Welcome to misalpav.com
लेखक: श्रीरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सिनेमा पाहण्याचं दुर्भाग्य अजुन वाट्याला आलेलं नाहीये, पण शिरिन आणि साईनाथचं लग्न, एम.के.ला उगं यक्ष्ट्राचा रोल असल्यासारखं कचर्‍यात काढणं आणि श्रेयसचं शिरिनशी लग्न होणं, पुढे श्रेयस खपणं ह्या एव्हढं भांडवल संपुर्ण टीमची आयमाय काढायला पुरेसं आहे. सध्या घाईत आहे, सविस्तर श्राध्द सवडीनं घालायची इच्छा आहेच. अगदी दर्भापासून दहाव्याच्या कावळ्यापर्यंतची सगळी सोय आम्हीच करु, पण एक तेव्हढं मर्तिक मात्र निभवलंच पाहिजे अशी मनापासून तळमळ आहे. अग्गदी...कालच हेमांगीच्या चेपूच्या भिंताडावर लिहिलं की दुनियादारीचं मातेरं करु नये इतकीच काळजी वाटते आणि आज हे दिव्य प्रताप कळाले. सु.शिं.च्या ताजमहालाला आपल्या पदरच्या फुटक्या विटा जोडण्यामागं चिन्मयबुवा मांडलेकरांचा नक्की काय हेतू होता तो एकदा कळालं म्हणजे आम्ही सुखानं प्राण सोडू. वर आणि डायरेक्शनचे भीषण प्रकार, सोबतीला वेशभूषेची लक्तरं....हरे राऽम!!! बरं झालं आमचा सु.शि. जिवंत नाही ही दुनियादारीची धिंड काढलेली पहायला. :(

नाही .. चित्रपट पाहिल्यावर जाणवेल तुम्हाला.. मांडलेकरांनी स्वतःच्या फुटक्या विटांचंच काहितरी बांधलंय, आणी त्यावर फक्त "ताजमहाल" अशी पाटी लावली आहे. ताज महाल चहाचा आग्र्याच्या ताज महालाशी जेवढा संबंध आहे, तेवढाच मांडलेकरांच्या दुनियादारीचा सु.शिं च्या दुनियादारीशी आहे.

बाकी, ते म्हैसचं ट्रेलर बघून केव्हाच डोक्यात तिडीक गेलीय.
संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत.
यासाठी +१

लेख वाचून खूप मानसिक समाधान मिळाले, कारण पुण्यात असतो तर हा सिनेमा पहिल्या शो ला बाल्कनी मध्ये बसून पहिला असता. नंतर आलेला मनस्ताप मैफिल (कलिंगा हॉटेल च्या खाली)मध्ये ३-४ तास बुडवून पण पुढचा आठवडा खराब गेला असता. नशिबाने आत्ता ती वेळ आली नाही आणि मनाला (ओंगळ)"दुनियादारी" बघायची रुखरुख पण राहिली नाही. धन्यवाद् !

एस्क्युज मी! ते 'महफील' असं आहे हां. असं आपल्या आवडत्या जागांच्या नावाची तोडमोड नै कराची हां. ;)

दुनियादारी ची college मध्ये असताना अक्षरशः पारायणं केली होती . इतका जिव्हाळ्याचा विषय आहे माझा ती कादंबरी की पुढच्या महिन्यातल्या India trip मध्ये "must do " च्या यादी मध्ये हा चित्रपट ठेवला होता. आता नाही जाणार . ती कादंबरी "classics " मध्ये मोडते. मला फार च मनस्ताप झाला असता सिनेमा बघून . परीक्षणाबद्दल धन्यवाद. मराठी मालिका आली होती खूप वर्षांपूर्वी याच पुस्तकावर. मूळ कथेशी बरीच प्रामाणिक आणि मुख्य म्हणजे "casting " योग्य होतं . शर्वरी जमेनीस , आशुतोष कुलकर्णी वगैरे सगळे त्या वेळचे नवीन पण चांगले कलाकार होते. ती सुद्धा मधेच बंद पडली मला वाटतं . या पुस्तकावर चांगली कलाकृती बनवणं कदाचीत खूप अवघड काम असेल.

