=)) =))
काही बोलणे धोक्याचे आहे यावर, उगीच पाशवी हल्ला होऊन धागा हायज्याक स्पॅरो करतील आंतरजालीय चाच्यांप्रमाणे =))
नोंदः चाच्या हा शब्द इथे चाचे या शब्दाचे अनेकवचनी स्त्रीलिंगी रूप म्हणून वापरला आहे.
मुलं जशी असतील त्याला सर्वस्वी आई-वडील जबाबदार असतात असं माझं मत आहे. नुसतच हे करू नका, ते करू नका असं सांगून उपयोगाचं नाही. त्यासाठी स्वतः तसं वागायला हवं. त्यासाठी वेळ मुलांसाठी द्यायला हवा. आणि हे योग्य त्या वेळेतच करायला हवं. एकदा वेळ निघून गेली की उपयोग नाही.
परवाच घरी एक मित्र त्याच्या तीन वर्षाच्या (उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या) मुलाला घेउन आला होता. त्याच्या जेवायच्या वेळेला मला काँप्युटर चालू करून त्यावर यु-ट्युबमधून ठरावीक कार्टूनच लावावं लागलं. वरती, 'माझं पोरगं कसलं हुशार आहे. तेच कार्टून आणि तोच भाग बघितल्याशिवाय जेवतच नाही" हे आई-बाबाच्या डोळ्यात कौतुक!
परवाच घरी एक मित्र त्याच्या तीन वर्षाच्या (उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या) मुलाला घेउन आला होता.
हॅहॅहॅ... असंच एक नमुना माझ्या मामे-भावाच्या मुलाच्या वाढदिवसात पाहिला होता ! घरात आल्या आल्या सर्व पोरांच्या डोक्यावर असणार्या छोट्या कागदी टोप्या फाडुन टाकल्या ! त्या टोपींचे गळ्याभवती बसणारे रबर कसे भराभर तोडायचे त्याचे प्रात्यक्षिक इतर मुलांना दाखवले. शिवाय हातात मिळेल त्या वस्तुंची वाट लावली ! त्या तोडल्या तरी किंवा फाडल्या तरी... शिवाय शोकेस मधे ठेवलेल्या प्रत्येक वस्तुंशी त्यानी खेळ खेळला,वीजेची २-४ बटनांशी खेळ खेळुन पाहिला... काही वेळाने त्या उध्योगी पोराच्या मातोश्रींचे आगमन झाले,त्यांचा एकंदर पेहराव आणि मुलाकडे केलेले पूर्ण दुर्लक्ष्य यातुनच मी काय तो बोध घेतला ! आणि त्या मुलाच्या अविरत मर्कट लिला पाहुन माझे मन क्षुब्ध होउन माझे टाळके सटकु नये म्हणुन माझी नजर मी केकवर स्थीर केली. ;)
दादा साहेब,
काय उत्तम शब्द आहेत. अगदी मनातले बोललात. अशी विधुळवाटी मुले आणि त्यांचे हुशार पालक आपल्याला सर्वत्र दिसतात आणि या मुलांनी केलेला विध्वंस जरी तिसर्याच्या घरात असेल तरी आपल्याला पाहवत नाही. आणि अशा पोराच्या एक सणसणीत कानाखाली मारण्यासाठी हात शिवशिवतात.
माझ्या डॉक्टर बंधूला एक लग्नात जेवताना शेजारच्या सद्गृहस्थाने मलविसर्जनास त्रास होतो ..याचे यथोचित वर्णन करून "सध्या 'भजीसारखे' होत असून ते 'श्रीखंडासारखे' झाले पायजे बघा "..
असा सल्ला मागितला होता ..अजूनही त्याच्या समोर भजी , श्रीखंड आले की तेच आठवते ..
मानवी स्वभाव बघितला तर या लेखातल्या आणि प्रतिसादांतल्या मुद्द्यांतील उदाहरणे कधीच संपणार नाहीत... पण तरीसुद्धा माझे दोन पैसे...
१. डॉक्टर एक जिवनावश्यक सेवा पुरवणारा व्यावसायिक आहे. पण तो एक माणूसही आहे.
२. व्यावसायिक वेळेत डॉक्टरतर्फे १००% व्यावसायिक वागणूकीची अपेक्षा ठेवण्यात काहीही गैर नाही, किंबहुना तसे वागणे डॉक्टरचे कर्तव्य आहे.
३. त्याबरोबरच डॉक्टरही माणूस असून त्याला त्याचे जीवन, कुटुंब, सगेसोयरे, सुखदु:ख आहेत आणि व्यावसायिक वेळेव्यतिरिक्त इतर वेळेस व्यवसाय बाजूला ठेवून दोन क्षण स्वतःसाठी खर्च करायचा हक्क आहे, याचे भान इतरांनी ठेवले पाहिजे. किंबहुना तसे करणे समाजातील इतर घटकांचे कर्तव्य आहे.
४. डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा अशीही बर्याच जणांची अपेक्षा असते... मात्र हा हट्ट नसून सापेक्ष मागणी असावी.
