनी राखून ठेवली आहे. आम्ही ती दिवाळीतच प्रसिद्ध करू असे म्हणतो! :)

तात्या.

आम्ही आमची रौशनी राखून ठेवली आहे. आम्ही ती दिवाळीतच प्रसिद्ध करू असे म्हणतो!

व्वा व्वा क्या बात है ! रौशनी दिवाळीतच येऊ द्या.
रौशनीने च्या लेखाने दिवाळी मस्त जाणार असे दिसते :)

अवांतर : सहावा वेतन आयोग लागु झाला तर ( नाही झाला तरी ) मिपाच्या काही उत्तम लेखांचे संपादन करुन एक छापील अंक काढला पाहिजे असा विचार मनात घोळत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर

बिरुटे सर,
अंक चाळताना घाटपांडे काकांचा माधव रिसबुडांवरील भारावुन टाकणारा लेख वाचला. मलातरी तो सर्वात जास्त आवडला. एका जबरदस्त विचारवंताची काय सुरेख ओळख करून दिली आहे. प्रसिद्धीच्या झोताबाहेर असणार्‍या ह्या विचारवंतावर इतका सुंदर लेख लिहून घाटपांडे काकांनी त्यांना आदरांजली च वाहीली आहे. ब्रावो!!

घाटपांडे यांचा आवडता विषय फलजोतिष इथेही आहे, पण या प्रवाहात माधव रिसबूडांचे वैचारिक मंथन आणि त्यांच्याशी असलेल्या घरोब्याचे संबध त्यासाठी माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे, मात्र या लेखातून लेखकाची भुमिका स्पष्ट होत नाही असे वाटते.

बस का कोलबेर सेठ,
आम्ही या पद्धतीने त्या लेखाची नोंद घेतली आहे. घाटपांडे साहेबांच्या लेखाची नोंद आम्ही कसे विसरु !!!
(माधवरावांनी हा शेवटचा लेख असे म्हणावे आणि घाटपांडेसाहेबांना त्याची झालेली सवय..... आणि एक दिवस खरेच शेवटचा असलेला लेख त्याची नोंद विसरणे शक्यच नाही. )
वरवर चाळला की काय आमचा लेख :)

कोलबेर

लिहिल्यावर लक्षात आलं... चूक सुधारली आहे!

प्रमोद देव

डॉक्टरसाहेब एकदम गुगली टाकलात असे वाटतंय!

संकेतस्थळावरील लेखनाचा, एक फसलेला दिवाळी अंक !!!

शीर्षकाचे प्रतिबिंब मात्र आपल्या लेखात दिसत नाहीये.
पण तुमच्या वाचनाच्या वेगाला मात्र दाद द्यायला हवेय. किती झटपट अंकाचे वाचन केलेत आणि लगेच समीक्षाही पेश केलीत. मान गये उस्ताद! जियो.

प्राजु

डॉ. साहेब,
आपल्या समिक्षणातून मला पु.लं.ची आठवण झाली.. म्हणजे..
"आमचा बेमट्या ना अगदी हुश्शार हो... जरा बावळट आहे म्हणून काय झालं??" अशा प्रकारचे आपले समिक्षण वाटते.
"कविता चांगल्या.. लेख वाचनीय.... मुलाखत दर्जेदार्....पण अंक फसलाय.."..
नक्की कुठे फसलाय हे सांगाल का?

- प्राजु.

असे टायटल ही "इष्टापत्ती" असते. ते जर वेगळे दिले असते तर लोकांचे लक्ष वेधले असते का? "तुला ती भानगड समजली का?" " एक लफडा झाला राव?" अशा संवादाने सुरवात केली कि समोरचा माणुस कान टवकारुन ऐकायला तयार होतो. डॉ साहेब आपले हुशार आहेत. अजानुकर्णाने हेच वेगळ्या भाषेत सांगितले आहेत. डॉ साहेव आपण लिहित रहा. आपल्या लिखाणावर प्रेम करणारी माणसे हीच आहेत.
प्रकाश घाटपांडे

एकवाचक

... हे असंच परिक्षण असतं का? खरं म्हणजे हेच शिर्षक असतं का असं विचारायला हवं कारण लेखात तर गुणवर्णन आहे.

कारण निव्वळ मनोगतावरचा आहे म्हणून जरा जास्त धारदार टिका केली कि काय असं वाटतं !! वर तुम्ही म्हंटलंय, "......म्हणून आम्ही टाकलेली स्तुतीसुमने, तीही फार मुकतपणे उधळलेली नाही.........." - फार चांगलं म्हंटलेलं कोणाला वाटू नये म्हणून तुमचा हा 'वैधानिक ईशारा' मजेदार वाटला :-)

अभावाबद्दलचे तुमचे १० मुद्दे वाचले. त्याबद्दल थोडं.
- बरेचसे 'अमुक तमुक जास्त हवं' असे आहेत: कुठल्याहि अंकाला हे मुद्दे लागू होतील, नाही का? जास्ती कंटेन्ट, जास्ती विषय, अजून वैविध्य वगैरे ...
- पहीला मुद्दा: 'ई-दिवाळी अंक' असता तर अगदी ग्राह्य आहे तुमचा मुद्दा. पण हा तसा नाही. हा मी प्रिन्ट करून वाटेत वाचू शकतो.
- शेवटचा मुद्दा: हे सुध्दा करावं तितकं थोडं असं असतं. हां, आता अगदिच टाकाउ असता तर गोष्ट वेगळी. पण हा तसा नक्किच नाहिये.

