Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चोवीस तासात एकही प्रतिसाद नाही… शरद काका, अरण्यरुदन यालाच म्हणतात :-( जरा सविस्तर प्रतिसाद द्यायचा आहे. रात्री देईन.

लेखातील भावनेशी जवळ जवळ सहमतच असल्यामुळे प्रतिसाद लिहुनही मी तरी लिहायचे टाळले होते. अरण्यरुदन वगैरे असं मला काही वाटत नाही, बाकी,आता मलाही सायंकाळी सवडीनं प्रतिसाद लिहिणं आलं. :) -दिलीप बिरुटे

आपली छायाचित्रे नॅशनल जीओग्राफित प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेची नाहीत हे आपल्याला माहीत असते. निदान माझी तरी अशी समजुत आहे. माझी देखील अशीच समजुत आहे... आपण खासदारांपेक्षा नक्कीच सुसंस्कृत आहोत ! हल्ली सुसंस्कृत असण्याचे तोटेच जास्त आहेत की काय असे वाटु लागले आहे, खासदारांना २० हजार आणि आमदारांना ४० हजार पेंशन विधीमंडळात कोणतीही चर्चा न करता केवळ 2 मिनीटात पदरी पाडुन घेतलं आहे. जनतेचे सेवक आहेत ना हे ? मग जनतेच्याच खिशातुन जमा करुन सरकारी तिजोरीत जमा केलेल्या पैशांवर ३० कोटी बोजा पडणार याच यांना काहीच वाटत नाही ? ५रु / १२रु मधे जेवण मिळत ना ? गरिबी कमी झाली आहे ना ? मग यांना पगारवाढ / पेंशन कशाला हवी ? यावर मात्र सर्व पक्ष एकी दाखवतात ! पण वर्षानु वर्ष खड्ड्यांतुन प्रवास करणार्‍या सामान्य जनतेस मात्र जगणेही कठीण करुन ठेवणार.सामान्य माणसाने प्रामाणिकपणे कष्ट करुन पैसे कमवुन घर चालवण्याचे दिवस संपले हेच खरे ! :( असो बरेच अवांतर झाले... मी श्री. गोरा सौमित्र यांच्या वतीने लिहित आहे असे मुळीच नाही. ते नखें काढून भांडावयास समर्थ आहेत असे त्यांच्या उत्तरांवरून उघडच आहे. यातच सर्व काही आले असे वाटते.

पण हे कुणी मुद्दाम केले आहे/असेल असे वाटत नाही. मिपाच्या नेहमीच्या पद्धतीनेच सुरुवातीचे काही प्रतिसाद आले की पुढे त्यावर साधारण त्याच लाईनीने प्रतिसाद येतात. बरेचजण निव्वळ सगळ्या चेष्टामस्करीत सामील होण्यापुरते असतात. त्यात लेखकाचा हिरमोड करण्याचा हेतू नसतो. खूपदा अशा रॅगिंगचा शिकार झालेला नवा सदस्य जरा जुना झाला की तेव्हाच्या नव्या सदस्यांना मिपाच्या "परंपरा" दाखवून देतो! तरीही निदान काही जणांनी तरी स्फुट आवडल्याचे लिहिले आहेच!

हे बाकी खरे आहे ! आतले आणि बाहेरचे !बाहेरचे आत आले की आधिक उत्साहाने बाहेरच्याना विरोध करतो ! आपला मुद्दा समजला पण त्याचबरोबर " काहीही" चालते हा समज होऊ नये हे ही आवश्यकच ! किमान पात्रता ही असायलाच हवी. आणि काही ठिकाणी आरडाओरडा करावा लागतो , लातोंके भूत बातोसे नही मानते ! अर्थात तारतम्य आणि विवेक असायलाच हवा !