जेथे इतर पर्यायच उपलब्ध नसतील तेथे उपलब्ध असलेला एकमेव डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा, इथपर्यंत ठीक आहे. पण डॉक्टरी पेशा पत्करला म्हणून दरवेळेस आम्हाला गरज आहे/वाटते तेव्हा (किंवा कधी कधी आम्ही म्हणू तेव्हा) डॉक्टरने धावून यावे ही मागणी योग्य नाही... विशेषतः जर त्या डॉक्टरने अगोदरच त्याच्या कामाच्या वेळा प्रसिद्ध केलेल्या असल्या तर.
वेळीअवेळी फोन करूनही नंतर "हे कसले डॉक्टर? आम्ही फोन केला तेव्हा हे खुशाल नाटकाला गेले होते." असे बोलणे म्हणजे "डॉक्टरी पेशा स्विकारला म्हणजे त्याने सर्ववेळ केवळ माझ्या सेवेसाठी सतत तत्परतेने हजर रहायलाच पाहिजे" असे म्हटल्यासारखे होते. ही गोष्ट आपल्या आयुष्यात अथवा आपल्या नवरा/बायकोच्या आयुष्यात अथवा आपल्या मुला/मुलीच्या आयुष्यात असणे किती जणांना योग्य वाटेल?
थोडक्यात, डॉक्टर एक जिवनावश्यक सेवा पुरवणारा व्यावसायिक आहे हे डॉक्टरने विसरू नये आणि तो एक माणूसही आहे हे इतरांनी विसरू नये.
एक्का साहेब
आज काल लोकांची वृत्ती अशी झाली आहे कि मी पैसा फेकतो कि मला काहीही उपलब्ध झाले पाहिजे.
एक उदाहरण म्हणून देत आहे.
२००७ साली हिरानंदानी रुग्णालयात काम करीत असताना विभागात एक फोन आला. त्या संगणक व्यावसायिकाला आपल्या बायकोची पाचव्या महिन्यातील सोनोग्राफी करून हवी होती हि चाचणी सोळा ते वीस अशा चार आठवड्याच्या कालावधीत केंव्हाही केली तरी चालते. हि चाचणी मुलात काही जन्मजात व्यंग( anomaly) आहे का यासाठी केली जाते आणि असे व्यंग असेल तर भारतीय कायद्याप्रमाणे वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो.
या महाशयांना ती चाचणी रविवारीच करून हवी होती. त्यांना नम्रपणे सांगितले गेले कि आपण सकाळी आठ ते रात्री आठ सोमवार ते शनिवार आपण कधीही येऊ शकता रविवारी फक्त तातडीच्या/ अतिगंभीर रुग्णाची तपासणी इतर डॉक्टरांच्या मागणीवरूनच केली जाते. यावर हे महाशय म्हणाले कि मी हजार दोन हजार अतिरिक्त देण्यास तयार आहे. याला मी स्पष्टपणे नकार दिला. यावर या महाशयांनी आमच्या विरुद्ध व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यावर तेथील प्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी एक बैठक बोलावली ज्यात माझ्या विभागाचे आम्ही तीन डॉक्टर होतो. त्यावर आम्हाला विचारले काय प्रश्न आहे. मिजेन्व्हा हे सांगितले कि चार आठवडे या महाशयांना वेळ मिळत नाही तर आम्ही त्याच्या तालावर का नाचायचे. रुग्णालयातील कोणताही तज्ञ तातडीने तपासणी करा म्हणून सांगतो तेंव्हा आम्ही दिवस रात्र रविवार हे न बघता ती करतो कारण ती आपत्कालीन परिस्थिती असते. इथे एखादी तपासणी चार आठवड्यात केंव्हाही करता येते तर मुद्दाम रविवारी कश्साठी यायचे? जेंव्हा आम्हाला "सुचवण्यात" आले कि अशी तपासणी रविवारी करायला काय हरकत आहे जर ते अतिरिक्त पैसे देत आहेत? ( इथे व्यवस्थापन त्याला खुश करण्यासाठी कमरेचे सोडून देण्यास तयार झाले होते. मी एकदम आवाज चढवून सांगितले आम्ही हमरस्त्यावरील वेश्या( braodway whore) नाही कि लुन्ग्यासुन्ग्याने चार पैसे फेकावे आणि "सेवा" घ्यावी. मी येणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा. अर्थात व्यवस्थापनाची मला नोकरीवरून काढून टाकण्याची हिम्मत नव्हतीच त्यामुळे पुढे कधीच असा प्रश्न आला नाही. आजही मी या निर्णयावर ठाम आहे. (मी या रुग्णालयात रविवारी रात्री एका इमारतीमध्ये बिगारी काम करणाऱ्या हमालाच्या बायकोची आपत्कालीन सोनोग्राफी खिशातून पैसे घालून करुन दिली होती हे कुठून तरी व्यवस्थापनाला कळले होते)
पण पैसा फेको तमाशा देखो हि वृत्ती आजकाल बोकाळली आहे
अगदी अशीच परिस्थिती घरोघरी आढळते. लेख वाचून डॉक्टरांची बाजू कळली आणि उत्तरे प्रती उत्तरे वाचून रोग्यांची आणि त्यांच्या घरातल्यांची सुद्धा मनस्थिती कळाली.
