Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आम्ही पण अकुशल कामगारच आहोत. डॉक्टरांना लागतील त्या वस्तू हातात नेऊन देणे, सलाईन तयार करणे आणि संध्याकाळी कचरा गोळा करून पेटवणे एव्हढेच आमचे काम. :))

सहि रे प्रथम , खूपच भारी . लोकांच्या सहनशक्तीची पण बाकी कमाल , खरच विठ्ठलालाच त्यांची काळजी

उपक्रम आणि फोटो दोन्हि स्तुत्य. खरचं एकदा वारी अनुभवायचीच आहे. ईकडे राहुन तो चान्स कधी मिळणार हे तो विठठलच जाणे.

वारीचा अनुभव घेण्याची अज्जिबात इच्छा नाही. पण डॉक्टर मंडळी आणि तुम्ही सर्व त्यांचे साहाय्यक, ह्यांच्या सेवाभावी वृत्तीला आदरयुक्त प्रणाम. तुम्ही करीत आहात तीच खरी इश्वर सेवा. कांही आर्थिक मदत हवी असल्यास व्यनि करावा. बाकी इतक्या दूर असल्याने शारीरीक मदत अशक्य आहे.

एकच सल्ला. कॄपया कचरा पेटवू नका. विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा नेचरफ्रेंडली मार्ग शोधा ही विनंती.

आदिजोशी तो मेडीकल कचरा आहे. अन तो पेटवणे हाच योग्य मार्ग आहे. नाहीतर महानगर पालिकेत जाऊन पैसे भरुन तो नष्ट करावा लागतो.

वाह प्रथम उत्तम उपक्रम डॉक्टर मंडळी आणि तुम्ही सर्व त्यांचे साहाय्यक, ह्यांच्या सेवाभावी वृत्तीला आदरयुक्त प्रणाम. बाकी मोदक ह्यांच्याशी १००% सहमत.

चांगला उपक्रम आहे. असे अनेक लोक सातत्याने काही ना काही प्रयत्न करत असतात चांगला बदल घडवून आणण्याचा. ही आशादायक बाब आहे. पण अर्थात बदल व्हायला अजून "बरेच काही" व्हायला हवे -तुमचा वाटा तुम्ही उचललात हे कौतुकास्पद आहे.

@ यशोधरा , सुधीर , नि३ - सर्वांचे धन्यवाद. कोणालाही येण्याची इच्छा असल्यास पुढील वर्षी नक्की या. १० लाख वारकर्‍यांच्या सेवेसाठी ६०-७० जण कमीच पडतात. @ पेठकर काका - आर्थिक हातभाराची गरज भासतेच. एका दिवसाच्या शिबीराचा खर्च अंदाजे ३-३.५ लाख रुपयांच्या आसपास येतो. आणि हा सगळा भार मंचाला स्वतःच्या बळावर उचलता येत नाहीच. पुढल्या वर्षी नक्की सांगेन. @आदिजोशी - या विषयावर डॉक्टर मंडळींशी मी चर्चा केली. काही दुसरा मार्ग अवलंबता येईल का याबद्दल बोललो. बराचसा कचरा हा सिरींजेस, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या असा प्लॅस्टिक स्वरूपात असतो. त्यामुळे जमिनीत पुरणे हा उपाय करता येत नाही. तसंच सगळा कचरा गोळा करून सोबत आणून इकडे त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणं हा प्रचंड किचकट, खर्चिक आणि अशक्यप्राय उपाय आहे. कारण एका दिवसाच्या शिबीरात अंदाजे ६०००-८००० सलाईन्स लावली जातात, १५०००-२०००० इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे इतका प्रचंड कचरा सोबत आणणं शक्य होत नाही. तरी या विषयाबद्दल काहीतरी दुसर्‍या मार्गाबद्दल विचार चालू आहेत.

सगळा कचरा गोळा करून सोबत आणून इकडे त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणं याचे कारण कळाले नाही. निव्वळ विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईपर्यंत कचरा वागवण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. प्रत्येक शिबीराच्या जवळपास एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची सिस्टीम तयार असेलच (अशी आशा आहे!) तुम्ही फक्त त्यांना तुमचा कचरा सप्रेम भेट द्यायचा. आणखी निश्चिततेसाठी एखाद्या आरोग्य मंत्र्याकडून / तत्सम अधिकार्‍याकडून वारीमार्गावरील कोणत्याही प्रा.आ. केंद्राला "असा कचरा विनातक्रार स्वीकारण्याचा विनंतीवजा आदेश" बनवून घ्या.

एस. टी. वाल्यांशी बोलून असा कचरा तालुक्याच्या सरकारी रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची सोय करता येते का ते पहा.

मस्तच. मी ही आर्थिक मद्त करु शकेन. प्लीज पुठ्च्या वर्शी जरा लवकर सांगाल म्हणजे मदत वेळेत पोहोचवता येईल.

भ्येटशिला तवा 'माऊलीऽऽ' म्हणून पाया पडिन गा. सध्या यवडा व्हर्चुअल दंडवतच घ्या.

फारच चांगला उपक्रम! दंडवत घ्या. पुढच्या वर्षी काही करता येईल का ते तेव्हा पाहू. मिपावरून काही लोक एकत्र जाऊ शकतात का ते.

छान उपक्रम.
दिंडीच्या गाडीत बसून यायचंस, या डॉक्टरांच्या सल्ल्यावर "पायी वारी केली न्हाई तर इठोबा कसा पावणार आमाला?"
अरेरे. या लोकांना शारिरीक उपचारांबरोबर मानसिक उपचारांचीही गरज आहे.

उत्तम उपक्रम, दर वर्षी उत्साहाने सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांचे अभिनंदन, फोटो मलाही दिसत नाहिये.