किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे.
कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे
कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे.
कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं -
मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे.
ते असो -
पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला.
आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो.
-गोपाल नीलकण्ठ दांडेकर
दुर्गभ्रमणगाथेच्या मागच्या पानावरून, बहुदा "आप्पांच्या राजीच्या" शब्दांत..
एका किल्ल्याच्या कुशींत जन्मलेला
एक गडवेडा माणूस
जन्मभर किल्ले भटकला
किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही.
दरदर झरत्या पावसांत
कडाडत्या थंडींत
भाजणार्या उन्हांत
रात्रीं, दिवसां, पहाटेंस, सायंकाळी
तो किल्ले चढला-उतरला.
पांच तपे उलटून गेलीं
किल्ल्यागडांचा वेध घेत
तो त्याच्या वाटा तुडवीत राहिला
कधी आनंदाने थिरकला,
कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला
असे त्याचे किल्ल्यांगडांशी मैत्र
आयुष्याच्या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून
तो तीं स्मरणे जागवीत आहे.
***************************
बॅटम्यानाने लिहिलेले गोनिदा. गोनिदांच्याच शैलीमध्ये.
***************************
गोनीदांचे वाचून हे सुचले.
गोनीदांची पुस्तकं वाचणं म्हणजे तच्चिंतनं, तत्कथनं, तत्प्रबोधनं होऊन जातं. तो रस कितीही वेळेस चाखला तरी कंटाळा कसा ठावकीं नाही.
कुठे शितूस साद घालत खाडीवर विसूसवे भटकतो आहे. कुठे झाडाच्या बेचक्यात बसून बुधासवे "इवायन" न्याहाळतो आहे तर कुठे पवनाकाठी धोंडीसवे फिरतो आहे. कधी पडघवलीच्या अंबूवहिनीचे शौर्य पाहोन नतमस्तक होतो आहे तर कधी शिवछत्रपतींच्या मावळ्यांची आभाळाएवढी कर्तुकं आठवीत दातांतळी आंगुळी घालतो आहे. कधी माळव्यात यशोदेसवे फिरतो आहे तर कधी मांडवगडी मैतरांसवे हुंदाडताना रूपमती-बाजबहाद्दुरास आठवितो आहे. कधी आळंदीस सोनूमामा दांडेकरांसवे ज्ञानेश्वरी अनुभविताना थक्कीत होतो आहे तर कधी बाबासवे रायगडाची परिक्रमा करताना त्या द्रष्ट्या श्रीमंत योगियाचे रूप आठविताना सैराट हिंडतो आहे. कधी पैठणास ज्ञानोबासवे विद्वत्सभेत बसून राहतो आहे. कितीकदा एकुटवाणा तासंतास गोनीदा बनून बसतो आहे.
थोडकी वर्षे उलटोन गेली, परी दिठीस गोनीदा आझून आकळले नाहीत. आयुष्याची सकाळ फुलविणार्या या जादुगारासवे थोडका बसेन म्हणतो.
आप्पाना न घाबरता त्यांचा सहवास काही काळ लुटला ! त्यांच्या बरोबर दुर्ग भ्रमण करता आले नाही याची मोठी खंत आहे.
एक विशिष्ट स्वर लावलेले त्यांचे बोलणे असे ! वाणीत रसरसलेपण नि कांतितही !
पुनश्चः गोनीदा, दुर्गभ्रमणगाथेतून. उत्तरेकडील किल्ले आणि आपले गिरीदुर्ग यांची तुलना करताना..
*************
महाराष्ट्रांतले दुर्ग आणि महाराष्ट्राबाहेरचे, यांत मनस्वी अंतर आहे - उंचीच्या दृष्टीनं, अवशेषांच्या दृष्टीनं. दिल्लीला लालकिल्ला पाहात हिंडत होतों. दिल्लीलाच राहाणारा एक समानशील मित्र तो किल्ला दाखवायला मजबरोबर होता. किल्ला दाखवून झाल्यावर तो क्षण थांबून म्हणाला,
"दाण्डेकरजी, एक सवाल पूछूँ?"
"जी हाँ, विना संकोचके!"
"आप दुर्गभरे देशसे आ रहे हैं| यह हमारा किला भी आपने देखा| क्या इनकी तुलना कर सकेंगे?"
