Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मागच्या भागात ओशोंचा फोटो होता... आणि एक वाक्य होते :- मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता) आता ओशो संपूर्ण अनुभूती बद्धल काय म्हणतात ते सुद्धा सर्वांनी वाचा. इतर काही चांगले वाचनिय दुवे:- १३२. देवशोधन गीता क्षीरसागरजी हे लेख आवार्जुन वाचण्याचे कष्ट घ्या म्हणजे तुमचा भ्रम दूर होईल !

तुम्हाला खरं तर तुमच्या मनाविरूद्ध जाऊन एकच निर्णय घ्यायचा आहे : `जे आहे त्याचा बेशर्त स्विकार' आणि तोच खरा चायलेंज आहे.
हिच तर खरि मेख आहे. सगळ्यात भ्रामक गोश्ट हि आहे कि एखादी गोश्ट बेशर्त स्विकारली आहे हे मानणे. हा अनुभव वा प्रक्रियाच मुळात एक कर्मठ सशर्त स्थिती आहे. आणि ति जर तशी सशर्त स्थिती /प्रक्रिया नसेल तर मुळात "स्विकार करणे" हि प्रोसेसच उरणार नाही, जि खरि मुक्ति असेल (मनोव्यापारातुन वगैरे वगैरे वगैरे).

सगळ्यात भ्रामक गोश्ट हि आहे कि एखादी गोश्ट बेशर्त स्विकारली आहे हे मानणे.
यात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्विकारण्याचा निर्णय घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं, आपण कामाला लागलो, विषय संपला!
हा अनुभव वा प्रक्रियाच मुळात एक कर्मठ सशर्त स्थिती आहे.
नाही. ते स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक आहे.
आणि ति जर तशी सशर्त स्थिती /प्रक्रिया नसेल तर मुळात "स्विकार करणे" हि प्रोसेसच उरणार नाही, जि खरि मुक्ति असेल (मनोव्यापारातुन वगैरे वगैरे वगैरे).
स्विकार ही सशर्त स्थिती नाही. एका क्षणात मनाचं `मेंटल शटलींग' थांबवून निर्णय स्वाधिन करण्याचा तो सर्वोत्तम उपाय आहे. ती अत्यंत निर्णयात्मक स्थिती आहे. `आय हॅव अ‍ॅक्सेप्टेड माय वर्क अँड आय वील ब्रींग कलर्स टू इट' असा कमालीचा कॉन्फिडन्स आहे. अर्थात ते करायला स्वतःवर विश्वास हवा किंवा आपल्या कामात आपल्याला मजा येत नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा तरी हवा.

यात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्विकारण्याचा निर्णय घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं, आपण कामाला लागलो, विषय संपला!
हे असलं बजावणे अन कामाला लागणे याला तुम्हि बेशर्तपणा म्हणता ?
नाही. ते स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक आहे.
नाहि तो स्वतःच्या निर्णयावर अढळ रहायचा अट्टहास आहे. यातली कोणतिच गोश्ट बेशर्त नाही. पुरेसा विरोधि रेटा निर्माण झाल्यास हा अट्टहास फाजिलही ठरु शकतो. अर्थात त्यावेळी माझि मर्जी म्हणत पळ काढुन दुसरा अट्टहास जवळ करायचा मार्ग जो आपण सुचवला आहे तो कोणत्याही प्रकारे स्वतःच्या निर्णयावर विश्वास असण्याचं द्योतक दाखवत नाही.
स्विकार ही सशर्त स्थिती नाही. एका क्षणात मनाचं `मेंटल शटलींग' थांबवून निर्णय स्वाधिन करण्याचा तो सर्वोत्तम उपाय आहे. ती अत्यंत निर्णयात्मक स्थिती आहे. `आय हॅव अ‍ॅक्सेप्टेड माय वर्क अँड आय वील ब्रींग कलर्स टू इट' असा कमालीचा कॉन्फिडन्स आहे.
कामाच्या ठिकाणी/ मनोव्यापाराच्या ठि़काणी स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा हा एकमेव दिर्घकाळ आनंदाने कार्यरत राहण्याचा राजमार्गे आहे. यु डोन निड टु गिव अ डाइम अबॉट ब्रिंगिंग कलर्स टु इट, यु विल एंजॉय व्हटेवर कलर्स इट हॅज आलरेडी गाट. दॅट्स व्हॉट रिअल अक्सेप्टन्स इज आल अबॉउट.
अर्थात ते करायला स्वतःवर विश्वास हवा किंवा आपल्या कामात आपल्याला मजा येत नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा तरी हवा.
ख्खिक्क! कोण माणूस कामात मजा येत नसताना मजा येतेय अस मानुन जगत असतो ? राहिलि गोश्ट विश्वासाचि यु डोंट निड इट अ‍ॅट ऑल.

