Welcome to misalpav.com
लेखक: मिसळलेला काव्यप्रेमी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

व्वा!! अतिशय सुंदर मुक्तक लिहलंय. सध्या अरूणा ढेरेंच कृष्णकिनारा वाचतोय. राधा, कुंती आणि द्रौपदी! कृष्णाच्या आयुष्यातील तीन महत्वाच्या स्त्रिया आणि त्यांना 'कळालेला' कृष्ण!

द्रौपदी वस्त्रहरण हा एकमेव प्रसंग मला नेहमी कोड्यात टाकत आला कि जिथे कृष्णाने अतिशय डॉमिनेटिंग पध्दतिने त्याचे देवत्व सिध्द केले. कारण हाच प्रसंग असा आहे ज्याने त्याच्या बालपणिच्या व्रात्यपणासंबंधी काहि कालाने उदभवु शकेल अशा वादांवर पांघरुण घातलेच, पण बाहुबल, वैचारीक हुशारी, कुटपणा, तत्ववेत्तेपणा यापलिकडील अचाट सामर्थ्याचे पुरुषांना धडकी भरवणारे प्रदर्शन ते हि होम पिच व एकांत नसताना करुन भक्तिप्रेममार्गे जाणार्‍या स्त्रियांच्या गळ्यातला ताइत बनवले. माझ्यापुरते विचार केल्यास, हा प्रसंग नसता तर बहुदा श्रीकृष्णाच्या असामान्यत्वावर पराकोटीच्या शंका निर्माण होतात*, भलेहि तो एक महान योध्दा, सर्वोतकृष्ट तत्ववेत्ता, हाडाचा राजकारणी व जाणता राजा होता. पण अल्टिमेट देवत्वाच निसंदिग्ध प्रदर्शन फक्त द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगातच. *हो त्याचे गोकुळातिल सार्वजनिक चमत्कार माहित आहेत पण त्याबाबतही त्याला एक "माणुस" या पातळिवर आणायला काहि तर्क सहजी लावता येतात.

जिथे कृष्णाने अतिशय डॉमिनेटिंग पध्दतिने त्याचे देवत्व सिध्द केले
हाच प्रसंग भांडारकरच्या संशोधित प्रतीमध्ये काढून टाकला आहे. विकर्ण आणि विदुराने केलेला हस्तक्षेप, भीमार्जुनांच्या कौरव-कर्ण वधाच्या प्रतिज्ञा ऐकून सारासार विचार करून धृतराष्ट्र वस्त्रहरणाचा प्रसंग थांबवून द्रौपदीला तीन वर देण्यास प्रवृत्त होतो. कृष्णाने द्रौपदीला सोडवले नाही या घटनेला पुढे वनपर्वातही आधार आहे. वनवासात पांडवांना भेटायला कृष्ण जातो तेव्हा वस्त्रहरणाची संपूर्ण हकिकत द्रौपदी कृष्णाला सांगते यात ती कृष्णानेच वस्त्रे पुरवून तिचे लज्जारक्षण केले याचा उल्लेख कुठेही करत नाही. याउप्पर कृष्ण तिला सांगतो की ह्यावेळी तो द्वारकेत नसून शाल्वाच्या सौभ नगरीचा नाश करण्यासाठी गेला असल्याने त्याला ही घटना समजली नाही नंतर सात्यकीकडून हस्तिनापुराचा समग्र वृत्तांत कळल्याबरोबर तो पांडवांना भेटण्यासाठी वनात आला.

हाच प्रसंग भांडारकरच्या संशोधित प्रतीमध्ये काढून टाकला आहे
नक्कि कोणति प्रत व्यासांचे मुळ "महाकाव्य" की आणखि काही ? तीन वर कोणते व त्यातुन काय मागितले ? चला म्हण़जे कृष्ण संकटसमयि धावुन आला न्हवता तर ? क्या बात है :)
कृष्णाने द्रौपदीला सोडवले नाही या घटनेला पुढे वनपर्वातही आधार आहे.
असुदे असुदे. चांगलच आहे :). फक्त सामान्य मानवाचा विचार केल्यास. कोणतिही स्त्रिलिंगी व्यक्ति तिला पुरुषांची प्रत्यक्षप्रत्यक्ष मदत नसेल तर पुरुषांवर अंकुशधारी सत्ता गाजवु शकत नाही, त्यांचे निर्णय फिरवु शकत नाही*. विषेशतः जेव्हां त्यांच्या विरोधात निर्णय अमलात आणायचा असेल तर. शारिरीक हल्ला सोडा, शाब्दिक झटापटही ती एकटी तरु शकणार नाही. तर मग ज्या स्त्रिकडुन सणसणित अपमान होउन पुरुषि अहंकार कमालिचा डिवचला गेल्याने संतापलेला सैतान, साक्षात बापजाद्यांसमोर रडिचा डाव खेळुन जिंकतात व त्याच्या व बलाच्या विजयोन्मादात असताना, त्या अबलेबाबत अचानक थोरामोठ्यांचे फंडे ऐकुन थंड पडतात... हेच मुळात पटत नाही. असला कठिण डाव साधणे निलकांत सोडुन अन्य कोणाला प्रॅक्टिकली शक्यच वाटत नाही. म्हणूनच ह्या प्रसंगाचे मोठे कोडे आहे. की कृष्ण नसेल तर नक्कि घडलं तरी काय ?

