Welcome to misalpav.com
लेखक: लॉरी टांगटूंगकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एका आव्हानात्मक ऐतिहासिक घटनेवर बर्‍यापैकी सुटसुटीत लिहिले आहे. विषयाचा आवाकाच इतका मोठा आहे की तपशिलवार लिहायला गेले तर ग्रंथच बनेल अन थोडक्यात लिहिले तर त्रोटक वाटेल. पु.भा.प्र.

श्रीजो,मुवि,यशोधरा,प्यारे१,वल्ली,आदूबाळ,पक पक पक, लै लै धन्स :) पकपकशेठ, प्रतीक्षा कशी काय हो?? संमं एक लिन्क हुकली आहे तिकडे तेव्हडं बघा अन् https://lh5.googleusercontent.com/-SUj9u7EIc48/UJVy2abzyYI/AAAAAAAAArU/1xtb18Ppz6A/w334-h530/7.jpg लढाई पानिपतची

छान! या युद्धात बाबराच्या तोफखान्याने निर्णायक भूमिका बजावली तर. पानिपतच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्याला काही सरदारांच्या उतावळेपणामुळे प्रभावी भूमिका बजावता आली नव्हती.

तथ्यांसहित दिलेली सुटसुटित माहिती आवडली. थोडी वेगळी माहिती मजकडे आहे, ती देतो. बाबर भारतात आला तो फक्त दौलतखान - इब्राहिम लोदी ह्यांच्या कलहामुळे नाही. त्याला खुद्द मेवाडचा राणा सांगा (संग्रामसिंग) ह्यानेही आमंत्रित केले होते. राणा संगा ह्याचा प्लॅन सोपा होता. "माझे राज्य मेवाड आहे. अखिल राजपुतान्यातील(मेवाड, मारवाड, जोधपूर, अंबर्/जयपूर), अजमेर ह्यापैकी सर्वात प्रबळ राज्य माझे आहे. राजपुत आघाडीचे नेतृत्व मेवाड करु शकते.(जसे ग्रीक नगरराज्यांची आघाडी बनवून त्याचे नेतृत्व मॅसिडोन्याने केले अलेखांडर द गेट ह्याच्या काळात,तसेच.) . ह्याचे फायदे बरेच. सर्वच राज्यांशी लढाया करण्याचे काम नाही. मैत्री तह जे मान्य करतील त्यांच्याशी युती करावी, त्यांना सोबत घेउन विरोधकांना झोडपावे आणि एकत्रित राजपूत शक्ती पुन्हा एकदा पूर्वीसारखी उत्तर भारतीय मैदानात पसरून द्यावी. " ह्या व्हिजननुसार त्याचेही लक्ष दिल्ली-आग्रा ह्या महत्वाच्या आणि सुपीक प्रदेशकडे होते. त्याचे गणित साधे होते. "माझ्या राज्याचा विस्तार करुन साम्राज्य करायचे असेल तर आधी इब्राहिम लोदीचे राज्य पूर्ण जिंकून घ्यावे लागेल. पण हे एक्ट्याने करण्यापेक्षा alliance बनवावी. पश्चिम्-उत्तरेकडून बाबर व व दक्षिण पश्चिमेकडून मी लोदीवर हल्ला केला तर काम सोपे होइल. तसेही मंगोल वंश एका ठिकाणी राहून राज्य करण्यात उत्सुक नसतोच. लूट घेउन बाबर परत जाइल, तैमूरलंगाप्रमाणे!" असे त्याचे गणित. त्यामुळे, बाबराला "तुम्ही तिकडून हल्ला करा, आम्ही इकडून चढाई करतो लोदीच्या राज्यावर" असा निरोप राणा सांगाने पाठवला. पण प्रत्यक्षात जेव्हा बाबर पंजाबपर्यंत चालून आला, तेव्हा त्याचे इरादे वेगळेच असल्याचे, इथेच ठाण मांडून बसण्याचे असल्याचे मेवाडच्या लक्षात आले, नि पानिपत संग्राम होइपर्यंत त्यांनी प्रत्य्क्षात काहिच हालचाल केली नाही. ही सगळिच माहिती तुमच्या पुढील अंकात येण्याची शक्यता असल्याने इथे करड्या रंगात देत आहे.

खर सांगु? पानिपत हे नाव वाचुनच लेख वाचायला मन कचरत होतं. तरीही आख्यान बर्‍याच आधीपासुन सुरु करता आहात. आवडला अस अजिबात म्हणणार नाही पण माहीतीपूर्ण.