तिथे तुम्ही लिहीलंय :
केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही भलेही कंपनी पगार/ जॉब प्रोफाइल बदलला नसेल, पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेशन.
आणि मी म्हणतो `आहे त्या कामाचा अस्विकार हेच बंधन आहे' तुम्ही पुढे काय लिहीलंय त्याला काही एक अर्थ नाही कारण तुमच्या विचारसरणीनं गेलं तर दर सहा महिन्याला नोकरी बदलण्याचा प्रसंग येत राहील. पुढे तर त्याहून गोंधळ आहे :
आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता, पण सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते. अलमोस्ट विदाउट ओब्लिगेश
`जॉब आणि काम यातला फरक' असा गोंधळ होतो का दर सहा महिन्यानी? वरच्या प्रतिसादात शेवटी म्हटलंय :
कोण माणूस कामात मजा येत नसताना मजा येतेय अस मानुन जगत असतो ?
= तुमच्या कामात मजा येण्यासाठी शर्ती किती आहेत ते पाहा म्हणजे मजा येतीये किंवा नाही ते कळेल : १ ) स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा २) ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. आता दुसरी शर्त पूर्ण व्हायला तर फक्त एकच अट आहे : ज्या कंपनीत तुम्ही नोकरी करता ती सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून हवी आणि तीनं कर्मपूर्तीसाठी तुमच्या एंट्री आणि इग्झिटची वाट बघावी!

Everybody is replaceable. कंपनी तुमच्यावर अवलंबून असेल तर तुम्ही गेल्यावर मग कोणाला replace करायला कंपनीच राहणार नाही. मी तर अगदी उलट विचाराने काम करतो. उद्या मी ही नोकरी सोडली तर माझ्यानंतर जो हे काम करेल त्याला कमीत कमी कष्ट झाले पाहिजेत. असो. ज्याची त्याची विचारसरणी.

चहुं वेदी जाण षटशास्त्री कारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥
एक हरी आत्मा जीव शिव सम । वाया दुर्गमी न घाली मन ॥
ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥

तुमच्या कामात मजा येण्यासाठी शर्ती किती आहेत ते पाहा म्हणजे मजा येतीये किंवा नाही ते कळेल :
त्या शर्ति पाळा अन करत असलेल्या कामाचा लुफ्त उठवा. कारण मि बेशर्तपणाचा ना फसवा भ्रम निर्माण करतोय ना दुसर्‍यांना त्याला बळि पडायला भाग पाडतोय. त्यामुळे व्हॉट डु वि क्नो अँड व्हॉट हॅव वि लर्न अबॉट वर्क/प्रोसेस हॅपिनेस इज= १ ) स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळा - स्किल्सेटच्या प्रमाणातच चॅलेंजही वाढवा, हे बिघडल तर फ्रेस्ट्रेशन अथवा बोअरड्म (भयानकही) उसळेल, व ऑब्लिगेशन्स रिड्युस करत चला... म्हणजेच कामाचा/प्रक्रियेचा कंटाळा कधिच येणार नाही. व ऑब्लिगेशन्सच्या लयसोबत मुक्तिचा मार्ग मोकळा होइल :) २) ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. - बरोबर. जेव्हां पाहिजे तेव्हां काम केलं, अन नको असेल तर नाहि केल केवळ हेच सर्वात आनंददायि असतं. समरसुन केलेलं असतं पण हाय रे दैवा.. आफ्टर अ‍ॅल हॅपिनेस इज नॉट एव्हरिथिंग जबाबदारि,गरज, निकड या आवश्यक गोश्टि सुध्दा प्रक्रिया/काम करायला भाग पाडतात अशावेळी समजा विलिंगफुली एंटर-एग्झिट शक्य नसेलही पण काम करताना स्किल्स, चॅलेंज व ऑब्लिगेशनचा रेशो व्यवस्थित संभाळणे हमखास उपयोगि पडुन आनंद निर्माण करतो.