हा लेख प्रिंट करून आमच्या घरी वाचायला देणार आहे - नक्कीच . (घरात आंतरजाल नसल्या कारणाने )
भारतीय लोकांना एखाद्या विशिष्ट व्यवसायाबद्दल लोकांना कुतूहल असते किंवा काही जाणून घ्यायची इच्छा असते.
हा स्वभावाचा भाग झाला त्यावर त्रागा करण्यात अर्थ नाही
मला मी हॉटेल व्यवस्थापन केले आहे म्हणजे मी एकत्र कुक किंवा वेटर असावा असा अनेकांचा समज होतो , त्यात पंचतारांकित हॉटेलात काम करतो हे दहा वर्षापूर्वी लोकांना सांगायचो तेव्हा त्या अनुषंगाने त्यांच्या मनातील अनेक शंका , कुशंका माझ्याशी चर्चिल्या जायच्या
खुद मी अनेकदा मुखर्जी सारखी आहार तज्ञ असो किंवा परुळेकर सारखे वैयक्तिक व्यायाम मार्गदर्शक असो त्यांना पंचतारांकित हॉटेलात गाठून चर्चेच्या ओघात अनेक क्षेत्रातील नामांकित सल्ला विचारायचे तेव्हा चेहऱ्यावरील हुकमी हास्य कायम ठेवून ही सर्व मंडळी मोजकी व जुजबी माहिती देऊन
प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीस , आपल्या कार्यालयात येण्याचे आमंत्रण द्यायचे , वर त्याच्या सर्व शंकांचे सविस्तर , निवांतपणे निरसन करण्याची हमी द्यायचे , ह्यावर ही नामांकित मंडळी अनेकदा चर्चेतून तेथून काढता पाय काढायची.
हाच उपाय मी सुद्धा करायचो.
चर्चेच्या ओघात अनेक क्षेत्रातील नामांकित सल्ला विचारायचे
हैला! हे भारीच हां. शेवटी माणूस नामांकित असो किंवा सर्वसामान्य, मूळ स्वभाव तसाच! समारंभात किंवा इतरवेळी गाठून प्रश्न विचारले व त्रास झाल्यास डॉ. खरे मिपावर लिहू तरी शकतात, या अतिउच्चभ्रु लोकांचे राग लोभ, कनेक्षने, व्यवसायाचे स्वरूप हे मोठे होत जाईल तसे उत्तर देणार्यास जास्त कॉम्प्लीकेटेड होत जात असणार. अशावेळी सगळेच थोडे ट्रिकी असेल.
निनादराव, आम्ही मात्र तुम्हाला अजून पंचतारांकित संस्कृतीबद्दल एकही प्रश्न विचारून त्रास दिलेला नाहीये. ;)
साहेब व्यवसायाबद्दल कुतूहल आणि फुकट सल्ला या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला लोक जेंव्हा लष्करी अनुभवाबद्दल विचारतात किंवा आमच्या मुलाला लष्करात अधिकारी बनायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल असे विचारतात तेंव्हा मी सरळ उत्तर देतो मग कुठेही असो. पण हेच जेंव्हा एखाद्या गाण्याच्या मैफिलीत अपचनाबद्दल विचारतात आणि अमुक तमुक डॉक्टर ने हे औषध दिले आहे ते बरोबर आहे का तेंव्हा काय अपेक्षा करायची. मी कोर्पोरेट रुग्णालयात लोकांना स्वच्छ शब्दात तोंडावर सांगत असे कि हि जागा आपले प्रश्न विचारण्याची नाही. पण आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसाने( त्यांच्या मित्राने) आपल्याला हा शब्द कालिदास सभागृहाच्या प्रवेशद्वारात विचारला तर?
केवळ वयाचा विचार करून असे सांगता येत नाही.( अजून तरी वरिष्ठांना मान देणे हे आपले संस्कार आणि लष्करातील शिकवण मी विसरू शकत नाही). मग पुढचा प्रश्न विचारला तर मला मोबाइल वर हुकुमी फोन येतो. म्हणून मी तो शब्द वापरला कि "मी त्यांना टाळतो".
शेवटचा उपाय म्हणून ते डॉक्टरांची मदत अपेक्षित असतात.
मला हि पेठकर काका चे मत बरोबर वाटते . बर्याच वेळेला आपण किवा आपले फमिली मेम्बेर्स स्वतःवर नियंत्रण नाही ठेवू शकत. जसे प्रत्येक धुम्रपान करण्यारा वक्तीला त्यःचे दु;ष परीणाम पण माहित असतात पण …. अशा वेळी डॉक्टर एके देवदूताचे काम करतात. ते सर्वसामान्यांचे आदर्श पण असतात आणि त्यामा प्रतेच्क गोष्ट माहित आहे असे आपण सर्वजण मान्तो. सोनारानेच कान तोच्वावेत मग भलेही सर्बांकडे सर्व साहित्य असले तरि….