सुशि स्वतः नाराज होते मालिकेवर. जे काही कथेचं कडबोळं केलं होतं त्यावरुन. शिवाय आमचा एक मित्र त्या मालिकेत काम करायचा, तो दरवेळी भेटला की "दुनियादारीची काय वाट लावतोय रे आम्ही..." असं म्हणून आईबहिणीवरुन कचकून शिव्या घालायचा. पण एकुण पाहता, ती मालिका परवडली असं म्हणायची वेळ येते की काय असा प्रश्न पडलाय मला.

((चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे...) चि.मा. ने 'तू तिथे मी' सिरीयलची माती केलीये तिथे चित्रपटाचं काय?

"मूळ 'दुनियादारी' पडद्यावर आणताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं अपरिहार्य बनतं. कादंबरी वाचलेल्यांना कदाचित हे स्वातंत्र्य पटणार नाही. परंतु, हे स्वातंत्र्य घेताना पटकथेला हिसके बसणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमा एकसंध बनला आहे." असंही लिहिलंय म टा मध्ये. हिसके बसणार नाहीत? उद्या रामायणावर चित्रपत बनवा. त्यात दाखवा, भीम रावणाला सामिल होऊन रामाशी युध्द करतो असं. आणी म्हणा परत अशी लिबर्टी घ्यावीच लागते, म्हणून.

असंही लिहिलंय म टा मध्ये. हिसके बसणार नाहीत? उद्या रामायणावर चित्रपत बनवा. त्यात दाखवा, भीम रावणाला सामिल होऊन रामाशी युध्द करतो असं. आणी म्हणा परत अशी लिबर्टी घ्यावीच लागते, म्हणून.
आणि महाभारतात दुर्योधनाबरोबर राम असतो व राम विरुद्ध अर्जुन असे युद्ध रंगते इ.इ.इ.

वाटते की ह्या पोदल्यांनी जरातरी वजन कमी करायला हवे होते. ते तुकाराम महाराज साईनाथ म्हणुन कितपत शोभतील ? कोणी काटकुळा मिळाला नाय काय ?

ह्या पिक्चर च ट्रेलर पाहून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मराठी तरुण कलाकारांच स्वताहाच्या शरिराकाडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. नसीर च्या एका मुलाखतीत तो म्हाणाला होता की शरीर हे अभिनेत्याच आयुध असते. पण स्वप्निल जोशी , जितेंद्रा जोशी साारखे पोटेन्षियल असणारे कलाकार याकडे जे दुर्लक्ष करतात ते बघून वाईट वाटत. जुन्या सिनेमात पण पोट हलवत नाचणारे लक्ष्या आणि अशोक सराफ झरकन आठवून गेले. बाकी अभिनेत्यांबद्दल पण (अतुल कुलकर्णी सारखे काही अपवाद वगळता) हीच बोंबाबोंब दिसते. पिक्चर च ट्रेलर मध्ये तरी तेच जुने अभिनेते कॉलेज कुमारांच्या भूमिकेत पाहून चित्रपट 'थकेला' असणार असे वाटत होते. हा चित्रपट बघितल्या जाणार नवताच.

असं नाय हां... http://www.youtube.com/watch?v=M2h0PTS2WCg यातला ड्यान्स बघा! विशेष म्हणजे जमिनीवर हात ठेवून गोल गोल फिरण्याची स्टेप. पोटबीट काही असलं तरी हा ड्यान्स महान आहे!

तुमच परीक्षण वाचून सुद्धा हि चित्रपट बघायची रिस्क घेणारे.. बघुया..