"क्यौं नहीं?"
"तब फिर शुरू किजीये!"
"पहले आपके इस किले के बारे में बता | जैसा कोई अमीर - हाथोंमें चमेलीकी मालाएं पहने, आँखोंमे सूरमा लगाएं, तकियेसे सटकर किसी तवायफका मदभरा गाना सुनने बैठा हो - आपका किला वैसा सुहावना हैं|"
प्रसन्न होवून तो म्हणाला,
"क्या कही दाण्डेकरजी! वाकई आप उपन्यासकार हैं| जी अब इसके साथ आपके किलोंके बारेमें - - "
त्याला थांबवीत म्हटलं,
"अजी जाने दीजिये| मेरे देशके किलोंकी तुलना इस लाल किलेके साथ नहीं की जा सकती|"
"भई, क्यों?"
"सारे बदनमें अरंडी का तेल लगाये कोई दो तगडे मल्ल हाथमें वज्रमुष्टि लिये एक एकके साथ जूंझ रहे हों, सारा बदन लहुलुहान हो गया हों, मेरे देशके गिरीदुर्ग देखनेपर इस दृष्यकाही स्मरण होता है!"
श्रम - सरितेच्या तीरावर
वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.
निळ्या नदीच्या किनार्यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोण उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्यांच्या फटीफटीतून निःशब्द चिणले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!
चौदा प्रेमांचा चोथा करणार्या सम्राटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!
संथ नाजूक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे,
मस्तकावर पाट्या वाहणार्या स्वेदगंधेच्या डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे
भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत
भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्श्सनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!
खपणार्यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!
- बाबा आमटे
नाळ तोडली तरीही
पुन्हा पुन्हा गुंते पायी
देहातल्या रक्तकणा
मूळ शोधायाची घाई
सात पिढ्यांच्या आडून
उतू येता गुणदोष
रुते कंठात हुंदका
पडे गळ्याखाली शोष
मागे पुढे दूरवर
अनाद्यनंत साखळी
नाही वृक्ष, नाही फांदी
मी तो नगण्य पाकळी
करकचून बांधता
असा भूतांचा वारसा
अमझे मलाच कळेना
बिंब किंवा मी आरसा?
- शांता शेळके
शब्दांचे देठ खुडता
वळून नये पाहू
गढूळलेल्या पाण्यात पुन्हा
पाय नये देऊ.
फुलपाखरांचे झगमग पंख
- नंतर होतो चुरा
कुठला रंग खोटा म्हणशील?
कुठला म्हणशील खरा?
निग्रहाच्या नकाराची
ठाम इतकी ग्वाही
खुडल्या शब्दामधून पुन्हा
कविता फुटत नाही!
- शांता शेळके
स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन फ्रॉइडचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षॊभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्यांशीत प्रवास हवा
--- बाकीबाब.
कुठल्या धाग्यात हा प्रश्न विचारावा हे समजत नसल्याने त्यातल्यात्यात हा धागा योग्य वाटून इथे लिहीतोय.
"मी हाय कोली" या कोळीगीतामधे (हो.हो. बराक आणि मिशेल ओबामा मुंबईत ज्यावर नाचले तेच) .. पहिल्या काही ओळींमधे " मारतीन कोली, हानल्यान गोली, गो चल जाऊ बाजारी" असे शब्द आहेत.
याचा अर्थ काय?
संदर्भासाठी त्याआधीची ओळ:
मी हाय कोली, सोरिल्या डोली, मुंबईच्या / वसईच्या किनारी
मारतीन कोली हानल्यान गोली गो चल जाऊ बाजारी.
हे गाणं आगरी बोलीभाषेत आहे का?
सोरिल्या डोली म्हणजे होड्या सोडल्या असंच ना?
मुळात "मारतीन कोली, हानल्यान गोली" याचा अर्थ जालावर कुठेच सापडत नाही. नुसत्या तर्कानेही लावता येत नाहीये.