पण त्मची हि परीशिती मी समजू शकते कारण माज्या घरात अर्धे लोक डॉक्टर आहेत आणि सामन्य जीवन जगणे कधी कधी फार अवधड होते. सर्वांचे अनुभव कमीअधिक प्रमाणत तुमच्या सारखेच आहेत.
मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक दहावीतील मुलगी पाळी वेळेत येत नाही म्हणून सोनोग्राफी साठी आली होती. वय वर्षे पंधरा आणि वजन शहाण्णव किलो (९६). ती खुर्ची मावत नव्हती. त्यामुळे तिच्या बीजांड कोशाना(ovaries)ना सूज आली होती. तिला वजन कमी करायला पाहिजे असे मी तिच्या वडिलांना सांगितले तर तिचे वडील म्हणाले डॉक्टर तुम्हीच सांगा तिला. मला संतापच आला सरळ विचारावेसे वाटले पंधरा वर्षाच्या मुलीचे शहाण्णव किलो वजन होईपर्यंत तुम्ही काय गोट्या खेळत बसला होतात काय? पण संयम बाळगून मी त्यांना सांगत होतो कि काय करायला पाहिजे तर त्यांचे आपले एकच टुमणे डॉक्टर तुम्हीच सांगा तिला.
उपरोक्त परिच्छेद आणि शेवटी केलेला हा उल्लेखः
नातीला ती हट्ट करते म्हणून रोज कुरकुरे देणारे पालक/ आजोबा किंवा ७० टक्के अधिक वजन होई पर्यंत मुलीला काही न बोलणारे पालक हे याच गटात मोडत आहेत. स्वतःला वाईटपणा नको म्हणून आपल्या नातेवाईकचे नुकसान होऊ द्यायची हि कोणती वृत्ती?
या दोन वाक्यांवरुन किंवा त्यांच्या रचनेवरुन काही गोष्टी जाणवल्याने एरवी दिला नसता, पण न राहवून प्रतिसाद देतो आहे:
मी स्वतः लठठपणाचा बळी आहे. लहानपणापासून कमीजास्त प्रमाणात वजन वाढणे आणि त्यावर आईवडिलांनी असंख्यवेळा मला मागे लागून व्यायाम करायला लावणे, आहारनियंत्रण इत्यादि गोष्टी केल्या. त्याचा त्या त्या वेळी फायदा झाला हे खरं, पण मूळ प्रवृत्ती तशीच असल्याने नोकरीला लागल्यावर महाप्रचंड प्रमाणात वजन वाढलं. डाएट, व्यायाम हे उपचार वरचेवर चालू असतात. सस्टेनेबल डाएट, हलका व्यायाम, मग वाढवत नेणे हे नेटाने केलं जातं, पुन्हा सोडलं जातं. जिम, डॉक्टर्स, दहा किलो कमी झाल्याचा आनंद आणि पंधरा किलो परत वाढल्याचं दु:ख अशी अनेक आवर्तनं करुन झाल्यावर एक नक्की लक्षात येतं की लठठपणा हा एक आजार आहे. जितका शारिरीक, तितकाच मानसिक.
पालकांनी "बोलून" आटोक्यात राहणारा हा आजार नव्हे. पूर्ण नियंत्रणात आणल्यावरही धूम्रपान किंवा मद्यपानाप्रमाणे, ड्रग अॅडिक्शनप्रमाणे एका वीक मोमेंटला, एका निराशेच्या प्रसंगी पुन्हा मनुष्य अफाट कार्बोहायड्रेड्स खाऊन त्यात दिलासा शोधतो.
पन्नास पन्नास किलो वजन कमी केल्याच्या सक्सेस स्टोरीज असतात. पंधरावीस किलो कमी केल्याच्या तर माझ्या खुद्द स्वतःच्या स्टोरीज आहेत.
पण यातले ९९ टक्के लोक पुन्हा मूळपदावर किंवा आणखी वर वजनकाटा पोचवून रिलॅप्स होतात. अत्यंत खडतर असा क्रॅश कोर्स किंवा दररोज कॅलरीज / फायबर / रिफाईन्ड शुगर्सचे प्रमाण पाहून योग्य आहार योग्य प्रमाणात घेणं यापैकी कोणत्याही प्रकारचे उपाय अत्यंत योग्य असले तरी ते मॉडेल आन्सरप्रमाणे असतात. ते कायमचे उपयोगी ठरत नाहीत. शस्त्रक्रिया हा उपाय अत्यंत खर्चिक आणि हाय रिस्क आहे.