नक्कि कोणति प्रत व्यासांचे मुळ "महाकाव्य" की आणखि काही ?
प्रक्षिप्त असलेले भाग गाळून महाभारताची जास्तीत जास्त अचूक प्रत. याबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.
तीन वर कोणते व त्यातुन काय मागितले ?
पहिला वराने द्रौपदीने युधिष्ठिराला दास्यत्वातून मुक्त केले, दुसर्‍या वराने इतर चारही पांडवांना त्यांच्या रथ आणि शस्त्रांसह दास्यत्वातून मुक्त केले. धृतराष्ट्र अजूनही तिसरा वर देत असताना द्रौपदीने तो स्वीकारला नाही आणि मला क्षत्रिय स्त्रीस तिसरा वर मागणे हे अनुचित असून दास्यमुक्त पांडव आपल्या कर्मांनेच सर्व प्राप्त करून घेतील असे म्हटले. याउप्परी धृतराष्ट्राने स्वतःच पांडवांना त्यांचे धन,राज्य सर्व काही परत दिले.
त्या अबलेबाबत अचानक थोरामोठ्यांचे फंडे ऐकुन थंड पडतात.
विदुर, विकर्ण, भीष्माचे कोणीही ऐकत नाहीत. पण भीमार्जुनांच्या रक्तपाताच्या भीषण प्रतिज्ञा ऐकून भयभीत झालेला राजा धृतराष्ट्र निर्णायक हस्तक्षेप करतो. बाकी नक्की काय घडले ते वर आलेच आहे. वस्त्रहरणाचा प्रसंग अर्ध्यावरच थांबवला गेला. पण जी काही मानहानी व्हायची ती झालीच व पुढील युद्धाची बीजे पेरली गेली. हाती आलेला डाव मोडल्यामुळे निराश झालेल्या दुर्योधन, शकुनीने बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास असा एकच पण लावून अनुद्युत खेळण्यासाठी इन्द्रप्रस्थी निघालेल्या पांडवांना अर्ध्या वाटेवरूनच परत बोलावले.

हे श्रीक्रुष्णाने शिश्टाई साठी गेले असताना,जेव्हा दुर्योधनाने या गवळ्याला पक्डुन कैद करा असे सन्गितले तेव्हा होते. असे वाटते.

मला सगळीच कविता आवडली होती. तेंव्हाही अन आत्ताही. तरीही विवेचन आवडल. स्वतःचा विचार विस्तृतपणे लिहिणे, हे ही एक आव्हानच.