यापुढे 'चिन्मय मांडलेकर म्हणजे X ' हे समीकरण पक्कं केल्याबद्दल टीम दुनियादारीचे मनःपूर्वक आभार! मूळ कादंबरीतच एवढं नाट्य असताना हे असले सगळे टुकार प्रकार करायची अवदसा का आठवली असावी यांना? उदाहरणार्थ - श्रेयस.. दिग्याला शहाणं वागायला सांगणारा यश स्वतः मात्र लग्नमंडपात धिंगाणा घालतो? मिनू.. दारू पिऊन पोरांच्या हाॅस्टेलवर?? साई.. शिरिनचा भावी नवरा??? या साईची नि दिग्याची खुन्नस का, हे तर दाखवायलाच विसरलेत लेखक महोदय. त्याहून कहर - एम के.. चक्क आत्महत्या?? हा तर घोर गुन्हा आहे. प्रेमात हरल्यानंतर आयुष्यभर स्वतःचं अोळख मिटवून तरीही स्वतःला जगत राहण्याची शिक्षा देणारा एमके.. असा आत्महत्या करेल? ट्रेलरमध्ये जे पात्र सर्वात अपेक्षाभंग करत होतं ते - दिग्या.. मात्र फर्मास जमला आहे. शरीरयष्टीमधली उणीव अंकुश चौधरीने अभिनयातून उत्तम भरून काढलीय. म्हाताऱ्या दिग्याचा (होय होय.. म्हातारा दिग्या!!) सीनही त्याने क्लास केलाय. हा सिनेमा पाहिल्याचे प्रायश्चित्त म्हणून आता पुन्हा एकशेआठ वेळा दुनियादारी वाचण्याचा संकल्प सोडत आहे!

इनि, मला दे नं ते पुस्तक. तसंही पुस्तकावरुन सिनेमे काढले की वाटच लावतात! शाळेचं तेच केलं. Vinci code ची पण वाट लावलेली. अजूनही असतील.

तसंही पुस्तकावरुन सिनेमे काढले की वाटच लावतात!
असं कै नै हां!! लॉर्ड ऑफ द रिंग्ज व हरी पुत्तर हे सणसणीत अपवाद आहेत त्याला. बॉर्न सेरीज पण तशीच!

अजुन या यादी मधले अप्रितम चित्रपट म्हणजे : फोरेस्ट गंप, द हेल्प , इन टू द वाइल्ड, द नोटबुक इ. खूप चांगले चित्रपट निर्माण करता येतात, फक्त तशी इच्छा पाहिजे.

दिलेल्या यादीतले पिच्चर बुकांवरून घेतले आहेत हे माहिती नव्हतं, रोचक आहे.
खूप चांगले चित्रपट निर्माण करता येतात, फक्त तशी इच्छा पाहिजे.
पूर्ण सहमत! इच्छा अन इच्छाशक्ती दोन्ही असल्यास माष्टरपीसेस बनायला वट्ट हर्कत नस्ते. "अ ब्यूटिफुल माईंड" हे अजून एक उदाहरण त्यावरून आठवले.

सिनेमातली फक्त गाणी छान आहेत. आणि स्मिता पाटील छान आहे. बाकी बोअर झालाय सिनेमा. ते पुस्तक वाचतानाजितके स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे रहाते तित का इफेक्ट सिनेमातून येत नाही. ३ दिवसापूर्वीच पुस्तक वाचलंय, त्यामुळे त्याचा इफेक्ट ताजा आहे. :)

हो लिगोंबावरच्या महादेवाचे वर्णन पुस्तकात बर्‍याच वेळा येतं पण ते वाचताना प्रत्येकवेळी वेगळं वाटतं. पुस्तक सर्वोत्तम आहे वादच नाही. पण मला चित्रपटही आवडला.

हरी पुत्तर हा अपवाद नाही हा... जे काही रोलिंग बाईंनी लिहिलय ते नाय दाखवायला जमल. म्हटल तर पहिले दोन भाग जरा बरे होते.. बाकि ९०% पिक्चर बकवासच पुस्तकावरुन घेतलेले. खाली विजुभौनी लिहिलय ते १००% बराबर हाय