हे सर्व लिहीण्याचं कारण काय? तर "आहेस ना जाड, मग आता उपाय केलाच पाहिजे" हे अत्यंत लॉजिकल विधान आहे. पण हा मार्ग सामान्य वजन असलेल्या व्यक्तीला वाटतो त्यापेक्षा प्रचंड खडतर आहे हे यानिमित्ताने अधोरेखित करु इच्छितो. सुदैवाने आतापर्यंत मला भेटलेल्या मॉडर्न मेडिसिनच्या कोणत्याही डॉक्टरने या वजनदारपणाला "रोग" / "आजार" हा दर्जा देऊन त्यानुसारच चर्चा केली आहे.
उपरोक्त धाग्यातल्या हायलाईट केलेल्या प्रकटनात एक मुलगी लहानपणापासूनच लठठपणाची शिकार झाली आहे. मान्य आहे की तिला वजन कमी केलंच पाहिजे.
पण ज्या पद्धतीने विचार मांडले आहेत त्यानुसार काही गृहीतकं दिसली:
- आईवडिलांनी तिला काहीच "म्हटलं" नसेल. (ते काय गोट्या खेळत होते का? -- मला तर इथे एक अगतिक पालक दिसतात..)
- त्या मुलीला एखाद्या शारिरीक / मानसिक / मनोशारीर आजाराला असते तशी मदतीची गरज आहे. वैद्यकीय मदतीची. अशा वेळी आईवडील हे अ-तज्ञ लोक फार काही करु शकत नाहीत. त्यांनी उशीरा का होईना, पण तिला वैद्यकीय मदतीसाठी आणलं आहे. वजन कमी करणं हा या वैद्यकीय समस्येवरचा वैद्यकीय उपाय आहे. अशा वेळी ते कसं करावं याविषयी संपूर्ण शास्त्रशुद्ध मार्गदर्शन.. आणि ते आपल्या स्पेशलायझेशनच्या स्कोपमधे बसत नसेल तर तत्सम प्रोफेशनल ओबेसिटी स्पेशालिस्ट / डाएटिशियनकडे रेफरल. त्या मुलीला सकारात्मकरित्या वजन कमी करण्याविषयी गायडन्स हे देणं अत्यंत आवश्यक आहे.
इथे मात्र "डॉक्टरसाहेब तुम्हीच तिला सांगा" या विनंतीनेही डॉक्टरांची तळपायाची आग मस्तकात गेलेली दिसते.
हा भाग मला काहीसा असंवेदनशील वाटला. तुम्हीच तिला सांगा हे "टुमणे"? पालकांनी तिला इतक्या वर्षात एकाही शब्दाने काहीच बोललं नसेल याची तुम्हाला नक्की खात्री आहे? त्या आईची झोप उडाली असेल.. मी गॅरंटी देतो डॉक्टरसाहेब. आपल्या जवळचे लोक प्रत्येक बाबतीत चांगले काउन्सेलर्स नसतात. उलट भावनेच्या अपरिहार्य भरात आईबाबांनी केलेली बोलणी आणि सूचना या बर्याचदा उलट टोकाला जातात आणि दुरित दिशेचे बंडखोर परिणाम मुलांच्या मनावर करतात. तिथे खरोखर न्यूट्रल त्रयस्थ काउन्सेलर हवा असतो.
पण त्यासाठी लठठपणा हा एक आजार आहे हे मान्य केलं पाहिजे.
पोरांचा लठठपणा म्हणजे ऐदीपणे आणि वेळेवर पोरांना चांगले पळायबिळायला न लावल्याने अन पालकांच्या दुर्लक्षामुळे झालेला एक फाजील फुगवटा अशी समजूत सामान्यजनांत दिसतेच.. पण डॉक्टरांनी तशा आशयाचं निदर्शक काही लिहावं हे अनपेक्षित होतं इतकंच.
आणि.. विशेष म्हणजे अत्यंत परिणामकारक ठरलेला आवश्यक, योग्य असा प्रोटोकॉल तुम्ही एका मद्यपि व्यसनी माणसाबाबत पूर्वी वापरला आहे.. इथे उल्लेख आहे:
http://www.misalpav.com/node/25044
शमीम तुमच्याकडे पोटदुखीसाठी आला. सोनोग्राफीत फॅटी लिव्हर निघाली. तुम्ही या फारशा पुढे न गेलेल्या साईनचा उपयोग करुन त्याला सुरुवातीला दारुच्या दुष्परिणामाची धास्ती उत्पन्न केलीत. पण तुम्हाला निश्चित माहीत होतं की अशा वन टाईम स्कोल्डिंगने कायमचे सुटणार नाही कोणतेच व्यसन किंवा आजार. उलट दारुमुळे तू घरच्यांची कशी वाट लावतो आहेस याच्या जाणिवेने येणारी गिल्ट ही व्यसनाधीनतेला आणखी वेगाने खड्ड्यात घेऊन जाते याची तुम्हाला जाणीव होती. म्हणून तुम्ही हे पूर्ण कौन्सेलिंग हातात घेतले नाहीत तर फक्त सुरुवातीचा एक पुश देऊन त्याला योग्य जागी पाठवले.
