Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

परचक्र? हं! लंपनला जिलबीची आशा लावत बाजारभर नुसतेच फिरवून आणणारे ते गृहस्थ,(कुणीतरी अण्णा ?) :-( आठवले. ती गोष्ट आठवली पूर्ण!

तुझ्या कथांमध्ये एक काहीतरी किमया आहे. नेमकं काय आवडलं ते शब्दात सांगता येत नाही इतकं सटल आहे. पण हे साधेसे प्रसंग नक्कीच कुठेतरी/कधीतरी अनुभवलेले असतात आणि ते अधिक आवडून, स्पर्शून जातात. लिहीत रहा!

मला तर प्रत्येक वेळी काय प्रतिसादात लिहायचे याचाच प्रश्न पडतो.. उगाच तेच तेच लिहिल्याने आपलेच शब्ददारिद्र्य उघडे पडायचे !

त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली. हे आठ शब्द एका वेगळ्याच मनःस्थितीत भिरकावतात... आत्या आणि तिच्या पोरांना चांगलंच झोडपून काढायला पाहिजे असं वाटतं. साध्या आणि मोजक्याच शब्दात खूप काही सांगणार्‍यांचा नेहमीच हेवा वाटत आला आहे. शतशब्दकथा सांगण्यात एकदम शिरोमणी आहात, अतिवास !

तुमच्या शतशब्दकथेतलं नेमकं काय आवडतं, सांगता येत नाही.. पण प्रत्येक कथेत तुम्ही कथा-नायिका तिच्या भावनांसकट हुबेहूब डोळ्यांसमोर उभी करता.. मागे एकदा बोललो होतो तेच पुन्हा, "लोक वाडगंभर लिहून जे सांगू शकत नाही, ते तुम्ही मोजक्या (अक्षरशः)शब्दांत सांगता.."

ही शतशब्दकथा पण आवडली. 'हवे ते' मिळाले तरी 'हवे तेंव्हा' आणि 'हव्या त्या पध्दतीने' मिळतंच असं नाही.मोठ्यांना आपण दुखावले गेलोय हे स्पष्ट कळतं तरी, लहानग्यांना ते न कळता सुध्दा त्याला रिअ‍ॅक्ट कसं व्हायचं ते माहीत असतं ! तसे साम्य काहीच नाही पण गविसाहेबांचे "आईसक्रीमवाले गंदे अंकल" नंतर लागोपाठ "बटाटा भाजी" वाचताना काहीतरी जाणवलं..क्षीण का असेना बहूदा "अंडरकरंट" का काहीसे म्हणतात तो एकच असावा !

सुंदर कथा. या गोष्ट सांगणार्‍या लहान मुलीचे निष्पाप आणि हळ्वं मन नेहमीच प्रभावीपणे दिसतं तुमच्या लेखनात.