पुस्तकापेक्षा उजवा चित्रपट "थ्री इडीयट्स" गाईड ( हिन्दी) मुळात पुस्तकापेक्षा उजवा डावा असा शब्द प्रयोग चुकीचा आहे. लेखक जे लिहेतो अन वाचक ते वाचताना स्वतःचे इमॅजिनेशन करून मनात रंगवत असतो. कॅमेरा या माध्यमाला मर्यादा आहेत. उदा एखाद्या मोठ्या झुम्बराचे / महालाचे वर्णन लेखक तीन चार किंव अधीक पाने रम्गवू शकतो. कॅमेरा बिचारा तेच झुंबर्/महल तीन सेकंदात दाखवून मोकळा होतो. लेखकाने जर लिहीले की दोन खट्याळ मुले तेथे आली. हे एक वाक्य मात्र कॅमेराला दाखवायला निदान दोन मिनीटे लागता. ( खट्याळ मुलांचा खट्याळपना एस्टॅब्लीश करावा लागतो.) एख्काद्या स्त्रीचे सौदर्य दाखवताना लेखक कवी तीच्या डोळ्यांच्याची तुलना नक्षत्रांशी करतो. कॅमेरा बिचारा फक्त डोळे दाखवु शकतो. वाचकाने मनात रेखाटलेल्या चित्राना कॅमेरा जसेच्यातसे रेखाटू शकत नाही. किंवा तो अनुभव दर्शकाला देवू शकत नाही. अर्थात एखादी सुकुमार कमल नयना सुवर्णकांतीची वेणीची नागीण गजगामिनी असे वर्णन केलेली स्त्री दाखवताना कॅमेरामन ने अलका कुबल/सवीता प्रभुणे/प्रिया अरूण दाखवली तर दर्शक तेथे आपल्या इंमॅजिनेशन ने मधुबाला/माधुरी दिक्षीत्/वर्षा उसगावकर कल्पु शकत नाही

मी हा चित्रपट दुपारी पाहून आलो. पाहण्याच्या आधी तुमचे हे परीक्षण अर्थातच वाचले नव्हते. आणि मला चित्रपट पाहील्याचा पश्चातापही होत नाही. उलट छोटया भावाला आवर्जून चित्रपट पाहण्यास सांगितले. कॉलेजमध्ये असताना जेव्हा "फिक्शन" खात असे, तेव्हापासून सुशिंची दुनियादारी मनात घर करुन राहीली आहे. तुम्ही म्हणताय तशी चिन्मय मांडलेकरांनी सुशिंच्या या अजरामर कलाकृतीला ठीगळं लावली आहेत यात शंकाच नाही. परंतू आपण वाचकांनी चित्रपट पाहायला जाताना तो चित्रपट मुळ कादंबरीशी तंतोतंत जुळणारा असेल अशी अपेक्षा का ठेवावी? कादंबरी हे वेगळं माध्यम आहे आणि चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. कलाकृती एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात रुपांतरीत करताना मुळ कलाकृतीतील काही गोष्टींना फाटा मिळणार, काही गोष्टी नव्याने टाकल्या जाणार हे अध्याहृत आहे. शिवाय हे रुपांतर करताना रुपांतर करणार्‍याच्या क्षमतेनुसार गुणवत्तेतही फरक पडणारच. शिवाय आर्थिक गणितं असतात. चित्रपट पाहण्यासाठी केवळ त्या पुस्तकाचे भक्तगण येत नसतात तर पुस्तक वाचनाचा गंधही नसलेले चित्रपट पाहत असतात. त्यांनाही चित्रपटामध्ये काहीतरी मिळायला हवं ना? उणिवा असल्या तरीही आपली आवडती कादंबरी पडदयावर जिवंत होतेय याने आनंदी व्हायचे सोडून पुस्तकात असं आहे आणि चित्रपटात तसं आहे असा गळा काढण्याला काय अर्थ आहे?

मी हा चित्रपट आज दुपारी पाहून आलो. पाहण्याच्या आधी तुमचे हे परीक्षण अर्थातच वाचले नव्हते. आणि मला चित्रपट पाहील्याचा पश्चातापही होत नाही. उलट छोटया भावाला आवर्जून चित्रपट पाहण्यास सांगितले. कॉलेजमध्ये असताना जेव्हा "फिक्शन" खात असे, तेव्हापासून सुशिंची दुनियादारी मनात घर करुन राहीली आहे. तुम्ही म्हणताय तशी चिन्मय मांडलेकरांनी सुशिंच्या या अजरामर कलाकृतीला ठीगळं लावली आहेत यात शंकाच नाही. परंतू आपण वाचकांनी चित्रपट पाहायला जाताना तो चित्रपट मुळ कादंबरीशी तंतोतंत जुळणारा असेल अशी अपेक्षा का ठेवावी? कादंबरी हे वेगळं माध्यम आहे आणि चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. कलाकृती एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात रुपांतरीत करताना मुळ कलाकृतीतील काही गोष्टींना फाटा मिळणार, काही गोष्टी नव्याने टाकल्या जाणार हे अध्याहृत आहे. शिवाय हे रुपांतर करताना रुपांतर करणार्‍याच्या क्षमतेनुसार गुणवत्तेतही फरक पडणारच. शिवाय आर्थिक गणितं असतात. चित्रपट पाहण्यासाठी केवळ त्या पुस्तकाचे भक्तगण येत नसतात तर पुस्तक वाचनाचा गंधही नसलेले चित्रपट पाहत असतात. त्यांनाही चित्रपटामध्ये काहीतरी मिळायला हवं ना? उणिवा असल्या तरीही आपली आवडती कादंबरी पडदयावर जिवंत होतेय याने आनंदी व्हायचे सोडून पुस्तकात असं आहे आणि चित्रपटात तसं आहे असा गळा काढण्याला काय अर्थ आहे?

