हम्म्म.! किनार्यापासून हजार नॉट खोल समुद्रात काय काय समस्या उद्भवतील सांगता येत नाही.
परंतु, हे कांही रुग्ण तुमच्या कौशल्याने वाचले असले तरी ह्या अवाढव्य शहरसदृष जहाजावर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना किनार्यावरील इस्पितळात तांतडीने पोहोचविण्याची व्यवस्था नसणे हे ही जबरदस्त धोकादायक वाटते आहे. वेळेत योग्य अशी वैद्यकिय सेवा नाही मिळाली तर एखादा रुग्ण दगाऊ शकतो किंवा जन्मभरासाठी अपंग होऊ शकतो.
बुणगे किंवा non combatant हे आर्मी/ नेव्ही/ एअर फोर्स कायद्याखाली येत नाहीत त्यामुळे युद्ध सुरु झाले तर ते आजी आजारी आहे किंवा आजोबा कंटाळले आहेत म्हणून पळून गेले तरी त्यांच्यावर वरील कायद्याखाली खटले भरत येत नहित.त्यांच्यावर सिव्हिल कायद्याने खटला होतो आणि त्यांना नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते.
सैनिक पळून गेला तर त्याचे ताबडतोब कोर्ट मार्शल होते आणि युद्ध स्थिती जाहीर झालेली( declared war) असेल तर याची शिक्षा फाशी आहे. आणि अन्यथा जन्मठेप किंवा १ वर्षे तुरुंगवास आहे. डॉक्टर हा वरील कायद्याखाली येतो.त्यामुळे डॉक्टर चे पण कोर्ट मार्शल होते. शिवाय डॉक्टर हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर हजर असतो त्याला सुद्धा बंदूक पिस्तूल आणि मशिनगन चालवण्याचे पूर्ण प्रशिक्षण घ्यावे लागते (हे मी स्वतः सुद्धा घेतले आहे). मला वाटते आपल्या शंकेचे निरसन झाले असावे
आपण हे जे आपले अनुभव मांडता आहात त्यामुळे आम्हा सर्वसामन्य माणसांना एरवी दृष्टीआड असणार्या जगात डोकावण्याची संधी मिळते याबाबत आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपली कुठल्याही अभिनिवेशाशिवाय ओघवत्या भाषेत वर्णन करण्याची शैली प्रशंसनीय आहे.
छान अनुभव.
>>> शेवटी मी OXFORD TEXT BOOK OF MEDICINE काढून त्यात शोधू लागलो
आपण प्री इंटरनेट एरा मध्ये जहाजावर होता त्यामुळे आपणास इंटरनेटवरील मदत मिळणे शक्य नव्हते हे समजू शकते पण जहाजावर काही इतर संपर्क यंत्रणादेखील असतात त्यांची मदत अशा संकटसमयी घेण्यात काय अडचण आली? किंवा अशी मदत घेता येत नव्हती काय? हे समजले तर बरे होईल.
त्या काळात फक्त उपग्रहाच्या टेलीफोन वरून संपर्क करत येत असे ते सुद्धा भरपूर कष्ट केल्यावर शिवाय हा फोन फक्त MCR( main compass room) म्हणजे जहाज जेथून चालवले जाते तेथे किंवा FLYCO( FLIGHT CONTROL OFFICE) येथे होता. तेंव्हा तेथून फोन करून माहिती मिळण्यापेक्षा तुमचे अज्ञान जगजाहीर होण्याची शक्यता जास्त होती. शिवाय आपल्या डॉक्टरला काही गोष्टी येत नाही हे सर्व सैनिकांना जाहीर होण्यात कोणाचाच फायदा नव्हता. १ ९ ९ ० साली आंतरजाल हे अगदी बाळबोध अवस्थेत होते आणी तुम्हाला पाहिजे तो माणूस तेंव्हा उपग्रह फोन वर उपलब्ध करणे हे कर्मकठीण होते.उगाच लुन्ग्यासुन्ग्याला निरोप देऊन त्याचे उत्तर मिळवण्याची वाट बघणे हे फारसे फायद्याचे झाले असते असे मला वाटले नाही.
या फोनचा एकाच फायदा झालेला मी पाहिला होता तो म्हणजे एका वायुदलाचा वैमानिक विक्रांत वर विमान घेऊन उतरला आणी काही वेळातच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचा संदेश आला.
तेंव्हा त्याच विमानात नौदलाच एक वैमानिक त्याला घेऊन परत गोव्याच्या दिशेने पाठविला होता.
आजचा जमाना किती पुढारला आहे हे आजच्या पिढीला कळणार नाही. माझा स्वतःचा एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाचा निकाल कळवण्यासाठी १ ९ ८ ४ साली मी पुण्याच्या केंद्रीय तारघरात ६ तास मुंबईला ट्रंक कॉल लावण्यासाठी ताटकळत बसलो होतो तरीही तो लागला नाहीच. हे सुद्धा तेंव्हा माझ्या घरी फोन असून. तेवढ्या वेळात मी मुम्बईला जाऊन परत सुद्धा आलो असतो.
असो.
वैद्यकीय ज्ञानाला निरिक्षण व तर्काची जोड असल्यावर प्राप्त परिस्थितीत कसा उपचार करता येतो हे आपल्या उदाहरणावरुन दिसून आले. त्या न्हाव्याला किती बर वाटल असेल याची कल्पना केली.
प्रतिक्रिया
बापरे....!
अतिशय रोचक अनुभव आहेत हे सर्व
डॉक्टर सुद्धा बुणग्यात (NON COMBATANT) येतात क?
डॉक्टर बुणग्यांत धरतात का?
माहीतीपद्दल धन्यवाद
*****
टंकन दोष
चित्र विचित्र!
आपण हे जे आपले अनुभव मांडता
लेखमालिका आवडली
विक्रांत वरील आयुष्य !
R.C.A. चे
तुम्ही ग्रेट आहात डॉक्टरसाहेब
नेहमी प्रमाणे, छान माहिती,
मस्त अनुभव..
छान अनुभव.
संकटसमयी मदत
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर
प्रत्युत्पन्नमतित्वाचे एक
अप्रतिम लेख !
वैद्यकीय ज्ञानाला निरिक्षण व