Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेखनाचा अर्थ आपण काढू तसा निघतो. मॅन यू हॅव नॉट एंजॉइड द डेलिकसी कॉल्ड `दाय विल बी डन! या वाक्याच्या संदर्भात - `यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड' म्हटलं आहे. दुसर्‍या वाक्याचा अर्थ जसा `मी सर्वश्रेष्ठ स्वयंपाकी ' असा होत नाही तसा `दाय विल बी डन' ची किमया सांगणारा `स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो' हा अर्थ नाही. इट इज जस्ट एन इन्विटेशन टू ट्राय समथींग न्यू. तुम्ही संत वचनं ऐकलीयेत, जगप्रसिद्ध व्यक्तींच आयुष्याविषयक चिंतन वाचलंय, तशी ही गोष्ट आजमावून पाहा. हा मुद्दा हुकल्यानं सगळ्या प्रतिसादात स्वतःच्या व्यवसायचं आणि त्यातलया समस्यांचं वर्णन आलंय. मी इथे वेगळा अँगल सांगतोयं, तुम्ही किती कष्टसाध्य व्यावसाय किंवा काँप्लिकेटेड काम करतायं हा प्रश्न नाही. जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा. मग कदाचित `मी काही फार मोठं करतोय' असं वाटणार, सगळं सहज आणि सोपं होऊ शकेल.... आणि >तुमच्या इंग्रजी विधानावर कुत्रंही तंगडी वर करीत नाही. कनवटीचे ४ पैसे खर्च करणारा माणूस पदार्थाचा आणि सेवेचा दर्जा पाहातो तुम्ही काय म्हणताय ते पाहात नाही. अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.

अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.
बास, आता स्वतःला फसवणं थांबवा. त्यांचा प्रतिसाद तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेलि विधाने वाहुन निर्माण झालेलि चित्तदशा व तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेल्या प्रतिसादांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतोय हे एव्हडच मान्य करायची क्षमता बाळगुन आहात काय ? नसाल तर शांत व्हा पण असे प्रतिसाद लिहुन धाग्यवरिल चर्चांचे मातेरं करुन नका.

एक तुम्ही वगळता बहुतेक वाचकांना माझा मुद्दा पटलेला दिसतो आहे. तुम्हाला तो पटावा असा आग्रह नाही. उलट, कोणाचेच मुद्दे तुम्हाला पटत नाहीत हे वास्तव आहे. ते तुम्ही कधीच बिनशर्त स्विकारणार नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान...... . तेंव्हा ह्यावर अजून वाद घालणे म्हणजे शब्दाला शब्द वाढविणे आहे. माझा आणि इतर वाचक सदस्यांचा मौल्यवान वेळ मी फुकट घालवू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या अनाकलनिय शाब्दिक कोलांट्याउड्या मारू शकता.
आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.
आपल्या लेखनातून (?) आपली अनियंत्रित चित्तदशा आणि पोकळ शब्दांचा चिखल चिवडत बसण्याचा दृष्टीकोन दिसून येतो.

मग गॉन केस आहे असेच म्हणावे लागेल
आता म्हणा! बाकी इतरांना उद्देशून पराभूत होणे, चित्तदशा संभ्रमित - दोलायमान होणे, उद्विग्न होणे अशी शेलकी विशेषणे वापरायची आणि मग त्यांना इनविटेशन द्यायचे हे म्हणजे दुसऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवून मग त्यांना स्वत:च्या कोंडवाड्यात आमंत्रण देण्यासारखे वाटते.

@"काही झालं तरी शेवटचा प्रतिसाद माझाच" या ध्येयपूर्तीकडे जाणारी वाटचाल रोचक आहे. चालूद्या!>>> खि..खि..खि..! यावरून आमच्या निकोटिन अ‍ॅनॉनिमस मधल १ स्लोगन अठवलं-पहिलिच चिमूट घातक!!! मतितार्थ-तंबाखुची पहिली चिमुट खाल्यानंतर(व्यसनी माणसाला) उरलेल्या चिम्टी "पुडी" संपेपर्यंत खाव्याच लागतात! :)

काय उपयोग? निम्याहुन अधिक प्रतिसाद निगेटिव्ह आहेत. याचा अर्थ पब्लिकला लेख आवडला नाहि असाच होतो. अध्यात्म्य आणि मनाच्यासारख्या महत्वाच्या विषयावर लोकान्नि भरपुर टाइमपास करून घेतला आणि लेखकासहित सर्वान्नि चांगलीच राळ उडवलीये. लेखकाने आधिच योग्य शब्दप्रयोग केले असते आणि वेळिच चुका मान्य केल्या असत्या तर हे टाळता आले असते - उदाहरणार्थ - 'बेशर्त' च्या जागि 'बिनशर्त' स्वीकृती अस हव होत. लेखक हे अजुनहि स्विकारायला तयार नाहिये अस दिसतय.