(अधिक अवांतर: एकविरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी" इतकीच ओळ पूर्वी पुन्हापुन्हा ऐकली जाऊन देवीची नजर कोल्ह्यावर आहे अशी समजूत होती.. कोल्हा हा एकतर कोणा असुराचे रुप किंवा देवीचे वाहन असावे काय अशी शंका यायची. नंतर पूर्ण गाणं ऐकल्यावर मच्छीमार कोळ्यावर कृपादृष्टी आहे असा साक्षात्कार झाला. असो.)
समझ देख मन मीत पियरवा
आशिक होकर सोना क्या रे
रुखा सुखा गम का तुकडा
फीका और सलोना क्या रे
जब अखिंयोंमें नींद घनेरी
तकिया और बिछौना क्या रे
कहत कबीर प्रेम का मारग
सर देना तो रोना क्या रे
कधी माझी कधी त्याचीही सावुली
रेंगाळे माझ्या चोरट्या पाऊली
कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यांतून दोघेही जागतो
दारी तोही कधी पणत लावतो
ऊन मीठपाणी काजळाच्या मागे
भिजे माझा पीळ; त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरुण
कैसे ओढू? त्याचे मावळेल ऊन
एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक, दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यातले राखतो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू ऊडू पाहें..
- आरती प्रभू
यशो, खूपच छान उतारे आणि कविता देते आहेस!
असाच एक उतारा रवींद्रनाथ ठाकुरांच्या पु लं नी भाषांतरित केलेया 'पोरवय' मधून.
आमच्या वडाच्या झाडावर एखाद्या वर्षी अचानक परदेशी पाखरं येऊन घरटी बांधतात. त्यांच्या पंखांचा नाच ओळखेओळखेपर्यंत पाहावं तर ती निघूनही गेलेली. ती दूरच्या रानातले अनोळखी सूर घेऊन यायची. तसंच आयुष्याच्या प्रवासात मधूनमधून जगाच्या अनोळखी प्रदेशातून आपल्या माणसांच्या दूती येतात आणि अंतःकरणाच्या सीमा विस्तारून जातात. न बोलावताच येतात. सरतेशेवटी एक दिवस बोलावूनसुद्धा भेटत नाहीत. निघून जाता जाता आयुष्याच्या पटाला वेलबुट्टीची किनार जोडून देतात. दिवसांरात्रीचं मोल कायमचं वाढवून जातात.
आयुष्याच्या प्रवासात मधूनमधून जगाच्या अनोळखी प्रदेशातून आपल्या माणसांच्या दूती येतात आणि अंतःकरणाच्या सीमा विस्तारून जातात. न बोलावताच येतात. सरतेशेवटी एक दिवस बोलावूनसुद्धा भेटत नाहीत. निघून जाता जाता आयुष्याच्या पटाला वेलबुट्टीची किनार जोडून देतात. दिवसांरात्रीचं मोल कायमचं वाढवून जातात.
ज्ञानेश्वरीचे लाडके नाव आहे 'भावार्थदीपिका'. या अभिधानात तिचे कार्य व तिचा अंतरंगीय सोहळा प्रकट होतो. ज्ञानाची स्वामिनीच भक्ती आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानविलासिनी असेलहि, पण ती भक्तीची अभिमानी आहे. श्रांतास छाया, दुखि:तास माया व पतितास दया अशी करूणामूर्ति म्हणजे ज्ञानेश्वरी. तत्वज्ञान व काव्य, जीवन व साक्षात्कार, अर्थ व संवेदना, साहित्य व चमत्कृती, दिव्यता व रसोन्मेष ज्या तर्हेने ज्ञानेश्वरीत क्रीडले आहेत, त्या तर्हेने मराठी साहित्यप्रांगणात अद्याप तरी अविष्कृत झालेले नाहीत.
ज्ञानदेवीचा मौलिक सिद्धांत अद्वैतवाद नव्हे तर द्वैताद्वैतविलक्षण भक्ती हाच होय. यालाच सामरस्य सिद्धांतही म्हणतात. विश्वात्मदेवाच्या पूजनार्थ ज्ञानदेवांच्या तबकात कर्म, ज्ञान, योग, मंत्र व तंत्र या पंचज्योतींचा भक्तीमयी प्रकाश आहे. ज्ञानेश्वरीचा भक्तीपंथ हा मोक्षाच्या वाटेवरून वैकुंठपीठास जाणारा नव्हे, तर मोक्षाचा अधिपति भगवंत हा वैराण वाळवंटात सवंगड्यांसमवेत नाचण्यास येण्यासाठी आखलेला तो 'पंथराज' आहे. ज्ञानेशांनी संपूर्ण महाराष्ट्रदेश परिशुद्ध जीवनधर्माने सचेत करून ओजस्वी व तेजस्वी धर्मपरंपरा निर्माण केली.