म्हणजेच तुम्ही त्याला तुमच्या कलीग्जपैकी असलेल्या मनोविकार तज्ञाकडे "डी-अॅडिक्शन"ला पाठवला. त्या मित्राला आधीच कल्पना दिलीत की :
शमीम म्हणून एकाला पाठवतो आहे त्याला दारू सोडण्यात तुझी मदत हवी आहे त्याला सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि हेही सांगितले कि त्याला लिव्हरचा आजार असा काही पुढे गेलेला नाही पण त्याला मी थोडी दहशत घातली आहे. पुढचे काम त्यानेच केले होते.
म्हणजेच खुद्द शमीमला किंवा त्याच्या घरच्यांना (ते सोबत नसल्याने?? )दारु पिण्यावरुन बोलण्याच्याही पुढे जाऊन तुम्ही त्याला सोडण्याची गरज आणि मार्ग समजावून सांगितलेत..
"याची दारु कमी केली पाहिजे" असे घरच्यांना सांगून.. "आता तुम्ही काय ते बघा.." असं त्याच्यावर किंवा नातेवाईकांवर सोडून नाही बसलात. एका घोटाचे इतके क्वार्टर्स होईपर्यंत काय करत होता असं म्हणून सोडून नाही दिलं. हे अत्यंत योग्य होतं आणि त्याची दारु सुटली हे सिद्ध झालं.
लठठपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अजूनही त्या प्रकारचा नाही हे एक निरीक्षण या निमित्ताने समोर आणायचं होतं. बाकी वेळीअवेळी पार्टीत, रस्त्यात गाठून सल्ले विचारणारे आणि अन्य प्रकारच्या लोकांविषयीची तुमची मतं योग्यच आहेत. त्यामुळे संपूर्ण लेखातल्या फक्त काही मर्यादित भागाशीच असहमती..
दोन्ही प्रतिसाद अप्रतिम आहेत.
नुसते डॉ़क्टरांच्या दृष्टीकोनातून न पाहता एका रुग्णाच्या दृष्टीकोनातूनही पाहण्याची गरज असते. 'इतके दिवस काय नुसते गोट्या खेळत बसला होता काय?' हा प्रश्न मलाही खुपला होता पण माझे विचार तुमच्या इतके प्रभावीपणे मला मांडता आले नाहीत. असो.
कांही वेळा डॉक्टरांच्या वैयक्तिक आयुष्य उपभोगण्याचा मुद्दा महत्त्वाचा असतो तर कांही ठिकाणी रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची हतबलता विचारात घेतली गेली पाहीजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन वर्तन ठेवावे म्हणजे संबंधात कटूता येणार नाही.
दोन्ही प्रतिसाद उत्तम. गवि तुमची निरिक्षणशक्ती दांडगी दिसते. तसेच मांडण्याची हातोटीही. डॉक्टर ही माणुसच असल्याने सर्वसामान्य माणसांमधल्या भावभावना या त्याच्यातही असतात. तो सदा सर्वदा विवेकी राहू शकत नाही. त्याचाही एक पिंड असतो.त्याच्याही काही मर्यादा असतात. त्याचीही चिडचिड होते. पण डॉक्टर हा विशेष माणुस असल्याने सर्वसामान्यांच्या त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. त्याचे ओझेही त्यावर येत असते.
गवि, तुमचे प्रतिसाद अतिशय वाचनीय असतात. आधी कधी सांगायचं राहून गेलं असेल कदाचित... मी बऱ्याच वेळा विचार केलेला आहे की नक्की असं वेगळं काय असतं? पण या प्रतिसादांमधून एकदम ते जाणवलं.
एखादी गोष्ट तुम्हाला खटकली हेदेखील तुम्ही अत्यंत हळुवारपणे सांगितलेलं आहे. आपल्या कुठल्याही शब्दाने समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची काळजी त्यातून दिसून येते. नुसतं तेवढंच नाही, तर दुसऱ्याबाबतचा तुमचा आदर व दुसऱ्याचा तुमच्याबाबतचा आदर याला धक्का पोचू न देता त्यात जवळीक साधून ते नाजूकपणे सांगता. त्यामुळे अर्थातच तुमचं म्हणणं बहुतेकांना पटतं. पूर्णपणे पटलं नाही तरी गवि या माणसाची ही अशी मतं का आहेत याबद्दल वाचणाराच्या मनात निश्चित सहानुभूती निर्माण होते.
तुम्ही जेव्हा कोणाशी असहमती दाखवता तेव्हा मला राहून राहून वडिलांनी जवळ घेऊन आपल्या लहान मुलीच्या पायात गेलेला काटा काळजीपूर्वक अल्लदपणे काढून द्यावा तसं चित्र डोळ्यासमोर येतं. तो काटा काढायचा तर असतोच, आणि त्याने किंचित दुखणार असतंच, पण दुखवण्याचा हेतू नाही हे तुम्ही ज्या प्रामाणिकपणाने दाखवता त्यामुळे त्या जखमेवर अपमानाचं ओझं चढत नाही.