लेखक हे अजुनहि स्विकारायला तयार नाहिये अस दिसतय. तसेही लेखक इतरांचे काहीच स्वीकारायला तयार नाहीये ! एकहार्ट मधे जेव्हा ते म्हणाले की गीतेच्या सगळ्या अध्यायांवर मी निरुपण लिहू शकेन पण ती फक्त चर्चा होईल. त्याचा रोजच्या जगण्याला उपयोग नाही. तसेच ते म्हणाले की,अभ्यासाची तर अजिबात आवश्यकता नाही. तेव्हाच मी समजलो की शाब्दीक बुडबुड्यांच्या जिलब्या टाकण्या शिवाय पेक्षा लेखक अधिक काही करु शकत नाही.

माफ करा पण इतरांना उपदेशांचे डोस पाजणे आणि आत्मप्रौढी हे प्रकार तुमच्या लेखनात खूपदा असतात.या तीनही भागांमधून नक्की काय म्हणायचे आहे हे अजिबात न कळलेल्यांमध्ये मी पण एक आहे.

हात्तिच्या! म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः एवढी साधी सोपी समोर असलेली गोष्ट तुम्हाला दिसत कशी नाही हेच आश्चर्य आहे! एकदा ह्या गोष्टीचा तुम्ही बिनशर्त स्वीकार केलात की सगळंच कसं सोप्पं सोप्पं!

एखादी गोष्ट जर समजत नसेल तर त्याला रूपकाचे रूप द्यावे. रुपकाचे रूप लेवून आलेले लिखाण आपले रूप बदलून आलेले असते. त्यामुळे मूळ रुपातील गोष्ट एकदा रुअक या रूपात आली की ते मोहक रुपडे रोचक वाटते. या रूपातील रुपवती कथेला पुन्ह रूपकातील रूपकाचा साज दिला त र्ते अबोध दुर्बोध न होता सुबोध व्हाचे अशी लेखकाची इच्छा बलीयसी. पण वाचकाला जर त्या रुपाचा मोह पडत नसेल तर रुपकाचे रूप टाकून देवून मूळ स्वरूप धारण कराएव असे रूपही जर वाचकास समजत नसेल तर कथाकाराने आपले रूपगर्वी न रहाता आरशात पहावे लेखनाचे उत्खनन करावे आणि सार बाळबोध रूपात वाचकासमोर आणावे.

विजुभौ, दंडवत स्विकारा! अतिशय समर्पक आणि यथार्थ प्रतिसाद, शब्दाशब्दाशी सहमती!! स्वगतः सोक्या, चक्क विजुभौशी सहमत व्हायची वेळ आली की ;) - (लेख लिहून गंगार्पण करणारा) सोकाजी

हे नक्की काय चालू आहे? दोन-तीन वेळा वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केला पण कुठचे काय. कशाचाच पत्ता लागला नाही. बहुदा मी हा प्रकार 'बेशर्त' (म्हणजे नक्की काय? बिनशर्त हा शब्द ऐकला होता) स्विकारलेला नाही असे दिसते. :)

इतके लाख लोक जातायतनं तिकडे, लावतायंत न रांगा, जोडतायतना हात? म्हणजे तो असणारच! या उलट, ज्याला कळलंय तो निश्चिंत असतो, त्याला इतरांच्या अनुमोदनची वाट पाहावी लागत नाही.

मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांना
त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच मूळ प्रश्नाचे उत्तर न देण्याची हातोटी वाखाणण्या सारखी आहे ! ;) तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा. तुम्ही त्यांचे लेखन "मन" लावुन वाचलेच असेल... आणि तसे असेल तर ते तुम्हाला कळलेच असेल असे गॄहीत धरुनच मी माझा प्रश्न विचारला आहे / होता. ;) आता तरी मूळ प्रश्नाचे उत्तर द्या.

तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा
एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा.

एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा. इथे आता अनेकांना संक्षी पूर्ण समजले आहेत. आम्हाला तुम्हाला समजलेले संक्षी आम्हाला जाणुन घ्यायचे आहेत. तुम्ही विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर देण्याचे शिताफिने टाळले आहे.आम्हाला आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतील>> स्पाचंद्रजी, तुम्हला माहित नाही का संक्षी हे नेहमी फेसलेस मॉबसाठी लिहितात. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आपल्याला आपण स्वतःच दिसत असतो. त्यामुळे संक्षी कसे आहेत हे त्यांना स्वतःला त्यांचे स्वतःचे लेखन वाचल्यावर कळेल. आणि मग त्यांनी ते आपल्याला सांगितले तरच आपल्याला कळेल. अवांतरः वैयक्तिक प्रतिसाद देउ नक रे पोरांनो. संक्षी कसे आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचय?