ज्ञान, कर्म वा योग हे भक्तीवाचून शून्य होत. भक्तीतूनच ते उगवतात व भक्तीरूप होऊन अंती भक्तविलासात प्रकट होतात हे मर्म जाणावे. आजच्या काळास योग्य वळण देण्यास भक्तीपंथाचा राजमार्गच संतांना रूचला आणि तोच त्यांनी विशेषे गौरवला. देवतेची कल्पना केवळ जीवदशेसाठीच ते मानतात, नाहीतर त्यांची देवता लागलीच 'विश्वात्मक रूप' धारण करते. ज्ञानेश हे सर्व संप्रदाय आपलेच मानीत आहेत, म्हणूनच की काय आज ज्ञानेशांनी दिग्दर्शित केलेल्या भगवान विठ्ठलाच्या नगरीत, संतांचे माहेरी सर्व संप्रदाय एकत्र होऊन 'वारकरी' म्हणून पंढरीच्या वाळवंटात निर्मळपणे व एकोप्याने वावरताना दिसतात. त्यांचे भक्तीमत ही एका विशाल व करूणामयी भावदशेचीच अखंड भारतवर्षास मिळालेली देणगी आहे.
ज्ञानेशप्रणित भक्ती पूर्ण वेदप्रणित आहे पण याहीपुढे तिच्या उदारतेने जीवनपद्धतीतली मोठीच उणीव भरून निघाली आहे. वर्णरहित आराधना व जीवनरचना ही त्यांच्या भक्तीची महानता व विशेषता होय. गुरूतत्वाचेच ईश्वरसंज्ञक पूजन त्यांच्या भक्तीत आहे. चार वर्णांच्या कर्मकांडी बेबंद धार्मिकशाहीला आलेले ढोंग वा दंभ हे स्वरूप मोडून त्यांनी सर्वांस जीवनकल्याणाची 'राजमार्गी' वाट प्रशस्त केली आहे. तसेच त्यांनी जातीपातीपेक्षा गुरूंच्या स्थितीचा विचार केला आहे. अहो! गुरूंची जात पाहणारे वेडेच नव्हेत का? ब्रह्म कोणत्या जातीचे असे विचारणे म्हणजे ब्रह्मताच सोवळ्यात बांधणे होय. अज्ञानाची परिसीमा आहे, हा गुरूंच्या ज्ञातीवैशिष्ट्यांचा विचार! व्यवहाराच्या कडीकुलुपात ब्रह्मता ओवळी म्हणून बांधू नका. ज्ञानेशांनी सर्वप्रथम हा आवाज उठविला. तुकोबा-रामेश्वर, चोखोबा-गिरधरपंत अशा गुरूशिष्य जोड्या यातूनच उदयाला आल्या. असा कोण मूर्ख शिष्य आहे की जो गिरिकंदरी भ्रमण करणार्या सिद्ध पुरूषास प्रथम जात विचारील? त्याची जातपात सारे हरवलेले असते. ज्ञानेश म्हणतात - यातिकुळ माझे गेले हरपून, वेदसंपन्नु होय ठायी, परि कृपणु ऐसा आणु नाही. नाथसंप्रदायाचे ते तत्व आहे. जीव वा हंस हीच जात, ब्रह्म हे त्याचे स्थान, बस एवढेच जाणले व तसा आदेश प्रसृत केला. उदारता, सामरस्यबोध, व्यापकता व सहजता यामुळे ज्ञानेशप्रणित भक्तीसिद्धांत आपल्या आगळ्या वैशिष्ट्याने आजही भारतवर्षात नांदत आहे.
- श्री संत बाबामहाराज आर्वीकरकृत 'दिव्यामृतधारा' ग्रंथातून
कवितेचं शीर्षक आठवत नाही..
