Welcome to misalpav.com
लेखक: श्रीरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हाहाहा! "काय सॉल्लिड पिक्चर आहे रे.. अगदी कादंबरीच वाचतोय असा फील आला!" असे म्हणून मित्राला टाळी दिली आणी अचानक लक्ष्त आलं, संजय जाधव अगदी शेजारीच उभे होते. एक ऑकवर्ड स्माईल देऊन निसटलो. सुरुवातीला दाखवलेली "नारबाची वाडी" चित्रपटाची झलक बरी वातली. चांगला असावा चित्रपट असं वाटतंय.

अतीरन्जक समीक्शा....... आणी धागाकर्त्याने म्हटल्या प्रमाणे जर सिनेमा एवढाच जर रटाळ अस्ता तर हाउस फुल चालल नसता...... नोटः दुनियादारी सिनेमा म्हणुन पहावा.... कादम्बरी सोबत तुलना न केलेली बर.

सिनेमा रटाळ असल्याचे कुठे म्हटले आहे जरा दाखवाल का? आणी कादंबरीबरोबर तुलना होणं सहाजीक आहे. कारन कादंबरीवरच सिनेमा बनवल्याचे, स्वतः चित्रपटकर्ते हज्जारदा टाहो फोडून सांगत आहेत.

कारन कादंबरीवरच सिनेमा बनवल्याचे, स्वतः चित्रपटकर्ते हज्जारदा टाहो फोडून सांगत आहेत. >> एकदम बरोबर......

काल पाहिला, चित्रपट चांगला वाटला…उर्मिला कानेटकर सोडली तर कॉलेजवयीन कोणीच वाटत नव्हत, श्रेयस आणि साई च्या भूमिकेत इतर कोणी कलाकार घेता आले असते तर चित्रपट अजून चांगला वाटला असता. बाकी दिग्या बेष्ट (कादंबरी वाचली नाही अजून)

चित्रपट चांगला वाटला…उर्मिला कानेटकर सोडली तर कॉलेजवयीन कोणीच वाटत नव्हत, श्रेयस आणि साई च्या भूमिकेत इतर कोणी कलाकार घेता आले असते तर चित्रपट अजून चांगला वाटला असता. बाकी दिग्या बेष्ट
+१

?? काहीही.. चित्रपटाबाबत काय काय खटकलं ते स्पष्ट लिहिलंय मी. त्यात चित्रपट रटाळ असल्याचा सूर तुम्हाला कुठे जाणवला माहित नाही. असो..

दुनियादारी आताच पाहून आल्यावर अशी अवस्था झाली. a सुशिंच्या कथेची शक्य तितकी वाट लावण्यात आली आहे. (स्वगतः का? का?? का??? भाग मिल्खा भाग नैतर वूल्वरीन का नै पाहिलास?)

आपल्याला ब्वॉ चित्रपट आवडला. सुशि भक्तांना नाही आवडणार कदाचित. स्वप्नील जोशी कॉलेजकुमार नाही वाटत. पण शम्मी कप्पूर, धर्मेंद्र, गोंद्या, संजय दत्त यांना कॉलेजकुमार म्हणून सहन केल्यानंतर स्वप्नील जोशी फारसा वावगा वाटत नाही. कालेजात असताना मीही बर्‍यापैकी वजनदार होतो. अजुनही आहे. त्यामुळे श्रेयस तसा दाखवल्यास मला काहीच खटकत नाही. दिग्या म्हणुन अ़ंकुश चौधरी बरा वाटत नसेल तर त्याच्याऐवजी बरा वाटणारा चेहराच मराठीत नाही. दिग्या म्हणुन एखादा अनोळखी कलाकार चाललाच नसता त्यामुळे अंकुश चौधरीच योग्य आहे. उर्मिला कानेटकर खास दिसली आहे. ती कॉलेजातली देखील वाटते :) सई ताम्हणकर बेष्ट आहे. आपल्याला तर लै आवडली. सुशांत शेलारला वाया घालवला आहे आणि तो चित्रपटातल्या प्रीतमच्या क्यारेक्टरला शोभत नाही. गाणी उत्तम आहेत. जितेंद्र जोशीने अभिनय चांगला केला आहे. सुशिंचा साईनाथ वेगळा आहे म्हणुन जितेंद्र जोशीला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. सुशिंची दुनियादारी चित्रपट माध्यमात रटाळ वाटली असती. ती वाचायला खुपच छान वाटते. त्यामुळे त्या माध्यमासाठी म्हणुन केलेले बदल खटकत नाहित. सुशिंच्या पुस्तकात असे होते अशी तुलना केली तरच चित्रपट खटकतो. पुस्तक न वाचलेल्या जनतेला तो आवडला असेल तर चित्रपट उत्तमच जमला आहे असे म्हणायला हरकत नाही. पुस्तक वाचलेल्या जनतेला तो आवडला नाही हे सुशिंचे यश. उद्या ३ इडियट्स फाइव्ह पॉईंट सारखा नाही म्हणुन कसे चालेल. माध्यम वेगळे आहे शेवटी.