अनेकांना सावरकर-गांधीजी कळत नाहीत तशातला संक्षी न कळणे हा प्रकार आहे का? :)

अगोदर लेख कळला नाही आता प्रतिसादही डोक्यावरून जाताहेत.. आधी मन आणि शर्ती होत्या.. मग प्रेम उपटले .. आता तर गोष्टी किचन मध्ये पोहोचल्या आहेत... मला तर फक्त "शर्ती" संपून "शर्यती" सुरु झाल्या आहेत असेच वाट्ते. उगा एक विंग्रजी क्याप्श्न आठवले.. If you can not convince people , confuse them!

ज्यासी नाही बोध तो करतो दुसर्‍यास मन बोध चुकलेली वाट ज्याची, तो काय दाखविल मनमुक्तिची अवघड वाट. पेठकर काकांशी पुरेपुर सहमत.

मनाचिया गुंती गुंतला तुम्ही भ्रमरूपी भ्रमर डसलासी. आम्ही कोणासंगे तुम्हास होइल माहीत ठेवा नेहमी सहवास सज्जनांसंगे.

लेखाप्रमाणेच अतिअतिअवांतर - कोपऱ्यात उभी हिंदमाता आणि बेमटेरावांच नाव घेण्यात माझा नंबर पहिला – इति पु.ल. (असामी असामी)

लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो. स्वतःकडे आणि आजुबाजूला पाहिलं तर परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार तर जाऊदेच, उलट परिस्थिती पूर्णपणे नाकारणे, डिनायल, डोळे मिटून दूध पिणे... अप्रिय वाटणार्‍या स्थितीला ती जणू नाहीच आहे असं समजून चालणे..असं एक आभासी-पॉझिटिव्ह टोक दिसतं- किंवा मग ती स्वीकारली आहे म्हणजे- चरफडत, नशिबाला बोल लावत, हतोत्साह होऊन "पत्करली" आहे.. प्राक्तन म्हणून झेलतो आहे असा दुसर्‍या टोकाचा ऋण अप्रोच दिसतो. या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच. आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय. लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात. शेवटी "ठेविले अनंते" चे उत्तम उदाहरण दिले आहे. यातला अनंत (नको असल्यास) वजा करुन हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्याला अन्य मार्गांनी फिरवून आणल्याने संभ्रम वाढू शकतो. तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा. त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.

गविंशी सहमत. विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.. हे तर अगदीच योग्य आहे. पण स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही. वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत. पण 'बाकी सगळे व्यर्थ, आणि मी सांगेन तेच बरोबर' हा टोन कुणीही कुठेही खपवून घेत नाही. शिवाय अनेकांसाथी अनेक संत, साधना सांगणारे गुरु हे त्यांच्या आईवडलांपेक्षाही जास्त जवळचे-पूजनीय असतात. त्याम्च्यावर विनाकारण टीका झाल्यास लोकांचा रोष ओढवणारच. लेखकानी त्यांचे स्वतःचे अनुभव योग्य शब्दात खुशाल मांडावेत. पण लोक कसे मूर्ख आहेत आणि मी कसा त्यांना शहाणं करायला आलोय, हा टोन बदलावा, अशी विनंती.

स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही. वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत.
हं. मी असं म्हणायला हवं होतं की (वाचक अनुभवी असले तरी) संक्षी यांना आलेली ती विशिष्ट अनुभूति किंवा त्यांच्या मनात घडलेल्या त्या नेमक्या विशिष्ट विचारप्रकियांचाच अनुभव वाचकांना आलेला नसू शकत असल्याने (त्यांना काही आपापली वेगळी अनुभूती आली असेल.) त्यांचा गोंधळ उडू शकतो.. (बरेच ज्यादा शब्द वापरुन आणि अनेक अनावश्यक तुलना करुन विचार मांडले की). शिवाय मी एकटा शहाणा आणि तुम्ही सारे मूर्ख असा टोन असणं चुकीचंच, पण आपल्याला मनापासून पटलेला मुद्दा समोरच्याच्या मनातही उतरावा अशा तीव्र इच्छेने कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो. माझं म्हणणं इतकंच आहे की विचार थोडक्यात मांडावा म्हणजे समोरच्याला स्पष्टपणे पटायला मदत होईल. यामुळे नंतर मेगाबायटी प्रतिसाद आणि क्वोटस देऊन खंडनमंडन करावं लागणार नाही. त्याउपर नाही पटलं तर फार रेटण्यात अर्थ नाही हे धोरण ठेवल्यास बरेचसे अस्थानी वाद टळतील हे महत्वाचं.

मला वाटातं की संक्षी नी "विचाराला" महत्व द्यावे... त्या विचारावे "त्यांच्या" आयुष्यात काय झालय त्याला नाही.. तो "माझा" विचार आहे.. "मला" अनुभुती आली आहे त्यामुळे "तोच योग्य आहे".. अशा गरज नसलेल्या गोष्टी लिहीणे टाळावे.. तसं झालं तर लोकही "विचारलाच" महत्व देतील.. "संक्षी" ना नाही... आणि हो.. जे काही असेल ते सरळ लिहावे.. उगा शब्दांचे मनोरे रचु नयेत...