सुंदर काव्यमनोगताची सुंदर उकल... सर्व प्राचीन साहित्य काव्यातच लिहिले जात होते कारण लिखित पुस्तके येण्याच्या अगोदरच्या काळात केवळ मौखीक परंपरेने इतिहास पुढच्या पिढीकडे जाणे शक्य होते. छंदबद्ध काव्यरचमुळे मूळ रचना लक्षात ठेवणे सोपे होते आणी त्यांत भेसळ करणे (असे झालेच नाही असे नाही, पण) कठीण होत असे. महाभारत हे धार्मिक काव्यापेक्षा जास्त इतिहासाच्या धाटणिने लिहिलेले आहे. कारण त्यांतले वर्णन "जसे झाले तसे" आहे... धार्मिक लेखनासारखे कोणतिही व्यक्तीरेखा १००% चांगली किंवा १००% वाईट रंगवलेली नाही. याविरुद्ध रामायण हे धार्मिक काव्याच्या पठडीतले आहे... त्यांत रामाच्या प्रत्येक गोष्टीचे चांगली म्हणूनच समर्थन आहे... मग ते पाठिमागून बाण मारून केलेला वालीवध असो अथवा कोण्या एका परिटाच्या बडबडीमुळे केलेला सितेचा त्याग असो. कृष्णाला त्याच्या जीवनकाळात (महाभारतातील त्याच्या पात्राला) देवत्व बहाल केलेले नाही. मात्र एक असामान्य कर्तृत्वाचा मानव म्हणून त्याचा हस्तीनापूर ते द्वारका या राजघाराण्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित राजेरजवाड्यांवर प्रभाव नक्कीच होता. पण त्यालाही स्वतःच्या राज्याचे आणि स्वतःच्या मोठेपणाचे रक्षण करण्यासाठी जन्मभर माणसासारखा लढा द्यावाच लागला... हे काम त्याने कोण्या एका दैवी चमत्काराने चुटकीसरशी केले असे महाभारतात तरी नाही. आयुष्याच्या शेवटास तर तो स्वकियांच्या कलहालाही आवरू शकला नाही. मात्र त्याच्या मृत्युनंतर मात्र ज्यांनी त्याला आयुष्यभर विरोध केला त्याच लोकांनी देवत्व बहाल करून त्याच्या दैवी चमत्काराच्या कहाण्या लिहायला सुरुवात केली ! कृष्ण मला आपल्या कर्तृत्वाने असामान्यत्व कमावलेला एक माणूस म्हणून--- नराचा नारायण कसा बनू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून--- निश्चितच आदरणिय वाटतो !

>>>कृष्ण मला आपल्या कर्तृत्वाने असामान्यत्व कमावलेला एक माणूस म्हणून--- नराचा नारायण कसा बनू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून--- निश्चितच आदरणिय वाटतो !>>>

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥ यावर अधिक इथे :http://vedabase.net/bg/7/3/en1

कृष्ण १ ते ४ या कविता (खास करुन २) फारच आवडल्या होत्या. पण त्याच्या सुंदर गूढ अर्थाला तसेच राहू द्यायचे होते. ते संपूर्णपणे उलगडून सांगितल्याने त्याविषयीचे आकर्षण कमी झाले, असे मला वाटते. ग्रेसनी जर त्यांच्या कविता स्पष्ट करुन सांगितल्या असत्या तर त्यांचे वलय कमी झाले असते. बाकी तुम्ही लिहिलेलाच अर्थ बहुतांशाने जाणवला होता.

कविता आवडली, विवेचनही. बाकी 'महाभारत' हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहील इतके त्याचे सामर्थ्य नक्कीच आहे. आता मीरा हे असेच एक वादग्रस्त पात्र, लोक वाद घालतात म्हणून ते व्यक्तिचित्र वादग्रस्त होत नाही, लोक वादग्रस्त असतात :-)

लोक वाद घालतात म्हणून ते व्यक्तिचित्र वादग्रस्त होत नाही, लोक वादग्रस्त असतात.
ताई, दंडवत स्विकारावा.. ह्याला म्हणतात भाषाचातुर्य..

कविता आवडली... मला मात्र 'रुक्मिणी' व्हावेसे वाटते. विश्वातील सर्वोत्तम, सर्वेश्रेष्ठ आणि सर्वाधिक यशस्वी अशा पुरुषोत्तम द्वारकाधीशाची 'सहधर्मचारिणी' बनावेसे वाटते. एकवेळ राधा-मीरा बनणे सोपे, पण कॄष्ण अन्तर बाह्य फक्त रुक्मिणीलाच समजला असावा

हेच तर कृष्णाचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं 'ये सिर्फ मेरा है' वाटायला लावायला आवश्यक सगळे गुण,पुरावे नि प्रसंग असणारा पूर्णावतार नि तरीही प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचा. अवांतर असावं कदाचित : आकर्षति इति कृष्णः (सगळ्यांना आकर्षून घेणारा. नि त्याबरोबर विभूतीयोग वाचल्यावर जे जे आकर्षक नि स्वतःकडं खेचून घेणारे ते ते कृष्णाची/ त्या तत्त्वाची आठवण करुन देणारं ठरावं )

प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं 'ये सिर्फ मेरा है' वाटायला लावायला आवश्यक सगळे गुण,पुरावे नि प्रसंग असणारा पूर्णावतार नि तरीही प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचा.
स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् ही श्वेताश्वतर उपनिषदातली प्रसिद्ध उक्ती आठवली. सर्व विश्व व्यापूनही दशांगुळे उरणारा तो.