Welcome to misalpav.com
लेखक: १००मित्र | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

फक्त इथले ज्येष्ठ, जाणते सदस्य डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी केलेला उल्लेख खटकला, कदाचित आपण इथे नवीन असल्याने हे झालं असेल, पण (आपण एका बालकाचे पालक असल्याचा उल्लेख वर आलाय ते खरं असेल तर) डॉक्टरसाहेब आपल्यापेक्षा वयाने बरेच वडील असावेत असं वाटतं. असो, लेखातलं निरीक्षण वास्तविक असेल तर माझ्या माहितीत भरच पडली.

गैरसमज नसावा सौमित्र, माझा पहिलीपासून(लंगोटी यार) चा शाळेतील मित्र आहे. तेंव्हा त्याने मला अहो म्हटले तर ते कानाला चांगले वाटणार नाही. आणि तुम्ही म्हणता तेवढा मी ज्येष्ठ नाही.

रेवती, तुमची पोस्ट वाचायच्या आधी कळलं, की , सुबोध नी उत्तर दिलंय. पण तुम्ही हे सांगितल्याबद्दल- निक्षून - अनेक धन्यवाद.

अगदी खरंय, बहुगुणी. चूक झालीच. डॉक्टरसाहेब, माझा एक डॉक्टर मित्र आहे, ह्याच नावाचा . चुकून बोलता, बोलता, सॉरी, लिहिता-लिहिता तोल कधी गेला कळलंच नाही. अर्थात हे माझ्या कृतीचं अजिबात जस्टिफिकेशन नाही. तरी पुन्हा एकदा, माफ करावे. बाय द वे, आपण डोक्टरसाहेब, मुलुंड पूर्व चे तर नाहीत ना ?

>>डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त पैसे खिशात आले की बिस्लरीने ** धुणे सुरू होते असे आमचे मत आहे. -- मामु... बोलेतो... तु सच्चीमे डॉक्टर है रे. अर्धवटराव

शाळेच्या सहलीबरोबर पालक आम्हीबी पहिल्यांदाच ऐकून राह्यलो. बाकी, बीसलरीनं आंघोळ, बिसलीनं अमुक अमुक ध्वायच्या पद्धती, वगैरे हे सर्व माहितीपूर्ण आहे. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

अहो मीच अठराव्या वर्षी लष्कराच्या भाकर्या भाजायला घराच्या बाहेर पडलो त्यामुळे भटक्या आणि विमुक्त जमातीत राहून २३ वर्षांनी मुंबईत परत आलो. त्यामुळे असे बरेच शाळा कॉलेज मधील मित्र कुठे ना कुठे भेटतात.

उलट्या होऊ नयेत म्हणून गोळ्या घेण्यामधे खरंच काय वाईट आहे? माझं सगळं लहानपण असं काढलंय माझ्या बिचाऱ्या आईबाबांनी. सर्व बसप्रवास. प्रवासाचा एक दिवस असा आठवत नाही की मी बॊक बॊक करून कपडे खराब केले नाहीत, मुलीला उलटी होतेय बस थांबवा असा पुकारा माझ्यासाठी करावा लागला नाही. आधी ती पोटात ढवळण सुरू होते. दुनिया हास्यविनोद करत असते आणि आपले तोंड बिघडलेले. जाम चिडचिड. मग उबळ आल्यावर हातात असेल तर प्लॆस्टिकच्या पिशवीत ओकायचे आणि पुढच्या वेळेला बस थांबेतो ओकरे तोंड तसेच, ती पिशवी हातात असे बसून रहायचे. तो भीषण वास. सगळेजण आपल्याकडे बघणार. कुणी काही म्हणलं नाही तरी विनाकारण आपल्याला गिल्टी वाटणार... शी भीषण. जेव्हा पहिल्यांदा ती एवोमिन घ्यायला परवानगी मिळाली आणि शाळेच्या ट्रिपला मी ती घेतली. ती ट्रिप अविस्मरणीय होती माझ्यासाठी. पहिल्यांदाच न ढवळता, बसमधे मैत्रिणींबरोबर दंगामस्ती खिदळाखिदळी करत प्रवास केला होता. काय सुटका झाल्यासारखे झाले होते. :)

उलट्या होऊ नयेत म्हणून अशा वेळी गोळ्या घेण्यात काहीच चूक नाही. खरंतर वैद्यक शास्त्राचा मूळ हेतू हा सर्वसामान्य माणसाचे आयुष्य कष्ट रहित आणि सुकर करणे हेच आहे. मी कित्येकदा तरुण मुलीना पाळीच्या वेळेस अतिशय त्रास सोसताना पाहतो कारण उगाच औषधे घ्यायची नाहीत हा पालकांचा दुराग्रह असतो.थोडासा त्रास सहन करणे इतपत ठीक आहे पण अंथरुणाला खिळवून ठेवणे आणि गोळ्या न घेणे यात काय साध्य होते कोण जाणे ?