पण हाय रे दैवा.. आफ्टर अ‍ॅल हॅपिनेस इज नॉट एव्हरिथिंग जबाबदारि,गरज, निकड या आवश्यक गोश्टि सुध्दा प्रक्रिया/काम करायला भाग पाडतात
म्हणजे तुमच्या
विलफुल एंट्री आणि इग्झिट
या कामात आनंद देणार्‍या महत्त्वाच्या शर्तीची पहिल्यांदाच वाट लागली! तुम्ही कारणं काहीही सांगा, आहे ती नोकरी बंधन झालं. आता दुसरी शर्त :
स्किल्सेटच्या प्रमाणातच चॅलेंजही वाढवा
म्हणजे: एकतर कंपनीनं कर्मपूर्तीसाठी तुमच्या एंट्री आणि इग्झिटची वाट बघायची. परत तुमच्या म्हणण्याप्रमाणे फक्त पहिल्या दिवशी तुम्ही आनंदात असणार कारण
" सुरुवातिला जॉब अन काम दोन्हि स्वतःसाठी असते."
यानंतर तुम्ही म्हटलंय तशी मानसिक कोलांटी उडी
("पण आता तुम्ही तुमच्यासाठी जॉब, पण काम मात्र कंपनीसाठि करत असता")
दुसरा दिवस ते सहामहिने या कालावधित केव्हाही बसू शकते. तसं होऊ नये कारण त्यामुळे तुमचं
फ्रेस्ट्रेशन अथवा बोअरड्म (भयानकही) उसळेल"
या भीतीनं कंपनीनं तुमच्या स्किलसेटसच्या प्रमाणात तुम्हाला चायलेंजेसही प्रोवाइड करायचे (थोडक्यात तुम्ही फ्रस्टेट किंवा बोअर होऊ नये म्हणून तुम्हाला दर चारसहा महिन्याला प्रमोट करत राहायच ) आणि दरम्यानच्या काळात तुमचा सल्ला काय तर
"ऑब्लिगेशन्स रिड्युस करत चला"
(थोडक्यात कंपनीला केव्हाही टांग मारता येईल अशी परिस्थिती निर्माण करा!) शाब्बास!

माझ्या लेखनावर "पावलापावलाला त्रुटि दाखवुनही" किंवा "तुमच्या बर्‍याच चुका दाखवुनही तुम्ही चुकिचे लेखन/धागे/प्रतिक्रिया का देताय ?" वगैरे आवेशात विचारण्यापूर्वी; तुमचा सल्ला तुम्हाला तरी उपयोगी ठरला आहे का ते जरूर पाहा. नाही तर तुमच्या या सल्ल्यान्वये :
ऑब्लिगेशन्सच्या लयसोबत मुक्तिचा मार्ग मोकळा होइल smiley
नक्कीच होईल, पण नोकरीतनं मुक्त होऊन घरी जायचा!

तुमच्या प्रतिसादाला दिलेली उत्तरं वाचा आणि त्यामागे पुढे आलेले इतर सदस्यांचे प्रतिसाद पाहा. काय लिहीलंय त्याचा तुम्हाला अंदाज येईल.

तुमच्या प्रतिसादाला दिलेली उत्तरं वाचा आणि त्यामागे पुढे आलेले इतर सदस्यांचे प्रतिसाद पाहा. काय लिहीलंय त्याचा तुम्हाला अंदाज येईल.
शब्द शब्द अन शब्द पोकळता. काय हो तुमच्या त्या प्रक्रिया/अनुभव वगैरे वगैरे मी तुम्हाला ठेवेन त्या परिस्थितीत तुम्हाला चिदानंदि वगैरे वगैरे ठेवु शकतिल काय ? आहे का वास्तवाला सामोरे जायची तयारी ? असेल तर तयार व्हा, नायतर सर्वांना स्पश्ट करा कि तुमचे लिखाणे हे निव्वळ "साहित्य" आहे, वास्तव न्हवे.