आंतरजालावर, जिथे आपले शब्द लोकं हत्यारासारखे चालवत असतात (श्रेयअव्हेर पुल - 'पुण्यातले लोक आपली स्कूटर म्हणजे तलवार, दांडपट्टा चालवल्यासारखे चालवतात') तिथे तुम्ही ते सराईत शिल्पकाराच्या छिन्नी हातोड्यासारखे वापरता. त्यामुळे लोकांना तुमचं वाचल्यानंतर 'मला हेच म्हणायचं होतं, पण इतक्या चांगल्या शब्दात मला म्हणता आलं नसतं' असं राहून राहून वाटतं.
आंतरजालावर, जिथे आपले शब्द लोकं हत्यारासारखे चालवत असतात (श्रेयअव्हेर पुल - 'पुण्यातले लोक आपली स्कूटर म्हणजे तलवार, दांडपट्टा चालवल्यासारखे चालवतात') तिथे तुम्ही ते सराईत शिल्पकाराच्या छिन्नी हातोड्यासारखे वापरता. त्यामुळे लोकांना तुमचं वाचल्यानंतर 'मला हेच म्हणायचं होतं, पण इतक्या चांगल्या शब्दात मला म्हणता आलं नसतं' असं राहून राहून वाटतं.
सहमत आहे. त्यामुळे बर्याचदा मूळ लेखातल्या आख्यानापेक्षा, हे 'नचिकेताचे उपाख्यान' अधिक वाचनीय आणि चिंतनीय ठरतं :)
गवि आणि पेठकर साहेब
जे रुग्ण जाडी वाढताना सुरुवातीला येतात त्यांना मी फुकट बराच सल्ला देतो आणी योग्य आहार तज्ञाकडे नेहेमी पाठवतो. कारण लठ्ठ पणा हा मुलाचा आत्मविश्वास डळमळीत करतो आणी त्यामुळे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करतो हे मला चांगले माहित आहे (यावर कधीतरी वेगळा लेख लिहिण्याचा विचार आहे).
लठ्ठ पणा चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे पैथोलोजीकल ओबेसिटी आणि दुसरा म्हणजे अति खाण्यामुळे ( अति लाडाचा परिणाम सुद्धा) पहिल्या प्रकारातील लठ्ठ पणाची टोकाची उदाहरणे मी बरीच पहिलेली आहेत. लठ्ठपणावर शल्यक्रिया करणाऱ्या गटाचा मी एक भाग होतो तेंव्हा. ज्यात सर्वात जास्त वजन २३७ (दोनशे सदतीस फक्त)सुद्धा पाहिलेले आहे. हा प्रकार आणि दुसरा यात फरक आहे हे मला व्यवस्थित पणे माहित आहे.BARIATRIC SURGERY याचे किती इतर दुष्परिणाम आहेत हे मला चांगले माहित आहे आणी लठ्ठपणा आणी त्याचे मानसिक परिणाम हेही मला माहित आहेत. पण आठवीतील मुलगी हट्ट करते म्हणून रोज वेफर विकत घेऊन देणारे पालक किंवा चार वर्षाची मुलगी रडते म्हणून रोज कुरकुरे देणारे आजोबा मला आजही समजता येत नाहीत. एवढेच कि मी त्यांना तोंडावर बोलत नाही.
वरील उदाहरणात त्या मुलीचे आई आणि वडील दोघेही माझ्या दवाखान्यात आलेले होते आणि दोघेही लठ्ठ नव्हते त्यामुळे तिला अनुवांशिक लठ्ठ पणा नक्कीच नव्हता.
आईचे म्हणणे होते कि लहानपणी ती बारीक होती आताच (तीन वर्षात) ती जाडी झाली आहे. आपल्या मुलीची उंची जेमतेम पाच फुट आहे आणी तिचे वजन पंधराव्या वर्षी जास्तीत जास्त पन्नास किलो असायला पाहिजे पण ते शहाण्णव किलो आहे म्हणजे ब्याण्णव टकके जास्त आहे हे त्यांना इतके महिने जाणवले नाही? हे मान्य करणे जरा कठीण आहे. तिथे सुद्धा तिचे वडील सांगत होते कि तिला रोज एक लेज चं पाकीट लागतच. आता अशा लाड करणाऱ्या पालकांचे मी काय करणार? तीन वर्षे तिचे वजन वाढत होते तोवर काहीच केले नाही आणी आता जेंव्हा pcos मुळे पाळी उशिरा आली तेंव्हा ते जागे झाले. दुर्दैवाने आजही चांगल्या आहार तज्ञाकडे जायची त्यांची मनोवृत्ती दिसत नव्हती. शेवटी हे लोक लग्नाचे वय झाले कि जागे होतात. कारण लग्नाच्या "बाजारात" किंमत अतिशय पडून येते. (हीच परिस्थिती दातांच्या बाबतीत दिसते जोवर वाढीचे वय असते तोवर दात जास्त सहज सरळ होतात (१ ८ ते २०) . पण एकदा २२ -२४ वय झाले कि ते तितके सोपे राहत नाही आणी मग लोक दाताच्या डॉक्टर कडे घाई करतात)
पोरांचा लठठपणा म्हणजे ऐदीपणे आणि वेळेवर पोरांना चांगले पळायबिळायला न लावल्याने अन पालकांच्या दुर्लक्षामुळे झालेला एक फाजील फुगवटा अशी समजूत सामान्यजनांत दिसतेच.