राग नाही, रोष नाही, खोल थोडा आहे विषाद
या देहाची मातीच अशी!.. प्रेमासंगे जमतो प्रमाद
पाण्याखाली गाळ जसा, ज्योतीखाली छाया जशी
प्रीतीलाही वेढून असते आसक्तीची माया तशी
पण असा अकस्मात आपलाच आपणां लागता तळ
वरची ज्योत उजळ होऊन खालचे पाणी होते निवळ
कळ्ले मोकळ्या हवेत उन्हांत फुलासारखा फुलतो प्राण
मूळचा मळ गिळता गिळताच आतून निर्मळ मिळते त्राण
वार्या उन्हासारख्या तुला मोकळ्या आहेत दाही दिशा
मुक्तीसाठीच जखमी उरांत फुलत असतात उषा निशा
वाटल्यास खरेच विसर मला... पण सतत फुलत रहा
व्यथा माझी स्मरलीच तर.. तिच्यांत नवे क्षितीज पहा
करु नकोस खंत असा माझ्यात उरला म्हणून विषाद
पूजा खरी असॆल तर त्याचा देखील होईल प्रसाद
- बा भ बोरकर
बोरकर व गदिमा दोघेही शब्दस्वामी व दोघांचीही काव्याची अशी वेगळी भाषा नसे. आपण जसे बोलतो ते काहीशा लयीत
बोलावयाचे हा त्यांचा फंडा असावा ! ही व बोरकरांच्या येथील कविता फारच क्लास !
वह अपने अकेलेपनसे भी पैदा हुई हैं
और कविता की जाई भी हैं
उसका अकेलापन उसकी परवरिश करता हैं
और कविता उसको पढती भी हैं
पढाती भी हैं
अकेली होकर भी वो कभी अकेली नहीं हुईं
कविता उसके अंदर भी हैं
और बाहर भी
कविता उसकी जमीन भी हैं
और कविता उसका आसमान भी हैं
हालात रुकावटें बनतेही रहे हैं
पर वह दरिया की तरह
कोई रुकावट कुबूल नहीं करती
चुपचाप सब पार कर लेती हैं
वह सब फिक्रोंमें भी बेफिक्र होकर
चुपचाप मनचाहा लिखती आ रही हैं
और मनचाहा जीती भी आ रहीं हैं
जिंदगी कभी दूर खडी
कभी पास खडी
उसको देख- देख
कभी आँखे पौंछती हैं
और कभी गर्वसे भर जाती नजर आती हैं..
- इमरोज
तुझे पांगलेले मन सांग सांग कसे बांधू?
माझे भंगलेले मन सांग सांग कसे सांधू?
आले गगन भरुन तसे मन आसवांनी
तुझ्यासाठी परी अडे असे पापण्यांत पाणी
पक्षी भाळला आभाळा, वाट मागची विसरे
मौन तुझे तीरसे गे मात्र काळजात शिरे
सांग सांग कशी तुला पुन्हा बोलकी गे करु?
कसे पिसावले चित्त आता मुठीत आवरु?
- बा भ बोरकर
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरल्या नभाची सूर्यास्तछाया,
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण
एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल,
विलग पंखांचे मिटते मन
एखाद्या प्राणाचे विजनपण,
एखाद्या फुलाचे फेडीत ऋण
गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां,
प्रजक्तचुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्मांचे सावळेपण,
एखाद्या प्राणाची मल्हार धून
एखाद्या प्राणाचे सनईसूर,
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण.
- आरती प्रभू
आकाशतळी फुललेली
मातीतील एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यांत कशाला पाणी?
तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय ऩक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती
सुख आम्रासम मोहरले
भवताल सुगंधित झाले
नि:शब्द वेदनांमधूनी
गीतांचे गेंद उदेले
पथ कुसुमित होते काही
रिमझिमत चांदणे होते
वणव्याच्या ओटीवरती
केधवा नांदण होते
त्या विराट शून्यामधली
ती एक वसहत होती
शून्यात प्रसवली शून्ये
शून्यांची रंगीत नाती
त्या शून्यामधली यात्रा
वार्यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यांत कशाला पाणी?
- कुसुमाग्रज
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे!
मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे
केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे!
मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे
चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे!
धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे
नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे!
तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे
सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे!
तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे!
बाकीबाब!