मिपा आपल्या परीने समृध्द आहे. मनोगतचं काहि विचकतं म्हणून नव्हे. असो. 'मनोगतचं अमुक तमुक कसं फसलं' या विचारसरणीतून मिपाच्या कधी सुटका होणार कोणास ठाऊक. मनोगताला 'मोठं भावंड' असं तात्यासुध्दा म्हणतो, बाकिच्याच मंडळीना अधनं मधनं एखादा दगड भिरकावल्याशिवाय राहावत नाहि!!

- मिपाचा प्रेमी, एकवाचक.

प्रिय वाचक,
आपल्या प्रतिसादास उपप्रतिसाद देण्यास जरा उशीर होत आहे, दिलगीरी व्यक्त करतो.

मनोगताचा नसता तर ....

आपला प्रश्न अगदी योग्य आहे, गेले वर्षभर या आणि अनेक प्रश्नांनी आमचे व्य. नि भरुन गेले. एका प्रा.डॉ ला ज्यांच्याकडे लोक बुद्धीवादी वगैरे म्हणून पाहतात ( स्वतः प्रा.डॉ. तसे मानत नाहीत) त्यांना असे अजे-दुजे करणे शोभत नाही, त्यांनी तसे करु नये. याच्याशी सहमत आहे. :)

पण या प्रा.डॉ. च्या आवरणाखाली एक 'दिलीप बिरुटे' नावाचा व्यक्ती वावरतो त्याचे स्वतःचे रुप राग,लोभ,मोद, मोह, मत्सराने भरलेले आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचे प्रेम वाटू शकते तसे ते एखाद्याचा तितकाच द्वेष करत असतील. त्याबरोबर त्यांना लेखन अनुमती धोरणाचा , शिष्ट लोकांचा प्रचंड राग येतो. त्यामुळे त्याच अंगाने त्यांचे परिक्षण बहरत जाते :)

अहो, अशात इकडच्या एका वाचकाने तिकडे लेख टाकला. तसे त्याला दोनच्या वर प्रतिसाद येत नाही तरी त्यांना तिथे लेखन टाकण्याची लय हौस. त्याला तिथल्या प्रशासकाने काय सुचना द्यावी. 'आपले लेखन शुद्धलेखनचिकित्सेत तपासून टाकावे.'

अशा गोष्टीचा आम्हाला लय राग येतो. तसेच, वेगवेगळे आयडी धारण करुन एखाद्या संस्थळावर गोंधळ घालण्यापेक्षा किंवा एखादा ब्लॉगवर सदस्यांवर चिखलफेक करण्यापेक्षा आपला राग व्यक्त करण्याचा योग्य नसेल पण हा चांगला मार्ग नाही का ? ;)

-दिलीप बिरुटे

नंदा प्रधान

अहो राहू द्या ना सर आता जाऊ द्या....

>>तसेच, वेगवेगळे आयडी धारण करुन एखाद्या संस्थळावर गोंधळ घालण्यापेक्षा

हा टोला डायरेक्ट तात्याला का? त्या चिखलफेकू ब्लॉगवर आम्हाला हेच ज्ञान मिळाले बॉ!!

(ह्या स्थळावर एकच आयडी असलेला) नंदा

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

(ह्या स्थळावर एकच आयडी असलेला) नंदा

मीही !! द्या टाळी.

नव्हे यापुढेही जाऊन म्हणतो, की प्रत्येक स्थळावर प्रत्येकी एकच आय डी असलेला,

-- सर्किट

नंदा प्रधान

>>प्रत्येक स्थळावर प्रत्येकी एकच आय डी असलेला,

काय शेंड्या लावता राव?..तुमचे उपक्रमावर युयुत्सु आणि सर्किट असे (मिनिमम) दोन आयडॉ आहेत असे ऐकून आहे!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जुने जाणते, नंदाजी,

आपल्या ह्या प्रतिसादाने आमचा आपल्याविशयीचा आदर रसातळाला गेलेला आहे.

युयुत्सु हा आय डी हॅक झाला, तो बंद केला, आणि मगच आम्ही सर्किट झालो उपक्रमावर, हे तरी लक्षात घ्या.

तो युयुत्सु मी नव्हे, ही नोंद घ्यावी.

(स्वगतः शशांकला सांगितले होते, तो युयुत्सु हा आयडी खारीज कर म्हणून. संकेतस्थळचालकांच्या आळसामुळे आम्हाला शरमेने कितीदा मान खाली घालावी लागणार आहे, कुणास ठावूक.)

-- सर्किट

नंदा प्रधान

आमच्या माहिती प्रमाणे सर्किट हा आयडी आधी काढला होतात मग युयुत्सु. त्यामुळे युयुत्सु हॅक झाल्यावर सर्किट आयडी काढला हे लॉजीक चालत नाही. गणिती ना हो तुम्ही? आमच्या मनातील तुमचा आदर देखिल कणभरच कमी झाला हा!:)
आणि हो ते जाल-सर्वज्ञाचा 'आयडी हॅकिंग' वगैरे काय गौडबंगाल होतं त्यात न गेलेलंच बरं.. नाही का? ;)

(जुने जाणते) नंदाजी

जनोबा रेगे

संकेतस्थळचालकांच्या आळसामुळे आम्हाला शरमेने कितीदा मान खाली घालावी लागणार आहे, कुणास ठावूक.)

आणि तुमच्यामुळे किती स॑केतस्थळचालका॑ना मान खाली घालायला लागली आहे कुणास ठाऊक?

मारवा

If Moses had gone to Harvard Law School and spent three years working on the Hill, he would have written the Ten Commandments with three exceptions and a saving clause. - Charles Morgan

मुद्दई लाख बुरा चाहे क्या होता है ?
आखिर वही होता है जो मंजुर-ए-खुदा होता है !

रमेश भिडे

ह्ही ह्ही ह्ही.

सवय अम्मळ जुनी दिसते!