अहो, मूळ कथेशी थोडीफार फारकत समजू शकतो. एखादं नाव बदलणे, एखादे पात्र घुसवणे, कादंबरीतल्या काही प्रसंगांना छाटणे, इत्यादि. परंतु, आता हेच पहा.. पुस्तकातला श्रेयस, शिरीनचे लग्न ठरल्याचे समजल्यावर, तिच्या होणार्या नवर्यावर अन्याय नको म्हणून स्वतः दूर होतो.. चित्रपटात मात्र लग्नात जाऊन धुडगूस घालून थेत तिला पळवूनच आणतो. चित्रपटाचा उत्तरार्ध तर कादंबरीपेक्षा संपूर्णतः वेगळा आहे. फक्त पात्रांची बावं ती ठेवायची होती, तर उगाच शिरवळकरांच्या कादंबरीवर चित्रपट बनवल्याचा खोटा दावा का करावा? वाचकांचं प्रचंड प्रेम असलेल्या कादंबरीवर चित्रपट बनवल्याचं सांगून प्रेक्षक खेचायचे, आणी दाखवायचं भलतंच, ही शुध्द फसवणूकच नव्हे काय?

पुस्तकातला श्रेयस, शिरीनचे लग्न ठरल्याचे समजल्यावर, तिच्या होणार्या नवर्यावर अन्याय नको म्हणून स्वतः दूर होतो
-१०० श्रेयस, शिरिनला त्रास होऊ नये म्हणून दूर होतो. आणि शिरिन तिच्या वडीलांसाठी ते लग्न करायला तयार होते. चित्रपट अगदीच टाकाऊ नाहिये. नाहीतर आत्ता खेचत आहे तेवढी पण गर्दी खेचू शकला नसता..

इन फॅक्ट हयात असलेल्या कुठल्यातरी मोठ्या मान्यवर लेखकाच्या बाबतीत चित्रपटकर्त्यांना इतक्या निर्भयतेने असं करता आलं असतं का? चेतन भगतनी श्रेय मिळालं नाही म्हणुन आमीरसारख्याच्या ही नाकी नऊ आणले होते. इथे तर सु.शिं चं नाव वापरून स्वतःला वाट्टेल ती कथा दाखवण्यात येते आहे. शिरवळकरांच्या वतीने भांडायला कोणीही उभे राहणार नाही, असा निर्लज्ज आत्मविश्वास तर यामागे नसावा?

DUNIYADARI..................................KHUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUP AWADALA................Ekadatari THEATERmadhye jaun pahilach pahije...................Thanks a lot ENTIRE TEAM of DUNIYADARI......................... हे मि फेस बुक आलेलि कोमेन्त्स आहे, आनि दुसरि हि पिच्तुएर बघित्ल्य नन्तर्चि अॅड. मीताली कुलदीप सावळेकरposted toVachoo Aanande Please can anybody tell me where ill get to Read Duniyadari online????????????

पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे.
क ह र!!!!. मनापासून धन्यवाद गुरूजी, कातड्याचे जोडे करुन तुमच्या पायात घातले तरी उपकार फिटायचे नाहीत. ह्या सिनेमाची लायकी कळाली. अजून तरी ही ठिगळं थेटरात पैसे घालून पाहिली नाहीत हे माझे परमभाग्य. आता जास्त डोक्याला न लावून घेता पुन्हा एकदा गॉडफादर पाहतो.