@जितेंद्र जोशीने अभिनय चांगला केला आहे. सुशिंचा साईनाथ वेगळा आहे म्हणुन जितेंद्र जोशीला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही.>>>> http://www.mimarathi.net/smile/congrats.gif @सुशिंची दुनियादारी चित्रपट माध्यमात रटाळ वाटली असती.त्यामुळे त्या माध्यमासाठी म्हणुन केलेले बदल खटकत नाहित. >>> ++++++११११११११

इतकं चर्चेत असणारं पुस्तक आपण वाचलेलं नाही हे लक्षात आलं होतं. पुण्यात आले तेव्हा योगायोगाने शेजा-यांच्याकडे हे पुस्तक सापडलं (त्यांच्या पुतणीने चित्रपट पाहून विकत घेतलं ..), हाताशी वेळ होता, मग वाचून काढलं. पुस्तक "ठीकठाक" आहे. वाचलं नसतं तरी चाललं असतं असं लक्षात आलं! चित्रपट पाहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पुस्तक आणि चित्रपट ही दोन वेगळी माध्यमं असताना अशा चर्चा होत राहतात पुस्तकाधारित सिनेमांवर - हे खूप रोचक आहे. त्याबाबत विचारांत पडले आहे :-)

माझे कालचे फेसबूक अपडेट _____________________ आज "दुनियादारी" बघितली..!! आय नो, बरेच उशीरा पाहिली.. पण तसे वाटले नाही.. आजही थिएटर हाऊसफुल्ल होते.. बरेच दिवसांनी एक चित्रपट अगदी आतवर भिडला, अगदी सुरुवातीपासूनच.. ईंटरव्हल कधी आलागेला कळलेच नाही आणि दि एण्डची पाटी लागली तरी टिकटिक डोक्यात वाजतच होती.. एखाद्या लव्हस्टोरीची नाही तर यारीदोस्तीची टिकटिक.. ज्याने आयुष्यातले चार दिवस जरी मित्रांच्या कट्ट्यावर घालवले असतील त्यावर हा चित्रपट असेच काहीसे गारुड करून जात असेल.. आमची तर वर्षे गेलेली.. स्वप्निल, सई आणि इतर सारेच सही, पण अंकुश चौधरीला दिग्याभाईच्या भुमिकेत बघून बरे वाटले.. पण पिक्चरच्या शेवटी त्याच डीएसपी बद्दल सर्वात जास्त वाईट वाटले.. एनीवेज, पिक्चरचे परीक्षण द्यायला मी इथे बसलो नाही.. पण अजून कोण इडियट असेल आपल्यात ज्याने अजून हा पिक्चर पाहिला नाही तर आजच तिकीट बूक करा आणि थिएटरमध्येच बघा.. मराठी पिक्चर आहे, पॉपकॉर्नच्या किंमतीपेक्षाही स्वस्तात पडेल तिकिट.. आणि म्हणूनच मी आज पॉपकॉर्नच खाल्ले नाहीत.. ;) .. विचार करतोय वाचलेल्या पैश्यात पुन्यांदा होऊन जाऊ दे.... तुझी माझी यारी, तर भोकात गेली दुनियादारी !! ___________________________ फेसबूक अपडेट संपले १५ ऑगस्टला पुन्हा जातोय दुनियादारीला.. :) आता तळटीप - पुस्तक मी वाचले नाही आणि त्या वादात मला पडायचे नाही :)