यासाठी खालील दुवा पाहावा(असे अनेक दुवे गुगल वर सापडतील)
http://fitbandits.com/laziness-is-the-top-cause-of-obesity-in-india/
आठवीतील मुलगी हट्ट करते म्हणून रोज वेफर विकत घेऊन देणारे पालक किंवा चार वर्षाची मुलगी रडते म्हणून रोज कुरकुरे देणारे आजोबा मला आजही समजता येत नाहीत. एवढेच कि मी त्यांना तोंडावर बोलत नाही....
..तिथे सुद्धा तिचे वडील सांगत होते कि तिला रोज एक लेज चं पाकीट लागतच. आता अशा लाड करणाऱ्या पालकांचे मी काय करणार?
१०० टक्के पालकांची चुक आहे. पोषणमुल्य, उष्मांकांची गरज आणि सेवन ह्या विषयी पराकोटीचे अज्ञान. आणि मी म्हणतो तसे 'सुबत्तेचे बळी' ही त्यांची चुक आहे. पण सर्व पालकांचे असे नसते. ते कानीकपाळी ओरडत असतात पण मुलं कान बंद करून बसली असतात. जेंव्हा एखादी, अवास्तव वजनसंबंधी, व्याधी डोके वर काढते तेंव्हा लोकं डॉक्टरांकडे धावतात. पण आधी त्यांनी कांहीच प्रयत्न केलेले नसतात असे नाही. अशा समस्यांमध्ये, सरसकट सर्व पालक, 'गोट्या खेळत बसलेले नसतात' एवढेच मला म्हणायचे आहे. जेंव्हा माणसाकडे ज्ञान असते पण उपाययोजना करायला माणूस टाळाटाळ करीत असतो त्याला 'हलगर्जीपणा' म्हणता येईल.
जोवर वाढीचे वय असते तोवर दात जास्त सहज सरळ होतात (१ ८ ते २०) . पण एकदा २२ -२४ वय झाले कि ते तितके सोपे राहत नाही
हे सर्वसामान्यांमध्ये किती टक्के लोकांना माहित असते? शेवटी अज्ञान हेच ह्या समस्येचे मुळ आहे. मलाही हे ज्ञान आज प्राप्त झाले. माझ्या मित्राची मुलगी ६वीत आहे. अतिशय सुंदर आहे. तिचे दात पुढे (थोडेसेच) आहेत. त्यांनी तिला दंतवैद्यास दाखवावे असे मी त्यांना अनेकदा सांगितले आहे. त्यांना ते पटते पण ते तेवढे गंभीर वाटत नाहीत. आता ही नवीन माहीती मला तुमच्याकडून मिळाली आहे ती वापरून मी त्यांच्यावर दबाव आणू शकेन. मुलगी तर अजून लहान आहे. डॉक्टरच्या नांवनेच घाबरते आहे.
Stitch in time saves Nine. ही उक्ती रोजच्या आयुष्यात अंगी बाणविली तर खुपशा समस्या टळतील.
खूप प्रयत्न करुनसुद्धा तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होतो हे वाचून वाईट वाटले. तो एक आजार आहे किंवा अनुवांशिक आजार आहे हे विधान तुमच्या केसपुरते मान्य करु शकतो.
पण चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठ झालेले बहुसंख्य लोक लठ्ठपणा हा आनुवंशिक आहे किंवा तो आजार आहे अशी कारणे पुढे करतात हेदेखील तितकेच खरे आहे. त्यामुळे डॉक्टरांचे मत तितकेसे चुकीचे वाटले नाही.
प्रतिक्रिया
काही बोलणे धोक्याचे आहे यावर,
महत्प्रयासाने गप्प बसलो आहे
छान विषय....
मस्त लेख...
परवाच घरी एक मित्र त्याच्या
नशीब
(उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या)
(उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या)
डॉक्टर
.
मानवी स्वभाव बघितला तर या
जिवनावश्यक सेवा पुरवणारा व्यावसायिक
.
महत्वपूर्ण लेख आणि विचार विनिमय
खुप सुन्दर
भारतीय लोकांना एखाद्या
चर्चेच्या ओघात अनेक
व्यवसायाबद्दल कुतूहल
शेवटचा उपाय म्हणून ते डॉक्टरांची मदत अपेक्षित असतात.
मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक
आणि.. विशेष म्हणजे अत्यंत
दोन्ही प्रतिसाद अप्रतिम आहेत.
उत्तम प्रतिसाद
गवि, तुमचे प्रतिसाद अतिशय
+१
उपाख्यान
+१
अति खाण्यामुळे लठ्ठ पणा
अज्ञान.
खूप प्रयत्न करुनसुद्धा
+१११११
हे बरय !
Pagination