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे
मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे
केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे
मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे
चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे
धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे
नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे
तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे
सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे
तेथ जाया वेगवेडी पारजाची* वाट आहे
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे
वृक्षशाखेला युगांच्या मंगलाची घांट* आहे
बुद्धदेवाच्या तळाशी हस्तीदंती पाट आहे
सत्यवानाच्या सखीच्या अंतरीचा दीप आहे
ख्रिस्त-मीरा-मोहनाच्या जीवनाचा धूप आहे
ज्ञानीयाच्या माऊलीची नित्य ओवी एक आहे
कान्हयाच्या गाऊलीचा दुग्धगंगा सेक* आहे
कोवळ्यां ज्वाळादळांचे भारताचें फूल आहे
हांसरे तेथें उद्याच्या मानवाचें मूल आहे
त्याजल्या मी चुंबिल्याने आंतही ते झाड आहे
अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे
बाकीबाब!
*
पारजाची = पार्याची
घांट = घंटा
सेक = शिडकाव
ती - किती उशीर?
तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर.
ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते.
तो - बरं.
ती - फक्त बरं?
तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो.
ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू?
तो - म्हणजे कसा?
ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.
तो - डोकं फिरलंय त्याचं?
ती - त्याचं की तुझं?
तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला?
ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं?
तो - नाही.
ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू.
तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार.
ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही.
तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये.
ती - अरे देवा
तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.
ती - बरं
तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय?
ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.
तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.
ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार.
तो - आता?
ती - हं आता.
तो - बरं जातो.
ती - ए काऊ थांब रे.
तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.
ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.
तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.
ती - काऊ तू मला खूप आवडतोस.
तो - मला माहितेय.
ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.
तो - बरं.
ती - अरे आता म्हण.
तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.
ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.
तो - बरं.
ती - ...
तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे.
ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.
तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.
ती - चल. :-)
-- निलेश गद्रे
http://nileshgadre.blogspot.in/2008/09/blog-post.html
पुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या एका वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी. (महाराष्ट्र टाइम्स)
****************************************
..तुला सार्वजनिक 'आपण' प्रिय, तर वैयक्तिक 'मी' ची ताकद ज्याने त्याने आजमावायला हवी हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे, याचा प्रत्यय मला सतत येत राही, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून ख़ुप दूर होतो. जणू 'दोन धृवांवर दोघे आपण'. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवतेवर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.
तूही जर इतर चारचौघांसारख़ाच 'एख़ादा कुणी' असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते, हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा 'मुल' पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख़्यानांत, लिख़ाणात, तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी, चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?
कवी ग्रेसच्या ओळी आहेत, 'क्षितीज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी। देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते, तसेच व्याकुळ व्हावे। बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे'. तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास, तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे, त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस.
ती तुझी सहज प्रवृत्तीच होती, प्रकृती होती. मराठी 'विश्वकोषा' त किंवा 'हूज हू' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच 'विचारवंत' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे, तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात, त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी, स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण, मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते? हक्काची बायकोच ना तुझी!
तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्द कळेची गर्भश्रीमंतीही, 'तुला' लाभली होती. येतांना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दिर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे रहाणार आहे.
तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना?
थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की, सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये, एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास, तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.
मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे, पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे, असं थोडंच आहे? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे? या संदर्भात सत्य एकच आहे, ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन) सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालवं इतकंच.
-सुनीता देशपांडे.
मी पु.ल. नाहि, पण आमची सौ. बरीचशी सुनीताबाईंसारखी आहे. तिच्या भरवश्यावर उडाणाटप्पु जींदगी एंजोय करणं हाच माझ्या लाईफचा एकमेव अजेंडा... आता तर ज्यु. अर्धवटराव देखील माझ्याच पाऊलावर पाऊल ठेऊन चालणार असे लक्षण आहे. डब्बल परिक्षा आमच्या सौ. ची.
अर्धवटराव
पहिल्या धाग्यावर आधीच ही कविता दिली गेली असल्यास क्षमस्व.
पारवा
भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो
सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.
तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित
चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून
झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.
दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.