दुनियादारीने १५ कोटी च विक्रमी व्यवसाय केल्याची बातमी आजच समजली. एका मराठी चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश बघून अतीशय आनंद झाला.

आमची वैयक्तिक मतं काहीही असोत, एका मराठी सिनेमानं इतका तगडा धंदा करुन दाखवला ह्याचं मात्र कौतुक आहे. :) टीम दुनियादारी, अभिनंदन!

काल दुनियादारी पाहिला,विमाननगर पुणे सारख्या तथाकथीत हुच्चाभ्रू सोसातटॆत असणाऱ्या फिनिक्स मल्टीप्लेक्स मध्ये मराठी पिक्चरचा सक्काळी सक्काळी दहाचा शो हाउसफुल्ल ,निच्छितच पिक्चर मध्ये दम आहे ……। पण ………… आयच्या गावात …सु. शिं च दुनियादारी वाचल असल्यामुळे असा वाटत होत की भोसडीचा दिग्दर्शक काय डोक्यावर पडला होता काय भेंडी………

सु. शिं च दुनियादारी वाचल असल्यामुळे असा वाटत होत की भोसडीचा दिग्दर्शक काय डोक्यावर पडला होता काय भेंडी………
दुनियादारी प्रेमींची ही प्रतिक्रिया सार्वत्रिक आहे. त्यामुळेच शिणुमा पहाण्याचा उत्साह मावळत चाललाय! पण दुनियादारीने केलेल्या जोरदार धंद्यामुळे म्हणूया हवं तर सुशिंच्या इतर कादंबर्‍यांकडे चित्रपट निर्मात्यांचं लक्ष गेलं तर फार बरं होईल. विशेषतः दारा बुलंद आणि मंदार पटवर्धन असलेल्या कादंबर्‍यांकडे.

मी पाहिला 'दुनियादारी'. खुप छान आहे. सु.शिं.ची कादंबरी पण वाचली...अजिबात आवडली नाही....टपोरी संवाद, अधांतरी कथानक. उगाचच ती कादंबरी वाचली, अस झालंय. नसती डोकेदुखी विकत घेतल्याचा मनस्ताप झाला मला.' असो, हे माझ मत आहे, आणि प्रत्येकाची आवड वेगळी असते.

कट्ट्यावरच सगळ जगच अधांतरी असतो हो . एथे फिक्स असते ती दोस्ती,अकरावी पासुन ते वैद्यकिय शिक्षणाची साडेपाच वर्ष अशी तब्बल ७ ते ८ वर्ष या कट्ट्यानेच तर जगवल राव,जो कट्टा जगला त्याच्या मनाचा हळवा कोपरा आहे ही कादंबरी....तुम्हाला नाही कळणार ते.....

मी पुस्तक वाचलेले नाही. श्रीरंग यांचा राग समजु शकते... ५ पॉइंट समवन वाचल्यानंतर जेव्हा ३ इडियट हा डोक्यात जाणारा चित्रपट बघितला तेव्हा मला सुध्दा असाच त्रास झाला होता... तारे जमीं पर मधे समंजस वाट्णारा अमीर खान, यात आपल्या शिक्षकांनाच अक्क्ल शिकवत होता... मोना सिंग आणि जावेद जाफ्री यांनी जो उच्छाद मांडला त्या बद्दल काय बोलणार.. आजच दुनियादारी पुस्तक मैत्रिणीकडुन मागवले आहे.. बघुया कसे वाटते ते.....