तुमचे सर्व युक्तीवाद आणि प्रतिसाद फोल ठरलेत म्हणून असे उद्विग्न होऊ नका. आणि नुसत्या वाचण्यात तुमची इतकी फरफट झाली असेल तर लेखाकडे दुर्लक्ष करा.

घाबरलात ना आव्हान स्विकारायला. वाटलच होतं जेव्हा प्रत्यक्ष कृतिची वेळ येइल असा मैदानातुन पळच काढाल. माझे युक्त्तिवाद (?) व प्रतिसाद फेल गेल्याचे तुम्हि जाहिर करत असालही पण पळ कोणि काढला हे सगळ्यांनाच दिसत आहे. :)

जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे,
असं कुठे वाचलं नाही कधी. कदाचित माझा अभ्यास कमी असेल. पण उदाहरण म्हणूनही हे पटलं नाही.

कसं वाचणार? इथेच प्रथम लिहीलं गेलंय ते. आपल्या जीवनात मन निर्णय घेतंय आणि आपण मनाचं अनुसरण करतोय अशी परिस्थिती आहे. टॅगलाईन त्या परिस्थितीचं वर्णन करते आणि लेख विश्लेषण करतो.

शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द...शब्द...शब्द..शब्द... एन्ट्री-एक्झीटचा हक्क वापरून वाचनातून एक्झीट घ्यावी म्हणतो. इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही.

भाषेतला प्रत्येक शब्द हा नुसता निर्देश आहे. नाहीतरी चंद्र या शब्दाला तो न समजणार्‍यासाठी काय अर्थ आहे? ज्याला अर्थ समजतो तो चंद्राकडे पाहतो आणि हरखून जातो. ज्याला समजत नाही तो शब्दांची माळ लावतो इतकाच फरक आहे.

वाजतेय ना? आवाज येतात, मनरंजन होतं, काही आतषबाजी देखील होतेम काही काळ बरं वाटतं. चालू द्या.

गुरुदेव म्हणाले: हू आर यू? यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? आमचा मात्र चंद्रशेखर झाला......... ( संद्रभ : असा मी असामी )

काही वेळाने गुरुदेव अन कुत्रा माझ्याचकडे बघताहेत असं मला वाटलं. माझी हाय अन लो ब्लडप्रेशरं दोन्ही एकाच वेळेला वाढू लागली. बर्‍याच वेळाने पाहतो तर कोणीतरी मला हलवून जागं करीत होतं. "शंकर्‍या ऊठ! तिकडं जाऊन झोप! काय पण लोळतात कार्टी!" असं ओरडलो तर कायकिणी गोपाळराव मला हलवून जागे करीत होते. "समाधी लागलं म्हंजे तुमचं पूर्वपुण्याई ग्रेटच असलं पाहिजे हो धोंडोपंत!" ते म्हणाले. आता अशी समाधी रात्री ताकभात खाल्ल्यावर मला दररोज लागते हे त्याला कशाला सांगा.

आध्यात्माची चढली झिंग टकिन रोज एकेक पिंक तू आणी मी,मी आणी तो नसला तरी आहे म्हणीन,भले नंतर होऊ दे चो ================================== अत्ता आमचं मन इतकच चाल्ललं,म्हनून इथेच थांबलो... कदाचित कामाहून आल्यावर,अजून चाल्लं तर अजून लिहू... त्यामुळे---विश्रामशः

काय ते ठरलं का शेवटी? स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्विकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं? की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं? की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे? की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं? की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची? ... त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्विकार करुन जगा! कसे? काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी.

या इअथल्या चर्चापटूंना अवांतराचीच काळजी फार. मुद्द्याचे बोला सिवाजी, मुद्द्याचे! बाकी, ते एक बालगीत आहे, गोल गोल लाल लाल फुग्याबद्दलचे. ......फू फू फुगा, फुट्ला ढम्म!!

की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं? की ................. जगा! कसे?
अरे बापरे! हे एवढं अवघड आहे ठरवणं? हा The Paradox of Choiceआहे काय? मॅट्रिक्स मध्ये निओ किंवा (आणि कोणीतरी) म्हणतो तेच खरं असावं Man cannot go beyond his choices! ;)