कवी - बालकवी
जगाचा गल्बला
जगात सोडुन
प्रेमाची मृणाल-
बंधने तोडून-
होता तो भ्रमिष्ट
भ्रमत एकला
नादात अगम्य
टाकीत पावला
वर्तले नवल
डोंगर-कपारी
गवसे प्रतिमा
संगमरवरी !
हर्षाचा उन्माद
आला त्या वेड्याला
घेऊन मूर्ति ती
बेहोष चालला,
आढळे पुढती
पहाड उभार
वेड्याच्या मनात
काही ये विचार
थांबवी आपुला
निरर्थ प्रवास
दिवसामागून
उलटे दिवस-
आणिक अखेरी
राबून अखण्ड
वेड्याने खोदले
मंदिर प्रचंड
चढवी कळस
घडवी आसन,
जाहली मंदिरी
मूर्त ती स्थापन !
नंतर सुरू हो
वेड्याचे पूजन
घुमते कड्यात
नर्तन गायन
रान अन् भोतीचे
स्फुंदते सकाळी
ठेवी हा वेलींना
ना फूल, ना कळी !
विचारी आश्चर्ये
तृणाला ओहळ
कोण हा हिरावी
रोजला ओंजळ ?
परन्तु मूर्त ती
बोलेना, हलेना,
वेड्याचे कौतुक
काहीही करीना !
सरले गायन
सरले नर्तन
चालले अखेरी
भीषण क्रंदन
पडून तिच्या त्या
सुन्दर पायाशी
ओरडे रडे तो
उपाशी तापाशी !
खुळाच ! कळे न
पाषाणापासून
अपेक्षा कशाची
उपेक्षेवाचून !
वैतागे, संतापे,
अखेरी क्रोधाने
मूर्तीच्या ठिकर्या
केल्या त्या भक्ताने !
रित्या त्या मंदिरी
आता तो दाराशी
बसतो शोधत
काहीसे आकाशी.
वाटेचे प्रवासी
मंदिरी येतात
आणिक शिल्पाची
थोरवी गातात.
पाहून परंतू
मोकळा गाभारा
पाषाणखंडांचा
आतला पसारा-
त्वेषाने बोलती
जाताना रसिक
असेल चांडाळ
हा मूर्तिभंजक !
------------
कुसुमाग्रज
प्रतिक्रिया
दुर्ग भ्रमण गाथा - प्रस्तावना
दुर्गभ्रमणगाथेच्या मागच्या
गोनीदा द ग्रेट!!!!!!!!!!!!
***************************
त्याना न घाबरता...
पुनश्चः गोनीदा,
संग्रह : ज्वाला आणि फुले
नाळ तोडली तरीही
कविता फुटत नाही
स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस
कुठल्या धाग्यात हा प्रश्न
सोरिल्या डोली म्हणजे होड्या
सोरिल्या डोली म्हणजे होड्या सोडल्या असंच ना?(खात्री नाही पण जितके अल्पज्ञान आहे त्यानुसार) हो!समझ देख मन मीत पियरवा
कधी तो कधी मी
मस्त! मस्त!
सुरेख.
वारीनिमीत्त...
अतिशय सुंदर उतारा. धन्यवाद.
बोरकरांची अजून एक कविता.
बोरकर व गदिमा
अपना आप - - इमरोज
तुझे पांगलेले मन
अहेवपण - आरती प्रभू
मातीतील एक कहाणी - कुसुमाग्रज
मिपाकर्स,
रुद्रास आवाहन
त्या दिसा वडाकडेन गडद
हे मी 'तुजे विणे' अल्बममधे
तूनळीवरती आहे का ते गाणे..?
कठीण आहे.. कोंकणी गाणी फारशी
लयवेल्हाळ
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे
अप्रतिम !
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे
चिऊ आणि काऊ
पुलं गेल्यानंतर आलेल्या
या संदर्भात सत्य एकच आहे, ते
हि जोडी खरच जगावेगळी आहे.
_/\_
पहिल्या धाग्यावर आधीच ही
शव्दाचा कुंचला....
चौरा, माझ्या एका
मूर्तिभंजक
अतिशय जबरी कविता!
मस्त!
उत्तर रात्र - रॉय किणीकर
या वळवाच्या सरीपरी तू आलीस
मिळाली का?
ए अबे बोरकरांच्या
बोरकरांच्या कविता खंड १ व २.
Pagination